Pages

Sunday 20 November 2011

काय करावे कळेना, कुणाचेच कुणाशी जुळेना


सेनेच्या कुटीलतेमुळे भाजप अडचणीत
राष्ट्रवादीला पोखरतोय ‘उंदीर’
कॉंग्रेसमध्ये एकछत्री कारभार
केवळ व्यक्तीगत स्वार्थावर केंद्रित झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असुनही राजकीय पक्षांची रणनिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस  या पक्षांमध्ये होणार असे चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी प्रथमच निवडणुक रिंगणात उतरणार अशी चर्चा असली तरी त्या दृष्टीने तयारी दिसत नाही. शिवसेनेचा स्थानिक नेता कुटील नितीचा अवलंब करून आपले लयास जात गेलेले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे. कॉंग्रेस मध्ये असलेला एक मोठा गट नुकताच राष्ट्रवादी मध्ये आल्याने पक्ष सशक्त झाला आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणुन प्रोजेक्ट करण्याचा पक्षाचा मानस असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रवादीला होऊ शकतो. मात्र बेलोरकरांच्या वर्चस्वाला तिरप्या नजरेने पाहणारा एक गट राष्ट्रवादीत आहे. या गटाला नगराध्यक्षपद आपल्याच खिशात असावे अशी तिव्र ईच्छा आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नियोजनाची सुत्रे याच गटाकडे आहेत. मात्र नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जाणा-या श्याम बेलोरकरांना निर्णय प्रक्रीयेमध्ये फारसे महत्व दिल्या जात नसल्याने राष्ट्रवादी मध्ये दोन गटात कुरबुर सुरू आहे. केवळ जातीच्या राजकारणाचा आधार घेऊन ईकडे तिकडे उड्या मारणारा एक ‘उंदीर’ राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये पोकळी निर्माण करीत आहे. यापुर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नगरसेविकेला नगराध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हेतुने हे सगळे कारस्थान सुरू आहे. याच उठाठेवीचा एक भाग म्हणुन राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवाराला प्रभाग एक मधुन हटवुन शिवसेनेच्या उमेदवारासाठी मैदान मोकळे करण्याचाही घाट रचला जात आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सकारात्मकतेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कॉंग्रेसमध्ये अगदी याऊलट चित्र आहे. नगर परिषदेसाठी निर्णय घेण्याचे सर्वाधीकार माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना आहेत. अन्य कोणाचीही लुडबूड ऐकल्या जाणार नाही असा अलिखित करारच झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकछत्री असला तरी त्याचा फायदाच कॉंग्रेसला होणार आहे.
भाजप व शिवसेनेची युती व्हावी असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी शिवसेनेने कुटील डाव खेळुन सर्व महत्वाच्या जागा आपल्याकडे ठेवुन घेतल्या. दबावात येऊन सेनेशी सलगी करणारा भाजप मधला एक गट सोडला तर उर्वरीत भाजप कार्यकत्र्यांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे झुकण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुक लढविणे श्रेयस्कर असल्याची अनेक कार्यकत्र्यांची भावना आहे. एकंदरीतच युती झाली तरी मनोमिलन मात्र होणार नाही हेच वर्तमान परिस्थितीवरून दिसते.
गेली पाच वर्षे एकमेकांचे पाय ओढुन घाटंजी शहराला एखाद्या खेड्यापेक्षाही दयनिय केलेल्या नगर परिषदेच्या महाभागांमध्ये निवडणुक काळातही समन्वय असल्याचे दिसत नाही. मतदार राजा मात्र या सर्व घडामोडींवर मोठ्या हुशारीने लक्ष ठेऊन ८ डिसेंबरची वाट पहात आहे.
साभार:- देशोन्नती 

No comments:

Post a Comment