Pages

Showing posts with label कॉंग्रेस. Show all posts
Showing posts with label कॉंग्रेस. Show all posts

Monday, 29 September 2014

आर्णी-केळापुर मतदार संघात उमेदवारीची अभुतपुर्व ओढाताण

भाजप नेत्यांनी विश्वासाहर्ता गमावली
कॉंग्रेसपुढे मतदारांच्या नाराजीचे आव्हान
सर्वसामान्य मतदार अजुनही संभ्रमावस्थेत
युती व आघाडीमध्ये झालेला घटस्फोट व त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आर्णी-केळापुर विधानसभा मतदार संघात सध्या उमेदवारीसाठी अभुतपुर्व ओढाताण पाहायला मिळत आहे. पक्षनिष्ठा, कार्यकत्र्यांच्या भावना अशा सर्वच गोष्टी आमदारकीच्या स्वप्नापुढे गौण ठरत आहेत. उमेदवारीसाठी पक्ष बदल केल्याने नेमका कोण कोणत्या पक्षाचा आहे हे निवडणुक आयोगाने अंतिम यादी जाहिर केल्यावरच लक्षात येईल असे चित्र आहे. 
उमेदवारीसाठी पक्ष बदल करण्याचा हा प्रकार यावेळी महाराष्ट्रात प्रकर्षाने दिसुन आला. आर्णी - केळापुर देखिल यातुन सुटले नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार धर सोड प्रवृत्तीमुळे पक्षाची प्रतिमा चांगलीच डागळल्या गेली आहे. उमेदवारी देतांना वेळोवेळी बदललेल्या निर्णयांमुळे या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांची विश्वसनियताच दावणीला बांधल्या गेल्याची चर्चा आहे. 
विद्यमान आमदार असतांनाही गेल्या निवडणुकीत भाजपाने डॉ.संदिप धुर्वे यांना उमेदवारी न देता दुस-या मतदार संघातून उमेदवार आयात केला. तरी देखिल डॉ.धुर्वे यांनी बंडखोरी न करता गेली पाच वर्ष पक्षासोबत एकनिष्ठता दाखविली. यावेळी ते उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. यावेळी त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळणार असा दावा केल्या जात होता. मात्र काही वरिष्ठ नेत्यांनी राजु तोडसाम यांच्या उमेदवारीसाठी पाठपुरावा केल्याने तोडसाम यांची उमेदवारी निश्चित होणार असे स्पष्ट चित्र दिसल्याने डॉ.संदिप धुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवीली. 
एक माजी आमदार असलेला उमेदवार मिळत असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष डॉ.धुर्वे यांना उमेदवारी देण्यास ईच्छुक होते. डॉ.धुर्वेंनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेले सेनेचे युवा कार्यकर्ते डॉ.विष्णु उवंâडे नाराज झाले व त्यांनी थेट पक्ष बदल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीने गेलेले राजु तोडसाम यांना ऐनवेळी ए.बी.फॉर्म हा उद्धव येरमे यांचा आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपविभागीय कार्यालय परिसरात भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. अखेर येरमे यांनी भाजपाकडून व तोडसाम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र त्या नंतर पुन्हा राजकारण शिजले व उद्धव येरमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भाजपाची उमेदवारी पुन्हा एकदा राजु तोडसाम यांच्या पदरात पडली आहे. मात्र या संभ्रमावस्थेमुळे भाजपाची प्रतिमा डागाळल्या गेली आहे.
राज्याचे सामाजीक न्यायमंत्री व मतदारसंघाचे सर्वाधीक काळ प्रतिनिधीत्व केलेले ना.शिवाजीराव मोघे यांच्याप्रती नाराजीचा सुर असला तरी गेल्या वर्षभरापासुन ते निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना उमेदवारीतच बराच काळ गुंतून राहावे लागल्याने ना.मोघे यांचे पारडे आपसुकच जड झाले आहे. शिवाय कार्यकत्र्यांची भक्कम फळी असल्याने त्यांना लोकांपर्यंत पोहोचणे कठिण जाणार नाही. मात्र ते लोकांची नाराजी कशी कमी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ना.मोघे यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचे तोंड दाखविणा-या डॉ.संदिप धुर्वे यांनी आमदारकीच्या काळात केलेली अनेक कामे ही त्यांची जमेची बाजु आहे. शिवाय ना.मोघेंना फक्त धुर्वेच पराभुत करू शकतात अशी भावनाही मतदार संघात रूजल्या गेली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने का कोण जाणे पण त्यांना दोन वेळ दगा दिला. विद्यमान आमदार असतांना गेल्या निवडणुकीतही डॉ.धुर्वेंना भाजपाने उमेदवारी दिली नव्हती. तेव्हा उमरखेडचे आमदार अनिल इंगळे हे भाजपाचे उमेदवार होते. मात्र ते डमी उमेदवार असल्याची चर्चा झाल्याने त्यांचा दणदणीत पराभव झाला. त्यावेळी डॉ.संदिप धुर्वे यांनी राजकीय डावपेचांकडे दुर्लक्ष केल्याने उमेदवारी गमावली व यावेळीही नेमके तसेच झाले. शिवाय त्यांना भाजपाचे स्थानिक व जिल्हा पदाधिकारी तसेच नेत्यांची मर्जी सांभाळता आली नाही.

आता भाजपाचे "लेटेस्ट" अधिकृत उमेदवार असलेले राजु तोडसाम यांच्याकडे तरूण कार्यकर्त्याची चांगली फळी आहे. उमेदवारीसाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासुन पुर्वतयारीही केली आहे. शिवाय प्रमुख नेतेही त्यांच्या बाजुने अनुवूâल आहेत. त्यामुळे ते आता नव्या दमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यात शंका नाही. मात्र पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरीत मतदार संघात ते फारशे परिचीत नाहीत. त्यांच्या संपर्वâही तेवढा नाही. त्यामुळे ना.मोघे व डॉ.धुर्वे यांच्या तुलनेत ते नवखे म्हणुन गणल्या जातील. मात्र तरी देखिल लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट या निवडणुकीतही चालली तर त्याचा त्यांना कितपत फायदा होतो हे देखिल महत्वाचे ठरणार आहे. एकुणच आर्णी-केळापुर मतदारसंघात कॉग्रेस, शिवसेना व भाजपामध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच रा.कॉ.चे विष्णु ऊवंâडे हे किती मते घेणार यावरही विजयाचे गणित अवलंबुन राहिल.

Sunday, 14 September 2014

घाटंजी पंचायत समितीत अभद्र युती

ना.मोघे गटाला जबर धक्का
सभापती कॉंग्रेसचे शैलेश इंगोले, उपसभापती भाजपाचे रमेश धुर्वे







कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीमुळे ना.शिवाजीराव मोघेंच्या विरोधी गटाने थेट भाजपाशी हात मिळवणी करीत सभापतीपद मिळविले. तर उपसभापतीपद आयतेच भाजपाच्या पदरात टाकले. ऐन विधानसभेच्या तोंडावर घाटंजी पंचायत समितीमध्ये झालेल्या या अभद्र युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश इंगोले विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसच्याच सुवर्णा निकोडे यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. तर उपसभापतीपदी भाजपाचे रमेश धुर्वे यांनी बाजी मारली. त्यांनी कॉंग्रेसच्या रूपेश कल्यमवार यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. 
गेल्या २-३ दिवसांमध्ये घाटंजी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वर्तमानपत्रातून व्हिप बजावला होता. मात्र ना.मोघेंच्या विरोधी गटाने यावर कुरघोडी करत जिल्हाध्यक्षांचा व्हिप तर धुडकावलाच शिवाय गटनेते म्हणुन शैलेश र्इंगोले यांनी देखिल व्हिप काढला. अखेर आज निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचा एक गट व भाजपाचे सदस्य एकत्र आल्याने चित्र स्पष्ट झाले. एकीकडे राज्याच्या राजकारणात कॉंग्रेस भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष व दुसरीकडे घाटंजी मध्ये कॉंग्रेस व भाजपाचे एकत्र आलेले झेंडे पाहुन सर्वसामान्य मतदार मात्र बुचकळ्यात पडला आहे. 
राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जि.प.सदस्य देवानंद पवार यांच्यात निर्माण झालेल्या दुफळीमुळे घाटंजी तालुका कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अवघा जिल्हा अनुभवत असतांना एकेकाळी ना.मोघेंचे मानसपुत्र अशी ओळख असलेल्या देवानंद पवारांनी विधानसभेच्या तोंडावर या निवडणुकीच्या निकालामुळे जबर धक्का दिला आहे. मात्र विधानसभेतही हि अभद्र युती कायम राहणार का? आज कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन असलेले नेते कार्यकर्ते कुणाच्या बाजुने उभे राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस जिंकली...कॉंग्रेस हरली !
अवघे बोटावर मोजण्याईतके सदस्य असलेल्या घाटंजी पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसच कॉंग्रेसच्या विरोधात असल्याने विजय व पराभवाचा एकत्रीत अनुभव घेण्याचा दुर्मिळ योग पक्षाला मिळाला. तर कॉंग्रेस व भाजपाचे नवनियुक्त पदाधिकारी विजयी मुद्रेत बाहेर पडत असतांना माळी महासंघ व काही संतप्त कार्यकत्र्यांकडून मुर्दाबादचे नारे लागल्याने आनंदावर थोडे विरजणही पडले. शेकडो कार्यकत्र्यानी गद्दारांना हाकला, देवानंद पवार मुर्दाबाद, शैलेश इंगोले मुर्दाबाद असे नारे लावले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते. भाजपाने कॉंग्रेसला निवडणुक कक्षात दिलेली साथ रस्त्यावरही दिसुन आली. भाजप व कॉंग्रेस कार्यकत्र्यांची आपापल्या झेंड्यांसह निघालेली विजयी मिरवणुक अभुतपुर्व ठरली. या निवडणुकीत भाजपाने सत्तेसाठी चक्क कॉंग्रेसचा हात धरल्याने पद मिळवुनही नैतिक पराभव करून घेतला आहे. भाजप सदस्य तटस्थ राहिले असते तर एक चांगला संदेश मतदारांमध्ये गेला असता. तालुक्यात पहिल्यांदाच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाचे सदस्य निवडुन आले. मात्र एक जबाबदार विरोधक म्हणुन भाजपाचे सदस्य कधीच दिसले नाही.

Tuesday, 8 January 2013

घाटंजी नगराध्यक्षपदी किशोर दावडा



नगर परिषद अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे किशोर दावडा यांची बिनविरोध निवड झाली. एक वर्ष नगराध्यक्षपद सांभाळुन जगदिश पंजाबी यानी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. घाटंजी नगर परिषदेमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आघाडी आहे. सत्तास्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार जगदिश  पंजाबी एक वर्ष, किशोर दावडा सहा महिने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे एक वर्ष व त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी आरक्षणानुसार नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. घाटंजी नगरपरिषदेमध्ये कॉंग्रेस ८, राष्ट्रवादी ४ तर शिवसेना ५ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. सुरूवातीचे अडीच वर्ष नगराध्यक्षपद खुले आहे. तर त्यानंतर अनुसूचित जाती (महिला) करीता आरक्षण निघाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस रा.कॉं.आघाडीमध्ये एकमेव असलेल्या चंद्ररेखा रामटेके यांचेकडेच नगराध्यक्षपद येणार आहे.
आज झालेल्या निवडणुक प्रक्रीयेत सेनेचे संतोष शेंद्रे यानीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दावडा यानी केलेल्या विनंतीनुसार अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली असे शेंद्रे यानी सांगितले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यानी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 

Friday, 28 December 2012

घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांचा राजीनामा



नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांनी आज सायंकाळी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सत्तास्थापनेच्या वेळी ठरल्याप्रमाणे जवळपास एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. आज सायंकाळी ७ वाजेदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला राजीनामा सादर केला. यापुढे नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचेच किशोर दावडा यांची वर्णी लागणार आहे. सहा महिन्यानंतर एका वर्षासाठी राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद देण्यात येईल. तर पुढील अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला साठी राखीव असल्याने ते राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. सध्या घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेस आणी राष्ट्रवादीची सत्ता आहे.

साभार :- देशोन्नती 

वाढदिवसानिमित्य साड्यांचे वाटप



जिल्हा परिषद सदस्य योगेश पारवेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पंगडी येथिल कार्यकर्त्यांनी गरजुंना साड्यांचे वाटप केले. गावातील मान्यवर व कॉंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर चिंचुलवार, रवि मुनेश्वर, संजय माळोदे, देविदास किनेकार, निलेश राऊत, गजानन कुंभारे, अनिता चव्हाण, नामु घोडाम, लक्ष्मण मेश्राम, महादेव कोडापे, संजु काकडे, गजानन चिंचुलवार, गजानन काकडे, विनायक मुनेश्वर, दादाराव मुनेश्वर, जयवंत कनाके यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 15 March 2012

घाटंजी पं.स.सभापतीपदी शैलेश इंगोले अविरोध सुवर्णा निकोडे उपसभापती


पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत घाटंजी पं.स.सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश महादेव इंगोले व उपसभापतीपदी कॉंग्रेसच्याच सुवर्णा राजेश निकोडे यांची अविरोध निवड झाली.
सहा सदस्यीय घाटंजी पंचायत समिती मध्ये कॉंग्रेसचे ४ तर भाजपाकडे २ सदस्य आहेत. कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झाला. कॉंग्रेसमधीलच पारवेकर गटाने रूपेश कल्यमवार यांच्यासाठी सुरूवातीला जोर दिला. मात्र चर्चेअंती ठराविक कालावधीनंतर सभापतीपद पारवेकर गटाकडे जाणार असल्याने कल्यमवार यांचे नामांकन दाखल करण्यात आले नाही.
विरोधी पक्ष भाजपाच्यावतीने सभापतीपदासाठी नामांकन दाखल करण्यात न आल्याने निवडणुक अविरोध झाली. यावेळी नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्य सुमित्रा पेंदोर, रूपेश कल्यमवार, भाजपाचे रमेश धुर्वे, रत्नमाला कोंडेकर यांची उपस्थिती होती. पीठासीन अधिकारी म्हणुन तहसिलदार संतोष शिंदे, सहाय्यक एस.व्ही.भरडे यांनी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 



Sunday, 5 February 2012

सत्तेच्या उन्मादात वावरणा-यांना धडा शिकविणार-सुरेश लोणकर

सत्ता सांभाळतांना संयम महत्वाचा असतो. मात्र गेल्या काळात तालुक्यातील राजकारणात काही कथित नेत्यांना  सत्तेचा उन्माद चढला आहे. माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही असा तोरा मिरवित माणूसकीला पायदळी तुडवून निघालेल्या राजकीय धेंडांना धडा शिकविण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो अशी प्रतिक्रीया लोकनेते सुरेश लोणकर यांनी दिली. शिवणी जिल्हा परिषद सर्कल व गणातील मतदार बेबंदशाहीला नाकारून राष्ट्रवादीला संधी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
शिवणी गटात राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागला असला तरी त्याचा परिणाम जाणवणार नसल्याचे त्यांनी प्रकर्षाने सांगितले. बंजारा समाजाचा नेता समजणा-याला सद्यस्थितीत हाच समाज नाकारत असल्याचे चित्र प्रचारादरम्यान दिसल्याचेही ते म्हणाले. शिवणी गटात सध्या अटीतटीचा सामना सुरू असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, सेना, मनसे व भाजपाचे उमेदवार आपापल्यापरिने प्रचार करीत आहेत. या गटात एकापेक्षा एक उमेदवार उभे ठाकले असल्याने कौल नेमका कोणाला भेटणार यावर सर्वांचेच लक्ष आहे. लोकनेते असे बिरूद लावणा-या सुरेश लोणकर यांना स्वत:ची ओळख देण्याची गरज नसल्याने ईतर उमेदवारांपेक्षा त्यांचे वेगळेपण दिसत आहे. सध्या तालुक्यातील पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ यासह सहकार क्षेत्रावर त्यांची चांगली पकड असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. जिल्हा परिषदेतील अभ्यासू व्यक्तीमत्व अशी त्यांची ख्याती आहे. घाटंजी तालुक्यातील राजकारणात बाबु व अण्णा यांच्या जोडीने राजकीय समिकरणे बदलली आहेत. यावेळी अण्णासाहेब पारवेकर व सुरेश लोणकर हे एका बाजूने असल्याने गठ्ठा मते निकालाची दिशा बदलू शकतात. त्यामुळे शिवणी गटात सुरेश लोणकर यांना जनतेचा पाठींबा मिळणार असा कयास लावल्या जात आहे. शिवणी गटात बंजारा तांड्यावर अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आपला संताप कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचार फलकावर काढल्याचे चित्र अनेक ठिकाणी नजरेस पडले. नागरिकांनी होर्डींग फाडुन आपला राग व्यक्त केल्याची माहिती आहे.
साभार :- देशोन्नती

Thursday, 2 February 2012

शिवणीत ‘कन्फ्युजन’!


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शिवणी जि.प.सर्कल मधील मतदार अजुनही संभ्रमावस्थेतून निघालेला दिसत नाही.
राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यात झालेल्या ओढाताणीनंतर काहीसे स्थैर्य आल्यासारखी स्थिती निर्माण झाली असली तरी सर्व चर्चीत उमेदवारांची गर्दी या सर्कलमध्ये झाल्याने मतदार राजा अस्थिर झाला आहे.
शिवणी जि.प.गटात सध्या रा.काँ.चे सुरेश लोणकर, कॉंग्रेसचे देवानंद पवार, मनसेचे प्रशांत धांदे, सेना-विदर्भ जन आंदोलन समितीचे मोहन जाधव, भाजपाचे विशाल कदम, अपक्ष जितेंद्र ठाकरे हे उमेदवार आहेत. यामधील विशाल कदम वगळता ईतर उमेदवार राजकीय पार्श्वभूमी लाभलेले व या ना त्या कारणावरून चर्चेत राहणारे आहेत. त्यामुळे यापैकी नेमकी कोणाची निवड करायची हा प्रश्न मतदारांना पडला आहे.
कॉंग्रेसच्या देवानंद पवार यांच्या गेल्या पाच वर्षातील उठाठेवी केवळ घाटंजी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा चर्चिल्या गेल्या. एकदा तर ‘पोपटपंची’ केल्याबद्दल सेना आमदाराकडून त्यांना ‘प्रसाद’ही मिळाला. सत्तेच्या उन्मादात वावरण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमूळे त्यांना समाजात झिडकारल्या जाणे स्वाभाविक आहे. अशा उमेदवाराच्या विरोधात राजकारणामध्ये आपले आयुष्य घालविणा-या सुरेश लोणकर यांना लढावे लागत आहे. त्यातच मोठ्या अपेक्षेने कॉंग्रेस मधुन राष्ट्रवादीमध्ये आलेल्या लोणकरांची योग्य ‘वेळ’ साधल्या गेली नाही. राज्य साक्षरता परीषदेच्या अध्यक्षपदासह अनेक पदे भुषविणा-या जेष्ठ व्यक्तीला जिल्हा परीषदेच्या क्षुल्लक तिकीटासाठी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे झगडावे लागले हे आणखी एक दुर्दैव !
तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर लोणकर यांची पकड आहे. ग्रामीण भागातील जनसंपर्कही दांडगा आहे. मात्र अनेकदा एखाद्या पदावर बसवितांना त्यांचे कुटूंबप्रेम आडवे येते हे वास्तव आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकीमध्ये त्यांनी कुटूंब व आप्तांना प्राधान्य दिल्याची उदाहरणे आहेत. अशावेळी निष्ठेने कार्य करणारे कार्यकर्ते मात्र दुर्लक्षील्या गेले हा भाग अलाहिदा. केवळ घाटंजी तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या सुरेश लोणकर यांना आजवर त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळाली नाही. 
त्यांचा सध्याचा गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना शिवणी मध्ये अतिक्रमण करावे लागले. मात्र येथे लढण्याच्या हेतूने आतापर्यंत पुर्वतयारी करणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले. तिकीट वाटण्याची ‘पत’ असतांना तिकीट मागण्याची वेळ का यावी हा प्रश्नही विचारल्या गेला. लोणकरांशी स्पर्धा असलेल्या देवानंद पवार यांना ईतरांना बोटावर नाचविण्याची कला अवगत आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. मात्र या कलेचा वापर मर्यादेबाहेर झाल्याने सर्वांनाच त्याचा विट आला आहे. तरी देखिल पैशाने सर्व काही शक्य असल्याचा ‘अर्थ’ काढुन ते अजुनही आपल्याच मस्तीत वागत आहेत. अशा या मिश्र परिस्थितीमध्ये पवार यांना मारक ठरू शकणारे मोहन जाधव आणी लोणकरांच्या मतांवर डल्ला मारू शकणारे जितेंद्र ठाकरे व प्रशांत धांदे यांच्यामुळे शिवणीतील वातावरण सध्या संभ्रमीत करणारे आहे. या विचित्र लढतीत कोण सरस ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी शिवणी सर्कल मधील मतदार व राजकीय वातावरण ‘कन्फ्युज’ करणारेच आहे.
साभार :- देशोन्नती

पारवा जि.प.गटात कॉंग्रेस भाजपा मध्ये खरी लढत


गेल्या महिन्याभरापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता ख-या अर्थाने औपचारीक प्रचाराला सुरूवात झाली आहे. विवीध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी नुकतीच नारळ फोडून प्रचाराची सुरूवात केली. पारवा जिल्हा परिषद गटात सध्या कॉंग्रेस व भाजप या दोन पक्षांमध्ये लढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी मात्र प्रचारात कमी पडत असल्याचे दिसत आहे. या गटात एकुण पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये कॉंग्रेसकडून आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर, भाजपाकडून रमेश यमसनवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस सुहास पारवेकर, सेनेचे शे.आसिफ शे.चांद व अपक्ष उमेदवार अविनाश ठाकरे यांचा समावेश आहे. देशमुख - पारवेकर घराण्यातील दोन उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र सुहास पारवेकर यांची राजकारणातील ही पहिलीच ईनिंग असल्याने त्यांना जेष्ठ नेत्यांच्या भरवशावरच अवलंबुन राहावे लागत आहे. योगेश पारवेकरांना आमदार निलेश पारवेकरांचे भक्कम पाठबळ आहे. मागील निवडणुकीत बंडखोर अपक्ष उमेदवार स्वामी काटपेल्लीवार यांना सहकार्य करणारे ना.मोघे हे सुद्धा यावेळी योगेश पारवेकरांच्या बाजुने आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा गड मजबुत आहे. मात्र दोन पारवेकरांच्या लढाईत भाजपाचे रमेश यमसनवार हे सुद्धा तगडे आव्हान देत आहेत. यमसनवार हे एकेकाळी ना.मोघेंचे खंदे समर्थक होते. कॉंग्रेस व मोघे समर्थीत उमेदवाराच्या प्रचाराची धुरा त्यांच्याच खांद्यावर राहात होती. यावेळी उमेदवारी मिळणार अशी आशा त्यांना होती मात्र तसे न झाल्याने त्यांनी भाजपाच्या उमेदवारीवर निवडणुक रिंगणात उडी घेतली. पारवेकरांच्या गडात भाजपाची अनपेक्षीत हवा निर्माण झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.  या गटात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातच लढ़त होणार अशी शक्यता पुर्वी वर्तविण्यात येत होती. मात्र आता ही लढत कॉंग्रेस-भाजप अशी झाली आहे. भाजपासोबत असलेला हा ‘माहौल’ मतदानात परिवर्तीत होणार का ?  याबाबत तर्कवितर्क केल्या जात आहेत. 
प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असुन प्रचार कार्यात फिरणा-यांची बडदास्त ठेवून त्यांची ‘सोय’ लावतांना उमेदवारांच्या नाकी नऊ येत आहे. 
साभार :- देशोन्नती

Tuesday, 31 January 2012

कॉंग्रेस राष्ट्रवादीला घराणेशाहीचीच परंपरा-भाजप

रमेश यमसनवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ








कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना घराणेशाहीची परंपरा असुन सर्वसामान्यांचा त्या पक्षात विचार केला जात नाही असे एकमुखी वक्तव्य भाजपाच्या नेत्यांनी पारवा येथे केले. पारवा गटातील भाजपाचे उमेदवार रमेश यमसनवार यांचेसह पारवा गणाच्या अरूणा महल्ले व कुर्ली गणाचे गजानन गाऊत्रे या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ येथिल गणपती मंदिरात फोडण्यात आला. 
यावेळी माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा, उद्धव येरमे, मुकुंद कदम, अशोक यमसनवार, वासुदेव महल्ले, दत्ता कोंडेकर, देवानंद काळे, संजय सवळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हजारो कार्यकर्त्यांसह प्रचाराला सुरूवात करण्यात आली. जनसामान्यांमध्ये वावरणारे रमेश यमसनवार यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस रा.काँ.ला त्याची मळमळ सुटली असुन हा मालकशाही विरोधातील संघर्ष असल्याची प्रतिक्रीया भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केली. शेतक-यांशी निगडीत व्यवसाय असल्याने शेतकरीवर्गात यमसनवार यांचेविषयी आदर आहे. आजवर शेतक-यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमूळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयात यमसनवार यांची महत्वाची भुमिका होती. यावेळी त्यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे कॉंग्रेस व रा.कॉ. ला चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहे.

Saturday, 21 January 2012

कोण गटस्थ, कोण तटस्थ आणी कोण कटस्थ हे गुलदस्त्यातच

शिवणीत रा.कॉ.चा "तिन तिघाडा"
पारवा गटात कॉंग्रेसची गोची
उमेदवारी मिळविण्यासाठी लागतोय कस

वातावरणात अंग गोठवणारा गारवा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून गरमागरमी सुरू आहे. राष्ट्रवादी मध्ये नव्यानेच आलेल्या नेते व कार्यकर्त्यांमुळे आजवर तालुक्यात राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारे नेते दुखावल्या गेले आहेत. प्रबळ दावेदार वाढ़ल्याने शिवणीमध्ये रा.कॉ. व पारव्यात कॉंग्रेसला निर्णय घेणे कठीण जात आहे
बाजार समिती सभापती निवडीदरम्यान झालेल्या मतभेदांमुळे आजवर ना.मोघेंना समर्थन देणारे जि.प.सदस्य सुरेश लोणकर कॉंग्रेसमधुन रा.कॉ.मध्ये आले. त्यांच्यासोबत एक मोठा कार्यकर्ता वर्ग असल्याने राष्ट्रवादीमध्ये त्यांचा दबावगट वाढ़ला. त्यामुळे जिल्हा परिषदेत त्यांची उमेदवारी निश्चित समजल्या जात होती. मात्र त्या मतदार संघात आजवर कार्य करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकोषाध्यक्ष व कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर हे या निर्णयामुळे दुखावल्या गेले. उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुक लढवायचीच असा चंग बांधुन ते आज नामांकन दाखल करणार आहेत. शिवणी मतदार संघासाठीच रा.कॉ.कडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार सदाशीव ठाकरे यांचे पुत्र जितेंद्र ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. ते सुद्धा आज उमेदवारी दाखल करतील. तर सुरेश लोणकरांनी काल मोठे शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. त्यामुळे शिवणी मध्ये उमेदवारी मिळविण्यासाठीच जोरदार रस्सीखेच राहणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी उमेदवारी कायम ठेवली नाही तरी ते पक्षाने निवडलेल्या उमेदवाराला साथ देणे कठीण आहे. ते तटस्थ राहिले तर ठिक मात्र जर त्यांनी पक्षाच्या विरोधात प्रचार केला तर प्रतिस्पर्धी उमेदवाराची वाट मोकळी होणार आहे.  नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही पदाधिका-यांनी पक्षविरोधी प्रचार करून प्रभाग २ मध्ये शिवसेनेला खुले सहकार्य केले होते. तसेच प्रभाग १ मध्येही राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांनी आपल्या विजयासाठी सेनेच्या ईतर उमेदवारांना सहकार्य केले. तिच परिस्थिती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसुन येत आहे. पार्डी जि.प.गटात राष्ट्रवादीचे पं.स.सदस्य सहदेव राठोड यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असा अंदाज बांधल्या जात होता. सहदेव राठोड हे पंचायत समितीत रा.कॉ.चे एकमेव सदस्य असुनही त्यांनी अत्यंत जबाबदारीने विरोधी भुमिका बजावली. एक अभ्यासू व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यास पुढ़े येणारे सदस्य अशी त्यांची ख्याती असल्याने पार्डी गटासाठी त्यांच्या पत्नीला जनसमर्थनही मिळू शकले असते. मात्र तेथे बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे यांच्या पत्नीला संधी देण्यात आली. अण्णासाहेब पारवेकरांचा आदेशच सर्वस्व मानणारे असल्यामुळे डंभारे यांना त्याचे फळ मिळाले. सहदेव राठोड यांनीही मोठ्या मनाने पक्षाच्या आदेशाचा सन्मान राखत  पार्डी गणातून उमेदवारी घेऊन समाधान मानले. पारवा जि प  सर्कलमध्ये मागील निवडणुकीप्रमाणेच कॉंग्रेस अडचणीत सापडली आहे. कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश नसतानांही केवळ ना.मोघेंच्या कार्यक्रमात हजेरी लावणारे जि.प.सदस्य स्वामी काटपेल्लीवार व यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर यांच्यात कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी तुल्यबळ स्पर्धा रंगली आहे. मागील निवडणुकीत निलेश पारवेकरांनी आपले राजकीय वजन वापरून वेळेवर ए.बी. फॉर्म आणल्याने काटपेल्लीवार यांची गोची झाली होती. मात्र ना.मोघेंनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने तेव्हा स्वामी काटपेल्लीवार अवघ्या काही मतांच्या फरकाने निवडून आले होते. रा.कॉ.कडून सुहास पारवेकर व भाजपाकडून रमेश यमसनवार हे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना गटबाजीने ग्रासले असल्याने नेमकी कोणाची काय भुमिका राहणार हे कळायला मार्ग नाही. उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले नेते तटस्थ राहणार, उमेदवारी कायम ठेवणार की, उमेदवारी मागे घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करून ‘कटस्थ’ होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती

नामांकन दाखल करतांना कॉंग्रेस रा.कॉ.चे शक्तीप्रदर्शन

शिवणी गट ठरतोय दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा 





नामांकन दाखल करण्याच्या तिस-या दिवशी जि.प.व पं.स. साठी १२ उमेदवारानी नामांकन अर्ज दाखल केले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस साठी ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली असल्याने नामांकन दाखल करतांना दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आज दाखल झालेल्या नामांकनामध्ये पारवा जि.प.गटातून अयनुद्दीन सोलंकी, मधुसूदन मोहुर्ले, सुहास देशमुख, पारवा गणातून स्नेहा खडसे, कुर्ली गणातून नितीन नार्लावार, अयनुद्दीन सोलंकी, पार्डी गटातून मंदा डंभारे, पार्डी गणातून छाया सहदेव राठोड, शिवणी गटातून सुरेशबाबू लोणकर, देवानंद पवार, शिवणी गणातून संजय आडे, मानोली गणातून सिंधु मेश्राम यांचा समावेश आहे.
नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढ़ली होती. या रॅलीमध्ये माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, जि.प.सदस्य सुरेश लोणकर, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे, रमेश लोणकर, मारोती पवार यांचेसह नगर परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, बाजार समितीचे पदाधिकारी व सदस्यांसह  कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, योगेश पारवेकर, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, सुभाष गोडे, परेश कारीया, सुधाकर अक्कलवार यांचेसह पंचायत समिती, नगर परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांसह सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात नागरीक आल्याने तहसिल कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

Friday, 13 January 2012

आता घाटंजी तालुक्यातील नेत्यांच्या अस्तित्वाची परिक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष, नेते व कार्यकर्त्यांची लगबग वाढ़ली आहे. काही नेत्यांना तर निवडणुक पुढे दिसताच ग्रामिण भागातील जनतेचा पुळका येतो. मात्र निवडणुकीच्या अगोदर विकासकामांचा देखावा उभा केला तर काय होते हे नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येईल. मात्र नेते परिणामांची चिंता न करता पाऊले उचलत आहेत ही त्यांच्यासाठीच धोक्याची घंटा आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील आमदार खासदारांच्या अस्तित्वाचीच परिक्षा या निवडणुकीतुन होणार आहे. तिन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या जागांसाठी ही निवडणुक होणार आहे. नगर परिषद निवडणुकीपुर्वी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेश लोणकर आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीमध्ये आल्याने कॉंग्रेसची ताकत अर्ध्यावर आली असे मानल्या जात आहे. मात्र असे असले तरी नगर परिषद निवडणुकीमध्ये या अपेक्षीत असा पक्षांतराचा काहीच प्रभाव दिसला नाही. उलट राष्ट्रवादीला एका जागेचे नुकसान झाले. लोणकरांची शहरात फारसी पकड नसली तरी ग्रामिण भागात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. सध्या तालुक्यातील सहकारी संस्थांवर त्यांचेच वर्चस्व आहे. लोणकरांना शिवणी सर्कलमधुन राष्ट्रवादीची उमेदवारी जवळजवळ निश्चित समजल्या जात आहे. मात्र त्यामुळे या जागेसाठी ईच्छुक असणारे राष्ट्रवादीतील मुळचे दावेदार दुखावल्या जाणार हे निश्चित. ते खुल्या दिलाने सहकार्य करणार का यावरही बरेच काही अवलंबुन राहणार आहे. मागील निवडणुकीत  पारवा सर्कलमधुन कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभुत करून निवडुन आलेले अपक्ष जि.प.सदस्य स्वामी काटपेल्लीवार सध्या कॉंग्रेसच्याच गोतावळ्यात मिरवतांना दिसतात. कॉंग्रेस पक्षात प्रवेश झालेला नसला तरी कॉंग्रेसच्या प्रत्येकच कार्यक्रमात त्यांची आवर्जुन हजेरी असते. यावेळी पारवा सर्कलमधुन आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे काटपेल्लीवार यावेळीही अपक्ष उमेदवारी दाखल करणार की त्यांच्या ‘पुनर्वसनाची’ व्यवस्था करण्यात आली आहे हे लवकरच स्पष्ट होईल. सध्याच्या परिस्थितीवरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांचेसह जि.प. व पंचायत समिती मध्ये मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे.
या भागाचे लोकप्रतिनिधी व सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, लोकनेते असे बिरूद लावणारे जि.प.सदस्य सुरेश लोणकर व अण्णासाहेब पारवेकर, तसेच तालुक्यातील एक वजनदार व्यक्तीमत्व तथा यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागणार आहे.

Wednesday, 28 December 2011

घाटंजीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे जगदीश पंजाबी

उपाध्यक्षपदी रा.कॉ.चे अकबर तंव्वर
नगराध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे जगदिश पंजाबी यांचा एकतर्फी विजय झाला. तर न.प.उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर तंव्वर विजयी झाले. नामनिर्देशीत सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे तसेच संजय राऊत यांची वर्णी लागली. नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे जगदिश पंजाबी व सेनेच्या शर्मिला उदार यांनी नामांकन दाखल केले होते. यामध्ये १३ नगरसेवकांनी पंजाबी यांच्या बाजुने तर केवळ ४ नगरसेवकांनी शर्मिला उदार यांच्या बाजुने मतदान केले. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर तंव्वर व सेनेच्या सरोज पडलवार यांनी नामांकन दाखल केले होते. तंव्वर यांना १३ व पडलवार यांना ४ मते पडली. गटनेत्यांच्या निवडीवर शिवसेनेने मोठ्या दिमाखाने आक्षेप घेतला होता. मात्र पीठासीन अधिका-यांनी तो फेटाळला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्याने नगराध्यक्षपदी पंजाबी यांची निवड जवळजवळ निश्चित झाली होती. सकाळी १० वाजता निवडणुक प्रक्रीयेला सुरूवात झाली. दुपारी २ वाजताच्या सुमारास निकाल घोषीत झाला. यावेळी नगर परिषदेच्या परिसरात नागरीकांची प्रचंड गर्दी जमली होती. निकालानंतर शहरातुन विजयी मिरवणुक काढण्यात आली.  पीठासीन अधिकारी म्हणुन उपजिल्हाधिकारी एस.पी.झंझाड होते. मुख्याधिकारी गिरिश बन्नोरे तसेच नगर परिषद कर्मचा-यांनी निवडणुक प्रक्रीया पार पाडली. पोलीस उपनिरिक्षक अरूण कोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Monday, 19 December 2011

घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेस-रा.कॉ. आघाडी


नगर परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडी करून सत्ता स्थापीत करणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
नगर परिषदेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नेमकी कोणत्या दोन पक्षांची युती होणार याकडे घाटंजीकरांचे लक्ष लागले होते. आज सायंकाळी दोन्ही पक्षांच्या झालेल्या बैठकीत याबाबत एकमत झाल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. संख्याबळानुसार कॉंग्रेसकडे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला जाईल. निवडणुक निकालात कॉंग्रेसला सर्वाधीक ८ जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ५ तर सेनेकडे ४ नगरसेवक आहेत. निकालानंतर रा.कॉ.-सेना युती होणार असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र शिवसेनेशी वैचारीक सामंजस्य होण्याची शक्यता नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कॉंग्रेस सोबतच हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यातच जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांचेसह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे या दोन पक्षात पराकोटीचे वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर मनोमिलन होणार की नाही याबाबत सर्वच साशंक होते. मात्र केंद्र व राज्यात असलेल्या आघाडीचा आधार घेऊन व शहर विकासाच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी एक चांगला निर्णय घेतल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
साभार:- देशोन्नती

Monday, 12 December 2011

घाटंजी न.प.निवडणुकीत संमिश्र निकाल

कॉंग्रेसला आघाडी पण बहुमत नाही
रा.कॉ.५ तर सेना ४ जागी विजयी
सेनेमुळे भाजपाला भोपळा


नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज जाहिर झालेल्या निकालात कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली असुन निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीची असलेली 'हवा' निकालातुन न दिसल्याने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र कॉंग्रेसलाही केवळ एका जागे अभावी सत्तेपासुन दुर रहावे लागणार आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेसला ८, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५ व शिवसेना भाजपाच्या कथित महायुतीला ४ जागी विजय मिळाला. तर यापुर्वी ६ नगरसेवक असलेल्या भाजपाला एकाही जागी विजय मिळवता आला नाही. शिवसेनेशी झालेल्या युतीमुळे भाजपाला हा फटका बसला असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. वर्तमान नगरसेवकांना नागरिकांच्या संतापाचा फटका बसला असुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा विद्यमान नगरसेवक शैलेष ठाकुर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच विद्यमान नगरसेवक दादाराव खोब्रागडे हे देखिल पराभुत झाले. केवळ संगिता भुरे या एकमेव नगरसेविकेला जनतेने पुन्हा संधी दिली. दिग्गजांमध्ये माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी विजयी झाले तर माजी नगराध्यक्ष शाम बेलोरकर,दुर्गा साखरकर, माया मंगाम यांचा पराभव झाला.
जलाराम प्रभाग क्र. १ (अ) मध्ये कॉंग्रेसचे संदिप बिबेकार (१०४७ मते) यानी रा.कॉ.च्या प्रशांत भोरे (६४४ मते), सेनेचे संजय बुल्ले (६४४ मते), अपक्ष दत्ता गटलेवार (९४ मते) व संजय राऊत (२५ मते) यांचा पराभव केला. ब गटात रा.कॉ.च्या संगिता भुरे (१११७ मते) यांनी कॉंग्रेसच्या स्वाती महाजन (७८१ मते), सेनेच्या सुलभा खांडरे (६७९ मते) यांना पराभुत केले. क गटामध्ये शिवसेनेच्या सरोज पडलवार (९९४ मते) यांनी आघाडी घेत  कॉंग्रेसच्या रेखा दोनाडकर (८०५ मते) व रा.कॉ.च्या वच्छला तलमले (७७९ मते) यांचा पराभव केला. ड गटात झालेल्या काट्याच्या लढतीत कॉंग्रेसच्या परेश कारीया (९९१मते) यांनी सेनेचे प्रमुख उमेदवार शैलेष ठाकुर (९३२ मते), रा.कॉ.चे शाम बेलोरकर (६२१ मते) यांना धुळ चारली.
घाटी क्र. २ मध्ये अ गटात सेनेचे संतोष शेंद्रे (७४५ मते) यांनी रा.कॉ.च्या दादाराव खोब्रागडे (५६१ मते), भाजपाचे विजय कासार (३८१ मते), कॉंग्रेसचे मधुकर पेटेवार (५९४ मते), अपक्ष नरेश कुंटलवार (३५६ मते), अजय गजभिये (९२ मते) यांना पराभुत केले. ब गटामध्ये शिवसेनेचे दिनेश उईके (७८६ मते) यांनी कॉंग्रेसच्या सतिष तोडसाम (७१५ मते), राष्ट्रवादीचे संतोष गेडाम (५३१ मते), भाजपाचे श्रावण परचाके (२९० मते), अपक्ष आनंद मडावी (४०१ मते) यांना पराभुत केले. क गटात कॉंग्रेसच्या अर्चना गोडे (८४७ मते) यांनी सेनेच्या सिता गिनगुले (७८२ मते), रा.कॉ.च्या सुधा ठाकरे (४३८ मते), भाजपाच्या दुर्गा साखरकर (३२२ मते), अपक्ष किशोरी चौधरी (३७५ मते) यांचा पराभव केला. ड गटात कॉंग्रेसच्या सिमा डंभारे (९०१ मते) यांनी शिवसेनेच्या सोफिया सैय्यद फिरोज (६८२ मते), रा.कॉ.च्या पुजा दिकुंडवार (४७४ मते), भाजपाच्या नलु मोहिजे (२९८ मते) अपक्ष फरझाना परविन अ रशिद (३४२ मते), विजु राठोड (६४ मते) यांचा दणदणीत पराभव केला. तर इ गटामध्ये सेनेच्या शर्मिला उदार (८५९ मते) यांनी रा.कॉ.च्या सिंधु सिरपुरे (७२० मते), कॉंग्रेसच्या जैबुनबी अफजलखॉ पठाण भाजपाच्या सुनिता गवारकर (३१७ मते), अपक्ष वर्षा जाधव (३५७ मते) व माया मंगाम (१७० मते)यांचा पराभव केला.
राममंदिर प्रभाग क्र.३ मध्ये चारही जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली. येथे अ गटात कॉंग्रेसच्या शोभा ठाकरे (१४६९ मते) यांनी रा.कॉ च्या सारीका उगले (७७५ मते), सेनेच्या सुलभा खांडरे (२६४ मते) यांचा पराभव केला. ब गटात कॉंग्रेसच्या जयश्री दिडशे (धांदे) (१०८३ मते) यांनी रा.कॉ.च्या निर्मला पांडे (५३१ मते), भाजपाच्या ललिता ठाकुर (३९१ मते) यांचा पराभव केला. क गटात कॉंग्रेसच्या जगदिश पंजाबी (१२७७ मते) यांनी रा.कॉ.च्या प्रमोद गिरी (७७५ मते), भाजपाचे विनायक परचाके (१६३ मते), मनसेचे गजानन भालेकर (३०४) यांचा पराभव केला. ड गटात कॉंग्रेसच्या किशोर दावडा (१४८६) यांनी रा.कॉ.च्या अशोक कटकमवार (५७९ मते), अपक्ष रविंद्र ठाकरे (२४५ मते) यांना पराभुत केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र. ४ मध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. येथे अ गटात रा.कॉ.च्या चंद्ररेखा रामटेके (१०५६ मते) यांनी कॉंग्रेसच्या भारती चुनारकर ( ६९१ मते), भाजपाच्या शोभा रामटेके (४०१ मते), अपक्ष चित्रकला देवतळे (१३५ मते) यांना पराभुत केले. ब गटात  रा.कॉ.च्या इंदु परतेकी (१०७५ मते) यांनी कॉंग्रेसच्या शालु गेडाम (७३४ मते), भाजपाच्या नंदा कोडापे (४६७ मते) यांचा पराभव केला. क गटामध्ये राष्ट्रवादीचे राम खांडरे (१३९७ मते) यांनी कॉंग्रेसच्या नरेंद्र धनरे (४४० मते), भाजपाचे स्वरूप नव्हाते (४४६ मते) यांचा दणदणीत पराभव केला. ड गटात रा.कॉ.चे अकबर तंव्वर (९०७ मते) यांनी कॉंग्रेसचे सैय्यद मोहिब सैय्यद लतिफ (४३१ मते), अपक्ष मधुकर निस्ताने (३७१ मते), भाजपाचे अरविंद बोरकर (४१० मते), अपक्ष सुधिर अग्रहरी (१०४ मते), मनसेचे सुधिर उरकुडे (३९ मते), प्रभा शेवरे (२८ मते) यांचा पराभव केला. घाटंजीकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने सत्तेत नेमके कोण येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

'धनुष्य' आला पण 'बाण' गेला

































अडीच वर्ष नगराध्यक्षपद सेनेकडे असतांना मनमानी कारभाराचा फटका शिवसेनेच्या शैलेष ठाकुर यांना बसला. प्रचारादरम्यानही जनतेने त्यांना अनेकदा फटकारले. यापुर्वी सेनेकडे तिन नगरसेवक होते. यावेळी एका जागेची बढत मिळाली असली तरी प्रमुख उमेदवारालाच पराभवाचे तोंड पहावे लागल्याने धनुष्य आला पण बाण गेला अशी परिस्थिती झाली आहे.
निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक सांस्कृतीक भवनाबाहेर जमले होते.

Saturday, 10 December 2011

घाटंजीत रा.कॉ. व कॉंग्रेस मध्ये थेट लढत

सेना भाजप महायुतीचा फुसका बार
नगर परिषदेची निवडणुक आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असुन जाहिर प्रचार थांबला असला तरी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गृहभेटीचा कार्यक्रम मात्र मतदानाची वेळ येईपर्यंत सुरूच राहणार आहे.
कर्णकर्कश आवाजातील प्रचार बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरीक व व्यावसायीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या दोन तिन दिवसात सभा, मोटरसायकल रली, पदयात्रा यामुळे प्रचाराला चांगलाच जोर चढला होता. घाटंजी नगर परिषद क्षेत्रात यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या दोन पक्षातच लढत होण्याची चिन्हे असुन भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या कथित महायुतीला जनता नाकारत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात आलेल्या अनुभवातुन स्पष्ट होत आहे. जनतेतुन मिळत असलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे बेगडी महायुतीचे अवसान गळाले असुन एक दोन विजयाने आपले खाते तरी उघडले जावे अशी प्रार्थना महायुतीचे नेते करीत आहेत. चार प्रभागात बहुतांश ठिकाणी दुहेरी लढत होणार असुन कुठे तिहेरी तर एक दोन ठिकाणी अपक्षांनी कडवे आव्हान दिल्याने चौरंगी लढत रंगणार आहे. या निवडणुकीत आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरलेल्या जलाराम प्रभाग क्र.१ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या दिग्गज उमेदवारांमध्ये प्रतिष्ठेची लढाई राहणार आहे. येथे ना.मा.प्र. गटात रा.कॉ.चे प्रा. प्रशांत भोरे व कॉंग्रेसचे संदिप बिबेकार यांच्यात थेट लढत असुन सेनेच्या संजय बुल्ले यांच्यासह अपक्ष उमेदवारही आहेत. ना.मा.प्र.स्त्री गटामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संगिता भुरे व कॉंग्रेसच्या स्वाती महाजन यांच्यात स्पर्धा राहिल. स्त्रियांसाठी राखीव गटात रा.कॉ.च्या वत्सला तलमले, कॉंग्रेसच्या रेखा दोनाडकर व सेनेच्या सरोज पडलवार यांच्यात लढत होईल. सर्वसाधारण गटात सर्वाधीक स्पर्धा होणार असुन चुरशीची तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अनुभवी उमेदवार श्याम बेलोरकर, कॉंग्रेसचे परेश कारीया यांच्यात समोरासमोर लढत होणार असुन सेनेचे शैलेश ठाकुर देखील स्पर्धेत आहेत. या प्रभागात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
घाटंजीतील सर्वात मोठ्या घाटी प्रभाग क्र.२ मध्ये अनुसूचित जाती गटात कॉंग्रेसचे मधुकर पेटेवार व रा.कॉ.चे दादाराव खोब्रागडे या दोघांमध्ये लढ़त असुन अपक्ष अजय गजभिये यांचीही चर्चा सुरू आहे. या प्रभागात सेना भाजप स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे भाजपाचे विजय कासार व सेनेचे संतोष शेंद्रे हे दोन उमेदवार एकमेकांविरोधात आहेत. येथिल अनुसूचित जमाती प्रभागातुन रा.कॉ.चे संतोष गेडाम, कॉंग्रेसचे सतिष तोडसाम यांच्यात लढत होईल. सेनेचे दिनेश उईके व भाजपाचे श्रावण परचाके व एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे.
ना.मा.प्र.स्त्री गटात राष्ट्रवादीच्या सुधा ठाकरे, कॉंग्रेसच्या अर्चना गोडे व भाजपाच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा साखरकर यांच्यात लढत आहे. अपक्ष किशोरी चौधरी व सेनेच्या सिता गिनगुले सुद्धा येथुन निवडणुक लढवित आहेत. स्त्रियांसाठी राखीव गटात कॉंग्रेसच्या सिमा डंभारे व रा.कॉ.च्या पुजा दिकुंडवार यांच्यात लढत असुन भाजपाच्या नलु मोहिजे, शिवसेनेच्या सै.सुफिया सै.फिरोज यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारही निवडणुक लढवित आहेत. स्त्रियांसाठी राखीव गटात सेनेच्या शर्मिला उदार, राष्ट्रवादीच्या सिंधु सिरपुरे, कॉंग्रेसच्या जैनुबाई अफजलखॉ पठाण व भाजपाच्या सुनिता गवारकर यांच्यात लढत होईल. वर्षा जाधव व माजी नगराध्यक्ष माया मंगाम या दोन अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत.
राममंदिर प्रभाग क्र.३ मध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे ना.मा.प्र.स्त्री गटात कॉंग्रेसच्या शोभा ठाकरे या तळागाळातल्या कार्यकर्त्यां असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य मतदारांची पसंती मिळत आहे. येथे त्यांना सेनेच्या सुलभा खांडरे व रा.कॉ.च्या सारीका उगले यांचे आव्हान राहणार आहे. स्त्रियांसाठी राखीव गटात राष्ट्रवादीच्या निर्मला पांडे व कॉंग्रेसच्या जयश्री दिडशे यांच्यात लढत असुन भाजपाच्या ललिता ठाकुर रिंगणात आहेत. सर्वसाधारण गटात माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी कॉंग्रेस च्या उमेदवारीवर असुन त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमोद मोतीगीर गिरी यांचे कडवे आव्हान राहणार आहे. या गटात अपक्ष उमेदवार संतोष गवळी, म.न.से.चे गजानन भालेकर व भाजपाचे विनायक परचाके देखिल निवडणुक रिंगणात असुन यांना मिळणा-या प्रतिसादावर येथिल निकाल प्रभावीत होऊ शकतो. याच प्रभागातील सर्वसाधारण गटात कॉंग्रेसचे किशोर दावडा व राष्ट्रवादीचे अशोक कटकमवार यांच्यात थेट लढत आहे. येथे रविंद्र ठाकरे हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र.४ कडे सुद्धा घाटंजीकरांचे लक्ष लागले असुन येथे अनुसूचित जाती स्त्री गटात रा.कॉ.च्या चंद्ररेखा रामटेके व कॉंग्रेसच्या भारती चुनारकर यांच्यात लढत असुन अपक्ष चित्रकला देवतळे व भाजपाच्या शोभा रामटेके निवडणुक लढवित आहेत. अनुसूचित जमाती स्त्री गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इंदु परतेकी व कॉंग्रेसच्या शालु गेडाम यांच्यात स्पर्धा आहे. भाजपच्या नंदा कोडापे रिंगणात आहेत. ना.मा.प्र.गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे यांचे कॉंग्रेसच्या नरेंद्र धनरे याना कडवे आव्हान असुन भाजपाचे स्वरूप नव्हाते हे देखिल स्पर्धेत आहेत. या प्रभागातील सर्वसाधारण गटात तब्बल सात उमेदवार असुन कॉंग्रेसचे सै.मोहिब सै.लतिफ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर युसूफ तव्वर, स्टॅम्प पेपरवर राजीनामाच लिहुन दिल्यामुळे चर्चेत आलेले अपक्ष उमेदवार मधुकर निस्ताने, भाजपाचे अरविंद बोरकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. या गटात सुधिर अग्रहरी, प्रभा शेवरे हे अपक्ष उमेदवार व सुधिर उरकुडे हे मनसेचे उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्यामुळे रा.कॉ.चे मनोबल वाढले आहे.
साभार:- देशोन्नती

Sunday, 20 November 2011

काय करावे कळेना, कुणाचेच कुणाशी जुळेना


सेनेच्या कुटीलतेमुळे भाजप अडचणीत
राष्ट्रवादीला पोखरतोय ‘उंदीर’
कॉंग्रेसमध्ये एकछत्री कारभार
केवळ व्यक्तीगत स्वार्थावर केंद्रित झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असुनही राजकीय पक्षांची रणनिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस  या पक्षांमध्ये होणार असे चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी प्रथमच निवडणुक रिंगणात उतरणार अशी चर्चा असली तरी त्या दृष्टीने तयारी दिसत नाही. शिवसेनेचा स्थानिक नेता कुटील नितीचा अवलंब करून आपले लयास जात गेलेले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे. कॉंग्रेस मध्ये असलेला एक मोठा गट नुकताच राष्ट्रवादी मध्ये आल्याने पक्ष सशक्त झाला आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणुन प्रोजेक्ट करण्याचा पक्षाचा मानस असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रवादीला होऊ शकतो. मात्र बेलोरकरांच्या वर्चस्वाला तिरप्या नजरेने पाहणारा एक गट राष्ट्रवादीत आहे. या गटाला नगराध्यक्षपद आपल्याच खिशात असावे अशी तिव्र ईच्छा आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नियोजनाची सुत्रे याच गटाकडे आहेत. मात्र नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जाणा-या श्याम बेलोरकरांना निर्णय प्रक्रीयेमध्ये फारसे महत्व दिल्या जात नसल्याने राष्ट्रवादी मध्ये दोन गटात कुरबुर सुरू आहे. केवळ जातीच्या राजकारणाचा आधार घेऊन ईकडे तिकडे उड्या मारणारा एक ‘उंदीर’ राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये पोकळी निर्माण करीत आहे. यापुर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नगरसेविकेला नगराध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हेतुने हे सगळे कारस्थान सुरू आहे. याच उठाठेवीचा एक भाग म्हणुन राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवाराला प्रभाग एक मधुन हटवुन शिवसेनेच्या उमेदवारासाठी मैदान मोकळे करण्याचाही घाट रचला जात आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सकारात्मकतेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कॉंग्रेसमध्ये अगदी याऊलट चित्र आहे. नगर परिषदेसाठी निर्णय घेण्याचे सर्वाधीकार माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना आहेत. अन्य कोणाचीही लुडबूड ऐकल्या जाणार नाही असा अलिखित करारच झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकछत्री असला तरी त्याचा फायदाच कॉंग्रेसला होणार आहे.
भाजप व शिवसेनेची युती व्हावी असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी शिवसेनेने कुटील डाव खेळुन सर्व महत्वाच्या जागा आपल्याकडे ठेवुन घेतल्या. दबावात येऊन सेनेशी सलगी करणारा भाजप मधला एक गट सोडला तर उर्वरीत भाजप कार्यकत्र्यांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे झुकण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुक लढविणे श्रेयस्कर असल्याची अनेक कार्यकत्र्यांची भावना आहे. एकंदरीतच युती झाली तरी मनोमिलन मात्र होणार नाही हेच वर्तमान परिस्थितीवरून दिसते.
गेली पाच वर्षे एकमेकांचे पाय ओढुन घाटंजी शहराला एखाद्या खेड्यापेक्षाही दयनिय केलेल्या नगर परिषदेच्या महाभागांमध्ये निवडणुक काळातही समन्वय असल्याचे दिसत नाही. मतदार राजा मात्र या सर्व घडामोडींवर मोठ्या हुशारीने लक्ष ठेऊन ८ डिसेंबरची वाट पहात आहे.
साभार:- देशोन्नती 

Sunday, 13 November 2011

घाटंजीत शिवसेनेच्या ‘त्या’ उमेदवारासाठी कॉंग्रेस-रा.काँ. करणार अ‍ॅडजस्टमेंट?

सत्तेत असतांना नगर परिषदेला ‘मालकी’ हक्काने वापरणा-या सेनेच्या नगर सेवकाला या निवडणुकीत नागरिकांच्या संतापामुळे पळता भुई थोडी होणार असल्याने त्याने कॉंग्रेस व रा.-कॉ.या पक्षांसोबत अ‍ॅडजस्टमेंटचे धोरण अवलंबिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सेनेच्या या उमेदवाराच्या वार्डामध्ये आरक्षणामुळे त्याच्यासाठी जागाच उरलेली नाही. मात्र वार्डाबाहेर तिळमात्रही अस्तित्व नसल्याने  निवडुन येणार नाही याची खात्री उमेदवारासह सर्वांना आहे. आपली राजकीय ‘दुकानदारी’ कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केलेल्या या नगरसेवकाने विवीध मुद्द्यांच्या आधारे कॉंग्रेस रा.कॉ.ला दबावात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरक्षणामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले. त्यावेळी कॉंग्रेस व काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वेळोवेळी सेनेला मदत केली. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमातही या नगरसेवकांची उपस्थिती चर्चिल्या गेली होती. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक जिंकली त्या पक्षाला व बहुमताला महत्व न देता दोन्ही कॉंग्रेसचे काही नगरसेवक सेनेला ‘शरण’ गेले. कॉंग्रेसच्या नगरसेविकेच्या यजमानाचे कोट्यवधींचे ले-आऊट तांत्रीक कारणामुळे प्रलंबीत आहे. या ले-आऊटला मार्गी लावण्याच्या अटीवर कॉंग्रेसच्या नगरसेविकेने सेनेशी सलगी केली होती. मात्र अद्यापही या ले-आऊटचा तिढा सुटलेला नाही.
या निवडणुकीत सेनेच्या या नगरसेवकाला सहकार्य केले नाही तर ले-आऊटच्या कामात तो ‘कुरापती’ करणार या भितीने पुर्वाश्रमी कॉंग्रेस मध्ये असलेल्या व सध्या रा.कॉ.च्या वाटेवर असलेल्या या नगरसेविकेच्या पतीकडे रा.कॉं.ची शहरातील रणनिती ठरविण्याची जबाबदारी आहे. तसेच न.प.मध्ये निवडुन न आल्यास हा उमेदवार कॉंग्रेससाठीही अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे कॉंग्रेस व रा-कॉं.आपल्या प्रमुख उमेदवारांना सेनेच्या उमेदवाराविरूद्ध न ठेवता ईतरत्र हलविणार असल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी सक्षम उमेदवाराऐवजी एखादा ‘कामचलाऊ’ उमेदवार देऊन सेनेच्या उमेदवाराच्या विजयासाठी दोन्ही कॉंग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते मदत करणार असल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. एकंदरीतच सर्वच दृष्टीने खचलेली सेना व व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणात आलेले कॉंग्रेस-रा.काँ.मधील काही महाभाग यांच्या पक्षविरोधी डावांना वरिष्ठ सहकार्य करतात की हाणुन पाडतात याकडे घाटंजी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
साभार:-देशोन्नती 

Friday, 11 November 2011

जिल्ह्यातील घडामोडींचे प्रत्युत्तर राज्यात देऊ-माणीकराव ठाकरे

 


यवतमाळ जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या  नेते व कार्यकर्त्यांना आमिष दाखवुन राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे खेचण्याच्या अजित पवारांच्या नीतीला राज्यात चोख प्रत्युत्तर देऊ असा ईशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणीकराव ठाकरे यांनी दिला. घाटंजी येथे आयोजीत कॉंग्रेस पक्षाच्या महामेळाव्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष केंद्र व राज्यात सत्तेवर आहेत. मित्रपक्ष अशी आमची ओळख आहे. मात्र गेल्या काही काळात राष्ट्रवादीने आघाडीचे संकेत पाळले नाहीत. पद व प्रतिष्ठेच्या आमिषाद्वारे ते आपले संख्याबळ वाढवित आहेत. त्यामुळे ज्यांना ईतर पक्षात जायचे आहे त्यांनी खुशाल जावे. कॉंग्रेसलाही त्यांची गरज नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेसची भिस्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आहे. त्यामुळे कितीही नेते गेले तरी कॉंग्रेसला फरक पडणार नाही असा टोला त्यांनी लगावला. कापसाच्या भाववाढ़ीवर बोलतांना त्यांनी ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने त्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला असुन लवकरच नाफेड व सि.सि.आय.ची खरेदी सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
या मेळाव्याचे उद्घाटन सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, यवतमाळ जिल्ह्याचे प्रभारी अशोक धवड, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, आमदार निलेश पारवेकर, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विजया धोटे, यवतमाळचे नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, योगेश पारवेकर, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बढे यांचेसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

गेल्या घरी सुखी रहा-मोघे
क्षुल्लक कारणासाठी पक्ष सोडणा-यांनी गेल्या घरी सुखी रहावे असा सल्ला सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सुरेश लोणकरांना दिला. सुरेश लोणकर हे जुने सहकारी असल्याने त्यांच्याबाबत काही टिका करणार नाही असे मोघे म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला धोरण नाही. तर कॉंग्रेस पक्ष धेय्य धोरणामुळेच टिकुन आहे असे ते म्हणाले. तर याप्रसंगी बोलतांना संजय देशमुख म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील नेते उसाच्या भावासाठी आंदोलन करताहेत. त्यामुळे विदर्भ व यवतमाळ जिल्ह्यातील कापसाला भाव मिळावा यासाठी माणीकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी पाऊले उचलण्याची गरज आहे. वामनराव कासावारांनी आपल्या भाषणात पक्ष सोडुन जाणा-यांमुळे पक्ष शुद्धीकरणाची प्रक्रीया सुरू झाल्याचे विधान केले.

कॉंग्रेस पक्ष सोडण्याची पाळी आल्यास जाहीर फाशी घेईन-पुरके
अस्सल स्त्रि कधीच घर सोडत नसते. पक्ष ही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. ज्या पक्षाने आपल्याला सर्वकाही दिले त्या पक्षाप्रती आदर व निष्ठा गरजेची असुन कॉंग्रेस हा निरोप देणा-यांचा पक्ष असल्याचे सांगत आपल्यावर पक्ष सोडण्याची पाळी आल्यास जाहीर फाशी घेईल असे त्यांनी ठामपणे सांगीतले. या मेळाव्याला पांढरकवडा, आर्णी व घाटंजी तालुक्यातील ग्रामिण भागातुन मोठ्या संख्येने लोकांना आणण्यात आल्याने बरीच गर्दी जमली होती.

‘अकरा’ च्या मुहुर्ताला एकशे अकरा प्रेक्षक
शतकात एकदाच येणा-या ११-११-२०११ चा मुहुर्त साधुन कॉंग्रेसने महामेळाव्याचे आयोजन केले होते. विषेश म्हणजे कार्यक्रमाची वेळही ११ वाजुन ११ मिनिटांची ठेवण्यात आली होती. मात्र नियोजीत वेळेला बाहेरगावाहुन बोलविण्यात आलेल्या प्रेक्षकांच्या गाड्या न पोहचल्याने अत्यंत तुरळक उपस्थिती होती. त्यामुळे अकरा अकरा च्या मुहुर्ताला एकशे अकरा प्रेक्षक उपस्थित असल्याची खमंग चर्चा कार्यक्रमस्थळी होती.