Pages

Showing posts with label भाजपा. Show all posts
Showing posts with label भाजपा. Show all posts

Monday, 29 September 2014

आर्णी-केळापुर मतदार संघात उमेदवारीची अभुतपुर्व ओढाताण

भाजप नेत्यांनी विश्वासाहर्ता गमावली
कॉंग्रेसपुढे मतदारांच्या नाराजीचे आव्हान
सर्वसामान्य मतदार अजुनही संभ्रमावस्थेत
युती व आघाडीमध्ये झालेला घटस्फोट व त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आर्णी-केळापुर विधानसभा मतदार संघात सध्या उमेदवारीसाठी अभुतपुर्व ओढाताण पाहायला मिळत आहे. पक्षनिष्ठा, कार्यकत्र्यांच्या भावना अशा सर्वच गोष्टी आमदारकीच्या स्वप्नापुढे गौण ठरत आहेत. उमेदवारीसाठी पक्ष बदल केल्याने नेमका कोण कोणत्या पक्षाचा आहे हे निवडणुक आयोगाने अंतिम यादी जाहिर केल्यावरच लक्षात येईल असे चित्र आहे. 
उमेदवारीसाठी पक्ष बदल करण्याचा हा प्रकार यावेळी महाराष्ट्रात प्रकर्षाने दिसुन आला. आर्णी - केळापुर देखिल यातुन सुटले नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार धर सोड प्रवृत्तीमुळे पक्षाची प्रतिमा चांगलीच डागळल्या गेली आहे. उमेदवारी देतांना वेळोवेळी बदललेल्या निर्णयांमुळे या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांची विश्वसनियताच दावणीला बांधल्या गेल्याची चर्चा आहे. 
विद्यमान आमदार असतांनाही गेल्या निवडणुकीत भाजपाने डॉ.संदिप धुर्वे यांना उमेदवारी न देता दुस-या मतदार संघातून उमेदवार आयात केला. तरी देखिल डॉ.धुर्वे यांनी बंडखोरी न करता गेली पाच वर्ष पक्षासोबत एकनिष्ठता दाखविली. यावेळी ते उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. यावेळी त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळणार असा दावा केल्या जात होता. मात्र काही वरिष्ठ नेत्यांनी राजु तोडसाम यांच्या उमेदवारीसाठी पाठपुरावा केल्याने तोडसाम यांची उमेदवारी निश्चित होणार असे स्पष्ट चित्र दिसल्याने डॉ.संदिप धुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवीली. 
एक माजी आमदार असलेला उमेदवार मिळत असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष डॉ.धुर्वे यांना उमेदवारी देण्यास ईच्छुक होते. डॉ.धुर्वेंनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेले सेनेचे युवा कार्यकर्ते डॉ.विष्णु उवंâडे नाराज झाले व त्यांनी थेट पक्ष बदल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीने गेलेले राजु तोडसाम यांना ऐनवेळी ए.बी.फॉर्म हा उद्धव येरमे यांचा आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपविभागीय कार्यालय परिसरात भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. अखेर येरमे यांनी भाजपाकडून व तोडसाम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र त्या नंतर पुन्हा राजकारण शिजले व उद्धव येरमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भाजपाची उमेदवारी पुन्हा एकदा राजु तोडसाम यांच्या पदरात पडली आहे. मात्र या संभ्रमावस्थेमुळे भाजपाची प्रतिमा डागाळल्या गेली आहे.
राज्याचे सामाजीक न्यायमंत्री व मतदारसंघाचे सर्वाधीक काळ प्रतिनिधीत्व केलेले ना.शिवाजीराव मोघे यांच्याप्रती नाराजीचा सुर असला तरी गेल्या वर्षभरापासुन ते निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना उमेदवारीतच बराच काळ गुंतून राहावे लागल्याने ना.मोघे यांचे पारडे आपसुकच जड झाले आहे. शिवाय कार्यकत्र्यांची भक्कम फळी असल्याने त्यांना लोकांपर्यंत पोहोचणे कठिण जाणार नाही. मात्र ते लोकांची नाराजी कशी कमी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ना.मोघे यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचे तोंड दाखविणा-या डॉ.संदिप धुर्वे यांनी आमदारकीच्या काळात केलेली अनेक कामे ही त्यांची जमेची बाजु आहे. शिवाय ना.मोघेंना फक्त धुर्वेच पराभुत करू शकतात अशी भावनाही मतदार संघात रूजल्या गेली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने का कोण जाणे पण त्यांना दोन वेळ दगा दिला. विद्यमान आमदार असतांना गेल्या निवडणुकीतही डॉ.धुर्वेंना भाजपाने उमेदवारी दिली नव्हती. तेव्हा उमरखेडचे आमदार अनिल इंगळे हे भाजपाचे उमेदवार होते. मात्र ते डमी उमेदवार असल्याची चर्चा झाल्याने त्यांचा दणदणीत पराभव झाला. त्यावेळी डॉ.संदिप धुर्वे यांनी राजकीय डावपेचांकडे दुर्लक्ष केल्याने उमेदवारी गमावली व यावेळीही नेमके तसेच झाले. शिवाय त्यांना भाजपाचे स्थानिक व जिल्हा पदाधिकारी तसेच नेत्यांची मर्जी सांभाळता आली नाही.

आता भाजपाचे "लेटेस्ट" अधिकृत उमेदवार असलेले राजु तोडसाम यांच्याकडे तरूण कार्यकर्त्याची चांगली फळी आहे. उमेदवारीसाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासुन पुर्वतयारीही केली आहे. शिवाय प्रमुख नेतेही त्यांच्या बाजुने अनुवूâल आहेत. त्यामुळे ते आता नव्या दमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यात शंका नाही. मात्र पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरीत मतदार संघात ते फारशे परिचीत नाहीत. त्यांच्या संपर्वâही तेवढा नाही. त्यामुळे ना.मोघे व डॉ.धुर्वे यांच्या तुलनेत ते नवखे म्हणुन गणल्या जातील. मात्र तरी देखिल लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट या निवडणुकीतही चालली तर त्याचा त्यांना कितपत फायदा होतो हे देखिल महत्वाचे ठरणार आहे. एकुणच आर्णी-केळापुर मतदारसंघात कॉग्रेस, शिवसेना व भाजपामध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच रा.कॉ.चे विष्णु ऊवंâडे हे किती मते घेणार यावरही विजयाचे गणित अवलंबुन राहिल.

Sunday, 14 September 2014

घाटंजी पंचायत समितीत अभद्र युती

ना.मोघे गटाला जबर धक्का
सभापती कॉंग्रेसचे शैलेश इंगोले, उपसभापती भाजपाचे रमेश धुर्वे







कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीमुळे ना.शिवाजीराव मोघेंच्या विरोधी गटाने थेट भाजपाशी हात मिळवणी करीत सभापतीपद मिळविले. तर उपसभापतीपद आयतेच भाजपाच्या पदरात टाकले. ऐन विधानसभेच्या तोंडावर घाटंजी पंचायत समितीमध्ये झालेल्या या अभद्र युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश इंगोले विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसच्याच सुवर्णा निकोडे यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. तर उपसभापतीपदी भाजपाचे रमेश धुर्वे यांनी बाजी मारली. त्यांनी कॉंग्रेसच्या रूपेश कल्यमवार यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. 
गेल्या २-३ दिवसांमध्ये घाटंजी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वर्तमानपत्रातून व्हिप बजावला होता. मात्र ना.मोघेंच्या विरोधी गटाने यावर कुरघोडी करत जिल्हाध्यक्षांचा व्हिप तर धुडकावलाच शिवाय गटनेते म्हणुन शैलेश र्इंगोले यांनी देखिल व्हिप काढला. अखेर आज निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचा एक गट व भाजपाचे सदस्य एकत्र आल्याने चित्र स्पष्ट झाले. एकीकडे राज्याच्या राजकारणात कॉंग्रेस भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष व दुसरीकडे घाटंजी मध्ये कॉंग्रेस व भाजपाचे एकत्र आलेले झेंडे पाहुन सर्वसामान्य मतदार मात्र बुचकळ्यात पडला आहे. 
राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जि.प.सदस्य देवानंद पवार यांच्यात निर्माण झालेल्या दुफळीमुळे घाटंजी तालुका कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अवघा जिल्हा अनुभवत असतांना एकेकाळी ना.मोघेंचे मानसपुत्र अशी ओळख असलेल्या देवानंद पवारांनी विधानसभेच्या तोंडावर या निवडणुकीच्या निकालामुळे जबर धक्का दिला आहे. मात्र विधानसभेतही हि अभद्र युती कायम राहणार का? आज कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन असलेले नेते कार्यकर्ते कुणाच्या बाजुने उभे राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस जिंकली...कॉंग्रेस हरली !
अवघे बोटावर मोजण्याईतके सदस्य असलेल्या घाटंजी पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसच कॉंग्रेसच्या विरोधात असल्याने विजय व पराभवाचा एकत्रीत अनुभव घेण्याचा दुर्मिळ योग पक्षाला मिळाला. तर कॉंग्रेस व भाजपाचे नवनियुक्त पदाधिकारी विजयी मुद्रेत बाहेर पडत असतांना माळी महासंघ व काही संतप्त कार्यकत्र्यांकडून मुर्दाबादचे नारे लागल्याने आनंदावर थोडे विरजणही पडले. शेकडो कार्यकत्र्यानी गद्दारांना हाकला, देवानंद पवार मुर्दाबाद, शैलेश इंगोले मुर्दाबाद असे नारे लावले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते. भाजपाने कॉंग्रेसला निवडणुक कक्षात दिलेली साथ रस्त्यावरही दिसुन आली. भाजप व कॉंग्रेस कार्यकत्र्यांची आपापल्या झेंड्यांसह निघालेली विजयी मिरवणुक अभुतपुर्व ठरली. या निवडणुकीत भाजपाने सत्तेसाठी चक्क कॉंग्रेसचा हात धरल्याने पद मिळवुनही नैतिक पराभव करून घेतला आहे. भाजप सदस्य तटस्थ राहिले असते तर एक चांगला संदेश मतदारांमध्ये गेला असता. तालुक्यात पहिल्यांदाच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाचे सदस्य निवडुन आले. मात्र एक जबाबदार विरोधक म्हणुन भाजपाचे सदस्य कधीच दिसले नाही.

Sunday, 5 February 2012

घराणेशाहीच्या चिखलात भाजपाचे कमळ फुलणार - रमेश यमसनवार

पारवा गट व गणात भाजप उमेदवारांची आघाडी

पारवा सर्कल आजवर घराणेशाहीच्या चिखलातच राहिल्याने या परिसराचा विकास झाला नाही. मात्र यावेळी याच चिखलात भाजपाचे कमळ फुलवून विकासाचा नवा अध्याय सुरू करणार असल्याचा विश्वास पारवा गटातील भाजपाचे उमेदवार रमेश यमसनवार यांनी व्यक्त केला. पारवा जि.प.सर्कलसह कुर्ली व पारवा गणातही भाजपाच्या उमेदवारांना जनतेचा स्वयंस्फूर्त पाठींबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. 
ईतर पक्षाच्या पारंपारिक उमेदवारांचा अनुभव जनतेने घेतला आहे. निवडणुकीच्या काळात हात जोडतात. मात्र त्यानंतर पुढच्या पाच वर्षात कधी ढुंकूनही पाहात नाहीत. मात्र माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेतून असुन निवडून आल्यावर जनतेतच राहायचे असल्याने प्रत्येक क्षणी शेतकरी व सर्वसामान्यांच्या कामासाठी तत्पर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्य व केंद्र शासनात कॉग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतांना सुद्धा शेतक-यांना न्याय मिळाला नाही. सर्वत्र कापसाच्या भावासाठी आंदोलने झाली मात्र सरकार व कॉंग्रेस रा.कॉ. नेत्यांनी जनक्षोभ दुर्लक्षीत केला. 
आता उमेदवारांच्या प्रचारात उतरलेले स्थानीक नेते आंदोलनाच्या वेळी शेतक-यांना न्याय मिळावा म्हणुन का पुढे आले नाही असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. पारवा पंचायत समिती गणात अरूणा वासुदेवराव  महल्ले व कुर्ली गणात सुशिक्षीत उमेदवार गजानन गाऊत्रे यांना भाजपाने संधी देऊन सर्वसामान्य जनतेतून उमेदवार उभा करण्याची परंपरा कायम राखली आहे. 
पंचायत समिती गणातही भाजप उमेदवारांना जनता आनंदाने कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापुर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिलेले रमेश यमसनवार पारवा परिसरात सुपरिचीत आहेत. काही वर्षांपुर्वी या भागात महापुर आला त्यावेळी ते पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे आले होते. अन्न, कपडे व निवारा या मुलभूत गोष्टींसाठी त्यांनी पुरग्रस्तांना मोलाची मदत केली होती. येथिल नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ते २७ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. धार्मिक व सामाजीक कार्यात ते नेहमीच पुढे असतात. सुमारे दहा वर्षांपुर्वी कुर्ली येथे पाण्याची तिव्र टंचाई असतांना स्वखर्चाने उन्हाळाभर त्यांनी मित्रमंडळींच्या सहकार्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. मतदार संघातील जवळजवळ प्रत्येक माणसाला त्यांची ओळख आहे. पारवा गटातील कुर्ली, वघारा, राजापेठ, पारवा, सावरगाव, सावंगी, सायतखर्डा, बोधडी, दत्तापुर, झटाळा, तरोडा, वाढोणा, मेसदा, गणेरी, भीमकुंड, पंगडी, येरंडगाव, देवधरी या गावांसह ईतर सर्वच ठिकाणी जनतेचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले. कुर्ली व पारवा गणातील उमेदवारांनाही जनतेचे सहकार्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सत्ता हाती असल्याने विकास करण्याचा प्रचार करीत आहेत. मात्र आजवर त्यांनी काय विकास साधला असा प्रश्न त्यांना जनता विचारत असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे खासदार हंसराज अहिर यांनी चंद्रपूर भागात केलेला विकास आता घाटंजी तालुक्यातही करायचा असुन त्यांच्या मदतीने विकासनिधी खेचून आणुन या भागातील समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले.
साभार :- देशोन्नती

Monday, 12 December 2011

घाटंजी न.प.निवडणुकीत संमिश्र निकाल

कॉंग्रेसला आघाडी पण बहुमत नाही
रा.कॉ.५ तर सेना ४ जागी विजयी
सेनेमुळे भाजपाला भोपळा


नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज जाहिर झालेल्या निकालात कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली असुन निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीची असलेली 'हवा' निकालातुन न दिसल्याने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र कॉंग्रेसलाही केवळ एका जागे अभावी सत्तेपासुन दुर रहावे लागणार आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेसला ८, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५ व शिवसेना भाजपाच्या कथित महायुतीला ४ जागी विजय मिळाला. तर यापुर्वी ६ नगरसेवक असलेल्या भाजपाला एकाही जागी विजय मिळवता आला नाही. शिवसेनेशी झालेल्या युतीमुळे भाजपाला हा फटका बसला असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. वर्तमान नगरसेवकांना नागरिकांच्या संतापाचा फटका बसला असुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा विद्यमान नगरसेवक शैलेष ठाकुर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच विद्यमान नगरसेवक दादाराव खोब्रागडे हे देखिल पराभुत झाले. केवळ संगिता भुरे या एकमेव नगरसेविकेला जनतेने पुन्हा संधी दिली. दिग्गजांमध्ये माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी विजयी झाले तर माजी नगराध्यक्ष शाम बेलोरकर,दुर्गा साखरकर, माया मंगाम यांचा पराभव झाला.
जलाराम प्रभाग क्र. १ (अ) मध्ये कॉंग्रेसचे संदिप बिबेकार (१०४७ मते) यानी रा.कॉ.च्या प्रशांत भोरे (६४४ मते), सेनेचे संजय बुल्ले (६४४ मते), अपक्ष दत्ता गटलेवार (९४ मते) व संजय राऊत (२५ मते) यांचा पराभव केला. ब गटात रा.कॉ.च्या संगिता भुरे (१११७ मते) यांनी कॉंग्रेसच्या स्वाती महाजन (७८१ मते), सेनेच्या सुलभा खांडरे (६७९ मते) यांना पराभुत केले. क गटामध्ये शिवसेनेच्या सरोज पडलवार (९९४ मते) यांनी आघाडी घेत  कॉंग्रेसच्या रेखा दोनाडकर (८०५ मते) व रा.कॉ.च्या वच्छला तलमले (७७९ मते) यांचा पराभव केला. ड गटात झालेल्या काट्याच्या लढतीत कॉंग्रेसच्या परेश कारीया (९९१मते) यांनी सेनेचे प्रमुख उमेदवार शैलेष ठाकुर (९३२ मते), रा.कॉ.चे शाम बेलोरकर (६२१ मते) यांना धुळ चारली.
घाटी क्र. २ मध्ये अ गटात सेनेचे संतोष शेंद्रे (७४५ मते) यांनी रा.कॉ.च्या दादाराव खोब्रागडे (५६१ मते), भाजपाचे विजय कासार (३८१ मते), कॉंग्रेसचे मधुकर पेटेवार (५९४ मते), अपक्ष नरेश कुंटलवार (३५६ मते), अजय गजभिये (९२ मते) यांना पराभुत केले. ब गटामध्ये शिवसेनेचे दिनेश उईके (७८६ मते) यांनी कॉंग्रेसच्या सतिष तोडसाम (७१५ मते), राष्ट्रवादीचे संतोष गेडाम (५३१ मते), भाजपाचे श्रावण परचाके (२९० मते), अपक्ष आनंद मडावी (४०१ मते) यांना पराभुत केले. क गटात कॉंग्रेसच्या अर्चना गोडे (८४७ मते) यांनी सेनेच्या सिता गिनगुले (७८२ मते), रा.कॉ.च्या सुधा ठाकरे (४३८ मते), भाजपाच्या दुर्गा साखरकर (३२२ मते), अपक्ष किशोरी चौधरी (३७५ मते) यांचा पराभव केला. ड गटात कॉंग्रेसच्या सिमा डंभारे (९०१ मते) यांनी शिवसेनेच्या सोफिया सैय्यद फिरोज (६८२ मते), रा.कॉ.च्या पुजा दिकुंडवार (४७४ मते), भाजपाच्या नलु मोहिजे (२९८ मते) अपक्ष फरझाना परविन अ रशिद (३४२ मते), विजु राठोड (६४ मते) यांचा दणदणीत पराभव केला. तर इ गटामध्ये सेनेच्या शर्मिला उदार (८५९ मते) यांनी रा.कॉ.च्या सिंधु सिरपुरे (७२० मते), कॉंग्रेसच्या जैबुनबी अफजलखॉ पठाण भाजपाच्या सुनिता गवारकर (३१७ मते), अपक्ष वर्षा जाधव (३५७ मते) व माया मंगाम (१७० मते)यांचा पराभव केला.
राममंदिर प्रभाग क्र.३ मध्ये चारही जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली. येथे अ गटात कॉंग्रेसच्या शोभा ठाकरे (१४६९ मते) यांनी रा.कॉ च्या सारीका उगले (७७५ मते), सेनेच्या सुलभा खांडरे (२६४ मते) यांचा पराभव केला. ब गटात कॉंग्रेसच्या जयश्री दिडशे (धांदे) (१०८३ मते) यांनी रा.कॉ.च्या निर्मला पांडे (५३१ मते), भाजपाच्या ललिता ठाकुर (३९१ मते) यांचा पराभव केला. क गटात कॉंग्रेसच्या जगदिश पंजाबी (१२७७ मते) यांनी रा.कॉ.च्या प्रमोद गिरी (७७५ मते), भाजपाचे विनायक परचाके (१६३ मते), मनसेचे गजानन भालेकर (३०४) यांचा पराभव केला. ड गटात कॉंग्रेसच्या किशोर दावडा (१४८६) यांनी रा.कॉ.च्या अशोक कटकमवार (५७९ मते), अपक्ष रविंद्र ठाकरे (२४५ मते) यांना पराभुत केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र. ४ मध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. येथे अ गटात रा.कॉ.च्या चंद्ररेखा रामटेके (१०५६ मते) यांनी कॉंग्रेसच्या भारती चुनारकर ( ६९१ मते), भाजपाच्या शोभा रामटेके (४०१ मते), अपक्ष चित्रकला देवतळे (१३५ मते) यांना पराभुत केले. ब गटात  रा.कॉ.च्या इंदु परतेकी (१०७५ मते) यांनी कॉंग्रेसच्या शालु गेडाम (७३४ मते), भाजपाच्या नंदा कोडापे (४६७ मते) यांचा पराभव केला. क गटामध्ये राष्ट्रवादीचे राम खांडरे (१३९७ मते) यांनी कॉंग्रेसच्या नरेंद्र धनरे (४४० मते), भाजपाचे स्वरूप नव्हाते (४४६ मते) यांचा दणदणीत पराभव केला. ड गटात रा.कॉ.चे अकबर तंव्वर (९०७ मते) यांनी कॉंग्रेसचे सैय्यद मोहिब सैय्यद लतिफ (४३१ मते), अपक्ष मधुकर निस्ताने (३७१ मते), भाजपाचे अरविंद बोरकर (४१० मते), अपक्ष सुधिर अग्रहरी (१०४ मते), मनसेचे सुधिर उरकुडे (३९ मते), प्रभा शेवरे (२८ मते) यांचा पराभव केला. घाटंजीकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने सत्तेत नेमके कोण येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

'धनुष्य' आला पण 'बाण' गेला

































अडीच वर्ष नगराध्यक्षपद सेनेकडे असतांना मनमानी कारभाराचा फटका शिवसेनेच्या शैलेष ठाकुर यांना बसला. प्रचारादरम्यानही जनतेने त्यांना अनेकदा फटकारले. यापुर्वी सेनेकडे तिन नगरसेवक होते. यावेळी एका जागेची बढत मिळाली असली तरी प्रमुख उमेदवारालाच पराभवाचे तोंड पहावे लागल्याने धनुष्य आला पण बाण गेला अशी परिस्थिती झाली आहे.
निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक सांस्कृतीक भवनाबाहेर जमले होते.