नगर परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडी करून सत्ता स्थापीत करणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
नगर परिषदेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नेमकी कोणत्या दोन पक्षांची युती होणार याकडे घाटंजीकरांचे लक्ष लागले होते. आज सायंकाळी दोन्ही पक्षांच्या झालेल्या बैठकीत याबाबत एकमत झाल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. संख्याबळानुसार कॉंग्रेसकडे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला जाईल. निवडणुक निकालात कॉंग्रेसला सर्वाधीक ८ जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ५ तर सेनेकडे ४ नगरसेवक आहेत. निकालानंतर रा.कॉ.-सेना युती होणार असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र शिवसेनेशी वैचारीक सामंजस्य होण्याची शक्यता नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कॉंग्रेस सोबतच हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यातच जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांचेसह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे या दोन पक्षात पराकोटीचे वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर मनोमिलन होणार की नाही याबाबत सर्वच साशंक होते. मात्र केंद्र व राज्यात असलेल्या आघाडीचा आधार घेऊन व शहर विकासाच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी एक चांगला निर्णय घेतल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
साभार:- देशोन्नती
shahar vikasa sathi nahi, swatachya vikasa sathi
ReplyDelete