Pages

Showing posts with label जिल्हा परिषद. Show all posts
Showing posts with label जिल्हा परिषद. Show all posts

Thursday, 17 May 2012

जि.प.प्राथमिक शिक्षक संघ (र.नं.२३५) ची कार्यकारीणी गठीत


यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र.नं.२३५ शाखा घाटंजीच्या कार्यकारीणीचे नुकतेच गठण करण्यात आले. समितीच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या या निवडीमध्ये अध्यक्षपदी सुधाकर राऊत, सचिव दिपक चौधरी, कार्याध्यक्ष डी.डी.पुसनाके तर सल्लागार म्हणुन विजय डंभारे, नारायण भोयर, संजय इंगोले यांची निवड करण्यात आली.
याशिवाय जिल्हाप्रतिनिधीपदी विकास डंभारे, शेख जलील, काशिनाथ आडे, उपाध्यक्ष जगन्नाथ गावंडे, महादेव सोनटक्के, अनिल तिडके, भारत राठोड, प्रशांत बोमिडवार, रविंद्र आडे, अशोक जिल्लडवार, सहसचिव विठ्ठल राठोड, सुभाष ठाकरे, कोषाध्यक्ष अभिजीत ठाकरे, सहकोषाध्यक्ष भारत लोखंडे, विकेश दावडा, मुख्य संघटक लक्ष्मण कुडमते, सहसंघटक संजय तुरक, महेंद्र खडसे, कार्यालयीन संपर्वâ प्रमुख रामेश्वर भांडारवार, कार्यालयीन संपर्वâ सहाय्यक गजानन तुरी, नंदकिशोर खडसे, प्रकाशक अविनाश खरतडे, सहप्रकाशक दिवाकर हेमके, विशाल गोडे, प्रसिद्धी प्रमुख किशोर मुनेश्वर, प्रसिद्धी सहाय्यक व्ही. आर. चिलकावार, जे.के.भुरे मुख्याध्यापक प्रतिनिधी राजु हेमके, एस.जी.बेंडे, विलास गुरडवार, पदवीधर प्रतिनिधी किसन किनाके, रूपेश बेलसरे, महिला प्रतिनिधी उज्वला सिडाम, माया भोयर, संगिता चव्हाण, वर्षा कटकमवार, शिक्षण सेवक प्रतिनिधी प्राजक्ता निकम, गायत्री भोयर, अमोल चौधरी यांचेसह कार्यकारीणी सदस्यांमध्ये कमल आगलावे, ओमप्रकाश भवरे, सिमा पिसाळकर, किशोर भोयर, पी.जी.चांदेकर, तृप्ती ठाकरे, अल्का गोटफोडे, बी.एल.राठोड, विनोद महल्ले, माधुरी रामटेके, प्रिया डफरे, दिनकर चौधरी, रमेश राठोड, कल्पना मेश्राम, अल्का कुडमते, संजय भवरे, सुरेश चव्हाण, अनिल चांदेकर, अरूणा धोंगडे, सुधाकर राठोड, पुंडलीक कुलमेलकर, ओमप्रकाश कुपटेकर, जयंत दिकोंडवार, प्रतिभा प्रतापवार, सुरेश वरगंटवार, रामलाल राठोड, पी.पी. राठोड, अविनाश मनवर, अरूणा चिंतावार, तारा मसराम, मोहम्मद इरफान खान, शकील अहमद, विनोद सुरपाम, श्रद्धा ढवळे, बाळु पवार, अजाब ऊईके, दिलीप राठोड, अशोक राठोड, दत्तात्रय आडे, सिंधु टेकाम, अर्चना झाडे, भाऊराव मेंगेवार, अच्युत पेंचेलवार, संदिप अंदुरकर, गजानन राऊत, आकाश ठाकरे, ईश्वर बिरकुटवार यांचा समावेश आहे.
साभार :- देशोन्नती 



Friday, 17 February 2012

घाटंजी तालुक्यात कॉंग्रेसची सरशी, भाजपाचे खाते उघडले

कॉंग्रेसला जि.प.२ पं.स. मध्ये ४ जागा
राष्ट्रवादीची मते वाढली, विजय नाही








संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधुन घेणा-या घाटंजी तालुक्यातील निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधीक जागा मिळवित आघाडी घेतली. तर प्रथमच भाजपाचे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आल्याने तालुक्यात यावेळी भाजपाचे खाते उघडले. राष्ट्रवादीला बंडखोरी व काही ठिकाणी उमेदवार निवडीचा फटका बसल्याने एकही जागा मिळवता आली नाही. बहुचर्चित शिवणी जि.प.गटात देवानंद पवार व पारवा गटात योगेश पारवेकर या कॉंग्रेसच्या उमेदवारांनी मतांची आघाडी घेत विजय मिळविला. तर पार्डी नस्करी गटात झालेल्या काट्याच्या लढतीत भाजपाच्या उषा राठोड यांनी बाजी मारली.
पंचायत समिती मध्ये कॉंग्रेसला चार व भाजपाला २ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेवर आता कॉंग्रेसने कब्जा मिळविला आहे. पंचायत समिती मध्ये शिवणी गणात शैलेष इंगोले (कॉंग्रेस), मानोली गणात सुमित्रा पेंदोर (कॉंग्रेस), पारवा गणात सुवर्णा निकोडे (कॉंग्रेस), कुर्ली गणात रूपेश कल्यमवार (कॉंग्रेस), पार्डी गणात रत्नमाला कोंडेकर (भाजप) व शिरोली गणात रमेश धुर्वे (भाजप) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
पार्डी गटाच्या मतमोजणी दरम्यान अखेरच्या टप्प्यात मांजरी गावाची मतमोजणी करतांना मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे चार तास प्रक्रीया रखडली होती. त्यानंतर यवतमाळ येथुन तज्ञांना पाचारण करण्यात आले. दुपारी चार वाजता यंत्र दुरूस्त झाल्यावर येथिल निकाल घोषीत करण्यात आला.
जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना मिळालेली मते पारवा गट योगेश पारवेकर (कॉंग्रेस) ७०८० मते, सुहास पारवेकर (रा.कॉ.) ५६५५ मते, रमेश यमसनवार (भाजप) ३७७० मते, शे.आसिफ शे.चांद (सेना) २०२७ मते, अविनाश ठाकरे (अपक्ष) १०३१ मते, शिवणी गट देवानंद पवार (कॉंग्रेस) ७८०० मते, सुरेश लोणकर (रा,कॉ.) ५६५५ मते, मोहन जाधव (सेना) २२०७ मते, जितेंद्र ठाकरे (अपक्ष) १२५७ मते, विशाल कदम (भाजप) १११९ मते, प्रशांत धांदे (मनसे) ८१४ मते, पार्डी (नस्करी) गट उषा राठोड (भाजप) ६१८५ मते, 
मंदा डंभारे (रा.कॉ.) ६०८७ मते, ज्योती निकडे (कॉंग्रेस) ५७५५ मते, शांता आसुटकर (अपक्ष) ३१६ मते, पंचायत समिती मध्ये पार्डी (नस्करी) गणात रत्नमाला कोंडेकर (भाजप) ३२५३ मते, छाया राठोड (रा.कॉ.) ३०४२ मते, अर्चना राठोड (कॉंग्रेस) २७९६ मते, रूपाली राठोड (सेना) ३४९ मते, शिरोली गणात रमेश धुर्वे (भाजप) ३४६९ मते, कैलास कोरवते (रा.कॉ.) २९२९ मते, अनिल गेडाम (कॉंग्रेस) २३३५ मते, भाऊराव आत्राम (सेना) १५३ मते, शिवणी गण शैलेष इंगोले (कॉंग्रेस) २८९७ मते, संजय आडे (रा.कॉ.) २३४६ मते, राजेश्वर वातिले (सेना) १६८१ मते, गिरीधर राठोड (भाजप) ११४८ मते, रविंद्र चव्हाण (मनसे) ७२९, नरेंद्र चव्हाण (अपक्ष) ४९१ मते, मानोली गणात सुमित्रा पेंदोर (कॉंग्रेस) ४५३१ मते, सिंधु मेश्राम (रा.कॉ.) ३६०६ मते, रूख्मा कनाके (सेना) ६२१ मते, सुमित्रा घोडाम (भाजप), सुशिला मंगाम (मनसे) ३४५ मते, पारवा गणात सुवर्णा निकोडे (कॉंग्रेस) ३७८३ मते, पुष्पा खडसे (रा.कॉ.) ३५८५ मते, अरूणा महल्ले (भाजप) १८२४ मते, कलावती मोहुर्ले (सेना) ९५४ मते, कुर्ली गणात रूपेश कल्यमवार (कॉंग्रेस) ३६८० मते, नितिन नार्लावार (रा.कॉ.) २५३२ मते, गजानन गाऊत्रे (भाजप) २२२५ मते, सोमा मंगाम (सेना) ९४२ मते मिळाली आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन डॉ.अशोक खरात, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संतोष शिंदे, नायब तहसिलदार एस.व्ही भरडे, वामन वैद्य होते. विजयी उमेदवारांची शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी ग्रामिण भागातुन मोठ्या प्रमाणावर नागरीक येथिल सांस्कृतिक भवन परिसरात आले होते.
मागील निवडणुकी पेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या मतांचे प्रमाण वाढले असले तरी दिग्गज नेते रा.कॉ.मध्ये असतांना झालेला पराभव धक्कादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे. पार्डी सर्कलमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पाठी ‘गॉडफादर’ कोण होते याची चर्चा सुरू आहे. जनतेने दिलेला कौल मान्य असुन सर्व मतदारांचे आभार जेष्ठ नेते सुरेश लोणकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Thursday, 2 February 2012

शिवणीत ‘कन्फ्युजन’!


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शिवणी जि.प.सर्कल मधील मतदार अजुनही संभ्रमावस्थेतून निघालेला दिसत नाही.
राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यात झालेल्या ओढाताणीनंतर काहीसे स्थैर्य आल्यासारखी स्थिती निर्माण झाली असली तरी सर्व चर्चीत उमेदवारांची गर्दी या सर्कलमध्ये झाल्याने मतदार राजा अस्थिर झाला आहे.
शिवणी जि.प.गटात सध्या रा.काँ.चे सुरेश लोणकर, कॉंग्रेसचे देवानंद पवार, मनसेचे प्रशांत धांदे, सेना-विदर्भ जन आंदोलन समितीचे मोहन जाधव, भाजपाचे विशाल कदम, अपक्ष जितेंद्र ठाकरे हे उमेदवार आहेत. यामधील विशाल कदम वगळता ईतर उमेदवार राजकीय पार्श्वभूमी लाभलेले व या ना त्या कारणावरून चर्चेत राहणारे आहेत. त्यामुळे यापैकी नेमकी कोणाची निवड करायची हा प्रश्न मतदारांना पडला आहे.
कॉंग्रेसच्या देवानंद पवार यांच्या गेल्या पाच वर्षातील उठाठेवी केवळ घाटंजी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा चर्चिल्या गेल्या. एकदा तर ‘पोपटपंची’ केल्याबद्दल सेना आमदाराकडून त्यांना ‘प्रसाद’ही मिळाला. सत्तेच्या उन्मादात वावरण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमूळे त्यांना समाजात झिडकारल्या जाणे स्वाभाविक आहे. अशा उमेदवाराच्या विरोधात राजकारणामध्ये आपले आयुष्य घालविणा-या सुरेश लोणकर यांना लढावे लागत आहे. त्यातच मोठ्या अपेक्षेने कॉंग्रेस मधुन राष्ट्रवादीमध्ये आलेल्या लोणकरांची योग्य ‘वेळ’ साधल्या गेली नाही. राज्य साक्षरता परीषदेच्या अध्यक्षपदासह अनेक पदे भुषविणा-या जेष्ठ व्यक्तीला जिल्हा परीषदेच्या क्षुल्लक तिकीटासाठी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे झगडावे लागले हे आणखी एक दुर्दैव !
तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर लोणकर यांची पकड आहे. ग्रामीण भागातील जनसंपर्कही दांडगा आहे. मात्र अनेकदा एखाद्या पदावर बसवितांना त्यांचे कुटूंबप्रेम आडवे येते हे वास्तव आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकीमध्ये त्यांनी कुटूंब व आप्तांना प्राधान्य दिल्याची उदाहरणे आहेत. अशावेळी निष्ठेने कार्य करणारे कार्यकर्ते मात्र दुर्लक्षील्या गेले हा भाग अलाहिदा. केवळ घाटंजी तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या सुरेश लोणकर यांना आजवर त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळाली नाही. 
त्यांचा सध्याचा गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना शिवणी मध्ये अतिक्रमण करावे लागले. मात्र येथे लढण्याच्या हेतूने आतापर्यंत पुर्वतयारी करणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले. तिकीट वाटण्याची ‘पत’ असतांना तिकीट मागण्याची वेळ का यावी हा प्रश्नही विचारल्या गेला. लोणकरांशी स्पर्धा असलेल्या देवानंद पवार यांना ईतरांना बोटावर नाचविण्याची कला अवगत आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. मात्र या कलेचा वापर मर्यादेबाहेर झाल्याने सर्वांनाच त्याचा विट आला आहे. तरी देखिल पैशाने सर्व काही शक्य असल्याचा ‘अर्थ’ काढुन ते अजुनही आपल्याच मस्तीत वागत आहेत. अशा या मिश्र परिस्थितीमध्ये पवार यांना मारक ठरू शकणारे मोहन जाधव आणी लोणकरांच्या मतांवर डल्ला मारू शकणारे जितेंद्र ठाकरे व प्रशांत धांदे यांच्यामुळे शिवणीतील वातावरण सध्या संभ्रमीत करणारे आहे. या विचित्र लढतीत कोण सरस ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी शिवणी सर्कल मधील मतदार व राजकीय वातावरण ‘कन्फ्युज’ करणारेच आहे.
साभार :- देशोन्नती

पारवा जि.प.गटात कॉंग्रेस भाजपा मध्ये खरी लढत


गेल्या महिन्याभरापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता ख-या अर्थाने औपचारीक प्रचाराला सुरूवात झाली आहे. विवीध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी नुकतीच नारळ फोडून प्रचाराची सुरूवात केली. पारवा जिल्हा परिषद गटात सध्या कॉंग्रेस व भाजप या दोन पक्षांमध्ये लढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी मात्र प्रचारात कमी पडत असल्याचे दिसत आहे. या गटात एकुण पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये कॉंग्रेसकडून आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर, भाजपाकडून रमेश यमसनवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस सुहास पारवेकर, सेनेचे शे.आसिफ शे.चांद व अपक्ष उमेदवार अविनाश ठाकरे यांचा समावेश आहे. देशमुख - पारवेकर घराण्यातील दोन उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र सुहास पारवेकर यांची राजकारणातील ही पहिलीच ईनिंग असल्याने त्यांना जेष्ठ नेत्यांच्या भरवशावरच अवलंबुन राहावे लागत आहे. योगेश पारवेकरांना आमदार निलेश पारवेकरांचे भक्कम पाठबळ आहे. मागील निवडणुकीत बंडखोर अपक्ष उमेदवार स्वामी काटपेल्लीवार यांना सहकार्य करणारे ना.मोघे हे सुद्धा यावेळी योगेश पारवेकरांच्या बाजुने आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा गड मजबुत आहे. मात्र दोन पारवेकरांच्या लढाईत भाजपाचे रमेश यमसनवार हे सुद्धा तगडे आव्हान देत आहेत. यमसनवार हे एकेकाळी ना.मोघेंचे खंदे समर्थक होते. कॉंग्रेस व मोघे समर्थीत उमेदवाराच्या प्रचाराची धुरा त्यांच्याच खांद्यावर राहात होती. यावेळी उमेदवारी मिळणार अशी आशा त्यांना होती मात्र तसे न झाल्याने त्यांनी भाजपाच्या उमेदवारीवर निवडणुक रिंगणात उडी घेतली. पारवेकरांच्या गडात भाजपाची अनपेक्षीत हवा निर्माण झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.  या गटात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातच लढ़त होणार अशी शक्यता पुर्वी वर्तविण्यात येत होती. मात्र आता ही लढत कॉंग्रेस-भाजप अशी झाली आहे. भाजपासोबत असलेला हा ‘माहौल’ मतदानात परिवर्तीत होणार का ?  याबाबत तर्कवितर्क केल्या जात आहेत. 
प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असुन प्रचार कार्यात फिरणा-यांची बडदास्त ठेवून त्यांची ‘सोय’ लावतांना उमेदवारांच्या नाकी नऊ येत आहे. 
साभार :- देशोन्नती

Saturday, 28 January 2012

घाटंजी तालुक्यात निवडणुकीला चढलाय रंग

‘शिवणी’चा तिढा सुटता सुटेना
उमेदवार लागले प्रचाराला

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला आता रंग चढण्यास सुरूवात झाली असुन बहुतांश उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. घाटंजी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तिन गट व पंचायत समितीचे ६ गण अशा एकुण ९ जागांकरीता निवडणुक होणार आहे.
पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित झाले असले तरी कोणत्याही पक्षाने अद्याप आपले अधिकृत उमेदवार जाहिर केले नाहीत. शिवणी गटात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजुनही काथ्याकुट चालु आहे. सुरेश लोणकर, सतिश भोयर व जितेंद्र ठाकरे यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी ओढाताण सुरू आहे. लोणकरांनी मोठे शक्तीप्रदर्शन करून नामांकन दाखल केले. तर सतिश भोयर व जितेंद्र ठाकरे हे सुद्धा उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. या विचित्र परिस्थितीमुळे पक्षश्रेष्ठी हतबल, कार्यकर्ते संभ्रमात व मतदार कोड्यात पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणा-या  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधुम जिल्हाभरात सर्वत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छूकांना जि.प. व  पं.स.च्या सत्तेचे डोहाळे लागले आहेत. अस्ताव्यस्त पसरलेला मतदारसंघ, प्रचंड मतदार संख्या या पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अनेकांनी विविध राजकिय पक्षांची तिकीटे मिळवण्याची खटपट सुरु केली आहे. विविध पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी भाऊगर्दी झाली असून अनेकांनी तिकीटे मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. परंतू ऐनवेळी तिकीट कोणाला मिळणार? तिकीटाच्या शर्यतीतून पत्ता कोणाचा कापला जाणार? याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याने ३० तारखेपर्यंत ईच्छुक उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवारच राहणार आहे. 
गट व गणात एकाच पक्षातील तुल्यबळ उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे. यातून बंडखोरीची समस्या निर्माण झाली. या बंडखोरीला लगाम लावण्यासाठी  नेतेमंडळींनी व्युहरचना आखली आहे. परंतू यास जुमानता काही बंडखोर निवडणुक लढून जिंकता नाही आले तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाडण्याची भूमिका वठविण्याची शक्यता आहे. उमेदवारीचा घोळ तात्काळ मिटत नसल्याने विरोधी पक्षाआधी पक्षांतंर्गत स्पर्धकाबरोबर शह- कटशहाचे राजकारण करत स्पर्धा करीत तिकीट मिळवण्याची लढाई खेळण्याची वेळ आली आहे. या पक्षांअंतर्गत लढाईतही धनशक्तींचीच सरशी होत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते संतप्त होत आहेत. बहूतेक ठिकाणी उमेदवाराचे निष्कलंक चारित्र्य, राजकीय कौशल्य, या गुणाऐवजी निवडणुकीत धनशक्तीचा जोर दाखवू शकणा-या उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून प्राधान्य दिले जात असल्याची खंत सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. 
सगळीकडे सध्या राजकारण्यांची धामधुम सुरू आहे. खेड्यातील रस्त्यांवर धुळ उडवित बेफामपणे जाणा-या वाहनांचा ताफा, मागील निवडणुकीनंतर गावात अवतरलेले नेते, स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी भाषणे यामुळे ग्रामिण भागातील वातावरण निवडणुकमय झाले आहे. तर दुसरीकडे मतदार संघातील जनता नागरी समस्यांच्या विळख्याने होरपळून निघत आहे. अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांचीही वाणवा आहे. रस्ते, पाणीपुरवठा,वीजसेवा, शिक्षण, आरोग्य, आदीसह विविध नागरी समस्यामुळे मतदार त्रस्त आहेत. निवडणुका आल्या की गावपुढा-यांकडून विकासाच्या गप्पा मारल्या जातात. नंतर मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते अशी संतप्त प्रतिक्रीयाही मतदारातून व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती