Pages

Showing posts with label शिक्षक. Show all posts
Showing posts with label शिक्षक. Show all posts

Friday, 28 December 2012

घाटंजी येथे शिक्षक मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन



यवतमाळ जि.प.प्राथमिक शिक्षक संघ र.न.२३५ शाखा घाटंजीचे वतीने तालुकास्तरीय शिक्षक मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन दि.३० डिसेंबरला स्थानिक जलाराम मंदिरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव राहतील. यावेळी पं.स.सभापती शैलेष इंगोले, जि.प.सदस्य योगेश पारवेकर, उषा राठोड, पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, सदस्य रूपेश कल्यमवार, रमेश धुर्वे, सुमित्रा पेंदोर, रत्नमाला कोंडेकर, गटविकास अधिकारी अजय राठोड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, विनोद गोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात शिक्षकांच्या विवीध प्रलंबीत समस्यांवरही चर्चा होणार आहे. तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाला आवर्जुन हजर राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, दिपक चौधरी, विजय डंभारे, शेख जलिल, नारायण भोयर, संजय इंगोले, काशिनाथ आडे, ज्ञानेश्वर पुसनाके, लक्ष्मण कुडमेथे, राजु हेमके, रामेश्वर भांडारवार, अशोक जिल्लडवार, सुभाष ठाकरे, किशोर मुनेश्वर, बाळु पवार, दिलीप संगनवार, मोहम्मद खान, आकाश ठाकरे, महादेव सोनटक्के, सुरेश वरगंटवार, अविनाश खरतडे यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

Friday, 21 December 2012

घाटंजी पं.स.कर्मचारी रविंद्र उगले यांचे अपघाती निधन


अज्ञात मेटॅडोअरने दुचाकीला दिलेल्या धडकेत रविंद्र दिलीप उगले (२६) रा.मुरली याचा मृत्यू झाला. काल (दि.१९) ला रात्री ८.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. तो घाटंजी पंचायत समिती मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत फिरते विशेष शिक्षक पदावर कार्यरत होता. यवतमाळ येथुन परत येत असताना कोळंबी जवळ हा अपघात झाला. 
अपघातात गंभिर जखमी झाल्याने त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आज मुरली येथे शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, पं.स.सभापती शैलेष इंगोले यांचेसह पंचायत समितीचे कर्मचारी, जिल्ह्यातील फिरते विशेष शिक्षक उपस्थित होते. वडील हयात नसल्याने रविंद्र हाच घरातील कर्ता होता. मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र ओळखल्या जाणा-या एका तरूण कर्मचा-याच्या अकाली मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती

Thursday, 17 May 2012

जि.प.प्राथमिक शिक्षक संघ (र.नं.२३५) ची कार्यकारीणी गठीत


यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र.नं.२३५ शाखा घाटंजीच्या कार्यकारीणीचे नुकतेच गठण करण्यात आले. समितीच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या या निवडीमध्ये अध्यक्षपदी सुधाकर राऊत, सचिव दिपक चौधरी, कार्याध्यक्ष डी.डी.पुसनाके तर सल्लागार म्हणुन विजय डंभारे, नारायण भोयर, संजय इंगोले यांची निवड करण्यात आली.
याशिवाय जिल्हाप्रतिनिधीपदी विकास डंभारे, शेख जलील, काशिनाथ आडे, उपाध्यक्ष जगन्नाथ गावंडे, महादेव सोनटक्के, अनिल तिडके, भारत राठोड, प्रशांत बोमिडवार, रविंद्र आडे, अशोक जिल्लडवार, सहसचिव विठ्ठल राठोड, सुभाष ठाकरे, कोषाध्यक्ष अभिजीत ठाकरे, सहकोषाध्यक्ष भारत लोखंडे, विकेश दावडा, मुख्य संघटक लक्ष्मण कुडमते, सहसंघटक संजय तुरक, महेंद्र खडसे, कार्यालयीन संपर्वâ प्रमुख रामेश्वर भांडारवार, कार्यालयीन संपर्वâ सहाय्यक गजानन तुरी, नंदकिशोर खडसे, प्रकाशक अविनाश खरतडे, सहप्रकाशक दिवाकर हेमके, विशाल गोडे, प्रसिद्धी प्रमुख किशोर मुनेश्वर, प्रसिद्धी सहाय्यक व्ही. आर. चिलकावार, जे.के.भुरे मुख्याध्यापक प्रतिनिधी राजु हेमके, एस.जी.बेंडे, विलास गुरडवार, पदवीधर प्रतिनिधी किसन किनाके, रूपेश बेलसरे, महिला प्रतिनिधी उज्वला सिडाम, माया भोयर, संगिता चव्हाण, वर्षा कटकमवार, शिक्षण सेवक प्रतिनिधी प्राजक्ता निकम, गायत्री भोयर, अमोल चौधरी यांचेसह कार्यकारीणी सदस्यांमध्ये कमल आगलावे, ओमप्रकाश भवरे, सिमा पिसाळकर, किशोर भोयर, पी.जी.चांदेकर, तृप्ती ठाकरे, अल्का गोटफोडे, बी.एल.राठोड, विनोद महल्ले, माधुरी रामटेके, प्रिया डफरे, दिनकर चौधरी, रमेश राठोड, कल्पना मेश्राम, अल्का कुडमते, संजय भवरे, सुरेश चव्हाण, अनिल चांदेकर, अरूणा धोंगडे, सुधाकर राठोड, पुंडलीक कुलमेलकर, ओमप्रकाश कुपटेकर, जयंत दिकोंडवार, प्रतिभा प्रतापवार, सुरेश वरगंटवार, रामलाल राठोड, पी.पी. राठोड, अविनाश मनवर, अरूणा चिंतावार, तारा मसराम, मोहम्मद इरफान खान, शकील अहमद, विनोद सुरपाम, श्रद्धा ढवळे, बाळु पवार, अजाब ऊईके, दिलीप राठोड, अशोक राठोड, दत्तात्रय आडे, सिंधु टेकाम, अर्चना झाडे, भाऊराव मेंगेवार, अच्युत पेंचेलवार, संदिप अंदुरकर, गजानन राऊत, आकाश ठाकरे, ईश्वर बिरकुटवार यांचा समावेश आहे.
साभार :- देशोन्नती 



Thursday, 26 January 2012

किन्ही शाळेत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत होणार ध्वजारोहण ?






तब्बल दोन आठवड्यांपासुन तालुक्यातील किन्ही (वन) जि.प. शाळेवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला असल्याने उद्या प्रजासत्ताक दिनाला विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन शिक्षकांची पदे मंजुर असतांना केवळ एकाच शिक्षकावर कारभार सुरू असल्याने संतप्त पालकांनी १२ जानेवारी पासुन पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. या जि.प.शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग असुन ५० पटसंख्या आहे. येरंडगाव केंद्रांतर्गत येत असलेल्या या शाळेवर तब्बल सात महिन्यांपासुन एकच शिक्षक आहे. पारवा येथिल शाळेवर अतिरिक्त असलेल्या सचिन मांडवगडे या शिक्षकाची किन्ही (वन) शाळेवर १९ डिसेंबरला समुपदेशनाद्वारे बदली करण्यात आली. मात्र पारवा शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे यांनी शिक्षकास कार्यमुक्त केले नाही. ग्रामस्थांनी याबाबत पंचायत समितीकडे तक्रार केल्यावर गटशिक्षणाधिका-यांनी शिक्षकाला कार्यमुक्त करण्याचा आदेश मुख्याध्यापकास दिला. मात्र या आदेशालाही मुख्याध्यापकांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासुन विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार आहे. केवळ किशोर भोयर हे एकमेव शिक्षक विद्यार्थ्यांअभावी शाळेत केवळ येऊन बसतात. प्रस्तुत प्रतिनिधीने किन्ही (वन) शाळेला प्रत्यक्ष भेट दिली असता पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेव आत्राम, उपसरपंच राजु कुंभारे, पालक प्रकाश रामटेके व विद्यार्थी प्रतिक उमरे, बाळू जिवने (वर्ग ४ था), सचिन कुंभारे (वर्ग ३ रा) हे म्हणाले की, जोपर्यंत या शाळेवर पुर्णवेळ कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येणार नाही तोवर बहिष्कार राहणार आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकारी जुमनाके यांची प्रतिक्रीया घेतली असता आदेशाचे पालन न करणारे मुख्याध्यापक ठाकरे व शिक्षक मांडवगडे यांचेवर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. या निमित्ताने पंचायत समिती शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. सुमारे पंधरा दिवसांपासुन विद्यार्थी शाळेत येत नसल्याने उद्या प्रजासत्ताकदिनी तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत ध्वजारोहणासाठी पाठवणार का ? असा प्रश्न विचारल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती

किन्ही (वन) येथिल शाळेची बातमी दि.२७ जानेवारीला
 ई.टिव्ही. वाहिनीच्या १२.३० वाजताच्या
 बातमीपत्रात दाखविण्यात आली. 
या बातमीची झलक आपल्यासाठी.


Wednesday, 25 January 2012

माथनी येथिल विद्यार्थ्यांचा पं.स.मध्ये ठिय्या

तालुक्यातील माथनी येथिल जिल्हा परिषद शाळेत शिक्षक देण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी पंचायत समीती मध्ये ठिय्या दिला. माथनी शाळेत दोन शिक्षकांची पदे मंजुर असतांना केवळ एकाच शिक्षकाच्या भरवशावर शाळा सुरू आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी शिक्षण विभागाला कळवुनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. काल ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकुन प्रशासनाचा निषेधही नोंदवला होता. मात्र तरी देखिल पंचायत समितीने याची दखल न घेतल्याने आज विद्याथ्र्यांसह पं.स.मध्येच शाळा भरवून निषेध व्यक्त केला.
साभार :- देशोन्नती

Monday, 24 October 2011

आता आम्हाला शैक्षणीक कामे करू द्या..!


शेकडो शिक्षकांचे तहसिलदारांना निवेदन

ऐन परिक्षेच्या काळात शिक्षकांवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सोपविण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेकडो शिक्षकांनी तहसिल कार्यालयावर धडक दिली. शैक्षणीक कामावर दुर्लक्ष होत असल्याने मतदार याद्यांच्या कामावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शेकडो शिक्षक उपस्थित होते. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यान्वये शिक्षकांना जनगणना, आपत्ती निवारण, तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरीक्त इतर कामे दिल्या जाऊ नयेत असा स्पष्ट नियम आहे. तरी देखिल शिक्षकांनी गेल्या महिनाभरात मतदार याद्यांच्या कामात प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले आहे. मात्र नुकत्याच देण्यात आलेल्या नविन आदेशान्वये नगर परिषद क्षेत्रातील मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदारांचे छायाचित्र गोळा करणे हे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. १ नोव्हेंबर पर्यंत ते पुर्णत्वास न्यायचे आहे. मात्र सध्या शिक्षकांवर प्रथम सत्रांत परिक्षेच्या प्रश्नपत्रिका तपासणे व सातत्यपुर्ण सर्वंकष मुल्यमापन पद्धतीनुसार विद्याथ्र्यांचे मुल्यमापन करण्याची जबाबदारी आहे. या सर्व कामांसाठी शिक्षकांना शाळेत राहणे मुख्याध्यापकांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या आदेशाचे पालन करणे अशक्य असल्याचे शिक्षकांचे म्हणने आहे. एकीकडे शासन सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करते तर दुसरीकडे शिक्षकांना अशैक्षणीक कामाना जुंपून शिक्षणाच्या कार्यापासुन वंचित ठेवते याबाबत अनेक शिक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली.


शिक्षकांच्या प्रशिक्षणात उडाला गोंधळ

अंजी नृसिंह येथे झालेल्या तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या मुल्यमापन प्रशिक्षणात अखेरच्या दिवशी गोंधळ उडाला. या तिन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येणा-या शिक्षकांना प्रत्येक दिवसाचा प्रवास भत्ता देय होता. मात्र पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पैसे मिळाल्याबाबत शिक्षकांच्या स्वाक्षNया घेतल्या. मात्र पैशांचे वाटप केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काही शिक्षकांनी याबाबत संबंधीतांना विचारणा केली. परंतु त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर बाबीची तक्रार करणार असल्याचेही काही शिक्षकांनी बोलुन दाखविले.


Friday, 16 September 2011

घाटंजीचा वादग्रस्त शिक्षक गिनगुले निलंबीत


मुरलीच्या ग्रामस्थांचा लढा यशस्वी

लाखो रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेल्या डी.डी. गिनगुले या वादग्रस्त शिक्षकाला अखेर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी निलंबीत केले. निलंबन काळात त्याला उमरखेड पंचायत समिती देण्यात आली आहे. 
एका जिल्हा परिषद सदस्याच्या दादागीरीमुळे गेल्या काही काळात चर्चेत आलेल्या या शिक्षकावर अनेक आरोप आहेत. कोणतीही पुर्वसुचना न देता तब्बल आठ महिने ड्युटीवरच न गेलेल्या गिनगुले याला मुरली या गावीच नियुक्त करण्यात यावे यासाठी मंत्र्यांच्या निकटस्थ असलेल्या एका जिल्हा परिषद सदस्याने राजकीय पदाचा गैरवापर करून तसेच प्रसंगी पंचायत समिती कार्यालयात धुडगूस घालुन दबावतंत्राचा वापर केला होता. मात्र मुरली येथिल ग्रामस्थांचा या शिक्षकाच्या नियुक्तीला ठाम विरोध होता. त्यामुळे येथिल ग्रामस्थांनी १ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले होते.  हा विरोध दडपण्यासाठी त्या जि.प.सदस्याने घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांच्या माध्यमातुन मुरली येथे पोलीस ताफा पाठवुन गावक-यांना धमकाविण्याचाही प्रयत्न केला होता.
डी.डी. गिनगुले हा जानेवारी २००४ ते ३ सप्टेंबर २०१० या कालावधीत तालुक्यातील सावंगी संगम येथिल जि.प. शाळेवर कार्यरत होता. त्यावेळी काही काळ मुख्याध्यापक पदाचा प्रभार त्याचेकडे होता. त्यावेळी त्याने शासनाकडून मिळालेला निधी, ई वर्ग जमिनीच्या हर्रासातुन शाळेला मिळालेली रक्कम, सर्व शिक्षा अभियान, मानव विकास मिशन च्या रकमेतुन सुमारे २ लाख  रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार सावंगी संगम येथिल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केली होती. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी गिनगुलेची ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानुसार पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. पार्लावार यांनी या तक्रारीची चौकशी केली. त्यामध्ये सदर प्रभारी मुख्याध्यापकाने गैरप्रकार केल्याचे चौकशीत आढळुन आले. धामनदरी जि. प. शाळेचे अर्धवट बांधकाम तसेच या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवणा-या महिलेचे वेतनही देण्यात न आल्याचे आढळले. तसा अहवालही चौकशी अधिका-याने गटशिक्षणाधिका-याकडे सोपवला. त्यानंतर गिनगुले कडुन मुख्याध्यापक पदाचा प्रभार काढुन घेण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली. परंतु आदेश मिळुनही त्या शिक्षकाने प्रभार दिला नाही. त्यामुळे पंचनामा करून एकतर्फी प्रभार काढण्यात आला. मात्र या प्रकरणी थातुर मातुर कारणे दाखवा नोटिस बजावण्याची औपचारीकता वगळता पंचायत समितीने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नव्हती. विषेश म्हणजे दि. ४ सप्टेंबर २०१० पासुन सदर शिक्षक शाळेवर कोणतीही पुर्वसुचना न देता गैरहजर होता . या सर्व प्रकारानंतर त्याचेवर कार्यवाही होण्याऐवजी त्याला घाटंजी लगत असलेल्या मुरली गावी स्थानांतरीत करण्यात आले. मात्र गावक-यांच्या विरोधामूळे त्याला रूजू करून घेण्यात आले नाही. तरी देखिल जि.प.सदस्याने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून गिनगुलेला मुरली येथेच नियुक्त करण्याचा हेका धरला.
त्यामुळे गिनगुलेचे प्रकरण अनेक महिण्यांपासुन रेंगाळतच होते. मात्र मुरली येथिल यादव निकम यानी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन आमदार संदिप बाजोरीया, सुमित बाजोरीया, कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर यांनी या प्रकरणात विषेश लक्ष घालुन मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे या प्रकरणात योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्यामुळे अखेर सर्व बाबींचा विचार करून डी.डी. गिनगुले याचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. याबाबत प्रतिक्रीया देताना सतिष भोयर म्हणाले की, शैक्षणीक क्षेत्रातील बेशिस्त प्रवृत्तींना  पाठीशी घालण्याचा प्रकार योग्य नाही. गिनगुले यांचेवर झालेल्या कार्यवाहीतुन ईतर कर्मचा-यांनी धडा घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
साभार: देशोन्नती