Pages

Showing posts with label मेळावा. Show all posts
Showing posts with label मेळावा. Show all posts

Tuesday, 14 January 2014

जातीधर्मापेक्षा देश महत्वाचा - रामदास आठवले

आवाहन : देशहितासाठी महायुतीला सत्ता द्या !
कोणत्याही जातीधर्मापेक्षा देश महत्वाचा असतो. कॉंग्रेसने गेल्या सहा दशकात देशाचे वाटोळे केले आहे. दीन दलित, शेतकरी व शोषीतांच्या नावावर सत्ता उपभोगुन त्यांचेसाठी काहीही केले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिपाई-भाजप-शिवसेना व स्वाभिमानी संघटनेच्या महायुतीला सत्ता द्या असे आवाहन रिपाईचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी केले. घाटंजी येथे आयोजीत महायुतीच्या मेळाव्यात ते उद्घाटक म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हंसराज अहिर होते. रिपाई (आ)चे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे, रिपाईचे सुधाकर तायडे, मोहन भोयर, बाबासाहेब गाडे, सेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर, विजय कोटेचा, उद्धव येरमे यांचेसह भाजप, रिपाई व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आठवले यांनी आपल्या खसखस पिकविणा-या भाषणातून कॉंग्रेसप्रणीत वेंâद्र व राज्य सरकारचा खरपुस समाचार घेतला. भगवा आणी निळा एकत्र आल्याने कॉंग्रेसच्या पोटात गोळा आल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाला केवळ विशिष्ट समाजापुरता मर्यादीत न ठेवता सर्वांपर्यंत नेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकत्र्यांना केले. काहीही झाले तरी हातातला निळा झेंडा व जयभिमचा विचार सोडणार नाही. कॉंग्रेसने दलितांना केवळ सत्तेसाठी वापरले. सन्मान दिला नाही. त्यामुळेच भाजप सेनेशी सन्मानाची महायुती केल्याचे त्यांनी सांगितले. सिंचनासाठी पाणी अडविण्यापेक्षा आघाडी सरकारने पैसा अडवा पैसा जिरवा हाच उपक्रम राबविल्याची टिका त्यांनी केली. 
खासदार हंसराज अहिर यांनी अध्यक्षीय भाषणातून कॉंग्रेसच्या धोरणांचा समाचार घेतला. आघाडी सरकारवर लोकांचा विश्वास नाही, कॉंग्रेसने लोकांना कधीच आपलं मानलं नाही. केवळ महात्मा गांधीच्या नावाने मतांची लुट केली. हि लुट थांबविण्यासाठीच महायुती अस्तित्वात आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. राज्याला विमानतळांपेक्षा धरणांची जास्त गरज आहे. विदर्भापेक्षा लहान असलेल्या पंजाब हरियाणामध्ये ९६ टक्के सिंचन होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यात सिंचन परिषदेत येऊन पर्यटनासाठी १० कोटींचा निधी जाहिर करतात. शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर सोयाबिन पेâकतो तरी या सरकारला शेतक-यांचे दु:ख कळत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आधी कोळसा घोटाळा झालाच नसल्याचा कांगावा करणा-या सरकारने अखेर सर्वोच्च न्यायालयात गैरव्यवहाराची कबुली दिल्याने पंतप्रधानांसह या विरोधात बोलणा-या मंत्र्यांचा खोटारडेपणा जनतेपुढे आल्याचे ते म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून आघाडी सरकारच्या धोरणांवर टिका करून महायुतीला सत्तेत आणण्याचे आवाहन केले. दरम्यान, रामदास आठवले यांची व्यासपीठावर लाडूतुला करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे यांनी केले. संचालन सुरेश जाधव तर आभार प्रदर्शन संतोष जिवने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे जेष्ठ नेते मधुसूदन चोपडे, तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर, शहराध्यक्ष विष्णु नामपेल्लीवार, सरचिटणीस देवानंद काळे, गिरीधर राठोड, तालुका कोषाध्यक्ष राजु सुचक, भाजयुमो तालुकाध्यक्ष गुड्डू शुक्ला, यांचेसह रिपाई (आ), भाजपा, शिवसेना व स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.
साभार : सकाळ 

Friday, 28 December 2012

घाटंजी येथे शिक्षक मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन



यवतमाळ जि.प.प्राथमिक शिक्षक संघ र.न.२३५ शाखा घाटंजीचे वतीने तालुकास्तरीय शिक्षक मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन दि.३० डिसेंबरला स्थानिक जलाराम मंदिरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव राहतील. यावेळी पं.स.सभापती शैलेष इंगोले, जि.प.सदस्य योगेश पारवेकर, उषा राठोड, पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, सदस्य रूपेश कल्यमवार, रमेश धुर्वे, सुमित्रा पेंदोर, रत्नमाला कोंडेकर, गटविकास अधिकारी अजय राठोड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, विनोद गोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात शिक्षकांच्या विवीध प्रलंबीत समस्यांवरही चर्चा होणार आहे. तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाला आवर्जुन हजर राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, दिपक चौधरी, विजय डंभारे, शेख जलिल, नारायण भोयर, संजय इंगोले, काशिनाथ आडे, ज्ञानेश्वर पुसनाके, लक्ष्मण कुडमेथे, राजु हेमके, रामेश्वर भांडारवार, अशोक जिल्लडवार, सुभाष ठाकरे, किशोर मुनेश्वर, बाळु पवार, दिलीप संगनवार, मोहम्मद खान, आकाश ठाकरे, महादेव सोनटक्के, सुरेश वरगंटवार, अविनाश खरतडे यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती