Pages

Wednesday 23 November 2011

मध्यरात्री लागलेल्या आगीत दुकान भस्मसात

शहरातील मुख्य बाजारपेठेत नगर परिषद व्यापारी संकुलात असलेल्या अजमेर मार्केटिंग या दुकानाला काल मध्यरात्री भिषण आग लागली. या आगीत संपुर्ण दुकान व साहित्य जळुन खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री १२ वाजताच्या सुमारास येथिल व्यापारपेठ बंद असल्यामुळे सगळीकडे सामसुम होती. काही नागरीक या भागातील चौकात बसुन होते. त्यांना दुकानातुन धुर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधीतांना कळविले तसेच या भागातील नागरीकांना गोळा केले. पोलीस विभागाला सुचना देण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक कोंडे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. यवतमाळ येथिल अग्निशमन यंत्रणेला बोलविण्यात आले. मात्र तोवर आग विझविण्यासाठी घाटंजी नगर परिषदेकडे असलेला पाण्याचा टँकर आणण्यासाठी सुचना देण्यात आली. मात्र सदर टँकर रिकामा असल्याने तो भरण्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागला. विषेश म्हणजे यावेळी कर्तव्यावर असलेल्या टॅ्रक्टर चालकाकडे चावीच नव्हती. शिवाय या टँकरचा पाईप सुद्धा फुटलेला होता. योग्य वेळी हा टँकर न पोहचल्याने सदर दुकान भस्मसात झाले. नागरीकांनी परिसरातुन पाण्याची व्यवस्था करून आग पसरू दिली नाही. यवतमाळ येथुन अग्निशमनाची गाडी आल्यावर आग आटोक्यात आली. मात्र सिराज अजानी यांच्या मालकीचे अजमेर मार्केटिंग हे दुकान संपुर्णपणे आगीच्या तडाख्यात खाक झाले. आग शॉर्ट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
न.प.चे ‘अग्निशमन’ थंडबस्त्यात
काही महिन्यांपुर्वी राज्य शासनाकडून नगर परिषदेला अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. न.प.ला आपला सहभाग नोंदवायचा होता. मात्र नगर परिषदेकडे पैसाच नसल्याचे कारण पुढे करून विद्यमान पदाधिका-यांनी अग्निशमन यंत्रणा उभारण्यास नकार दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे सोंग उभे करणा-या न.प.पदाधिका-यांना नागरिकांच्या जिवीताशी संबंधीत सुविधेबद्दल किती आस्था आहे हेच यावरून स्पष्ट होते. नागरिकांनीही न.प.निवडणुकीच्या निमित्ताने यावर वर्तमान
पदाधिका-यांना जाब विचारण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment