Pages

Saturday 26 November 2011

ना.मोघेंच्या 'वाटप' हट्टामुळे घरकुल लाभार्थ्यांची परवड

धनादेशाच्या प्रतिक्षेत शेकडो लाभार्थी पंचायत समितीत
शासकीय मदतीचा कोणताही धनादेश आपल्याच हस्ते वाटप व्हावा असा पायंडा पाडणा-या सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यामुळे शेकडो घरकुल लाभाथ्र्याना पंचायत समितीत ताटकळत रहावे लागले.
ना.मोघेंच्या उपस्थितीत नुकताच बेलोरा येथे पाणी टंचाई आढावा बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाबाबत पंचायत समिती सभापती व सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत असल्यामुळे हा कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे.
या बैठकीसाठी केवळ पाणी टंचाई संबंधीत कर्मचारीच नव्हे तर पंचायत समिती कार्यालयातील जवळपास सर्वच कर्मचारी गेले होते. त्यामुळे घरकुलाचे धनादेश घेण्यासाठी आलेल्या शेकडो लाभार्थ्यांना दिवसभर पंचायत समितीच्या आवारात ताटकळत रहावे लागले.यामुळे संतप्त झालेल्या काही पंचायत समिती सदस्यांनी गटविकास अधिका-यांच्या कक्षाला कुलूप लावण्याचाही प्रयत्न केला.
पं.स.सभापती व सदस्यांना डावलुन गटविकास अधिकारी मंत्री महोदय व एका जि.प.सदस्याच्या ईशा-यावर काम करतात असा आरोप पं.स.सदस्य सहदेव राठोड यांच्यासह इतर सदस्यांनीही केला आहे. शासनाकडुन विवीध योजनेंतर्गत आलेला निधी आपणच आणला असा संभ्रम निर्माण करण्यासाठीच अशा वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असा आरोप राठोड यांनी पत्रपरिषदेत केला. घरकुल योजनेत प्रचंड अनियमितता आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या मात्र कार्यवाही मात्र झाली नाही. या योजनेसाठी प्राधान्यक्रम डावलुन गावांची निवड करण्यात आली. बंजारा व आदीवासी समाज बहुल गावांना या योजनेतुन डावलण्यात आले. त्यामुळे स्वत:ला बंजारा समाजाचे हितचिंतक म्हणवुन घेणा-यांना ही बाब लक्षात येऊ नये याबाबत राठोड यांनी आश्चर्य व्यक्त केले.
भारत निर्माणच्या योजनेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. मात्र एकाही प्रकरणात कुणावरही ठोस कार्यवाही झालेली नाही. पाणी टंचाई कृती आराखड्यात मोठा भ्रष्टाचार असुन आढाव्याचे हे नाट्य केवळ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाच पोसण्यासाठी असल्याचा आरोप सहदेव राठोड यांनी यावेळी केला. काही महिन्यांपुर्वी ना. मोघेंच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या धनादेशांवर संबंधीतांच्या स्वाक्ष-याच नसल्यामुळे कार्यक्रम आटोपताच धनादेश लाभार्थ्यांकडुन परत घेण्यात आले होते. त्यावेळीही ना.मोघेंच्या वाटप हट्ट चांगलाच चर्चेत आला होता हे विषेश.
साभार:- देशोन्नती 

No comments:

Post a Comment