Pages

Wednesday 2 November 2011

अरूणावती च्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची समस्या निवारण सभा

अरूणावती प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतक-यांसाठी समस्या निवारण सभेचे आयोजन दि.४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता वसंत आदिवासी विद्यालय पार्डी(नस्करी) येथे करण्यात आले आहे. अरूणावती प्रकल्पाचे पाणी अजुनही शेवटच्या गावापर्यंत पोहचले नाही. या प्रकल्पांतर्गत कनॉलबाधीत शेतक-यांना अद्याप प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळालेला नाही. यामुळे सदर विभागाचे अधिकारी व लाभ क्षेत्रातील समस्याग्रस्त शेतकरी यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा यासाठी या समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्र झपके, जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सु.दा.साळुंखे, अरूणावती प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता पी.व्ही. गायकवाड, युवा नेते योगेश पारवेकर, सद्रुद्दीन रयानी, आर्णी बाजार समितीचे माजी सभापती शंकर राठोड, निम्न पैनगंगा प्रकल्प समस्या निवारण समितीचे सचिव रफिक पटेल, जयवंत चिल्लावार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे.
या कार्यक्रमाला शेतक-यानी उपस्थित राहुन आपल्या व्यथा मांडाव्या असे आवाहन पार्डी नस्करी ग्रा.पं.सरपंच गजेंद्र निकडे, उपसरपंच विठ्ठल धुर्वे, भांबोरा ग्रा.पं.सरपंच अशोक मेश्राम, उपरपंच निलेश कोठारी, धन्नु चव्हाण, बलदेव खडसे, शिवदास डेहणकर, किसन पवार, नामदेव जाधव, खुशाल राठोड, दामोधर शिंदे, रामराव साखरकर, विजय मरगडे, दामोधर थोटे, राजाराम पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment