Pages

Monday 23 December 2013

दक्षता समिती अध्यक्षपदी चंद्रकांत ढवळे

येथिल नगर पालिका स्तरीय दक्षता समितीच्या अध्यक्षपदी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रास्त धान्य व ईतर वस्तुंचा पुरवठा शासकीय रास्त धान्य दुकानातून योग्य प्रकारे होतो अथवा नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनातर्पेâ या समितीचे गठण करण्यात येते. पत्रकारीतेचा दांडगा अनुभव असलेल्या ढवळे यांची या पदावर नियुक्ती झाल्याने या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे, जि.प.सदस्य देवानंद पवार यांना दिले आहे.

Monday 9 December 2013

सभापतींचा ‘वादग्रस्त’ निर्णय ठरला बाजार समितीच्या फायद्याचा

अभिषेक ठाकरे : विरोध झाला तरी शेतकरी हिताचे निर्णय घेणार
बाजार समितीने आयोजीत केलेल्या गुरांच्या बाजार लिलावात योग्य बोली न लागल्यामुळे सभापतींनी विशेषाधीकार वापरून लिलाव रद्द करण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता. मात्र पेâरलिलावात एक लाख रूपये जास्त बोली लागल्याने सदर निर्णय बाजार समितीच्या फायद्याचा झाला आहे. त्याबद्दल घाटंजी बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे.
२३ नोव्हेंबर रोजी घाटंजी बाजार समितीने गुरांच्या बाजाराचे वंâत्राट देण्यासाठी लिलावाचे आयोजन केले होते. त्यामध्ये किमान बोली ५ लाख रूपये ठेवण्यात आली होती. मात्र या लिलावात अंतिम बोली ५ लाख ८ हजार एवढीच होती. त्यामुळे सभापतींनी लिलाव प्रक्रीया रद्द केली. त्यानंतर ४ डिसेंबरला पेâरलिलाव घेण्यात आला. त्यामध्ये अंतिम बोली ६ लाख ८ हजार रूपयांची झाली. पहिल्या लिलावापेक्षा तब्बल एक लाख रूपयांचा फायदा बाजार समितीला झाला आहे. 
या लिलावाच्या वेळी सभापती अभिषेक ठाकरे, सहाय्यक निबंधक जयंत पालटकर, ख.वि.सं.चे माजी अध्यक्ष बल्लु पाटील लोणकर, विवेक भोयर, आशिष लोणकर, नामदेव आडे, अकबर तंव्वर, नागोराव कुमरे, किशोर चवरडोल, गजानन भोयर, संजय र्इंगळे, रमेश आंबेपवार, सय्यद रफिक, रा.कॉ.तालुकाध्यक्ष संजय गोडे, रा.यु.कॉ.शहराध्यक्ष संजय ढगले, बाजार समिती सचिव कपिल चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिला लिलाव रद्द केल्याने सभापतींवर बरीच टिका झाली होती. मात्र या टिकेचा विचार न करता सभापती ठाकरे निर्णयावर ठाम राहिले. शेतकरी व बाजार समितीच्या हितासाठी कोणाचाही विरोध पत्करण्याची तयारी असल्याचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. २०११-१२ व त्यापुर्वी बाजार समितीला गुरांच्या बाजारापासुन ३ लाखांपेक्षाही कमी उत्पन्न मिळत होते. 
मात्र गुरांचा बाजार लिलाव पद्धतीने देण्याच्या धाडसी निर्णयामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. एकीकडे बाजार समितीच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडत असतांना प्रत्येक आरोपांचा सामना करीत सुरू असलेली वाटचाल चकीत करणारी आहे.
साभार : सकाळ 

Friday 6 December 2013

घाटंजी तालुक्यात ‘ऑनर किलिंग’

वडील, भाऊ व मामाने केला १६ वर्षीय मुलीचा खुन
तब्बल २२ दिवसांनी लागला तपास
नेर तालुक्यात पुरला होता मृतदेह
अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण व लग्नाचा हट्ट सहन न झाल्याने मुलीचे वडील, भाऊ, मामा यांचेसह पाच जणांनी कट रचुन तिचा निर्घुण खुन केला. घाटंजी तालुक्यातील किन्ही गावातील या घटनेने तालुका हादरला आहे. घटनेच्या तब्बल २१ दिवसांनी हा गंभिर प्रकार उघडकीस आला. 
रेखा प्रेमदास जाधव (वय१६) असे त्या दुर्दैवी मृतक मुलीचे नाव आहे. ता.१३ नोव्हेंबर रोजी नेर तालुक्यातील शिंदखेड शिवारातील शेतात तिचा खुन करून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला होता. या प्रकरणी घाटंजी पोलीसांनी मुलीचे वडील प्रेमदास केशव जाधव (४५) नातलग देविदास राठोड यांना अटक केली असुन खुनाच्या कटात सहभागी मुलीचा भाऊ रूपेश प्रेमदास राठोड, मामा अशोक धनु राठोड, राजु मोतीराम राठोड हे आरोपी फरार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मृतक मुलगी हि ता.१७ नोव्हेंबर रोजी घाटंजी येथुन बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील प्रेमदास केशव जाधव यांनी नोंदविली होती. गावातीलच अर्जुन उर्फ  बबलु वासुदेव राठोड (२०) याचेशी मुलीचे प्रेमसंबंध असल्याने त्यानेच तिला फूस लावुन पळविल्याचा आरोप वडीलांनी केला होता. त्यानुसार घाटंजी पोलीसांनी त्या युवकावर भा.दं.वि.कलम ३६३, ३६६ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट ३७० (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. अद्यापही तो युवक न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान नेर तालुक्यातील शिंदखेड शिवारात ता.२२ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान पुरलेल्या अवस्थेतील युवतीचे प्रेत आढळुन आले होते. चेहरा दगडाने ठेचुन विद्रुप करण्यात आल्याने मृतदेहाची ओळख पटली नव्हती. नेर तालुक्यात या अनोळखी युवतीच्या खुनामुळे खळबळ उडाली होती. उल्लेखनिय म्हणजे मृतक रेखाच्या वडीलांनाही नेर येथे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले होते. मात्र कपडे व अन्य साहित्य माझ्या मुलीचे नाही असे त्यांनी सांगितले होते. तपासादरम्यान मुलीच्या वडीलांची उत्तरे समाधानकारक न वाटल्याने पोलीसांचा संशय बळावला.
त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पाच जणांनी कट रचुन रेखाला अशोक राठोड व राजु राठोड यांचे सोबत दुचाकीवर नेर तालुक्यात पाठविले. तिथे शेतशिवारात या दोघांनी तिचा खुन केल्याचे त्याने कबुल केले. मुलीचे गावातीलच अर्जुन राठोड याचेशी प्रेमसंबंध होते. तिने त्याच्या सोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला होता. याबाबत समाजाची बैठकही किन्ही येथे झाली होती. मुलाकडचे लग्नासाठी तयार होते. मात्र मुलीच्या वडीलाचा लग्नाला तिव्र विरोध होता. त्यातुनच हे कृत्य त्याने सांगितले. घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या नेतृत्वात घाटंजी पोलीस आरोपींचा कसोशीने शोध घेत आहेत.  
साभार : सकाळ 

Friday 2 August 2013

घाटंजीत नगराध्यक्षपदाची ‘संगितखुर्ची’

दिड वर्षात तिन नगराध्यक्ष : पदाच्या आघाडीत ‘कर्तव्य’ माघारले
अवघ्या दिड वर्षाच्या कालावधीत तब्बल तिन नगराध्यक्ष पाहण्याचा दुर्मिळ पण तितकाच दुर्दैवी योग घाटंजीवासीयांच्या नशिबी आला आहे. येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर तिस-यांदा ‘नवा गडी’ विराजमान होणार आहे. कोणतीही तांत्रिक अडचण नसतांना दिड वर्षात तिन वेळा सर्वसहमतीने नगराध्यक्ष बदलाची बहुदा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे ही पालिकेच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची आहे की ‘संगितखुर्ची’च्या खेळातली? असा प्रश्न घाटंजीवासियांना पडला आहे.
उल्लेखनिय म्हणजे हे बदल प्रासंगिक नव्हे तर पुर्वनियोजीत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करतेवेळीच ही ‘वाटणी’ ठरविली होती. ज्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने नगर पालिकेत सर्वाधीक जागा मिळविल्या ते जगदिश पंजाबी हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. एका वर्षात त्यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसचेच परंतु ना.मोघे यांचे खंदे समर्थक किशोर दावडा यांनी नगराध्यक्षपदाची खुर्ची पटकावली. मात्र सहाच महिन्यामध्ये त्यांना ‘खो’ मिळाल्याने खुर्चीवरून उठावे लागले. आता एका वर्षासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे हे खुर्चीचा ताबा घेतील. त्यानंतरचे अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांकरीता राखीव आल्याने व त्या प्रवर्गातील एकमेव उमेदवार रा.कॉं.कडे असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. अन्यथा घाटंजी नगर परिषदेने यावेळी पाच वर्षांच्या काळात सर्वाधीक नगराध्यक्ष बदलाचा नवा विक्रम प्रस्थापीत केला असता. पदाच्या या ओढाताणीत विकास तर सोडाच परंतु मुलभूत समस्यांकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही. पावसात शहराच्या विवीध भागामध्ये साचणारे तलाव व त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगणारे घाटंजीकर, अवघ्या दोन तिन वर्षांपुर्वी बांधलेल्या रस्त्यांवर पावलोपावली पडलेले खड्डे, नाल्या नसल्याने पॉश वस्त्यांमध्येही वाहणारी गटारे यासह विवीध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. न.प.च्या सर्वच शाळांची दुरावस्था झाली आहे. न.प.कार्यालयातही ठिकठिकाणी पाणी गळते. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये यावर्षी मुरूम देखिल टाकण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही आवश्यक कागदपत्रांवर मुख्याधिका-यांची स्वाक्षरी मिळवणे हे मोठे दिव्य असल्याचा अनुभव घाटंजीकरांना येत आहे. अशातच नगराध्यक्षपदाची ही संगितखुर्ची मात्र शहरवासियांचे मनोरंजन करीत आहे.

युवा नगराध्यक्षाकडून ‘रामराज्या’ची अपेक्षा !
 येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदी आरूढ होणार असलेले राम खांडरे हे पालिकेच्या विस्कळीत कारभाराला रूळावर आणतील अशी अपेक्षा घाटंजीकर बाळगून आहेत. एक प्रगतीशील व्यावसायीक, उमदा कार्यकर्ता व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणुस अशी ओळख असलेले हे व्यक्तीमत्व अन नावामध्ये असलेला ‘राम’ यामुळे त्यांच्याकडून सुराज्याची अपेक्षा केली जात आहे.
अमोल राऊत
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

गिलानी महाविद्यालयाला एक लाखांचा पहिला पुरस्कार


येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाला जागर जाणिवांचा अभियानांतर्गत जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाच्या  उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फ़े  सन २०१२-१३ करिता देण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहजाद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याला खा.सुप्रिया सुळे, ना.जयंत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.राजेश टोपे, उच्च शिक्षण संचालक श्री गायकवाड साहेब यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. महाविद्यालय व शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण 
घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये  स्त्री पुरूष समानतेची बिजे रूजविणे आणी विद्यार्थीनींमध्ये आत्मविश्वास तथा आत्मनिर्भयता विकसीत होण्याच्या दुष्टीने गिलानी महाविद्यालयाने पुढाकार घेऊन शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये विवीधांगी उपक्रम राबविले. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फ़े महाविद्यालयाला जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. या उल्लेखनिय यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव ए.ए.लोणकर यांनी कौतूक केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सी.पी.वानखडे, प्रा. डॉ.एन.एन.तिरमनवार, प्रा.डॉ.सी.आर.कासार, प्रा.पत्की, प्रा.डॉ.प्रदिप राऊत, प्रा.डॉ.निनाद धारकर, प्रा.युवराज माहुरे यांचेसह प्राध्यापक वर्ग व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

पाऊस पडताच घाटंजीत वाहते गटारगंगा !

नगर परिषद व पंचायत समितीतही पाणीच पाणी
अनेक भागातील नागरिकांचा जीव धोक्यात





नगर परिषद व तहसिल कार्यालयाच्या तुघलकी कारभारामुळे पाऊस पडताच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचुन सर्वत्र तलावाचे स्वरूप येते. पांढुर्णा रोड, आंबेडकर वार्ड, आनंद नगर, घाटी यासह अनेक भागातील नागरिकांना पाऊस येताच घर सोडून उंच ठिकाणी जावे लागते. बेशरमाच्या झाडांनी लुप्त झालेले नाले, पाणी वाहुन जाण्यासाठी नसलेली व्यवस्था, कच-याने तुंबलेल्या नाल्या यामुळे पाऊस येताच सर्वत्र पाणी साचते. शहरातील रहिवाशी भागच नव्हे तर पाण्याच्या निच-याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषद कार्यालय परिसरालाही तलावाचे स्वरूप येते. अशीच परिस्थिती पंचायत समिती कार्यालयाचीही आहे. 
पांढुर्णा रोडवरील सरस्वती नगरातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी तहसिल व न.प.ला दिली होती. या ले आऊट मध्ये नाल्या नाहीत. या भागातून जो नाला वाहतो त्याचे पाणी थेट ले आऊट मधील घरांमध्ये घुसते. येथिल रहिवाशांनी अनेकदा प्रशासनाकडे याबाबत तक्रारी केल्या. तहसिलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पं.स.सभापती या सर्वांनी येऊन पाहणी केली. मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. दि.३ जुलै रोजी ले आऊटधारक दिपक बळीराम बेलोरकर यांनी तहसिलदारांसमक्ष नाल्याची २४ तासात व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. संदिप नार्लावार यांच्याबाबतही नागरिकांची अशीच तक्रार आहे. पांढुर्णा रोड, वसंत नगर व शहरातील ईतर भागात असलेले मोठे नाले बेशरम व गाजगवताने बुजलेले आहेत. वर्षानुवर्षे त्याची सफाई झालेली नाही. त्यामुळे या सफाईचा निधी कोणाच्या घशात गेला असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष गजानन भालेकर यांनी उपस्थित केला. सरस्वतीनगरासह शहरातील समस्या तातडीने न सोडविल्यास आंदोलन करण्याच्या ईशारा मनसेचे विनायक परचाके, गजानन ठाकरे, सागर मोहुर्ले, अनिल जाधव, आनंद पंधरे, राजु गावंडे, संदिप झाडे, राहुल धुर्वे, राजु ठाकरे, नितेश डोनारकर, संदिप राऊत, शिवराज्य चे जिल्हाध्यक्ष पवन परडखे, प्रशांत ठाकरे यांचेसह या परिसरातील रहिवासी प्रविण ठाकरे, वैâलास बगमारे, संदिप आत्राम, आकाश  बांगरे, विलास बगमारे, आसीफ शेख यांनी दिला आहे.

आमच्या जीवाची जबाबदारी प्रशासनावरच
आम्ही वारंवार तक्रारी करूनही न.प.व तहसिल प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याने जीवीतहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील अशी प्रतिक्रीया या भागातील नागरिकांनी दै.सकाळ जवळ व्यक्त केली.

रस्त्यांवर डबक्यांचे साम्राज्य
घाटंजीच्या मुख्य रस्त्याला डबक्यांनी व्यापले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी साचुन असल्याने अनेक वाहनधारक यामध्ये पडून जखमी होतात. मात्र नगर परिषदेला ते बुजविण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत कोणी न.प.मध्ये तक्रार घेऊन गेले तर त्यांना सांभाळून वाहने चालविण्याचा सल्ला देण्यात येतो.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

हि शाळा आहे की मुत्रीघर ?

न.प.च्या दुर्लक्षाने उर्दू शाळेची दुरावस्था

जीर्ण ईमारतीमुळे २१२ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात














शाळा म्हणजे विद्येचे भांडार...तिथे ज्ञानाचा दरवळ यावा, विद्यार्जनासाठी प्रसन्न वातावरण असावे हि सर्वांचीच माफक अपेक्षा असते. मात्र घाटंजीतील नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळेचे चित्र जरा वेगळे आहे. येथिल विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी प्रसन्न वातावरण तर सोडाच पण गटार व मुत्रीघराच्या घाणेरड्या वासाने शाळेमध्ये बसणे दुरापास्त झाले आहे. 
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेमध्ये वर्ग १ ते ७ मध्ये ४९ मुले व ९३ मुली  तर वर्ग ८ ते १० मध्ये ३२ मुले व ३८ मुली असे एकुण २१२ विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिक शाळेची ईमारत अत्यंत जीर्ण झाली असुन भिंतीना भेगा पडल्या आहेत त्यातून पाणी झिरपते. विंचु, साप असे धोकादायक जीव जंतू सुद्धा वर्गात येत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बसावे लागते. छतावरील कवेलु फ़ुटल्याने
 वर्गात पाणी गळते. एका वर्गखोलीचा स्लॅब खाली झुकला आहे. तो कधीही कोसळु शकतो. परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर टिनाचे शेड टाकुन त्याला स्वयंपाकगृह केले आहे. ६ बाय ८ च्या या जागेतच पोषण आहार शिजवुन विद्यार्थ्यांना उघड्यावरच जेवायला दिले जाते. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह असावे असा नियम आहे. मात्र उर्दू शाळेमध्ये स्वच्छतागृहच नाही. शाळेलगत असलेल्या न.प.कन्या शाळेचे दोन मुत्रीघर आहे. त्यापैकी वापर करण्या योग्य नसल्याने एक कुलूपबंद तर दुस-या मुत्रीघराचा वापर परिसरातील व्यापारी व नागरिक करतात. न.प.उर्दू शाळा, कन्या शाळा व अंगणवाडी एकाच परिसरात आहेत. मात्र संरक्षक भिंत नसल्याने मुत्रीघर व परिसरामध्ये नागरिक नेहमीच घाण करून ठेवतात. वर्गखोल्यांच्या भिंती, स्वयंपाकगृहाचाही वापर मुत्रीघरासारखाच केल्या जातो. त्यामुळे या परिसरात अत्यंत उग्र दर्प दरवळत राहतो. शिवाय शिक्षीका, विद्यार्थीनींची यामुळे प्रचंड कुचंबना होते. विद्यार्थींनीना तर अत्यंत संकोचलेल्या अवस्थेत परिसरात वावरावे लागते. त्यामुळे अनेक विद्यार्थीनी वर्गाबाहेरच पडत नाहीत.
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची खोलीही जीर्ण झाली आहे. पाणी झिरपत असल्याने भिंती काळवंडल्या आहे. शाळेचे दस्तावेज सुरक्षीत राहतील का याचीही हमी नाही. एकदा तर चोरट्यांनी जीर्ण झालेली खिडकी तोडून कार्यालयातील कपाटे फोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली होती. अशा धोकादायक परिस्थितीमध्ये १३१ अल्पसंख्यांक विद्यार्थींनी व ८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी आज दुपारी शाळा व्यवस्थापन समितीसह न.प.कार्यालय गाठले. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने कार्यालयात तक्रार देऊन त्यांना परतावे लागले. नविन जागेवर उर्दू शाळेची ईमारत बांधण्यासाठी न.प.ने २०१२ मध्ये ठराव घेतला आहे. जागा उपलब्ध आहे. नविन ईमारतीसाठी निधीही आला आहे. मात्र तरी देखिल नगर परिषद नविन ईमारत बांधण्यासाठी टाळाटाळ करीत आहे असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शे.सलिम कुरेशी यांनी केला. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

शि.प्र.म. विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती




राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ईयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.) परिक्षेत येथिल शि.प्र.मं.विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 
समिक्षा संजय कांबळे, शौरी विकास डंभारे, शिवाणी गणेश वल्लपवार, शरयु प्रविण चौधरी, सुबोध राजेश मुनेश्वर,  अनिकेत सुभाष निकम, अजिंक्य दत्ताजी पांढरमिसे, प्रतिक श्रिराम कनाके या आठ विद्याथ्र्यांना ईयत्ता बारावी पर्यंत दरमहा पाचशे रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्याथ्र्यांना संस्थेचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव अ‍ॅड. अनिरूद्ध लोणकर, मुख्याध्यापक बाबा भोंग, उपमुख्याध्यापक पुरूषोत्तम बोभाटे, पर्यवेक्षीका कुसूम महाकाळकर, देविदास टोंगे, जी.आर.सिंहे, एस.जी.राठोड, दिपक सपकाळ, महेश वाघाडे, डी.के.मस्के, मनोज बुरांडे, संदीप नखाते, अनुप मानकर, फिरोज पठाण, प्रशांत उगले, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

अंशकालीन निदेशकांचे सामाजीक न्यायमंत्र्यांना साकडे

राज्यातील १८६४५ निदेशक बेरोजगार : पुनर्नियुक्तीची मागणी
राज्यातील न.प., मनपा, तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अंशकालीन निदेशकांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक अंशकालीन निदेशकांनी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांची भेट घेतली. 
या वर्षी राज्यातील सुमारे १८ हजार ६४५ अंशकालीन निदेशकांना पुनर्नियुक्ती देण्यात न आल्याने त्यांचेवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याच्या अधिनियमान्वये वेंâद्र सरकारने ईयत्ता ५ ते ७ वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी क्रिडा, कार्यानुभव व कला या तिन अंशकालीन निदेशकांची नियुक्ती केली. त्यानुसार २०१२ या वर्षात निदेशकांनी काम सुद्धा केले. 
मात्र १८ फ़ेब्रुवारी २०१३ ला केंद्र शासनाच्या मान्यता मंडळाच्या बैठकीत सर्व शिक्षा अभियानांतर्गत चालणा-या २३ उपक्रमांमधुन १६ उपक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद सर्व शिक्षा कार्यक्रमांतर्गत करण्यात आली नाही असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या १९ मार्च २०१३ च्या परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहे. मात्र १३ मे २०१३ ला केंद्रशासनाने काढलेल्या शुद्धीपत्रकात कला, क्रिडा व कार्यानुभव निदेशकांच्या पदांसाठी २०१३-१४ वर्षाकरीता अनुदानाची तरतूद केली आहे. 
शासनाने शैक्षणीक सत्र २०१३-१४ मध्ये सर्व शिक्षा अभियानाला ७११.५० कोटी अनुदानास मंजुरी सुद्धा दिली आहे. मात्र तरी देखिल राज्यातील १८ हजार ६४५ निदेशकांना शासनाने पुनर्नियुक्ती दिलेली नाही अशी तक्रार आहे. सामाजीक न्यायमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करून बेरोजगारांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक निदेशकांनी यावेळी केली असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जितेंद्र जुनगरे यांनी कळविले आहे.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

घाटंजी पालिकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे अनुकंपा उमेदवाराची फरफट

जिल्हाधिका-यांचा आदेशही मुख्याधिका-यांसाठी ‘कवडीमोल’
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी शासन निर्णयानुसार पात्र असतांनाही केवळ घाटंजी पालिका मुख्याधिका-यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे विक्की माधव शेंद्रे हा उमेदवार नोकरीपासुन वंचित आहे.
सदर उमेदवाराने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि.१४ जुन २०१३ ला जिल्हाधिकारी कार्यालयाने घाटंजी नगर परिषदेला पत्र पाठवुन शासकीय निकषानुसार अनुकंपा तत्वावरील पद भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी असे सुचित केले होते. तसेच या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात यावा असेही या पत्रात नमुद करण्यात आले होते. मात्र जिल्ह्याधिका-यांनी आदेश देऊनही घाटंजी नगर परिषद प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.
त्यामुळे घाटंजी पालिका आता जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही महत्व देत नसल्याचेच सिद्ध झाले आहे. सुधारीत आकृतीबंधानुसार नगर परिषदेने पदभरती करतांना प्रथम पदोन्नतीची पदे, त्यानंतर अनुकंपा त्वावरील पदे, लाडकमिटीची पदे व शेवटी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सरळ सेवा भरती द्वारे पदे भरण्याचे निकष ठरवुन देण्यात आले आहेत. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदांनी आपल्या आस्थापनेवर कोणतेही पद कंत्राटी, हंगामी, मानधन तत्वावर अथवा प्रतिनियुक्ती द्वारे भरण्यात येऊ नये असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवुन नगर परिषदेचे पदाधिकारी व प्रशासन कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याच्या प्रयत्नात होते. 
नगर परिषदेच्या ग्रंथालयातील पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यास पात्र असलेला उमेदवार विक्की माधव शेंद्रे याने ग्रंथालय शास्त्रातही पदवी संपादन केली आहे. तसेच तो कला शाखेत पदव्युत्तर पदवीधारक आहे. सदर उमेदवाराचे वडील माधव शेंद्रे यांचा २५ जुन २००६ मध्ये कार्यालयीन कामकाजा दरम्यान मृत्यू झाला. ते लिपिक पदावर कार्यरत होते. त्यामुळे समकक्ष पदावर कार्य करण्यास सदर उमेदवार पात्र आहे. शिवाय अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये तो एकमेव उमेदवार आहे. तरी देखिल न.प.प्रशासनाकडून त्याला नियुक्ती देण्यास जाणिवपुर्वक दिरंगाई केल्या जात असल्याची तक्रार त्याने जिल्हाधिका-यांकडे केली होती. मात्र मुख्याधिकारी विपीन बन्नोरे हे जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही जुमानत नसल्याने कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडीलांच्या निधनामुळे कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी सदर उमेदवारावर आहे. अर्धांगवायुने ग्रस्त आई व तिन बहिणींसह कुटूंबाची उपजिवीका तो कशीबशी सांभाळत आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नगर परिषदेला नाही. जिल्हाधिका-यांचा आदेश झुगारणा-या मुख्याधिका-यांवर वरिष्ठांचा अंकुश नाही हे यातुन सिद्ध होत आहे. या प्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सदर उमेदवाराने ‘सकाळ’ शी बोलतांना सांगितले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडीयाच्या शहर शाखेचे गठण

दि.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इडीया च्या घाटंजी शहर शाखेचे नुकतेच गठण करण्यात आले. शहराध्यक्षपदी गजानन भावराव मनवर, सरचिटणीसपदी आशिष विठ्ठलराव कांबळे व कोषाध्यक्षपदी विरेंद्र पिलावन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरीत कार्यकारीणीमध्ये संरक्षण विभाग उपाध्यक्ष स्वप्निल खोब्रागडे, प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष स्वप्निल कांबळे, संस्कार विभाग उपाध्यक्ष सचिन खोब्ब्रागडे, कार्यालय सचिव मयुर भवरे, हिशेब तपासणीस सचिन भगत, संरक्षण विभाग सचिव अमोल मानकर, प्रचार व पर्यटन विभाग सचिव प्रतिक खरतडे, संस्कार विभाग सचिव प्रविण बागेश्वर, संघटक संरक्षण विभाग चंदू खरतडे, रवि कांबळे, वैभव निखाडे, शुभम मनवर यांचा समावेश आहे. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इडीयाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष रवि भगत यांचे प्रमुख उपस्थितीत या कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस नरेंद्र भगत व आभार प्रदर्शन तालुका संस्कार विभाग उपाध्यक्ष संतोष जिवने यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल नगराळे व अविनाश खरतडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   

Sunday 30 June 2013

पिवळ्या हळदीने आणली लक्ष्मी घरात

घाटंजी तालुक्यातील रमेश आंबेपवार यांनी घेतले दिड एकरात ४६ क्विंटल हळदीचे उत्पन्न



केवळ शासकीय योजनांच्या भरवशावर न राहता शेतक-याने घाम गाळुन शेती कसली तर धरणीमाय सोनेच पिकवते. शेतीवर असा निढळ विश्वास असलेल्या घाटंजी तालुक्यातील राजापेठ येथिल उपक्रमशील शेतकरी रमेश गंगण्णा आंबेपवार यांनी अवघ्या दिड एकर शेतीमध्ये तब्बल ४६ क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. 
कापुस, सोयाबीन अशा पारंपारीक पिकांव्यतिरिक्त अन्य कोणते पिक घेण्याची रिस्क अनेक शेतकरी घेत नाहीत. पण तरी देखिल अवघी २ हेक्टर ६० आर शेती असलेल्या रमेश आंबेपवार या शेतक-याने धाडस केले. दिड एकर शेतीत हळद, एका एकरात कापुस व ४ एकरात सोयाबीन पिकाचे उत्पादन घेऊन त्यांनी पारंपारिक शेतीसोबतच नाविन्यपुर्ण पिकही घेतले. ४६ क्विंटल हळदीसह १७ क्विंटल कापुस व १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न त्यांना झाले आहे. कृषी विभागामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या पिक पाहणी कार्यक्रमात परभणी व हिंगोली येथे शेतक-यांनी हळदीच्या पिकांमधुन साधलेली प्रगती पाहुन प्रेरणा मिळाली व त्यानंतर हा प्रयत्न केला. अनेकांनी सुरूवातीला शंका कुशंका व्यक्त केल्या मात्र स्वत:च्या मेहनतीवर विश्वास असल्याने केवळ दिड एकरात एवढे उत्पन्न घेतल्याचे आंबेपवार ठामपणे सांगतात. 
त्यांच्या शेतात विहिरीच्या पाण्याने ओलीताची व्यवस्था आहे. शेती कमी असली तरी स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर, मळणीयंत्र व पेरणीयंत्र अशी आधुनिक शेतीसाधने त्यांच्याकडे आहेत. शिवाय शेतीला जोडधंदा म्हणुन दुधाचा व्यवसायही ते करतात. त्यांच्याकडे ६ म्हशी आहेत. त्या दिवसाला सुमारे २५ लिटर दुध देतात. राजापेठ या छोट्याशा गावात नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. काही शेतक-यांचा एका गट मिळुन सुमारे ५० एकरात गट शेती करण्यात येते. या मंडळाच्या माध्यमातून गावातील शेतक-यांसाठी नाविण्यपुर्ण उपक्रम, चर्चासत्र अशा कार्यक्रमांच्या आयोजनात आंबेपवार यांचा मोलाचा वाटा असतो. ते घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालकही आहेत. 
पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार व कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे ते आवर्जुन सांगतात. शेतक-यांनी केवळ शासकीय योजनांच्या मागे लागुन वेळ न गमावता परिश्रमाने शेती कसल्यास कुण्याही शेतक-यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. मात्र त्यासाठी शेतीला आधुनिकतेची जोड देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत रमेश आंबेपवार यांनी ‘सकाळ’ शी बोलतांना व्यक्त केले.
‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराने होणार गौरव
अत्यंत अल्प शेतीत हळदीचे चांगले उत्पादन घेणा-या रमेश आंबेपवार यांचा कृषी दिनानिमित्य शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्या शेतीप्रती असलेल्या एकनिष्ठतेचा सन्मान केल्या जाणार आहे.
रमेश आंबेपवार :- मोबाईल नं. ९४२०११८५५४
अमोल राऊत, घाटंजी
साभार : सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

Wednesday 26 June 2013

कोळसा घोटाळा तब्बल ५० लाख कोटींचा : खा.हंसराज अहिर

वाळूचा लिलाव होतो मग कोळसा फुकटात का?

रेती, मुरूम, दगड यासारख्या गौण खनिजाचा शासन लिलाव करते. मग बहुमुल्य कोळसा आजवर फुकटात का वाटण्यात आला? कोल ब्लॉक वाटणीत शासनाला झालेल्या नुकसानाचा कॅग ने जाहिर केलेला आकडा अत्यंत कमी असुन प्रत्यक्षात तब्बल ५० लाख कोटींच्याही वर तोटा झालेला आहे. असा दावा खासदार हंसराज अहिर यांनी केला. 
येथिल जलाराम मंदिर सभागृहात आयोजीत व्याख्यानात ते बोलत होते. महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळातर्फे ‘कोळसा खान वाटप घोटाळा’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, देशातील या संपत्तीचा विनीयोग नागरिकांसाठी होणे अपेक्षीत असतांना खासगी कंपन्यांना कोल ब्लॉकची खैरात का वाटण्यात आली? 
देशात नऊ राज्यांमध्ये कोळशाचे उत्पादन होते. १९७३ साली स्थापन झालेली कोल इंडीया ही सरकारी कंपनी कोळसा उत्पादन करणारी एकमेव वंâपनी होती. मात्र माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या काळात खासगी उद्योजकांना कोळसा ब्लॉक देण्याचा निर्णय झाला. तेव्हापासुन या कंपनीला उतरती कळा लागली. कोट्यवधींची किंमत असलेले कोल ब्लॉक आजवर शासनाने फुकटात वाटले. लोकसभेत या विषयावर सर्वप्रथम प्रश्न उपस्थित करून हा विषय पुढे आणला व तेव्हा सरकारला जाग आली. देशाच्या महालेखापरिक्षकांकडे याची तक्रार केल्यावर या घोळाची चौकशी सुरू झाली. त्यांनी या घोटाळ्यावर ताशेरे ओढताच त्यांचेवरही शिंतोडे उडविण्यात आले. आता सि.बी.आय.या प्रकरणाची चौकशी करीत आहे. या घोटाळ्यात ज्यांचे हात काळे झाले आहेत ते बाहेर येत आहेत. मात्र ज्या पंतप्रधान कार्यालयाने या सर्वांची पाठराखण केली त्यांचेवर कार्यवाही कधी होणार? पंतप्रधान मनमोहनसिंग व्यक्तीगतरित्या दोषी नसतीलही मात्र एवढ्या गंभिर प्रकाराकडे डोळेझाक केल्याने त्यांना निर्दोषही ठरविता येणार नाही असे खा.अहिर म्हणाले. वाटप करण्यात आलेले कोल ब्लॉक रद्द करण्याचा अधिकार शासनाला आहे. मात्र उद्योजकांशी लागेबांधे असल्याने तसा निर्णय टाळल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या अभ्यासपुर्ण व्याख्यानात खा.अहिर यांनी कोळसा खान घोटाळ्याचे अनेक पैलु श्रोत्यांपुढे मांडले. 
दरम्यान महाबलाय व्या.प्र.मंडळ, स्व.रमणीकभाई सुचक बहुउद्देशीय संस्था व गुजराती समाजातर्फे खा.हंसराज अहिर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, स्व.रमणीकभाई सुचक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजु सुचक, महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शैलेश ठाकुर, उपाध्यक्ष सैय्यद फिरोज, समर्थ विद्यालयाचे संचालक मधुसूदन चोपडे, शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल, भाजप तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विष्णु नामपेल्लीवार व सुरेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.  
साभार- सकाळ
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

घाटंजी बाजार समितीवर बरखास्तीची टांगती तलवार?

जिल्हा उपनिबंधकांकडून कारणे दाखवा नोटीस
विवीध गैरप्रकार सुरू असल्याचा ठपका

येथिल कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत गैरप्रकार सुरू असल्याचा कारणावरून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी समितीच्या सर्व २१ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  
मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांच्या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकाच्या चौकशी अहवालावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात २० जुलै २०१३ रोजी बाजार समितीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५(१) अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे. 
सेस व सुपरव्हीजन च्या थकीत रकमा, राणा जिनिंग अ‍ॅन्ड फॅक्टरी प्रा.लि. मध्ये प्रदिप राऊत या शेतक-याच्या कापुस सौदे पट्टी मध्ये खोडतोड, तिरूपती कॉटन जिनिंग साठी वसंत जिनिंगमध्ये खरेदी करणारे व्यापारी पिंटू अग्रवाल यांनी २०१२-१३ या हंगामात खरेदी केलेल्या संपुर्ण कापसापैकी ९० टक्के कापसाच्या लिलावाच्या दरात जिनात कपात करत असल्याचे सहाय्यक निबंधकांच्या निदर्शनास आल्याने अशा व्यापा-यांचे परवाने बाजार समितीने रद्द करावयास पाहिजे होते. मात्र बाजार समितीने कार्यवाही केली नाही. अशा विवीध कारणांवरून बाजार समिती नियमानुसार काम करीत नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. 
२०११-१२ च्या हंगामातील एकुण बाजार व देखरेख फि पैकी सुमारे २२ लाख रू फि वसुल झाली नाही. मागील बाजार फि थकीत असतांनाही अशा व्यापा-यांचे परवाने नुतणीकरण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा सादर करण्यात न आल्यास बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.

नोटीस राजकीय दबावातून - सभापती अभिषेक ठाकरे
केवळ राजकीय दबावातून ही नोटीस देण्यात आली आहे. बाजार समितीवर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांचा पुराव्यानिशी खुलासा सादर करण्यात येईल. अशी प्रतिक्रीया बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिली. कृ.ऊ.बा.स.चा कारभार पारदर्शक आहे. बाजारात स्पर्धा टिकुन शेतक-यांना योग्य भाव मिळावा यासाठी अनेकदा व्यापा-यांविषयी मवाळ भुमिका ठेवावी लागते. थकीत सेसच्या मुद्द्यावरून समिती बरखास्त होऊ शकत असेल तर राज्यातील एकही बाजार समिती अस्तित्वात राहणार नाही. घाटंजी बाजार समितीमध्ये यावर्षी तब्बल ४ लाख १० हजार क्विंटल कापसाची विक्रमी आवक झाली आहे. आम्ही गैरप्रकार केले असते तर दुस-या तालुक्यातून घाटंजीमध्ये कापुस आला नसता. आमचे काम प्रामाणिक असल्याने संचालक मंडळावर कार्यवाही होणार नाही असा दावा ठाकरे यांनी सकाळ शी बोलतांना केला.
साभार- सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

चोरटे ‘सापळा’ रचतात, मग पोलीस का नाही?

‘त्या’ महिलांना पकडण्यासाठी पोलीसही हतबल

‘त्यांची’ भिरभिरणारी नजर शोधत असते दागिण्यांनी लदबदलेले ‘सावज’. एकदा का ते नजरेस पडले की त्याचा पाठलाग सुरू होतो. पाच सहाच्या संख्येत असलेल्या ‘त्या’ अगदी गर्दीच्या ठिकाणी ते सावज गाठतात. त्याच्या अवतीभवती गराडा घालतात. एकदा का ‘पाश’ आवळला की मग थेट मानेवर ‘झडप’ घालुन दागिने लंपास करतात. गराडा अशा पद्धतीने घालण्यात येतो की समोरच्या व्यक्तीला ती बाब लक्षात आली तरी हालचाल करता येऊ नये. लगेच त्या टोळीतील अन्य साथिदार दागिने घेऊन निघुनही जातात. म्हणजे कोणी आरोप केलाच तर ‘आमची झडती घ्या’ असे म्हणायला त्या मोकळ्या. ही परिस्थिती आहे जवळजवळ प्रत्येक बसस्थानक व वर्दळीच्या परिसरातील. घाटंजीच्या बसस्थानकावरही असे प्रकार आता ऐकीवास येत आहेत. सापळा रचुन दागिने लंपास करणा-या महिलांची टोळी सध्या शहरात सक्रीय आहे. लग्नाचा हंगाम असल्याने दागिने घालुन जाणा-या महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. मात्र अनेक घटना पोलीस स्टेशन पर्यंत जातच नाहीत. अन कुणी तक्रार द्यायला गेलेच तर पोलीस, ‘वस्तु मिळणार नाही अन तुम्हालाच त्रास होईल’ असे गोंडस कारण सांगुन अशा तक्रारी धुडकावुन लावतात. 
चोरट्या महिलांनी पद्धतशीरपणे सापळा रचुन मौल्यवान दागिने लंपास केल्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र सहज लक्षात येणा-या अशा टोळ्यांना पकडण्यासाठी पोलीसांनी कधी सापळा रचल्याचे अगदी दुर्मिळच. ज्या प्रमाणे पोलीस ईतर गुन्ह्यांमधील आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचतात त्याच प्रकारे अशा टोळ्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीसांकडून प्रयत्न का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुचाकीवरून चेन स्नॅचिंग करणा-या युवकांपेक्षाही या महिलांच्या कारवाया जास्त आहेत. मात्र त्याचा उहापोह होत नाही. 
अनेकदा प्रवाशी अशा महिलांना पकडतात. मात्र केवळ तक्रार नसल्याच्या कारणावरून अशा टोळ्यांना सोडून दिल्याचे प्रकारही यापुर्वी घडले आहेत. बसस्थानकावर पोलीस कर्मचा-याची नेमणुक असते. मात्र घाटंजीच्या बसस्थानकावर कधीही पोलीस कर्मचारी आढळत नाही. नेहमीच घडणा-या अशा चोरीच्या घटना व त्याचा क्वचीतच लागणारा तपास यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
साभार- सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          


उज्वल निमजे राष्ट्रीय फॅशन डिझायनिंग स्पर्धेत अव्वल

येथिल उज्वल देविदास निमजे याने राष्ट्रीय फॅशन डिझायनिंग स्पर्धेत अव्वल कामगिरी केली. फॅशन जगतातील ‘व्होग’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने ही स्पर्धा आयोजीत केली होती. तो नागपुर येथिल इंटरनशनल इन्स्टीट्युट ऑफ फॅशन डिझाईन या संस्थेमध्ये बि.एस्सी. करीत आहे. ‘निसर्ग’ या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या स्पर्धेत उज्वलने ‘लपवलेले प्राणी’ या विषयावर आपले डिझाईन सादर केले होते. त्याला १५ हजार रूपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यापुढे दिल्ली येथे होणा-या ‘व्होग फॅशन नाईट’ या समारंभात त्याला आपले डिझाईन प्रदर्शीत करण्याची संधी मिळणार आहे. या समारंभामध्ये आंतरराष्ट्रीय फॅशन जगतातील दिग्गज सहभागी होणार आहेत. उज्वल हा येथिल एकात्मीक बाल विकास सेवा योजन कार्यालयात पर्यवेक्षीका असलेल्या कमल देविदास निमजे यांचा मुलगा आहे. घाटंजीतील युवकाने फॅशन जगतामध्ये मारलेल्या या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साभार- सकाळ


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा
                           
                          

घाटंजीतील चिमुकल्या क्रिकेटपटूंनी पटकावले राष्ट्रीय विजेतेपद

चेन्नईला पराभुत करून ‘योटी नॅशनल कप’ विदर्भाकडे
१४ वर्षाखालील संघाची चमकदार कामगिरी

राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणा-या घाटंजीतील चिमुकल्यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वल्लभगढ (हरियाणा) येथे झालेल्या ‘योटी इंडीयन नॅशनल कप’ क्रिकेट सामन्यांच्या १४ वर्षाखालील गटाचे विजेतेपद विदर्भ संघाने पटकावले. या संघामध्ये बहुतांश खेळाडू घाटंजी तालुक्यातील आहेत हे विशेष. 
येथिल राष्ट्रीय खेळाडू व क्रिडा प्रशिक्षक राजन भुरे यांच्या मार्गदर्शनात सराव करणा-या या खेळाडूंनी यापुर्वीही अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. करमविर स्टेडीयम, वल्लभगठ, फरिदाबाद (हरियाणा) येथे झालेल्या उपांत्य सामन्यात यजमान हरियाणा संघाचा पराभव करून विदर्भ संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात चेन्नई (तामिळनाडू) संघाचा दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले. 
विजेत्या संघामध्ये वेदांत बोंडे, प्रथमेश गुघाणे, संकेत देशमुख, गजानन सोनुले, गौरव भोयर, हेमंत राठोड, हर्षल देठे, कौस्तुभ आगे, प्रियांशु वाघमारे, चेश राठोड सर्व रा.घाटंजी व सुबोजीत राय, मित सिंग रा.गोंदीया या खेळाडूंचा समावेश होता. राजन भुरे हे या संघाचे प्रशिक्षक होते. संपुर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा वेदांत बोंडे याने मालिकावीर तर चेश राठोड याने सामनाविर होण्याचा बहुमान पटकावला. पारितोषीक वितरण समारंभाला योटी ग्रुपचे अध्यक्ष प्रताप चौधरी, बि.सि.सि.आय.कोच मोहन दास, कोलकता यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. या यशाबद्दल या चिमुकल्या क्रिकेटपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

Saturday 25 May 2013

अघोरी अंधश्रद्धेनेच घेतला चिमुकल्या सपनाचा बळी

देवीला प्रसन्न करण्यासाठी चालविला गळ्यावर सुरा 
प्रसाद म्हणुन प्राशन केले सपनाचे रक्त
मामा, आजोबा, आत्याच निघाले आरोपी 




घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सपना पळसकर नरबळीप्रकरणाचा अखेर पर्दापाश झाला असून गावात शांतता राहावी यासाठी सपनाचा मामा, आजोबा, आत्या आणि गावातील काही शेजार्‍यांनीच तिचा नरबळी देण्यात आल्याचे अखेर पोलिस तपासात उघड झाले आहे. दहा लोकांनी अत्यंत क्रूरपणे तिचा नरबळी देत तिचे रक्त प्रसाद म्हणून वाटल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपना पळसकर ही नवरात्र सुरू असताना २३ ऑक्टोंबर २0१२ रोजी अचानक बेपत्ता झाली होती. ती हरविल्याची तक्रार २४ ऑक्टोंबरला घाटंजी पोलिस ठाण्यात तिच्या आईवडिलांनी दिली. तेव्हापासून पोलिस याप्रकरणाचा तपास करीत होते. परंतु सात महिन्यात तपासात फारशी प्रगती न झाल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तर लोकांकडून माहिती मिळावी म्हणून ५0 हजाराचे बक्षिसही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. शिवाजीराव मोघे यांनी जाहीर केले होते. अखेर सपनाची कवटी, हाडे आणि फ्रॉक चोंरबा येथील जंगलात गुराख्याला २२ मे २0१३ रोजी आढळून आले. तिच्या शरीराचे अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. या प्रकरणी पोलिसांनी सपनाचे आजोबा पुनाजी आत्राम, मामा देविदास आत्रात आणि या प्रकरणाची मास्टरमाईंड यशोदा मेर्शाम हिला अटक केली असून तपासकामी आठ लोकांना ताब्यात घेतले आहे. मनोज उर्फ लाल्या वसंता मेर्शाम यांने पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच दुर्गा शिरभाते या महिलेच्या अंगात देवी येते. देवीने 'सपनाचे रक्त द्या, त्याशिवाय गावात शांतता नांदणार नाही', असे दुर्गाला सांगितले. दुर्गाने याबाबत आपल्या आईस म्हणजे यशोदा मेर्शाम हिला सांगितले. यशोदा मेर्शाम हिने गावातील काही लोकांना याबाबत माहिती दिली. शिवाय नरबळी देण्याची योजना आखली. 
त्यासाठी यशोदा मेर्शाम हिने वेगवेगळय़ा तीन बैठका घेऊन त्यात नरबळी देण्याची योजना आखली. त्यानुसार २३ ऑक्टोंबरला यादव टेकाम याने सपनाला बिस्किट आणण्यासाठी दहा रुपये दिले. ती दुकानात जात असताना ईलेक्ट्रिशिएन असलेल्या मोतीराम मेर्शाम यांनी लाईट बंद केले आणि अंधाराचा फायदा घेत यादव टेकाम याने सपनाचे तोंड दाबून तिला यशोदा मेर्शाम हिच्या घरी नेले. त्यानंतर एक तासाने देवीची पूजा करून सपनाचा नरबळी देण्यात आला. सपनाची मान अक्षरश: धारदार चाकूने कापून रक्त एका भांड्यात जमा करण्यात आले. नरबळी दिल्यानंतर तिचे रक्त गावातील देवीला वाहण्यात आले आणि प्रसाद म्हणूनही वाटण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह यशोदा मेर्शाम हिच्या स्नानगृहात पुरण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांनी तो मृतदेह तेथून काढून गावाबाहेर ४00 मीटर अंतरावर पुरण्यात आला. 
पोलिसांनी गेल्या आठ दिवसात गावातच डेरा टाकल्याने पुन्हा तो मृतदेह बाहेर काढून चोरंबा येथील जंगलात पुरण्यात आला. तिच्या शरीराची कवटी, हाडे आणि फ्रॉक सापडल्याची माहिती गुराख्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी मोतीराम मेर्शाम, शेडकी बुडा मेर्शाम, यादव टेकाम, पुनाजी आत्राम, दुर्गा शिरभाते यांना तपासकामी ताब्यात घेतले असून यशोदा मेर्शाम व मनोज आत्राम व देविदास आत्राम यांना अटक करण्यात आली आहे.



Click On The Image To View In Full Size



Wednesday 22 May 2013

बेपत्ता सपनाची कवटीच सापडली.....!





ज्या प्रकरणामुळे घाटंजी तालुका केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही चर्चेत आला त्या बेपत्ता सपना पळसकर प्रकरणाचा दुर्दैवी शेवट पुढे आला आहे. दि.२० मे ला सायंकाळच्या सुमारास चोरांबा गावाच्या पश्चिम दिशेला सुमारे सातशे मिटर अंतरावर कवटी, हाडे, केस, गुलाबी रंगाचा ठिपक्याचा फ्रॉक व निळ्या रंगाची चड्डी संशयास्पद स्थितीत सापडली. देवा आत्राम नामक गुराखी संध्याकाळी त्या भागात गुरे चारून परत येत असतांना त्याला कवटी दिसली. 
त्याने लगेच पळसकर यांचे घर गाठुन याबाबत त्यांना सांगितले. सपना पळसकर हिच्या आईवडीलांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता गुलाबी रंगाचा फ्रॉक व निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र हे सपनाचेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अवघ्या काही वेळापुर्वीच चोरांबा येथुन चौकशी करून गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांना त्यांनी मोबाईलवर संपर्क केला. त्यांनी रात्री येऊन घटनास्थळाची पाहणी केली. आज (ता.२१) ला सकाळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र ते तेवढ्या परिसरातच घुटमळले. सपना गोपाल पळसकर ही चोरांबा येथिल सात वर्षीय चिमुकली २४ ऑक्टोबर २०१२ पासुन संशयास्पदपणे बेपत्ता झाली होती. त्यावेळी घाटंजी पोलीसांनी केवळ हरविल्याची नोंद घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र १७ नोव्हेंबर २०१२ ला घाटंजीलगत असलेल्या मुरली गावाजवळ गुप्तधनाचा शोध घेणारी टोळी सापडली. त्यांच्या जवळ लहान मुल होते असे प्रत्यक्षदर्शीने वारंवार सांगितले. तेव्हा त्यांच्या जवळ असलेले लहान मुल म्हणजे चोरांब्याची सपनाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तशी तक्रार सुद्धा बेपत्ता सपनाची आई शारदा पळसकर यांनी पोलीस स्टेशनला दिली. या प्रकरणाच्या तपासात अद्यापपर्यंत पोलीसांचा तपास अत्यंत ढिसाळ असल्याने विवीध संघटनांनी आंदोलने केली. विधीमंडळातही तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
सपनाची कवटी व ईतर गोष्टी संशयास्पद स्थितीत आढळल्याने तिचा मृत्यू नेमका कसा झाला? गुप्तधन प्रकरणाशी त्याचा संबंध आहे का? तिचे मारेकरी कोण? विशेष पोलीस महासंचालकांच्या तंबीनंतर दोन दिवसातच शोध कसा लागला? सपना सुरक्षीत असल्याचे पोलीसांचे यापुर्वीचे दावे कशाच्या आधारावर होते? सपनाचा मृतदेह तिथेच कुजला की कवटी व कपडे तिथे कोणी आणुन टाकले? अशा अनेक प्रश्नांनी या प्रकरणातील गुढ अधिकच वाढले आहे.

Click On Image To View In Full Size

Do You Want Regular Updates Of 
Government & Private Jobs. 
GK, Career Tips & Many More?
Just Like Below Page To Stay In Touch !