Pages

Showing posts with label कृषी उत्पन्न बाजार समिती. Show all posts
Showing posts with label कृषी उत्पन्न बाजार समिती. Show all posts

Monday, 29 September 2014

घाटंजी बाजार समितीचे संचालक मंडळ पुन्हा सत्तारूढ

उच्च न्यायालयाने घाटंजी बाजार समिती बरखास्तीचा निर्णय रद्दबातल ठरविल्याने सभापतींसह संचालक मंडळाने आज प्रभार स्विकारला. बाजार समिती संचालक मंडळाच्या कथित गैरव्यवहाराची तक्रार मनसेने केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीवर बरखास्तीची कार्यवाही केली. हि कार्यवाही राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचा आरोप पुर्वी पासुनच होत होता. 
शिवाय न्यायालयात दाद मागण्याची संधी मिळु नये म्हणुन सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रभार काढुन घेण्याची घाई, बाजार समितीची बाजु ऐकुन न घेता घेतलेला बरखास्तीचा निर्णय यामुळे या संपुर्ण कार्यवाहीवरच संशय व्यक्त केल्या जात होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे तक्रारकर्ते तोंडघशी पडले आहेत. 
बरखास्तीची कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय ७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिला होता. तक्रारकत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र मनसेने सर्वोच्च न्यायालयात जाणे टाळले. त्यामुळे अखेर आज संचालक मंडळाने प्रभार स्विकारला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, सभापती अभिषेक ठाकरे यांचेसह बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 9 December 2013

सभापतींचा ‘वादग्रस्त’ निर्णय ठरला बाजार समितीच्या फायद्याचा

अभिषेक ठाकरे : विरोध झाला तरी शेतकरी हिताचे निर्णय घेणार
बाजार समितीने आयोजीत केलेल्या गुरांच्या बाजार लिलावात योग्य बोली न लागल्यामुळे सभापतींनी विशेषाधीकार वापरून लिलाव रद्द करण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता. मात्र पेâरलिलावात एक लाख रूपये जास्त बोली लागल्याने सदर निर्णय बाजार समितीच्या फायद्याचा झाला आहे. त्याबद्दल घाटंजी बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे.
२३ नोव्हेंबर रोजी घाटंजी बाजार समितीने गुरांच्या बाजाराचे वंâत्राट देण्यासाठी लिलावाचे आयोजन केले होते. त्यामध्ये किमान बोली ५ लाख रूपये ठेवण्यात आली होती. मात्र या लिलावात अंतिम बोली ५ लाख ८ हजार एवढीच होती. त्यामुळे सभापतींनी लिलाव प्रक्रीया रद्द केली. त्यानंतर ४ डिसेंबरला पेâरलिलाव घेण्यात आला. त्यामध्ये अंतिम बोली ६ लाख ८ हजार रूपयांची झाली. पहिल्या लिलावापेक्षा तब्बल एक लाख रूपयांचा फायदा बाजार समितीला झाला आहे. 
या लिलावाच्या वेळी सभापती अभिषेक ठाकरे, सहाय्यक निबंधक जयंत पालटकर, ख.वि.सं.चे माजी अध्यक्ष बल्लु पाटील लोणकर, विवेक भोयर, आशिष लोणकर, नामदेव आडे, अकबर तंव्वर, नागोराव कुमरे, किशोर चवरडोल, गजानन भोयर, संजय र्इंगळे, रमेश आंबेपवार, सय्यद रफिक, रा.कॉ.तालुकाध्यक्ष संजय गोडे, रा.यु.कॉ.शहराध्यक्ष संजय ढगले, बाजार समिती सचिव कपिल चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिला लिलाव रद्द केल्याने सभापतींवर बरीच टिका झाली होती. मात्र या टिकेचा विचार न करता सभापती ठाकरे निर्णयावर ठाम राहिले. शेतकरी व बाजार समितीच्या हितासाठी कोणाचाही विरोध पत्करण्याची तयारी असल्याचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. २०११-१२ व त्यापुर्वी बाजार समितीला गुरांच्या बाजारापासुन ३ लाखांपेक्षाही कमी उत्पन्न मिळत होते. 
मात्र गुरांचा बाजार लिलाव पद्धतीने देण्याच्या धाडसी निर्णयामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. एकीकडे बाजार समितीच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडत असतांना प्रत्येक आरोपांचा सामना करीत सुरू असलेली वाटचाल चकीत करणारी आहे.
साभार : सकाळ 

Wednesday, 26 June 2013

घाटंजी बाजार समितीवर बरखास्तीची टांगती तलवार?

जिल्हा उपनिबंधकांकडून कारणे दाखवा नोटीस
विवीध गैरप्रकार सुरू असल्याचा ठपका

येथिल कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत गैरप्रकार सुरू असल्याचा कारणावरून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी समितीच्या सर्व २१ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  
मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांच्या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकाच्या चौकशी अहवालावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात २० जुलै २०१३ रोजी बाजार समितीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५(१) अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे. 
सेस व सुपरव्हीजन च्या थकीत रकमा, राणा जिनिंग अ‍ॅन्ड फॅक्टरी प्रा.लि. मध्ये प्रदिप राऊत या शेतक-याच्या कापुस सौदे पट्टी मध्ये खोडतोड, तिरूपती कॉटन जिनिंग साठी वसंत जिनिंगमध्ये खरेदी करणारे व्यापारी पिंटू अग्रवाल यांनी २०१२-१३ या हंगामात खरेदी केलेल्या संपुर्ण कापसापैकी ९० टक्के कापसाच्या लिलावाच्या दरात जिनात कपात करत असल्याचे सहाय्यक निबंधकांच्या निदर्शनास आल्याने अशा व्यापा-यांचे परवाने बाजार समितीने रद्द करावयास पाहिजे होते. मात्र बाजार समितीने कार्यवाही केली नाही. अशा विवीध कारणांवरून बाजार समिती नियमानुसार काम करीत नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. 
२०११-१२ च्या हंगामातील एकुण बाजार व देखरेख फि पैकी सुमारे २२ लाख रू फि वसुल झाली नाही. मागील बाजार फि थकीत असतांनाही अशा व्यापा-यांचे परवाने नुतणीकरण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा सादर करण्यात न आल्यास बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.

नोटीस राजकीय दबावातून - सभापती अभिषेक ठाकरे
केवळ राजकीय दबावातून ही नोटीस देण्यात आली आहे. बाजार समितीवर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांचा पुराव्यानिशी खुलासा सादर करण्यात येईल. अशी प्रतिक्रीया बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिली. कृ.ऊ.बा.स.चा कारभार पारदर्शक आहे. बाजारात स्पर्धा टिकुन शेतक-यांना योग्य भाव मिळावा यासाठी अनेकदा व्यापा-यांविषयी मवाळ भुमिका ठेवावी लागते. थकीत सेसच्या मुद्द्यावरून समिती बरखास्त होऊ शकत असेल तर राज्यातील एकही बाजार समिती अस्तित्वात राहणार नाही. घाटंजी बाजार समितीमध्ये यावर्षी तब्बल ४ लाख १० हजार क्विंटल कापसाची विक्रमी आवक झाली आहे. आम्ही गैरप्रकार केले असते तर दुस-या तालुक्यातून घाटंजीमध्ये कापुस आला नसता. आमचे काम प्रामाणिक असल्याने संचालक मंडळावर कार्यवाही होणार नाही असा दावा ठाकरे यांनी सकाळ शी बोलतांना केला.
साभार- सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

Sunday, 3 March 2013

राजकीय कुरघोडीत शेतक-यांच्या सुविधा दावणीला


गेल्या अनेक वर्षांपासुन घाटंजी तालुक्याच्या सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाची भुमिका निभावणारी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतक-यांसाठी मात्र असुविधेचीच ठरली आहे. कापुस व धान्याच्या मार्केट  यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने आजवर बाजार समितीची सत्ता काबिज करणा-यांनी काय केले असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. कधी नव्हे तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प शेतक-यांसाठी सुरू झाला होता. शिदोरी मंडपापासुन ते गोदामापर्यंत सर्व सुविधांनी युक्त अशा २ कोटी ८ लाखांच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. 
आजवर तुरळक अपवाद वगळता कोणतेच विकासकाम न झालेल्या बाजार समितीमध्ये शेतक-यांसाठी शिदोरी मंडप, ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गोदाम, स्वच्छतागृह, मुक्कामाची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी यासह विवीध सुविधा एकाच वेळी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू झाले. मात्र तांत्रिक मुद्द्यांवरून या प्रकल्पाच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्पाचे काम खोळंबले. यंदाच्या कापुस हंगामात शेतक-यांना या सुविधांचा लाभ होणार असे चित्र दिसत असतांना या तक्रारींमुळे शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. केवळ काही तांत्रिक मुद्दे सोडले तर तक्रारीत आक्षेप घेण्यासारखे काही नसल्याचे निदर्शनास येते. मात्र हातात सत्ता नसलेल्यांना कदाचित शेतक-यांसाठी होत असलेल्या सुविधा पाहवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या तक्रारी झाल्या. ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्या अभावी व्यापा-यांना वजनात दांडी मारण्याची मिळत असलेली संधी बाजार समिती मार्केट यार्डात होऊ घातलेल्या ४०० मेट्रीक टनाच्या वजनकाट्यामुळे मिळाली नसती. बाजार समितीचे त्यावर नियंत्रण राहिले असते. मात्र या तक्रारींमुळे हंगामाच्या वेळेपर्यंत काटा उभारल्या जाऊ शकला नाही. सध्या बाजार समितीच्या मार्केट यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. टिनाच्या शेडमध्येच समितीचे कर्मचारी बसतात. तशीच स्थिती शिदोरी मंडपाचीही आहे. 
धान्य यार्डावर अनेकदा शेतक-यांचा माल बाहेर तर व्यापा-यांचा माल गोदामात अशी स्थिती असते. यावर्षी बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबविली. गोदामा अभावी अनेक शेतक-यांना या योजनेपासुन वंचीत राहावे लागले. नाफेडची खरेदी तालुक्यात सुरू झाल्याने शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळाला. काही जिनिंग मध्ये वजनकाट्यात तफावत असल्याचे आढळुन आले. बाजार समितीने या तक्रारींची दखल घेऊन काट्यांची तपासणी केली. मात्र बाजार समितीचा वजन काटा उभारल्या गेल्यास भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही असे बाजास समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. शेतक-यांसाठी सुविधा निर्माण करणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडचणी दुर होऊन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वयीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
साभार :- देशोन्नती 

Friday, 16 November 2012

घाटंजी बाजार समितीच्या कापुस खरेदीचा शुभारंभ






येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापुस यार्डावर आज कापुस खरेदी तसेच शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचे हस्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. 
या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, शंकर ठाकरे, संजय इंगळे, शाम बेलोरकर, नामदेव आडे, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, न.प.शिक्षण सभापती राम खांडरे, किशोर चवरडोल, विवेक भोयर, चंपत आत्राम, संजय निकडे, रफिक बाबु, वंदना जिभकाटे, लक्ष्मण पोतराजे, श्री.गवळी, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे म्हणाले की, शेतक-यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. मार्केट यार्डावर ईलेक्ट्रॉनिक काट्यांद्वारे मोजमाप पद्धतीचा अवलंब करून शेतक-यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धान्यासाठी नाफेडची खरेदी सुरू करण्यात बाजार समितीने पुढाकार घेतला असुन सि.सि.आय.च्या खरेदीसाठीही बाजार समिती प्रयत्नरत आहे. उल्लेखनिय म्हणजे कापुस व्यापा-यांना ५ लाख रूपये तर अडत्यांसाठी २ लाख रूपये बँक गरंटी करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शेतक-यांच्या सुरक्षिततेकरीता मापा-यांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे. सेसबद्दल सुद्धा व्यापा-यांकडून आलेल्या अर्जावर धोरणात्मक निर्णय घेऊन शेतक-यांना जास्तीत जास्त भाव मिळवुन देण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांनी केले. यावेळी व्यापारी, अडते व शेतक-यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

साभार :- देशोन्नती