Pages

Showing posts with label शुभारंभ. Show all posts
Showing posts with label शुभारंभ. Show all posts

Friday, 16 November 2012

घाटंजी बाजार समितीच्या कापुस खरेदीचा शुभारंभ






येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापुस यार्डावर आज कापुस खरेदी तसेच शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचे हस्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. 
या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, शंकर ठाकरे, संजय इंगळे, शाम बेलोरकर, नामदेव आडे, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, न.प.शिक्षण सभापती राम खांडरे, किशोर चवरडोल, विवेक भोयर, चंपत आत्राम, संजय निकडे, रफिक बाबु, वंदना जिभकाटे, लक्ष्मण पोतराजे, श्री.गवळी, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे म्हणाले की, शेतक-यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. मार्केट यार्डावर ईलेक्ट्रॉनिक काट्यांद्वारे मोजमाप पद्धतीचा अवलंब करून शेतक-यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धान्यासाठी नाफेडची खरेदी सुरू करण्यात बाजार समितीने पुढाकार घेतला असुन सि.सि.आय.च्या खरेदीसाठीही बाजार समिती प्रयत्नरत आहे. उल्लेखनिय म्हणजे कापुस व्यापा-यांना ५ लाख रूपये तर अडत्यांसाठी २ लाख रूपये बँक गरंटी करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शेतक-यांच्या सुरक्षिततेकरीता मापा-यांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे. सेसबद्दल सुद्धा व्यापा-यांकडून आलेल्या अर्जावर धोरणात्मक निर्णय घेऊन शेतक-यांना जास्तीत जास्त भाव मिळवुन देण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांनी केले. यावेळी व्यापारी, अडते व शेतक-यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

साभार :- देशोन्नती