Pages

Showing posts with label नोटीस. Show all posts
Showing posts with label नोटीस. Show all posts

Wednesday, 26 June 2013

घाटंजी बाजार समितीवर बरखास्तीची टांगती तलवार?

जिल्हा उपनिबंधकांकडून कारणे दाखवा नोटीस
विवीध गैरप्रकार सुरू असल्याचा ठपका

येथिल कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत गैरप्रकार सुरू असल्याचा कारणावरून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी समितीच्या सर्व २१ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  
मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांच्या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकाच्या चौकशी अहवालावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात २० जुलै २०१३ रोजी बाजार समितीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५(१) अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे. 
सेस व सुपरव्हीजन च्या थकीत रकमा, राणा जिनिंग अ‍ॅन्ड फॅक्टरी प्रा.लि. मध्ये प्रदिप राऊत या शेतक-याच्या कापुस सौदे पट्टी मध्ये खोडतोड, तिरूपती कॉटन जिनिंग साठी वसंत जिनिंगमध्ये खरेदी करणारे व्यापारी पिंटू अग्रवाल यांनी २०१२-१३ या हंगामात खरेदी केलेल्या संपुर्ण कापसापैकी ९० टक्के कापसाच्या लिलावाच्या दरात जिनात कपात करत असल्याचे सहाय्यक निबंधकांच्या निदर्शनास आल्याने अशा व्यापा-यांचे परवाने बाजार समितीने रद्द करावयास पाहिजे होते. मात्र बाजार समितीने कार्यवाही केली नाही. अशा विवीध कारणांवरून बाजार समिती नियमानुसार काम करीत नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. 
२०११-१२ च्या हंगामातील एकुण बाजार व देखरेख फि पैकी सुमारे २२ लाख रू फि वसुल झाली नाही. मागील बाजार फि थकीत असतांनाही अशा व्यापा-यांचे परवाने नुतणीकरण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा सादर करण्यात न आल्यास बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.

नोटीस राजकीय दबावातून - सभापती अभिषेक ठाकरे
केवळ राजकीय दबावातून ही नोटीस देण्यात आली आहे. बाजार समितीवर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांचा पुराव्यानिशी खुलासा सादर करण्यात येईल. अशी प्रतिक्रीया बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिली. कृ.ऊ.बा.स.चा कारभार पारदर्शक आहे. बाजारात स्पर्धा टिकुन शेतक-यांना योग्य भाव मिळावा यासाठी अनेकदा व्यापा-यांविषयी मवाळ भुमिका ठेवावी लागते. थकीत सेसच्या मुद्द्यावरून समिती बरखास्त होऊ शकत असेल तर राज्यातील एकही बाजार समिती अस्तित्वात राहणार नाही. घाटंजी बाजार समितीमध्ये यावर्षी तब्बल ४ लाख १० हजार क्विंटल कापसाची विक्रमी आवक झाली आहे. आम्ही गैरप्रकार केले असते तर दुस-या तालुक्यातून घाटंजीमध्ये कापुस आला नसता. आमचे काम प्रामाणिक असल्याने संचालक मंडळावर कार्यवाही होणार नाही असा दावा ठाकरे यांनी सकाळ शी बोलतांना केला.
साभार- सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा