Pages

Showing posts with label बेपत्ता. Show all posts
Showing posts with label बेपत्ता. Show all posts

Wednesday, 22 May 2013

बेपत्ता सपनाची कवटीच सापडली.....!





ज्या प्रकरणामुळे घाटंजी तालुका केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही चर्चेत आला त्या बेपत्ता सपना पळसकर प्रकरणाचा दुर्दैवी शेवट पुढे आला आहे. दि.२० मे ला सायंकाळच्या सुमारास चोरांबा गावाच्या पश्चिम दिशेला सुमारे सातशे मिटर अंतरावर कवटी, हाडे, केस, गुलाबी रंगाचा ठिपक्याचा फ्रॉक व निळ्या रंगाची चड्डी संशयास्पद स्थितीत सापडली. देवा आत्राम नामक गुराखी संध्याकाळी त्या भागात गुरे चारून परत येत असतांना त्याला कवटी दिसली. 
त्याने लगेच पळसकर यांचे घर गाठुन याबाबत त्यांना सांगितले. सपना पळसकर हिच्या आईवडीलांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता गुलाबी रंगाचा फ्रॉक व निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र हे सपनाचेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अवघ्या काही वेळापुर्वीच चोरांबा येथुन चौकशी करून गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांना त्यांनी मोबाईलवर संपर्क केला. त्यांनी रात्री येऊन घटनास्थळाची पाहणी केली. आज (ता.२१) ला सकाळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र ते तेवढ्या परिसरातच घुटमळले. सपना गोपाल पळसकर ही चोरांबा येथिल सात वर्षीय चिमुकली २४ ऑक्टोबर २०१२ पासुन संशयास्पदपणे बेपत्ता झाली होती. त्यावेळी घाटंजी पोलीसांनी केवळ हरविल्याची नोंद घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र १७ नोव्हेंबर २०१२ ला घाटंजीलगत असलेल्या मुरली गावाजवळ गुप्तधनाचा शोध घेणारी टोळी सापडली. त्यांच्या जवळ लहान मुल होते असे प्रत्यक्षदर्शीने वारंवार सांगितले. तेव्हा त्यांच्या जवळ असलेले लहान मुल म्हणजे चोरांब्याची सपनाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तशी तक्रार सुद्धा बेपत्ता सपनाची आई शारदा पळसकर यांनी पोलीस स्टेशनला दिली. या प्रकरणाच्या तपासात अद्यापपर्यंत पोलीसांचा तपास अत्यंत ढिसाळ असल्याने विवीध संघटनांनी आंदोलने केली. विधीमंडळातही तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
सपनाची कवटी व ईतर गोष्टी संशयास्पद स्थितीत आढळल्याने तिचा मृत्यू नेमका कसा झाला? गुप्तधन प्रकरणाशी त्याचा संबंध आहे का? तिचे मारेकरी कोण? विशेष पोलीस महासंचालकांच्या तंबीनंतर दोन दिवसातच शोध कसा लागला? सपना सुरक्षीत असल्याचे पोलीसांचे यापुर्वीचे दावे कशाच्या आधारावर होते? सपनाचा मृतदेह तिथेच कुजला की कवटी व कपडे तिथे कोणी आणुन टाकले? अशा अनेक प्रश्नांनी या प्रकरणातील गुढ अधिकच वाढले आहे.

Click On Image To View In Full Size

Do You Want Regular Updates Of 
Government & Private Jobs. 
GK, Career Tips & Many More?
Just Like Below Page To Stay In Touch !

Thursday, 21 February 2013

यंत्रणेच्या असंवेदनशीलतेमुळे सपनाच्या शोधाची आशा मावळली

पोलीस तपासाचे गौडबंगाल काय?
जनतेचा सवाल
मुरली येथिल गुप्तधन प्रकरणातील आरोपींची जामिनावर मुक्तता झाली. पोलीसांनी ९० दिवसांच्या कालावधीत आरोपपत्रच दाखल न केल्याने त्याचा फायदा आरोपींना झाला. प्रसारमाध्यमे, सामाजीक संघटना व ठराविक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन त्या विरोधात आवाज उठवला. मात्र का कोण जाणे घाटंजी पोलीसांसह जिल्हा पोलीस यंत्रणेने सुद्धा या प्रकरणात अपेक्षीत अशी कर्तव्यतत्परता न दाखविल्याने कोणताही निष्कर्ष न निघता हे प्रकरण थंडबस्त्यात गेले आहे. तालुक्यातील चोरांबा गावची सात वर्षीय चिमुकली सपना गोपाल पळसकर दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता आहे. ती या गुप्तधन शोधणा-या टोळीच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पोलीसांनी सुरूवातीपासुनच या दृष्टीने तपास केला नाही. आरोपी सांगतील तेच बयाण प्रमाण समजुन केवळ कागदी सोपस्कार पार पाडल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार, लक्ष्मण एंबडवार, अरूण ताकसांडे, राजु ताकसांडे यांनी सुरूवातीच्या चौकशीत एकहात्या मारोती मंदिरात हनुमान चालिसा वाचायला गेल्याचे सांगितले होते. त्या नंतर परिस्थिती पाहुन गुप्तधन शोधण्यासाठीच गेल्याची कबुली दिली. मात्र मुलगी सोबत नसल्याचे सांगितले. गुप्तधन शोधणारी टोळी केवळ चार जणांची नसते हे पोलीसांना सांगण्याची गरज नाही. मात्र या प्रकरणात गावक-यांनी पकडून दिलेल्या आरोपी व्यतिरिक्त एकही आरोपी पोलीसांना गवसला नाही. या टोळीने यापुर्वी कुठे गुप्तधन शोधले का? या टोळीत आणखी किती सदस्य आहेत? धन सापडल्यावर त्याची विल्हेवाट ते कशी लावणार होते? यासह कोणत्याच बाबतीत पोलीस तपास पुढे गेला नाही. केवळ दबाव आहे म्हणुनच तपासाचा ‘उहापोह’ करायचा एवढाच एक उद्देश पोलीस तपासात दिसला. 
घटनेच्या दिवसापासुनच पोलीसांची सहानुभूती आरोपींच्या बाजुने असल्याचे दिसुन आले. प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सोडून देणे, गंभिर कलम असतांना केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी, आरोपींना आलिशान गाडीतून नेण्याची मुभा व आता आरोपपत्र दाखल न केल्याने मिळालेला जामिन यावरून पोलीसांच्या एकुणच कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत आहे. त्या टोळीसोबत मुलगी नव्हतीच हे पोलीस आरोपींपेक्षाही ठासुन सांगतांना दिसले. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत. फिर्यादीने मुलीचा आवाज ऐकलाच नसेल. तो त्याचा भ्रम आहे. अशा काथ्याकुटा व्यतिरिक्त पोलीसांनी काही केले नाही. कदाचित ही दोन्ही प्रकरणे वेगळी असुही शकतात. पण बेपत्ता सपनाचा शोध घेऊन पोलीसांनी ते देखिल सिद्ध केले नाही. दोन्ही प्रकरणे ‘वेगळी’ आहेत केवळ हिच बाब सिद्ध करण्याचे  आव्हान पोलीसांनी स्विकारले की काय असे पोलीसांच्या भुमिकेवरून निदर्शनास आले. प्रकरण ‘थंड’ होऊ द्या, सपना नक्कीच सापडेल. असा सुर देखिल ऐकु येत होता. त्यामुळे या प्रकरणा भोवती असलेले संशयाचे मळभ अधिकच गडद झाले. सामाजीक संघटना व तालुक्याबाहेरील नेत्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सि आय डी तपास करण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हा प्रशासनानेही तसा अहवाल पाठविला होता. मात्र चौकशीचा आदेश पुढे सरकलाच नाही. त्यामुळे पाणी नेमके कुठे मुरले? हा प्रश्न उपस्थित झालाय. पोलीस यंत्रणेच्या अक्षम्य अनास्थेमुळे सपना ही आदिवासी मुलगी अजुनही बेपत्ता आहे. तिचा शोध लागून या प्रकरणातील नेमके वास्तव बाहेर येईल याची आशा आता जणु मावळलीच आहे. याला जबाबदार कोण हे आता जनताच ठरविणार आहे.
साभार :- देशोन्नती 

Monday, 24 December 2012

बेपत्ता सपना व गुप्तधन प्रकरणी सि.आय.डी.चौकशीचे संकेत


राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली दखल

तब्बल दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेली चोरांबा येथिल सात वर्षीय चिमुकली सपना गोपाल पळसकर व मुरली येथे गुप्तधनासाठी झालेला प्रयत्न प्रकरणात पोलीस तपास अपयशी ठरल्याने आता सि.आय.डी.या दोन्ही प्रकरणी तपास करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लोकसंग्राम पक्षाचे आमदार अनिल गोटे व गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तातडीने सि.आय.डी.चौकशीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे. या शिष्टमंडळात अनिल जवादे, विनोद सिंघानिया, कृष्णा भोंगाडे, श्रिराम तलांडे, महादेव चिकराम, लक्ष्मण भिवनकर, गंगाधर महाराज कोलाम, विठ्ठल धानोरकर, बंडू मसराम यांचा समावेश होता. हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबर रोजी या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची भेट घेऊन या घटनेच्या तपासात पोलीसांनी दिरंगाई करून आरोपांrना पाठिशी घातल्याचा आरोप केला होता. तसेच पोलीस राजकीय दबावातून या प्रकरणी योग्य तपास करीत नसल्याची बाब सुद्धा गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली होती. यापुर्वी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने घाटंजी येथे मोर्चा काढण्यात आला होता. तसेच आमदार संजय राठोड, संदिप बाजोरीया, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पुरोगामी युवक संघटना, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्ष निता केळकर महिला कॉंग्रेस यवतमाळ यांचेसह अनेकांनी विवीध माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे सि.आय.डी.चौकशी झाल्यावर या दोन्ही प्रकरणी निर्माण झालेले रहस्य उलगडणार अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 22 November 2012

गुप्तधन प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी



मुरली तांड्यावरील गुप्तधनासाठी नरबळी प्रकरणातील ३ आरोपींना आज ५ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपी राजु ताकसांडे याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या तिसNया दिवशी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांना आरोपींची केवळ एक दिवसाचीच पोलीस कोठडी मिळाली. ‘देशोन्नती’ च्या बातमीमध्ये वर्तविलेल्या शक्यतेप्रमाणे ही पोलीस कोठडी केवळ औपचारीकताच ठरली. या एका दिवसात पोलीसांनी आरोपींकडून कोणतीही माहिती काढल्याचे वृत्त नाही. या घटनेतील सुमारे आठ ते दहा आरोपी कोण आहेत? ती मुलगी कोण होती? चोरंबा येथिल बेपत्ता असलेली मुलगी तिच तर नाही ना? हे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. घटनेच्या रात्रीपासुनच आरोपी विषयी सहानुभूती असलेल्या प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले यांच्याकडेच या घटनेचा तपास राहिल्याने कोणत्याही माहितीविना सर्व आरोपी अखेर न्यायालयीन कोठडीत सुरक्षीत झाले. आता यापुढे पोलीस सदर घटनेचा नेमका काय तपास करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. घटनास्थळावर सर्व संशयास्पद पुरावे आढळूनही पोलीस या घटनेला गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची वास्तविकता मान्य करायलाच तयार असल्याचे दिसत नाही. विस ते पंचेविस दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या त्या मुलीच्या बाबतीतही कोणताही सुगावा लागलेला नाही. दिड हजार लोकसंख्येच्या गावातून एक सात वर्षीय चिमुकली बेपत्ता होते. मात्र त्या प्रकरणातही पोलीस तपास शुन्यच आहे. घाटंजी पोलीसांचा हा ‘कारभार’ पाहता पोलीस नेमके काय करीत आहेत? असा प्रश्न विचारल्या जात आहे. त्यांचेवर वरिष्ठांचा वचक नाही का? प्रभारी ठाणेदार गुरनूले यांची कार्यपद्धती यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. आरोपींविषयी त्यांना नेहमीच असलेली ‘सहानुभूती’ संशयास्पद असते. मात्र वरिष्ठांकडून आजवर याबाबत त्यांचेवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने असे प्रकार वाढत आहेत. यावेळी तर चक्क गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न व बेपत्ता असलेली सात वर्षीय मुलगी असा धडधडीत गंभीर प्रकार स्पष्ट असतांना पोलीसांचा तपासच संशयाच्या भोवNयात सापडला आहे. पोलीस दलातील वरिष्ठही या प्रकरणी गंभिर असल्याचे दिसत नाही याचे कारण काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. कर्तव्यदक्ष अशी प्रतिमा असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा या प्रकरणी लक्ष घालतील अशी अनेकांना अपेक्षा होती. एवंâदरीतच या प्रकरणी स्वतंत्र तपास यंत्रणेमार्पâत चौकशीची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


Saturday, 15 September 2012

आठवडाभरापासुन बेपत्ता युवकाच्या तपासात पोलीसांना यश नाही

घाटंजीवासियात तिव्र संताप

गेल्या आठवडाभरापासुन बेपत्ता असलेल्या यश बाबाराव लिंगणवार याच्या प्रकरणात पोलीस कमालीचा दुर्लक्षीतपणा करीत असुन अजुनही त्या युवकाचा शोध लागलेला नाही. या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या आरोपी युवकांच्या तपासणीतूनही काहीही निष्पन्न झाले नसल्याने अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आठ दिवसांपासुन यशचा ठावठिकाणा पोलीसांना लागलेला नाही. या प्रकरणात पोलीस तपासात अजिबात गांभिर्य नसुन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेले नाहीत. यश हा यवतमाळ येथिल बाजोरीया नगरातून बेपत्ता झाला आहे. तो मुळचा घाटंजी येथिल रहिवासी आहे. त्यामुळे घाटंजी वासियांमध्ये पोलीस तपासाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. घाटंजी येथिल नाभिक संघटना तसेच व्यापारी संघटना याप्रकरणी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
साभार :- देशोन्नती