Pages

Showing posts with label सि.आय.डी.. Show all posts
Showing posts with label सि.आय.डी.. Show all posts

Monday, 24 December 2012

बेपत्ता सपना व गुप्तधन प्रकरणी सि.आय.डी.चौकशीचे संकेत


राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली दखल

तब्बल दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेली चोरांबा येथिल सात वर्षीय चिमुकली सपना गोपाल पळसकर व मुरली येथे गुप्तधनासाठी झालेला प्रयत्न प्रकरणात पोलीस तपास अपयशी ठरल्याने आता सि.आय.डी.या दोन्ही प्रकरणी तपास करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लोकसंग्राम पक्षाचे आमदार अनिल गोटे व गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तातडीने सि.आय.डी.चौकशीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे. या शिष्टमंडळात अनिल जवादे, विनोद सिंघानिया, कृष्णा भोंगाडे, श्रिराम तलांडे, महादेव चिकराम, लक्ष्मण भिवनकर, गंगाधर महाराज कोलाम, विठ्ठल धानोरकर, बंडू मसराम यांचा समावेश होता. हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबर रोजी या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची भेट घेऊन या घटनेच्या तपासात पोलीसांनी दिरंगाई करून आरोपांrना पाठिशी घातल्याचा आरोप केला होता. तसेच पोलीस राजकीय दबावातून या प्रकरणी योग्य तपास करीत नसल्याची बाब सुद्धा गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली होती. यापुर्वी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने घाटंजी येथे मोर्चा काढण्यात आला होता. तसेच आमदार संजय राठोड, संदिप बाजोरीया, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पुरोगामी युवक संघटना, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्ष निता केळकर महिला कॉंग्रेस यवतमाळ यांचेसह अनेकांनी विवीध माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे सि.आय.डी.चौकशी झाल्यावर या दोन्ही प्रकरणी निर्माण झालेले रहस्य उलगडणार अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 

Friday, 8 June 2012

तालुका कृषी अधिकारी घुलेंच्या भ्रष्टाचाराची सि.आय.डी. चौकशी करा

घाटंजीत शेतक-यांच्या धरणे आंदोलनातील मागणी



येथिल तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांनी केलेल्या लाखोंच्या भ्रष्टाचाराची सि.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी घाटंजी तहसिल कार्यालयासमोर शेकडो शेतक-यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. विदर्भ जन आंदोलन समितीचे मोरेश्वर वातिले यांचे नेतृत्वात तहसिलदारांना विवीध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना वातिले यांनी तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर सडकुन टिका केली. ज्या कार्यालयात शेतक-यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकारी कर्मचा-यांनी तत्पर राहावयास हवे तिथे नेहमीच शेतक-यांना अपमानास्पद वागणुक दिल्या जाते. तसेच शासनातर्फे शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या बहुतांश योजना घाटंजी तालुक्यात कागदोपत्रीच राबविल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कृषी विस्तारासाठी साहाय्य देण्यासाठी असलेल्या ‘आत्मा’ या योजनेत शेतक-यांना लाभ देतांना लाखो रूपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणीच झालेली नाही असे वातिले यांनी यावेळी सांगितले. घाटंजीच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कोणत्याही योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर अधिका-यांच्या आशिर्वादाने वावरणा-या एजंटांच्या माध्यमातूनच संपर्क करावा लागतो. अन्यथा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात येते. राजकीय पुढा-यांच्या चेल्याचपाट्यांना पात्र नसतांनाही योजनांचे लाभ दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पी.पी.घुले यांच्या घाटंजी तालुक्यातील कार्यकाळा दरम्यानच्या कारभाराची सि.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावुन धरली. जयवंत भोयर, राजु राठोड, संदिपसिंग ढालवाले, राजु राठोड, संदिपसिंग ढालवाले, यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना कृषी विभागाच्या भोंगळ कारभारावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करून चौकशीची मागणी केली. कृषी विभागाने शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, योजना राबवितांना ग्रामसभेच्या ठरावामध्ये मंजुर कराव्या अशा विवीध मागण्या यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची दखल न घेतल्यास विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांच्या कार्यालयासमोर ५ जुलै पासुन आमरण उपोषण करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात  किरण जवादे, विष्णु कोरवते, अमरदिपसिंग ढालवाले, संदिप खवास, रमेश पडलवार, अमोल पडलवार, विकास धुर्वे, अरूण कुडमते, लक्ष्मण आत्राम, अमुत करमनकर, अरूण सिडाम यांचेसह अनेक शेतक-यांनी सुमारे तिन तास धरणे दिले.

साभार :- देशोन्नती