Pages

Friday 8 June 2012

तालुका कृषी अधिकारी घुलेंच्या भ्रष्टाचाराची सि.आय.डी. चौकशी करा

घाटंजीत शेतक-यांच्या धरणे आंदोलनातील मागणी



येथिल तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांनी केलेल्या लाखोंच्या भ्रष्टाचाराची सि.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी घाटंजी तहसिल कार्यालयासमोर शेकडो शेतक-यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. विदर्भ जन आंदोलन समितीचे मोरेश्वर वातिले यांचे नेतृत्वात तहसिलदारांना विवीध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना वातिले यांनी तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर सडकुन टिका केली. ज्या कार्यालयात शेतक-यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकारी कर्मचा-यांनी तत्पर राहावयास हवे तिथे नेहमीच शेतक-यांना अपमानास्पद वागणुक दिल्या जाते. तसेच शासनातर्फे शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या बहुतांश योजना घाटंजी तालुक्यात कागदोपत्रीच राबविल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कृषी विस्तारासाठी साहाय्य देण्यासाठी असलेल्या ‘आत्मा’ या योजनेत शेतक-यांना लाभ देतांना लाखो रूपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणीच झालेली नाही असे वातिले यांनी यावेळी सांगितले. घाटंजीच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कोणत्याही योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर अधिका-यांच्या आशिर्वादाने वावरणा-या एजंटांच्या माध्यमातूनच संपर्क करावा लागतो. अन्यथा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात येते. राजकीय पुढा-यांच्या चेल्याचपाट्यांना पात्र नसतांनाही योजनांचे लाभ दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पी.पी.घुले यांच्या घाटंजी तालुक्यातील कार्यकाळा दरम्यानच्या कारभाराची सि.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावुन धरली. जयवंत भोयर, राजु राठोड, संदिपसिंग ढालवाले, राजु राठोड, संदिपसिंग ढालवाले, यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना कृषी विभागाच्या भोंगळ कारभारावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करून चौकशीची मागणी केली. कृषी विभागाने शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, योजना राबवितांना ग्रामसभेच्या ठरावामध्ये मंजुर कराव्या अशा विवीध मागण्या यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची दखल न घेतल्यास विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांच्या कार्यालयासमोर ५ जुलै पासुन आमरण उपोषण करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात  किरण जवादे, विष्णु कोरवते, अमरदिपसिंग ढालवाले, संदिप खवास, रमेश पडलवार, अमोल पडलवार, विकास धुर्वे, अरूण कुडमते, लक्ष्मण आत्राम, अमुत करमनकर, अरूण सिडाम यांचेसह अनेक शेतक-यांनी सुमारे तिन तास धरणे दिले.

साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment