Pages

Showing posts with label लोकसंग्राम. Show all posts
Showing posts with label लोकसंग्राम. Show all posts

Monday, 24 December 2012

बेपत्ता सपना व गुप्तधन प्रकरणी सि.आय.डी.चौकशीचे संकेत


राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली दखल

तब्बल दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेली चोरांबा येथिल सात वर्षीय चिमुकली सपना गोपाल पळसकर व मुरली येथे गुप्तधनासाठी झालेला प्रयत्न प्रकरणात पोलीस तपास अपयशी ठरल्याने आता सि.आय.डी.या दोन्ही प्रकरणी तपास करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लोकसंग्राम पक्षाचे आमदार अनिल गोटे व गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तातडीने सि.आय.डी.चौकशीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे. या शिष्टमंडळात अनिल जवादे, विनोद सिंघानिया, कृष्णा भोंगाडे, श्रिराम तलांडे, महादेव चिकराम, लक्ष्मण भिवनकर, गंगाधर महाराज कोलाम, विठ्ठल धानोरकर, बंडू मसराम यांचा समावेश होता. हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबर रोजी या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची भेट घेऊन या घटनेच्या तपासात पोलीसांनी दिरंगाई करून आरोपांrना पाठिशी घातल्याचा आरोप केला होता. तसेच पोलीस राजकीय दबावातून या प्रकरणी योग्य तपास करीत नसल्याची बाब सुद्धा गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली होती. यापुर्वी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने घाटंजी येथे मोर्चा काढण्यात आला होता. तसेच आमदार संजय राठोड, संदिप बाजोरीया, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पुरोगामी युवक संघटना, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्ष निता केळकर महिला कॉंग्रेस यवतमाळ यांचेसह अनेकांनी विवीध माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे सि.आय.डी.चौकशी झाल्यावर या दोन्ही प्रकरणी निर्माण झालेले रहस्य उलगडणार अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 5 December 2012

सपना अपहरण व गुप्तधन प्रकरणी गुप्तचर विभागाकडून चौकशीची मागणी

१२ डिसेंबरला गोंडवाना गणतंत्र पार्टीचा घाटंजीत धडक मोर्चा 

गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व दिड महिन्यांपासुन बेपत्ता असलेली सपना पळसकर हिचा शोध घ्यावा. तसेच संपुर्ण प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी व लोकसंग्राम पक्षाच्या वतीने दि.१२ डिसेंबरला दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निरंजन मसराम यांचे नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सपनाचे अपहरण होऊन तब्बल दिड महिना उलटला तरी देखिल पोलीस विभागाला तिचा शोध घेण्यास यश आलेले नाही. एक गरिब आदिवासी कुटूंबातील मुलगी असल्याने पोलीस या तपासात गंभिर दिसत नाहीत. शिवाय गुप्तधन प्रकरणात देखिल पोलीस तपास संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून केल्या जाणार आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद न घातल्या गेल्यास भविष्यात हा प्रकार आणखी वाढु शकतो. यावेळी एका गरिब आदिवासी मुलीचे अपहरण झाले आहे. 
भविष्यात आपल्याही मुलाबाळांचे अपहरण अशा विकृत कामांसाठी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांसह सर्वांनीच या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाला गों.ग.पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम तलांडे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव धानोरकर, महासचिव बंडू मसराम, जिल्हा उपाध्यक्ष निमपाल राजगडकर, अनिल गेडाम, तालुकाध्यक्ष महादेव चिकराम, तालुका सचिव महादेव वेट्टी, जितेंद्र धुर्वे, मोहन कोटरंगे, देवजी गेडाम, सहाय्यक सचिव दत्ता मडावी, लोकसंग्राम पक्षाचे सरचिटणीस विनोद सिंघानिया, नानाजी कोवे, लेतूजी जुनघरे, उरकुंडा जांभुळकर, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी हे मार्गदर्शन करणार आहेत. या मोर्चामध्ये सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन घाटंजी तालुका कार्यकारी अध्यक्ष महादेव मैंद, नाना धुर्वे, कवडू मरापे, बाबुराव कोवे, शंकर कोरवते, कर्णूजी नैताम महाराज, कृष्णा आडे, गुलाब घोडाम, अमृत पेंदोर, अनिल गेडाम, संभा कोवे, नागोराव शेडमाके, लक्ष्मण अनाके, मारोती पेंदोर, शंकर वेलादी, नामदेव मरापे, अजय ताडपेल्लीवार, कवडू पेंदोर, खुशाल देडाम, विजय मेश्राम, बंडू सिडाम, देवजी गेडाम, विजय मसराम, नारायण कुळसंगे, प्रमोद ईळपाते, श्रावण किनाके, दत्ता मडावी, नानाजी किनाके, शंकर गेडाम, ज्ञानबा मसराम, शत्रुघ्न पेंदोर, सिताराम पराचे, काशिनाथ कनाके, संतु पेंदोर, अभिमान कातले, लक्ष्मण अनाके, भगवान उईके, राजु मडावी, अजाब सलाम, कवडू सुरपाम, शालिक मडावी, भानुदास सुरपाम, भाऊराव मेश्राम, शंकर अनाके, पुरूषोत्तम मडावी, अर्जुन कोरवते, गोकुल मेश्राम, मुनीरोद्दीन, ज्ञानेश्वर सिडाम, शेषराम आत्राम, हरिभाऊ सलाम, पुरूषोत्तम मडावी, दामोधर ऊईके, रामदास ऊईके, गुलाब कोडापे, शंकर कोरवे, अनिल गेडाम, जितेंद्र धुर्वे, रायबा आत्राम, रमजान जाटू, विलास चांदुरकर, सुबान जाटू, तुकाराम नेहारे, गोविंद तिरमानवार, दिलीप पेगर्लावार, ज्ञानेश्वर चितकुंटलवार, दत्तू पालेपवार, शरद खोडपे, मज्जीद बैलीम, दत्ता मडावी, कवडू मरापे, शंकर सोयाम, सलिम मनियार, शंकर गेडाम यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती