Pages

Showing posts with label गोंडवाना गणतंत्र पार्टी. Show all posts
Showing posts with label गोंडवाना गणतंत्र पार्टी. Show all posts

Wednesday, 12 December 2012

........यापुढे सपनाच्या शोधासाठी एस.पी. व जिल्हाधिका-यांना घेराव

न्याय द्या मोर्चामध्ये निरंजन मसराम यांचा ईशारा


गेल्या दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेल्या सपनाचा शोध पोलीसांना घेता आला नाही. तर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न करणा-या व पळुन गेलेल्या आरोपीनाही पोलीस शोधु शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा धुसर झाल्याने पुढची दिशा म्हणुन आठवडाभरानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना आदिवासी बांधवांना नाईलाजास्तव घेराव घालावा लागणार असा ईशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांनी आज घाटंजी येथे दिला.
ते गों.ग.पा.तर्फे घाटंजी तहसिलवर काढण्यात आलेल्या न्याय द्या धडक मोर्चाला संबोधीत करत होते. त्यांनी पुढे सांगितले की, सपनाचे आईवडील मजुरी करतात. ते परिस्थितीने गरिब आहेत. सपना ही चिमुकली बालिका आहे. त्यामुळे तिचे अपहरण खंडणी अथवा अनैतिक कारणासाठी झाले असे म्हणता येणार नाही. ती गावातून साणासुदीच्या दिवशी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. त्यावेळी संशयास्पदपणे गावातील विज गेली होती. तसेच तिला पळवुन नेत असतांना कदाचीत ती ओरडू नये म्हणुन तिला खाण्यातून अथवा प्रसादातून गुंगीचे औषध दिले असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान दि.१७ ऑक्टोबर रोजी मुरली येथे रात्रीच्या सुमारास गावाबाहेर असलेल्या एकहात्या मारोती मंदिराजवळ एका बालिकेचा किंकाळीचा आवाज विजय चव्हाण या नागरिकाने ऐकल्यावर गावकरी तेथे धावुन गेले. त्यामुळे गुप्तधन शोधणा-या टोळीतील दोन आरोपी सापडले. आता चार आरोपी अटकेत आहेत. पोलीसांनी सपना पळसकर हिच्या अपहरणाचा व गुप्तधनाच्या प्रकरणाचा परस्पर संबंधाची शक्यताही तपासली नाही. या घटनेतील अनेक अज्ञात आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचाही शोध घेण्याची मानसिकता पोलीसांमध्ये दिसत नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. आदिवासी बांधवांवर कितीही अन्याय झाला विंâवा त्याला कापुन टाकण्याचाही प्रयत्न झाला तरी तो पेटून ऊठणार नाही ही भावना तुमच्याप्रती एकप्रकारची रूढ झालेली आहे. म्हणुन आदिवासींवरील अन्यायाला शासनही गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारात क्रांतीची ठिणगी टाकुन न्यायासाठी पेटून ऊठले पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळेल असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. मतदार संघातील आपलेच आदिवासी नेते व सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे दोन महिन्यात एकदाही सपनाच्या आईवडीलांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. यावरून त्यांना आदिवासी बांधवांविषयी किती कळवळा आहे हे दिसुन येते. एवढ्या गंभिर घटनेबद्दल त्याना गांभिर्य नसल्याबद्दल मसराम यांनी आश्चर्य व्यक्त केले. सपनाचा त्वरीत शोध न घेतल्यास विधानसभेवर मशाल मोर्चा काढण्याचा ईशाराही त्यानी यावेळी दिला. या मोर्चाला गों.ग.पा.चे जिल्हाध्यक्ष श्रिराम तलांडे, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी, विठ्ठल धानोरकर, नाना टेकाम, जितेंद्र धुर्वे, सुदर्शन टेकाम, निमपाल राजगडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसिलदार प्रकाश राऊत यांना निवेदन दिले.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 5 December 2012

सपना अपहरण व गुप्तधन प्रकरणी गुप्तचर विभागाकडून चौकशीची मागणी

१२ डिसेंबरला गोंडवाना गणतंत्र पार्टीचा घाटंजीत धडक मोर्चा 

गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व दिड महिन्यांपासुन बेपत्ता असलेली सपना पळसकर हिचा शोध घ्यावा. तसेच संपुर्ण प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी व लोकसंग्राम पक्षाच्या वतीने दि.१२ डिसेंबरला दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निरंजन मसराम यांचे नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सपनाचे अपहरण होऊन तब्बल दिड महिना उलटला तरी देखिल पोलीस विभागाला तिचा शोध घेण्यास यश आलेले नाही. एक गरिब आदिवासी कुटूंबातील मुलगी असल्याने पोलीस या तपासात गंभिर दिसत नाहीत. शिवाय गुप्तधन प्रकरणात देखिल पोलीस तपास संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून केल्या जाणार आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद न घातल्या गेल्यास भविष्यात हा प्रकार आणखी वाढु शकतो. यावेळी एका गरिब आदिवासी मुलीचे अपहरण झाले आहे. 
भविष्यात आपल्याही मुलाबाळांचे अपहरण अशा विकृत कामांसाठी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांसह सर्वांनीच या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाला गों.ग.पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम तलांडे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव धानोरकर, महासचिव बंडू मसराम, जिल्हा उपाध्यक्ष निमपाल राजगडकर, अनिल गेडाम, तालुकाध्यक्ष महादेव चिकराम, तालुका सचिव महादेव वेट्टी, जितेंद्र धुर्वे, मोहन कोटरंगे, देवजी गेडाम, सहाय्यक सचिव दत्ता मडावी, लोकसंग्राम पक्षाचे सरचिटणीस विनोद सिंघानिया, नानाजी कोवे, लेतूजी जुनघरे, उरकुंडा जांभुळकर, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी हे मार्गदर्शन करणार आहेत. या मोर्चामध्ये सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन घाटंजी तालुका कार्यकारी अध्यक्ष महादेव मैंद, नाना धुर्वे, कवडू मरापे, बाबुराव कोवे, शंकर कोरवते, कर्णूजी नैताम महाराज, कृष्णा आडे, गुलाब घोडाम, अमृत पेंदोर, अनिल गेडाम, संभा कोवे, नागोराव शेडमाके, लक्ष्मण अनाके, मारोती पेंदोर, शंकर वेलादी, नामदेव मरापे, अजय ताडपेल्लीवार, कवडू पेंदोर, खुशाल देडाम, विजय मेश्राम, बंडू सिडाम, देवजी गेडाम, विजय मसराम, नारायण कुळसंगे, प्रमोद ईळपाते, श्रावण किनाके, दत्ता मडावी, नानाजी किनाके, शंकर गेडाम, ज्ञानबा मसराम, शत्रुघ्न पेंदोर, सिताराम पराचे, काशिनाथ कनाके, संतु पेंदोर, अभिमान कातले, लक्ष्मण अनाके, भगवान उईके, राजु मडावी, अजाब सलाम, कवडू सुरपाम, शालिक मडावी, भानुदास सुरपाम, भाऊराव मेश्राम, शंकर अनाके, पुरूषोत्तम मडावी, अर्जुन कोरवते, गोकुल मेश्राम, मुनीरोद्दीन, ज्ञानेश्वर सिडाम, शेषराम आत्राम, हरिभाऊ सलाम, पुरूषोत्तम मडावी, दामोधर ऊईके, रामदास ऊईके, गुलाब कोडापे, शंकर कोरवे, अनिल गेडाम, जितेंद्र धुर्वे, रायबा आत्राम, रमजान जाटू, विलास चांदुरकर, सुबान जाटू, तुकाराम नेहारे, गोविंद तिरमानवार, दिलीप पेगर्लावार, ज्ञानेश्वर चितकुंटलवार, दत्तू पालेपवार, शरद खोडपे, मज्जीद बैलीम, दत्ता मडावी, कवडू मरापे, शंकर सोयाम, सलिम मनियार, शंकर गेडाम यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती