Pages

Wednesday 12 December 2012

........यापुढे सपनाच्या शोधासाठी एस.पी. व जिल्हाधिका-यांना घेराव

न्याय द्या मोर्चामध्ये निरंजन मसराम यांचा ईशारा


गेल्या दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेल्या सपनाचा शोध पोलीसांना घेता आला नाही. तर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न करणा-या व पळुन गेलेल्या आरोपीनाही पोलीस शोधु शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा धुसर झाल्याने पुढची दिशा म्हणुन आठवडाभरानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना आदिवासी बांधवांना नाईलाजास्तव घेराव घालावा लागणार असा ईशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांनी आज घाटंजी येथे दिला.
ते गों.ग.पा.तर्फे घाटंजी तहसिलवर काढण्यात आलेल्या न्याय द्या धडक मोर्चाला संबोधीत करत होते. त्यांनी पुढे सांगितले की, सपनाचे आईवडील मजुरी करतात. ते परिस्थितीने गरिब आहेत. सपना ही चिमुकली बालिका आहे. त्यामुळे तिचे अपहरण खंडणी अथवा अनैतिक कारणासाठी झाले असे म्हणता येणार नाही. ती गावातून साणासुदीच्या दिवशी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. त्यावेळी संशयास्पदपणे गावातील विज गेली होती. तसेच तिला पळवुन नेत असतांना कदाचीत ती ओरडू नये म्हणुन तिला खाण्यातून अथवा प्रसादातून गुंगीचे औषध दिले असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान दि.१७ ऑक्टोबर रोजी मुरली येथे रात्रीच्या सुमारास गावाबाहेर असलेल्या एकहात्या मारोती मंदिराजवळ एका बालिकेचा किंकाळीचा आवाज विजय चव्हाण या नागरिकाने ऐकल्यावर गावकरी तेथे धावुन गेले. त्यामुळे गुप्तधन शोधणा-या टोळीतील दोन आरोपी सापडले. आता चार आरोपी अटकेत आहेत. पोलीसांनी सपना पळसकर हिच्या अपहरणाचा व गुप्तधनाच्या प्रकरणाचा परस्पर संबंधाची शक्यताही तपासली नाही. या घटनेतील अनेक अज्ञात आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचाही शोध घेण्याची मानसिकता पोलीसांमध्ये दिसत नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. आदिवासी बांधवांवर कितीही अन्याय झाला विंâवा त्याला कापुन टाकण्याचाही प्रयत्न झाला तरी तो पेटून ऊठणार नाही ही भावना तुमच्याप्रती एकप्रकारची रूढ झालेली आहे. म्हणुन आदिवासींवरील अन्यायाला शासनही गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारात क्रांतीची ठिणगी टाकुन न्यायासाठी पेटून ऊठले पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळेल असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. मतदार संघातील आपलेच आदिवासी नेते व सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे दोन महिन्यात एकदाही सपनाच्या आईवडीलांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. यावरून त्यांना आदिवासी बांधवांविषयी किती कळवळा आहे हे दिसुन येते. एवढ्या गंभिर घटनेबद्दल त्याना गांभिर्य नसल्याबद्दल मसराम यांनी आश्चर्य व्यक्त केले. सपनाचा त्वरीत शोध न घेतल्यास विधानसभेवर मशाल मोर्चा काढण्याचा ईशाराही त्यानी यावेळी दिला. या मोर्चाला गों.ग.पा.चे जिल्हाध्यक्ष श्रिराम तलांडे, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी, विठ्ठल धानोरकर, नाना टेकाम, जितेंद्र धुर्वे, सुदर्शन टेकाम, निमपाल राजगडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसिलदार प्रकाश राऊत यांना निवेदन दिले.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment