Pages

Thursday 22 November 2012

गुप्तधन प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी



मुरली तांड्यावरील गुप्तधनासाठी नरबळी प्रकरणातील ३ आरोपींना आज ५ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपी राजु ताकसांडे याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या तिसNया दिवशी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांना आरोपींची केवळ एक दिवसाचीच पोलीस कोठडी मिळाली. ‘देशोन्नती’ च्या बातमीमध्ये वर्तविलेल्या शक्यतेप्रमाणे ही पोलीस कोठडी केवळ औपचारीकताच ठरली. या एका दिवसात पोलीसांनी आरोपींकडून कोणतीही माहिती काढल्याचे वृत्त नाही. या घटनेतील सुमारे आठ ते दहा आरोपी कोण आहेत? ती मुलगी कोण होती? चोरंबा येथिल बेपत्ता असलेली मुलगी तिच तर नाही ना? हे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. घटनेच्या रात्रीपासुनच आरोपी विषयी सहानुभूती असलेल्या प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले यांच्याकडेच या घटनेचा तपास राहिल्याने कोणत्याही माहितीविना सर्व आरोपी अखेर न्यायालयीन कोठडीत सुरक्षीत झाले. आता यापुढे पोलीस सदर घटनेचा नेमका काय तपास करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. घटनास्थळावर सर्व संशयास्पद पुरावे आढळूनही पोलीस या घटनेला गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची वास्तविकता मान्य करायलाच तयार असल्याचे दिसत नाही. विस ते पंचेविस दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या त्या मुलीच्या बाबतीतही कोणताही सुगावा लागलेला नाही. दिड हजार लोकसंख्येच्या गावातून एक सात वर्षीय चिमुकली बेपत्ता होते. मात्र त्या प्रकरणातही पोलीस तपास शुन्यच आहे. घाटंजी पोलीसांचा हा ‘कारभार’ पाहता पोलीस नेमके काय करीत आहेत? असा प्रश्न विचारल्या जात आहे. त्यांचेवर वरिष्ठांचा वचक नाही का? प्रभारी ठाणेदार गुरनूले यांची कार्यपद्धती यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. आरोपींविषयी त्यांना नेहमीच असलेली ‘सहानुभूती’ संशयास्पद असते. मात्र वरिष्ठांकडून आजवर याबाबत त्यांचेवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने असे प्रकार वाढत आहेत. यावेळी तर चक्क गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न व बेपत्ता असलेली सात वर्षीय मुलगी असा धडधडीत गंभीर प्रकार स्पष्ट असतांना पोलीसांचा तपासच संशयाच्या भोवNयात सापडला आहे. पोलीस दलातील वरिष्ठही या प्रकरणी गंभिर असल्याचे दिसत नाही याचे कारण काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. कर्तव्यदक्ष अशी प्रतिमा असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा या प्रकरणी लक्ष घालतील अशी अनेकांना अपेक्षा होती. एवंâदरीतच या प्रकरणी स्वतंत्र तपास यंत्रणेमार्पâत चौकशीची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment