Pages

Showing posts with label शि.प्र.मं.. Show all posts
Showing posts with label शि.प्र.मं.. Show all posts

Monday, 5 January 2015

घाटंजीच्या अंजलीने उंचावली यवतमाळ जिल्ह्याची मान !

भारतीय विज्ञान परिषदेत कौतुकाचा वर्षाव 
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, कैलाश सत्यार्थींसह 
मान्यवरांकडून प्रयोगाची दखल

अमोल राऊत
भारतातील सर्वात मोठा विज्ञान समारंभ...वैविध्यपुर्ण अविष्कारांच्या स्टॉल्सने गजबजलेला परिसर...पंचतारांकीत शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक प्रयोगांची रेलचेल...दरम्यान देशाचे माजी राष्ट्रपती तथा ख्यातनाम वैज्ञानिक डॉ.अब्दुल कलाम कार्यक्रमाच्या उद्घाटनास येतात. देशातील सर्वोत्तम विजान अविष्कार असलेल्या या परिसरात त्यांची नजर पडते ती सायकलवरील स्वयंचलीत फवारणी यंत्रावर. ते तिथे जातात. प्रयोग साकारणा-या विद्यार्थीनीकडून प्रयोगाची माहिती घेतात. त्या प्रयोगाचा उद्देश व विद्यार्थीनीची पार्श्वभूमी जाणुन घेतल्यावर त्या विद्यार्थीनीच्या पाठीवर कौतुकाने हात फिरवतात. हा प्रसंग घडला मुंबई येथे सुरू असलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमात. अन ती विद्यार्थीनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याची. शहरालगत असलेल्या खापरी या लहान खेड्यातील शेतकरी संजय गोडे यांची मुलगी अंजली. घाटंजीतील शि.प्र.मं.कन्या शाळेतील दहाव्या वर्गाची विद्यार्थीनी. राष्ट्रीय स्तरावर तिच्या प्रयोगाची मान्यवरांनी दखल घेतल्याने घाटंजी तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याचाही गौरव वाढला आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय स्तरावरील इंडीयन सायन्स कॉंग्रेस या विज्ञान प्रदर्शनात घाटंजी येथिल शि.प्र.मं. कन्या शाळेची विद्यार्थीनी अंजली संजय गोडे हिने सादर केलेल्या सायकलवरील स्वयंचलीत फवारणी यंत्र या प्रयोगाने अनेक मान्यवरांचे लक्ष वेधले. या प्रदर्शनीमध्ये अंजलीचा हा अभिनव व शेतक-यांसाठी उपयोगी असलेला हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे. 
देशाचे माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते चिल्ड्रन सायन्स कॉंग्रेसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अंजलीच्या प्रयोगाची पाहणी केली. या प्रयोगाची संपुर्ण माहिती त्यांनी घेतली. शेतक-यांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकणा-या या प्रयोगासाठी अंजली गोडे व तिचे मार्गदर्शक शिक्षक अतुल ठाकरे यांचे डॉ.कलाम यांनी विशेष कौतुक केले. त्याच प्रमाणे नोबेल पारितोषीक विजेते कैलाश सत्यार्थी यांनीही या प्रयोगाची पाहणी करून अंजलीला शाबासकी दिली.
मुंबई येथे सुरू असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषदेचे ३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेमध्ये नोबेल पारितोषीक विजेते मान्यवर, प्रसिद्ध वैज्ञानिक, विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला आहे. या विज्ञान मेळाव्यात देशभरातील प्रतिभावान विद्यार्थी सहभागी झाले असुन अंजली संजय गोडे हि महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. जिल्हा, राज्य, व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याने भारतीय विज्ञान परिषदेत तिला निमंत्रित करण्यात आले आहे. घाटंजी तालुक्यातील खापरी या छोट्याशा गावातील शेतकरी कन्येने राष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी कौतुकाचा विषय ठरली आहे.


कृषी क्षेत्रातच करीयर करणार
भविष्यात कृषी विज्ञान क्षेत्रातच शिक्षण घेऊन शेतक-यांसाठी उपयोगी ठरणारे संशोधन करण्याचा मानस अंजली गोडे हिने सकाळ शी बोलतांना व्यक्त केला. वडील शेतकरी असल्याने आधी पासुनच शेतीविषयी आवड आहे. या प्रयोगासाठी वडील संजय गोडे यांनी त्यांच्या अनुभवातून केलेले मार्गदर्शन खुप उपयोगी ठरले. राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषदेत येऊन बरेच काही शिकायला मिळाले तसेच प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशिर्वाद मिळाला असे ती म्हणाली. शेतक-यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे खचुन न जाता आधुनिक तंत्रजानाच्या मदतीने शेती करण्याला प्राधान्य द्यावे. तसे झाल्यास शेतक-यांवर आत्महत्येची पाळी येणार नाही.
अंजली गोडे

खुप काही शिकायला मिळाले
अंजलीच्या या प्रयोगाला मार्गदर्शन करीत असतांना माझ्याही जानात भर पडली. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सहभागी होता आले. शिवाय या ठिकाणी अनेक नामवंत मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले. अंजलीमध्ये आता प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या दरम्यान आलेल्या अनुभवांचा फायदा भविष्यात शाळेतील ईतर विद्यार्थीनींसाठी करता येईल
अतुल ठाकरे
मार्गदर्शक शिक्षक


शाळेसाठी गौरवाचा क्षण !
अंजलीने विजान क्षेत्रात घेतलेली भरारी शाळेसाठी गौरवास्पद आहे. या प्रयोगाची संकल्पना प्रथम दर्शनी जरी साधी वाटत असली तरी त्याची उपयोगीता खुप आहे. भविष्यात शेतक-यांसाठी हे संशोधन महत्वाचे राहील. अंजलीच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थीनींना प्रेरणा मिळेल.
सौ.के.पी.महाकाळकर
मुख्याध्यापीका, शि.प्र.म.कन्या शाळा

अंजलीच्या यशाचा अभिमान वाटतो

आमची वर्गमैत्रिण आज राष्ट्रीय स्तरावर गेली असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अंजलीची जिद्द, परिश्रम व प्रयोगाचा उद्देश कौतुकास्पद आहे. आम्हालाही तिच्याकडून खुप काही शिकता येईल.
नेहा अवचित
वर्गमैत्रिण


स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी वरदान
सायकलवर चालणारे हे स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अवघ्या अडीच ते ३ हजार रूपयात हे यंत्र तयार होते. शिवाय र्इंधन विरहित असल्याने पैश्याच्या बचतीसोबतच पर्यावरणासाठीही हानीकारक नाही. सायकलच्या पॅडल द्वारे दाब निर्माण करून वेगवेगळ्या १० नोझल्स द्वारे फवारणी करता येऊ शकते. विषेश म्हणजे सायकलची गती कमी असली तरी फवारणी होऊ शकते. केवळ एक व्यक्तीच सायकल चालवुन फवारणी करू शकत असल्यामुळे मजुराची गरज नाही. तसेच फवारणी मागील बाजुस होत असल्यामुळे रासायनिक द्रव्य अंगावर पडण्याचा धोका कमी आहे. फवारणीसाठी शेतक-यांना ईलेक्ट्रीक फवारणी यंत्राचे भाडे, र्इंधन व मजुरी असा खर्च लागतो. मात्र या अत्यल्प खर्चातील स्वयंचलीत यंत्राने शेतक-यांना किफायतशीर दरात फवारणी करता येऊ शकते.

अंजलीच्या प्रयोगाची राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल
( बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा )

The Indian Express
Teen invents pump on cycle for farmers, gets a pat from Abdul Kalam


Hindustan Times
Yavatmal schoolgirl's agricultural innovation appreciated by Dr Abdul Kalam


DNA ( Daily News & Analysis )
Yavatmal girl receives praise from former president Dr APJ Abdul Kalam for her project


The Asian Age
‘Create technology for welfare’

The Hindu
A scientist demonstrates her project to former President A.P.J. Abdul Kalam


महाराष्ट्र टाईम्स
पिकांवर फवारणीसाठी ‘सायकल पंप’
गरजू शेतकऱ्यांसाठी यवतमाळच्या अंजलीचा अविष्कार

लोकसत्ता
देशाला दर्जेदार नेतृत्त्वाची गरज

सकाळ
कल्पनांच्या पंखावर घ्या भरारी !

लोकमत
पैशासाठी विज्ञान अभ्यास नको

दैनिक ट्रिब्युन
छोटा पंप करे कमाल

IBN Lokmat

Monday, 8 December 2014

शि.प्र.मं.कन्या शाळेच्या प्रयोगाची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड

शेतकरी कन्येची गगनभरारी
साकारले सायकलवर स्वयंचलित फवारणी यंत्र 
स्थानिक शि.प्र.मं. माध्यमिक कन्या शाळेतील विज्ञान प्रतिकृतीची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरीता निवड करण्यात आली आहे. सायकलवर स्वयंचलित फवारणी यंत्र हि प्रतिकृती राष्ट्रीय विजान प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. येत्या १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान लेझर व्हॅली गार्डन चंदीगड येथे हे प्रदर्शन होणार असुन भारतातील सर्वोत्कृष्ट वैजानिक प्रयोग येथे सादर होणार आहेत. घाटंजी तालुक्यातील शाळेला प्रथमच राज्य स्तरावर द्वितीय पारितोषीक व राष्ट्रीय पातळीवर निवड होण्याचा बहुमान मिळाला आहे. 
शि.प्र.मं.कन्या शाळेतील १० व्या वर्गाची विद्यार्थीनी अंजली संजय गोडे हिने शिक्षक अतुल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात हा प्रयोग साकारला आहे. जानेवारी महिन्यात धामणगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत स्वयंचलीत फवारणी यंत्राला माध्यमिक गटातून द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला होता. या प्रयोगासाठी शाळेचे पर्यवेक्षक बी.व्ही. घागरे, यांचेसह सर्व विजान शिक्षक व शिक्षीकांचे मार्गदर्शन लाभले. हा प्रयोग साकारणारी विद्यार्थीनी अंजली गोडे हिचे वडील उपक्रमशील शेतकरी आहेत. त्यांना जिल्हा परिषदेकडून सन्मानीत सुद्धा करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीत निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव अनिरूद्ध लोणकर, संचालक आर.यु.गिरी, आलिया शहजाद, गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए. शहजाद, शि.प्र.मं.कन्या शाळेच्या मुख्याध्यापक के.पी.महाकाळकर व सर्व शिक्षक तसेच कर्मचारी वुंदाने कौतुक केले आहे.
स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी वरदान
सायकलवर चालणारे हे स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अवघ्या अडीच ते ३ हजार रूपयात हे यंत्र तयार होते. शिवाय र्इंधन विरहित असल्याने पैश्याच्या बचतीसोबतच पर्यावरणासाठीही हानीकारक नाही. सायकलच्या पॅडल द्वारे दाब निर्माण करून वेगवेगळ्या १० नोझल्स द्वारे फवारणी करता येऊ शकते. विषेश म्हणजे सायकलची गती कमी असली तरी फवारणी होऊ शकते. केवळ एक व्यक्तीच सायकल चालवुन फवारणी करू शकत असल्यामुळे मजुराची गरज नाही. तसेच फवारणी मागील बाजुस होत असल्यामुळे रासायनिक द्रव्य अंगावर पडण्याचा धोका कमी आहे. फवारणीसाठी शेतक-यांना ईलेक्ट्रीक फवारणी यंत्राचे भाडे, र्इंधन व मजुरी असा खर्च लागतो. मात्र या अत्यल्प खर्चातील स्वयंचलीत यंत्राने शेतक-यांना किफायतशीर दरात फवारणी करता येऊ शकते.

Sunday, 4 May 2014

प्रा.अभय पत्की यांना पी.एच.डी.प्रदान

येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अभय केशवराव पत्की यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आचार्य पदवीने गौरविण्यात आले आहे. त्यांना ’’स्टडी ऑफ सम केस्टोड पॅरासाईट्स फ्रॉम फिशेस ऑफ वेस्ट कॉस्ट ऑफ र्इंडीया’’ या विषयावरील शोध प्रबंधासाठी पी.एच.डी.प्रदान करण्यात आली आहे. यासाठी त्यांना श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालय चिखली येथे कार्यरत डॉ.एम.बी.सोनुने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ.के.एम.कुळकर्णी यांनीही त्यांना सहकार्य केले. 
प्रा.अभय पत्की यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी, संचालक र.ऊ.गिरी, अ‍ॅड अनिरूद्ध लोणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए.शहेजाद, डॉ.ए.पी चार्जन, प्रम.बी.बी.चोपडे, प्रा.सि.पी.वानखडे, प्रा.आर.जी.डंभारे, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.आर.व्ही.राठोड, प्रा.जी.सी.भगत यांचेसह सर्व प्राधापक व कर्मचारी वुंदाने कौतुक केले आहे.
  

Friday, 31 January 2014

स्नेहसंमेलनात फ्री स्टाईल बाईक रायडींगचा थरार

रस्ता सुरक्षेचा संदेश : युवकांनो फाजिल धैर्य दाखवू नका



येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलना दरम्यान फ्री स्टाईल बाईक रायडींगने युवकांच्या मनाचा ठाव घेतला. राष्ट्रीय रेसर राहुल राठोड व दिलशाद खान यांचे चित्तथरारक बाईक स्टंट्स यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. 
हिलचेयर व्हिली, सुसाईड बर्नाऊट, सिट स्टॅण्ड व्हिली, रोलींग बर्नाऊट यासह विवीध प्रकारचे स्टंट्स युवकांना भुरळ पाडीत होते. मात्र या बाईकर्सनी युवकांना बाईकवर फाजिल धैर्य न दाखविण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मर्यादीत वेगातच बाईक चालवावी. योग्य प्रशिक्षण असल्याशिवाय स्टंट्स करू नये. रस्ता हा सुरक्षीतपणे वाहने चालविण्यासाठी असतो स्टंट्स करण्यासाठी नाही असा संदेशही त्यांनी महाविद्यालयीन युवकांना दिला. या कार्यक्रमातून गोळा झालेला निधी यवतमाळ येथिल वृद्धाश्रमाला देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे विद्यार्थी अमित पडलवार, सुहास दिवुंâडवार, निलेश दुल्लरवार, अनुप तारक, पुष्कर कुरजेकर यांनी पुढाकार घेतला. दरम्यान या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विवीध खेळ व क्रिडा स्पर्धा, रांगोळी, थाळी सजावट, वादविवाद, वक्तृत्व, भावगित, कविता वाचन, आनंद मेळावा, पुष्परचना या स्पर्धांसह विवीध सांस्कुतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्याथ्र्यांनी उत्स्पुâर्त सहभाग घेतला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संचालक आर.यु.गिरी, आलिया शहेजाद यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे प्रभारी म्हणुन प्रा.टी.एम.कोटक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. 
साभार : सकाळ 

Friday, 2 August 2013

शि.प्र.म. विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती




राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ईयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.) परिक्षेत येथिल शि.प्र.मं.विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 
समिक्षा संजय कांबळे, शौरी विकास डंभारे, शिवाणी गणेश वल्लपवार, शरयु प्रविण चौधरी, सुबोध राजेश मुनेश्वर,  अनिकेत सुभाष निकम, अजिंक्य दत्ताजी पांढरमिसे, प्रतिक श्रिराम कनाके या आठ विद्याथ्र्यांना ईयत्ता बारावी पर्यंत दरमहा पाचशे रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्याथ्र्यांना संस्थेचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव अ‍ॅड. अनिरूद्ध लोणकर, मुख्याध्यापक बाबा भोंग, उपमुख्याध्यापक पुरूषोत्तम बोभाटे, पर्यवेक्षीका कुसूम महाकाळकर, देविदास टोंगे, जी.आर.सिंहे, एस.जी.राठोड, दिपक सपकाळ, महेश वाघाडे, डी.के.मस्के, मनोज बुरांडे, संदीप नखाते, अनुप मानकर, फिरोज पठाण, प्रशांत उगले, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

Saturday, 9 February 2013

मुलाखत व परिक्षा विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा


स्थानिक शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालय घाटंजी व विद्यार्थी कल्याण विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने लेखी परिक्षा व मुलाखत या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन बा.दे.पारवेकर महाविद्यालय पारवा चे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे सचिव अ‍ॅड. अनिरूद्ध लोणकर होते. संस्थेचे संचालक आर.यु.गिरी, आलिया शहेजाद, प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद, प्रा.ए.के.पत्की, प्रा.आर.जी.डंभारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आजच्या या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल स्पर्धा परिक्षेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी लागणा-या तयारीची मार्गदर्शक शिदोरी प्रा.नितिन सिंघवी यांनी विद्यार्थ्यांना
 दिली. हताश न होता सातत्याने विद्यार्थ्यांनी आपल्या सकारात्मक विचाराने स्वत:ची ओळख जगासमोर ठेवावी असे मार्गदर्शनपर उद्गार प्रा.सी.पी.वानखडे यांनी आपल्या द्वितीय सत्रातील व्याख्यानात काढले. मुलाखतीस जाताना न घाबरता संधी काबिज करण्याचा सल्ला प्रा.आर.व्ही.राठोड यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन सिमा कश्यप हिने तर आभार प्रदर्शन प्रा.व्हि.एस.जगताप यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता प्रा.डॉ.प्रदिप राऊत, प्रा.टी.एम.कोटक, प्रा.डॉ.एन.एस.धारकर, प्रा.एम.एच.ढाले, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.जी.सी.भगत, प्रा.यु.एस.माहुरे, प्रा.ए.पी.भगत, प्रा.एन.एन.तिरमनवार, प्रा.जे.पी.मोरे, प्रा.के.आर.किर्दक, छात्रसंघ सचिव गौरव गावंडे, कर्मचारी दिनेश खांडरे, लक्ष्मण बोरकर यांचेसह संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 6 February 2013

गिलानी महाविद्यालयाच्या खेळाडूंना सुवर्णपदक



येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशांत मस्के व सौरभ माकडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली होती. आनंद गुजरात येथे झालेल्या क्रिडा स्पर्धा तसेच नागपुर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधीत्व करून त्यानी सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी करून त्यानी महाविद्यालय व घाटंजी तालुक्याचा लौकीक वाढविला याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद यांच्या हस्ते या खेळाडुंचा गौरव करण्यात आला. त्याना शारिरीक शिक्षक प्रा.आर.एम.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वुंदाने खेळाडूंचे कौतूक केले आहे.
साभार :- देशोन्नती 


Tuesday, 29 January 2013

गिलानी महाविद्यालयाच्या रा.से.यो.शिबिरातून ‘बेटी बचाओ’ चा संदेश














शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर दत्तकग्राम मुरली येथे संपन्न झाले. या शिबिरांतर्गत अनेक सामाजीक उपक्रमांसोबतच बेटी बचाओ अभियान प्रामुख्याने राबविण्यात आले. रा.से.यो.स्वयंसेवकांनी गावातून रॅली काढुन मुलगी वाचवा देश वाचवा हा संदेश दिला. या सात दिवशीय विशेष शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी यांचे हस्ते झाले. यावेळी मुरलीच्या सरपंच दिपमाला निकम, सुरेश चौधरी, प्रा.प्रकाश निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरा दरम्यान बौद्धीक, उद्बोधनपर, सामाजीक व मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात आले होते. बौद्धीक सत्रात कृषी अधिकारी आर.डी.पिंपरखेडे, प्रा.डॉ.पी.आर.राऊत, प्रा.आर.सी.वानखडे, प्रा.आर.व्ही.राठोड, अड.एम.आर.शुक्ला, महेश पवार यांनी कृषी विषयक, अंधश्रद्धा आणी भ्रष्टाचार निर्मुलन, व्यक्तीमत्व विकास, पर्यावरण जनजागृती, रक्तदान - सर्वश्रेष्ठ दान या विषयावर मार्गदर्शक व्याख्याने आयोजीत करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गितगायन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात आले. स्त्री भ्रुणहत्या थांबविण्यासाठी पथनाट्य, स्त्री पुरूष समानता या विषयावर सर्वेक्षण तसेच व्यसनमुक्ती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले.
या शिबिराला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रा.से.यो.समन्वयक डॉ.श्रिकांत पाटील, जिल्हा समन्वयक डॉ.अजय लाड, क्षेत्रीय समन्वयक प्रा.आर.व्ही.राठोड, शि.प्र.मं.चे सचिव अड. अनिरूद्ध लोणकर, उपाध्यक्ष संजय गढीया या मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. या शिबिरात स्व.प्रा.व्हि.जी.हटवारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरात रा.से.यो.स्वयंसेवक तसेच गावातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. समारोपीय कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद, श्रीमती पुष्पा हटवारे, केतन हटवारे, सी.बी.ढोणे, राजु साठे, राजु निकम, श्री.टोंगे यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेकरीता प्रा.ए.के.पत्की, प्रा.आर.जी.डंभारे, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.सी.पी.वानखडे, प्रा.आर.एम.पवार, प्रा.वाय.एस.माहुरे, प्रा.जी.सी.भगत, प्रा.सी.आर.कासार, डॉ.निनाद धारकर, डॉ.एम.एच.ढाले, प्रा.एस.पी.डोमळे, प्रा.टी.एम.कोटक, प्रा.जे.पि.मोरे, प्रा.के.आर.किर्दक, प्रा.एन.एन.तिरमनवार, कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.एस.जगताप, छात्रसंघ सचिव तथा विद्यापीठ प्रतिनिधी गौरव गावंडे, कर्मचारी सुभाष कनाके, मंदार भुसारी यांचेसह सर्व रा.से.यो.स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

Monday, 14 January 2013

माहितीचा अधिकार हे लोकशाहीतील सर्वात मोठे शस्त्र

न्यायमुर्ती गिलानी यांचे प्रतिपादन
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी साधला दिलखुलास संवाद

माहितीचा अधिकार हे लोकशाहीतील सर्वात मोठे शस्त्र असुन या माध्यमातून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता राहते. जनतेने त्याचा योग्य उपयोग करावा. या अधिकाराचा दुरूपयोग होणे ही चुकीची गोष्ट आहे. ज्यांनी आपल्या कामात कसुर केला नाही त्यांना दुरूपयोगाची चिंता नसावी असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांनी केले. येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्रुद्दीनभाई गिलानी, नगराध्यक्ष किशोर दावडा, माजी प्राचार्य वाघ, अलिया शहेजाद यांची उपस्थिती होती. घाटंजी येथे न्यायालयाच्या उद्घाटनासाठी न्यायमुर्ती आले असता आज त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्यांनी सविस्तरपणे उत्तर देऊन विद्यार्थ्यांना विवीध विषयांवर मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना न्यायमुर्ती म्हणाले की, आजच्या काळातील साधु संत पंचतारांकीत झालेत. ज्या साई बाबांनी आयुष्यभर फाटके कपडे घालुन मानवतेची सेवा केली त्यांना पैशाचा माज चढलेले लोक सोन्याने मढविण्यासाठी निघालेत. त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? याचा विचारही समाजाने केला पाहिजे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, देशात सद्यस्थितीत सुमारे अडीच कोटी खटले प्रलंबीत आहेत. सर्वच खटल्यांच्या निकालासाठी वेळ लागत नाही. न्यायाधिशांची कमतरता व कायद्यातील क्लिष्टतेसोबतच अनेक कारणे अशी आहेत ज्यामुळे प्रक्रीयेला विलंब होतो. एका विद्यार्थीनीने मुलींच्या पोषाखाबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, कोणी काय घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र समाजात जे शोभुन दिसते ते केल्यास अधिक श्रेयस्कर ठरते. खाप पंचायती सारख्या समांतर व्यवस्थेला कोणताही आधार व अधिकार नाही. त्यांचा आदेश पाळणारे लोक आहेत म्हणुनच त्यांचे अस्तित्व आहे असे ते म्हणाले. एका विद्यार्थ्यांने मुला मुलींना संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे कौतूक करून हे बदलत्या विचारधारेचे उदाहरण असल्याचे म्हटले.  जनतेला आणखी मुलभूत अधिकार कोणता हवा हे जनतेनेच सुचवावे. न्यायालय समाजभावनेचा प्रकर्षाने विचार करते. न्यायक्षेत्रात विद्यार्थ्यांना करीयर करण्याचा अनेक संधी आहेत. ईतर क्षेत्रांप्रमाणेच याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न मनमोकळेपणाने न्यायमुर्तींना विचारले. त्यांनीही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्रसंघ सचिव गौरव गावंडे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन श्रीमती तिरमनवार यांनी केले.
साभार :- देशोन्नती 

Monday, 31 December 2012

राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेत शि.प्र.मं.कन्या शाळेच्या विद्यार्थीनींची बाजी



येथिल शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालीत शि.प्र.मं.कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी यवतमाळ येथे झालेल्या ३१ व्या राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेत सबज्युनियर व ज्युनियर गटात क्रमश: प्रथम व द्वितीय स्थान पटकावले. 
शाळेच्या विद्यार्थीनी अनुराधा र.निवल, मंजुषा सु.वखरे, रजनी प्र.वातीले, मयुरी प्र.वातीले, निकिता सु.गावंडे, काजल उ.राठोड, यांनी आपल्या संघाकडून खेळतांना उत्कृष्ट प्रदर्शन केले व वैय्यक्तीक खेळाच्या जोरावर आपल्या संघाला प्रथम व द्वितीय स्थान मिळवुन देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
यवतमाळ जिल्ह्याला सबज्युनियर गटात प्रथम तर ज्युनियर गटात द्वितीय स्थान मिळाले. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष संजय गढीया, अ‍ॅड.अनिरूद्ध लोणकर, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, मुख्याध्यापीका संध्या कासलिकर, पर्यवेक्षक द.तु.जमदापुरे यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदाने या विद्यार्थीनींचे कौतुक केले आहे. या सर्व विद्यार्थीनींना शाळेच्या शारिरीक शिक्षण मार्गदर्शक शिक्षीका कु. केकापुरे व सहाय्यक शिक्षक अतुल ठाकरे यांचे मार्गदर्शन मिळाले.
साभार :- देशोन्नती 

Friday, 28 December 2012

राष्ट्रीय टि.२० सामन्यांसाठी ४ खेळाडूंची निवड



कुरूक्षेत्र (हरियाणा) येथे दि.२५, २६ व २७ डिसेंबरला होणा-या राष्ट्रीय टि.२० क्रिकेट सामन्यांसाठी घाटंजी तालुक्यातील २ विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील ४ खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये शि.प्र.मं.विद्यालयाचा विद्यार्थी प्रणित घुगरे, समर्थ विद्यालयाचा राहुल राठोड, शिवछत्रपती विद्यालय पाटणबोरीचा अक्षय तोटावार, सावित्रीबाई फुले विद्यालय आर्णीचा रवि राठोड हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या चमुत आहेत. नुकतेच ते कुरूक्षेत्र येथे रवाना झाले. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय धावपटू राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 31 December 2011

प्रा.प्रदीप राऊत आचार्य पदवीने सन्मानीत

संशोधनातील निष्कर्ष देणार युनो व मानवाधिकार आयोगाकडे
शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.प्रदीप रामकृष्ण राऊत यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतेच आचार्य पदवीने सन्मानीत केले आहे. मराठी विषयाकरिता प्रदान करण्यात आलेल्या त्यांच्या पदवी प्रबंधनाचा विषय ‘साठोत्तर मराठी कादंबरीतील ठळक व्यक्तीरेखांच्या मनोवृत्ती व भुमिकांचा चिकित्सक अभ्यास' हा आहे. १ हजार ७७३ पानांचा हा द्विखंडातील संशोधन प्रबंध महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रबंध ठरला आहे हे विषेश. यासाठी त्यांना कला वाणिज्य महाविद्यालय यवतमाळचे प्राचार्य डॉ.रा.गो.चवरे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्रातील सामाजीक वास्तवाचे भीषण रूप दर्शविणा-या सामाजीक, दलित, ग्रामीण, प्रादेशीक, राजकीय व मार्क्सवादी अशा ७५ कादंब-या व १५० संदर्भ ग्रंथांच्या चिकित्सक अभ्यासाने सुमारे साडेपाच वर्षानंतर हा प्रबंध पुर्णत्वाकडे गेला. सदर प्रबंधात २५० पेक्षा अधिक निष्कर्ष काढले असुन पुस्तिकेच्या स्वरूपात ते महाराष्ट्र शासन, नियोजन आयोग, स्वयंसेवी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठविण्याचा आपला मानस प्रा.राऊत यांनी व्यक्त केला. प्रा.राऊत यांचे याच विषयानुषंगाने आजवर ४ रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले असुन गॅट व डंकेल कराराची अंमलबजावणी व त्याच्या भयावह परिणामानंतर मराठी कादंबरीच्या माध्यमातुन मांडण्यात आलेले त्याचे भिषण परिणाम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी नुकताच त्यांनी 'जागतिकीकरणाने प्रभावित मराठी कादंबरीतील पात्रमुखी विचारधारा' या विषयावरील मेजर रिसर्च प्रोजेक्ट विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ६ लाख रूपयांच्या संशोधन अनुदानाकरीता पाठविला आहे. या संशोधनामुळे राज्याच्या हितासाठी विद्यापीठामार्फत संयुक्त राष्ट्रसंघ व जागतीक बँकेकडे अनेक शिफारसी करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा.राऊत यांचे ‘गर्भार लोकशाही’ व ‘स्वातंत्र्याच्या शोधात’  हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. 
त्यांच्या या संशोधनातील यशासाठी संस्थेचे अध्यक्ष सदरूद्दीन गिलानी, उपाध्यक्ष संजय गढीया, सचिव अनिरूद्ध लोणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहजाद, माजी प्राचार्य के.एम.वाघ यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कर्मचा-यांनी कौतुक केले आहे.

Wednesday, 28 December 2011

गिलानी महाविद्यालयाच्या रा.से.यो. शिबिराने दिला स्वच्छतेचा मुलमंत्र











स्थानिक शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीर नुकतेच दत्तकग्राम मुरली येथे संपन्न झाले.
या शिबीरात रा.से.यो.स्वयंसेवकांनी विवीध सामाजीक समस्या, स्वच्छता, आरोग्य यासह अनेक बाबतीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रबोधन केले. शिबीराचे उद्घाटन शि.प्र.मं.चे उपाध्यक्ष संजय गढीया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद होते. यावेळी संस्थेचे सचिव अनिरूद्ध लोणकर, जिल्हा समन्वयक डॉ.अजय लाड, आर.यु.गिरी, मुरली ग्रा.पं.सरपंच दिपमाला निकम, मुख्याध्यापीका सी.बी.ढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबीरादरम्यान ग्रामस्वच्छता, आरोग्य तपासणी व औषध वाटप, महिला सक्षमीकरण उपक्रम, गाजरगवत व बेशरम निर्मुलन, एड्स जनजागृती अभियान, हागणदारीमुक्त ग्राम अभियान राबवीण्यात आले. तसेच याबाबतचे महत्व गावक-यांना पटवुन देण्यात आले. याशिवाय दररोज घेण्यात आलेल्या बौद्धीक सत्रात स्त्री भृणहत्या, आरोग्य व योगसाधना, बदलत्या समाजव्यवस्थेत युवकांची भुमिका, वेध भविष्याचा, रक्तदानाची गरज, आपत्ती व्यवस्थापन व युवकांची भुमिका, जागतीकीकरण व भारत, आजचा युवक-अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती, शेतीची दिशा व दशा अशा विवीधांगी विषयांवर डॉ.एम.आर.शुक्ला, डॉ.दिपक राठोड, प्रा.गोविंद तिरमनवार, प्रा.सि.पी.वानखडे, प्रा.डॉ.सागर दखणे पुणे, प्रा.नरेश महाजन, प्रा.योगेश उगले, प्रा.प्रदिप राऊत, प्रा.आर.व्ही राठोड, प्रा.यु.ए.ठाकरे या मान्यवरांनी शिबीराथ्र्यांचे मार्गदर्शन केले. लॉयन्स क्लबच्या तालुका अध्यक्षा साधना ठाकरे यांनी मी स्त्री भृण बोलतेय या विषयावर एकांकीका सादर केली. आरोग्य तपासणी शिबीरात डॉ.भरत राठोड व डॉ.वैश्य यांनी रूग्णांची तपासणी केली. या सात दिवशीय शिबीरादरम्यान जिल्हा समन्वयक डॉ.अजय लाड, सल्लागार समिती सदस्य डॉ.पवन मांडवकर, क्षेत्रीय समन्वयक डॉ.नरेश महाजन यांनी सदिच्छा भेटी देऊन रा.से.यो.स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
या विषेश शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा.व्ही.एस.जगताप, प्रा.ए.पी.भगत, डॉ.सी.आर.कासार, डॉ.निनाद धारकर, प्रा.टी.एम.कोटक, प्रा.एम.एच.ढाले, प्रा.एस.पी.डोमळे, प्रा.कु.जे.पी.मोरे, प्रा.कु.के.आर.किर्दक, प्रा.ए.के.पत्की, प्रा.आर.जी डंभारे, प्रा.हितेश शुक्ला, प्रा.युवराज माहुरे, प्रा.यु.पी.वैश्य, प्रा.एम.एच जैन, प्रा.राहुल वानखडे, सुभाष कनाके, मंदार भुसारी, प्रा.पी.एच निकम, राजु निकम, सुभाष निकम, सुरेश चौधरी, प्रा.टोंगे, श्री.गोल्हर, श्री.डंभारे, यांचेसह मुरली येथिल ग्रामस्थ व गिलानी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे योगदान मिळाले.