Pages

Friday 2 August 2013

पाऊस पडताच घाटंजीत वाहते गटारगंगा !

नगर परिषद व पंचायत समितीतही पाणीच पाणी
अनेक भागातील नागरिकांचा जीव धोक्यात





नगर परिषद व तहसिल कार्यालयाच्या तुघलकी कारभारामुळे पाऊस पडताच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचुन सर्वत्र तलावाचे स्वरूप येते. पांढुर्णा रोड, आंबेडकर वार्ड, आनंद नगर, घाटी यासह अनेक भागातील नागरिकांना पाऊस येताच घर सोडून उंच ठिकाणी जावे लागते. बेशरमाच्या झाडांनी लुप्त झालेले नाले, पाणी वाहुन जाण्यासाठी नसलेली व्यवस्था, कच-याने तुंबलेल्या नाल्या यामुळे पाऊस येताच सर्वत्र पाणी साचते. शहरातील रहिवाशी भागच नव्हे तर पाण्याच्या निच-याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषद कार्यालय परिसरालाही तलावाचे स्वरूप येते. अशीच परिस्थिती पंचायत समिती कार्यालयाचीही आहे. 
पांढुर्णा रोडवरील सरस्वती नगरातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी तहसिल व न.प.ला दिली होती. या ले आऊट मध्ये नाल्या नाहीत. या भागातून जो नाला वाहतो त्याचे पाणी थेट ले आऊट मधील घरांमध्ये घुसते. येथिल रहिवाशांनी अनेकदा प्रशासनाकडे याबाबत तक्रारी केल्या. तहसिलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पं.स.सभापती या सर्वांनी येऊन पाहणी केली. मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. दि.३ जुलै रोजी ले आऊटधारक दिपक बळीराम बेलोरकर यांनी तहसिलदारांसमक्ष नाल्याची २४ तासात व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. संदिप नार्लावार यांच्याबाबतही नागरिकांची अशीच तक्रार आहे. पांढुर्णा रोड, वसंत नगर व शहरातील ईतर भागात असलेले मोठे नाले बेशरम व गाजगवताने बुजलेले आहेत. वर्षानुवर्षे त्याची सफाई झालेली नाही. त्यामुळे या सफाईचा निधी कोणाच्या घशात गेला असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष गजानन भालेकर यांनी उपस्थित केला. सरस्वतीनगरासह शहरातील समस्या तातडीने न सोडविल्यास आंदोलन करण्याच्या ईशारा मनसेचे विनायक परचाके, गजानन ठाकरे, सागर मोहुर्ले, अनिल जाधव, आनंद पंधरे, राजु गावंडे, संदिप झाडे, राहुल धुर्वे, राजु ठाकरे, नितेश डोनारकर, संदिप राऊत, शिवराज्य चे जिल्हाध्यक्ष पवन परडखे, प्रशांत ठाकरे यांचेसह या परिसरातील रहिवासी प्रविण ठाकरे, वैâलास बगमारे, संदिप आत्राम, आकाश  बांगरे, विलास बगमारे, आसीफ शेख यांनी दिला आहे.

आमच्या जीवाची जबाबदारी प्रशासनावरच
आम्ही वारंवार तक्रारी करूनही न.प.व तहसिल प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याने जीवीतहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील अशी प्रतिक्रीया या भागातील नागरिकांनी दै.सकाळ जवळ व्यक्त केली.

रस्त्यांवर डबक्यांचे साम्राज्य
घाटंजीच्या मुख्य रस्त्याला डबक्यांनी व्यापले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी साचुन असल्याने अनेक वाहनधारक यामध्ये पडून जखमी होतात. मात्र नगर परिषदेला ते बुजविण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत कोणी न.प.मध्ये तक्रार घेऊन गेले तर त्यांना सांभाळून वाहने चालविण्याचा सल्ला देण्यात येतो.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:

Post a Comment