![]() |
संग्रहीत छायाचित्र |
सध्या निलंबीत असलेल्या ठाणेदार बाबुराव खंदारे यांच्या काळात तर अवैध व्यावयायीकांची चांगलीच चांदी सुरू होती. त्यांच्या निलंबनानंतर सुमारे महिनाभर सुधाकर अंभोरे यांच्याकडे ठाणेदार पदाचा प्रभार होता. अवघ्या एका महिन्याच्या कार्यकाळातच त्यांनी अवैध वाहतुकीसह मटका व अवैध दारू चा व्यवसाय करणा-यांना वठणीवर आणले होते.
अवैध वाहतुक करणा-या सुमारे ३० वाहनानांवर त्यांनी कारवाई केली होती. तसेच चोरांबा येथे खुलेआमपणे चालणा-या कोंबडबाजारावरही त्यांनी छापा मारून ठोस कारवाई केली होती. त्यांच्या या धडक मोहिमेचा धसका अवैध व्यावसायीकांनी घेतला होता. मात्र लवकरच त्यांची येथुन बदली करून ठाणेदारपदाचा प्रभार सध्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांचेकडे देण्यात आला आहे. तेव्हापासुन अवैध व्यवसायीकांसाठी मोकळे रान झाले आहे. शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या कन्या शाळांच्या परिसराला लागुनच मटका व अवैध दारू चा व्यवसाय खुलेआम केल्या जातो. सर्वसामान्य नागरीक तसेच विद्यार्थ्यांनाही सहज नजरेस पडणारी ही गोष्ट पोलीसांना का दिसत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे अवैध व्यावसायीकांना संरक्षण देणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment