Pages

Showing posts with label मटका. Show all posts
Showing posts with label मटका. Show all posts

Saturday, 18 August 2012

घाटंजीत मटका अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा



पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर बिनधास्तपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक एस.पी.पवार यांच्या पथकाने काल (दि.१६) ला  दुपारी ३.२० वाजता छापा मारला. महाराष्ट्र बँकेसमोर असलेल्या मोकळ्या जागेत खुले आमपणे हा मटका अड्डा सुरू होता. या धाडीत राजेंद्र रामदयाळ अग्रहरी, सुरेश रामभाऊ हटवार, मोहन बापुराव शिवणकर, प्रशांत लक्ष्मण धोटे रा.घाटंजी या आरोपींना पोलीसांनी अटक केली. त्यांचे जवळून वरळी मटक्याचे साहित्य व ७ हजार ७५० रू.रोख जप्त करण्यात आली. 
हा छापा दुपाराच्या सुमारास टाकण्यात आला. यावेळी अशा अड्ड्यावर हजारो रूपये जमा असतात. मात्र पोलीसांच्या या छाप्यात केवळ साडेसात हजारच रूपये कसे जप्त झाले याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
घाटंजी येथे वर्दळीच्या परिसरात व पोलीस स्टेशनच्या आजुबाजूला खुले आमपणे मटका अड्डे सुरू असतात. घाटंजी पोलीस मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असतात. या धाडीमुळे घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साभार :- देशोन्नती  


Thursday, 17 May 2012

घाटंजी तालुक्यातील जुगार व मटका अड्ड्यांवर विशेष पथकाच्या धाडी

२० जणांना अटक; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
घाटंजी, पारवा ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
येथिल पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन मटका अड्ड्यांवर विशेष पोलीस पथकाने धाड मारून तब्बल १२ आरोपींना अटक केली. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक रूपाली दरेकर व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सारंग नवलकर  यांच्या पथकाने काल रात्री ही कार्यवाही केली.
या कार्यवाहीमध्ये १६ हजार ६८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी मोहन बापुराव शिवणकर (४०), विश्वनाथ विष्णुजी रामटेके (६२), मारूती रोडबाजी पारधी (३६), रमेश काशीराम ठाकरे (५५), प्रशांत लक्ष्मण धोटे (५०), सुदाम शंकर वाडे (५०), विनायक माधव प्रसन्नकर, प्रताप प्रभाकर डंभारे (३५), राम किसन पेटेवार (२६), राजु विलास गावंडे (२०), सुधाकर शामराव कांबळे (३२), राहुल वसंत लढे (३५) यांना अटक करण्यात आली. तर मटका अड्डा चालविणारा सतिष यल्लरवार हा फरार आहे.
यापुर्वी दि.१४ ला पारवा येथे जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने धाड मारून ४७ हजार रूपयांच्या मुद्देमालासह ८ जणांना ताब्यात घेतले. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक दत्ता नलावडे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यामध्ये जुगार अड्डा चालविणारा शेख आसिफ शेख चांद (२१) याचेसह शेख असलम शेख रेहमान (१९), उत्तम बापुराव तायडे (६२), राजु गंगाधर धवने (२८), मन्सुर अली अकबर अली लालानी (५८), आकाश रामराव मोहिते (२०), सुनिल डोमाजी शेंडे (३५) यांना अटक करण्यात आली. या दोन्ही कार्यवाहीमध्ये स.पो.नि.सारंग नवलकर, जमादार नरेंद्र मानकर, कैलास देवकर, विशाल भगत, सचिन आडे, भोजराज करपते, नितिन वास्टर, प्रमोद इंगोले, विवेक पेठे, प्रमोद मडावी,मयुरी मांगुळकर यांनी सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने घाटंजी तालुक्यात राबविलेल्या धाडसत्रामुळे घाटंजी व पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्व अवैध व्यवसाय पुर्णपणे बंद करण्याच्या जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाला कवडीचीही विंâमत न देता घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वंजारे यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना जणु संरक्षणच दिले आहे. पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये खुले आमपणे अवैध दारू विकल्या जाते. वाहतुकीची बेशिस्त तर अंगावर काटा आणणारी आहे. घाटंजी शहरात मुख्य बाजारपेठेच्या परिसरात खुलेआमपणे मटका अड्डे चालविल्या जातात. उल्लेखनिय म्हणजे नेहमी महाराष्ट्र बँक परिसरातील मटका अड्ड्यांवरच धाड पडते. मात्र कन्या शाळेच्या मागे, संत मारोती महाराज मंदीर परिसर, मटन मार्केट यासह विवीध भागात असलेल्या मटका अड्ड्यांवर कधी कार्यवाही होतांना दिसत नाही. महाराष्ट्र बँकेच्या परिसरात महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय आहे. बँक व या कार्यालयात महिलांची नेहमीच ये जा असते. मात्र मटका लावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या परिसरात भटकत असल्याने महिलावर्गाची प्रचंड कुचंबना होते. तर कन्या शाळेच्या मागील भागातही मटकाबहाद्दरांची वदळ राहत असल्याने प्रसंगी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात चालणारे काही प्रमुख मटका व जुगार अड्डे राजकारणी व्यक्ती चालवित असल्याने पोलीस विभागाची त्याकडे मेहेरनजर असते असा नागरिकांचा आरोप आहे.
विशेष पथकाच्या कार्यवाही नंतर एक दोन दिवस हे व्यवसाय बंद राहतील व त्यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती होईल. त्यामुळे अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलीसांच्या मुसक्या आवळण्याची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


Wednesday, 4 January 2012

घाटंजीतील मटका अड्ड्यांवर एस.पीं.च्या विशेष पथकाचा छापा

संग्रहीत छायाचित्र
शहरातील विवीध भागात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गठित केलेल्या विशेष पथकाने आज दुपारी एक वाजताच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत तब्बल ९ आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.  एस.पीं.चे विशेष पथक आज शहरात येणार याची ‘खबर’ घाटंजी पोलीसांना मिळाली होती अशी माहिती आहे. त्यामुळे घाटंजी पोलीसांनी एका मटका अड्ड्यावर सुरूवातीस छापा मारला. अवघ्या अर्ध्या तासातच विशेष पथकाने येऊन तब्बल तिन मटका अड्ड्यांवर छापे मारले. या संपुर्ण कार्यवाहीत रोख, मोबाईल असा सुमारे २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे कळु शकली नाही. या कारवाईमुळे घाटंजी पोलीस स्टेशनच्या प्रभारी ठाणेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या निलंबीत असलेल्या ठाणेदार बाबुराव खंदारे यांच्या काळात तर अवैध व्यावयायीकांची चांगलीच चांदी सुरू होती. त्यांच्या निलंबनानंतर सुमारे महिनाभर सुधाकर अंभोरे यांच्याकडे ठाणेदार पदाचा प्रभार होता. अवघ्या एका महिन्याच्या कार्यकाळातच त्यांनी अवैध वाहतुकीसह मटका व अवैध दारू चा व्यवसाय करणा-यांना वठणीवर आणले होते.
अवैध वाहतुक करणा-या सुमारे ३० वाहनानांवर त्यांनी कारवाई केली होती. तसेच चोरांबा येथे खुलेआमपणे चालणा-या कोंबडबाजारावरही त्यांनी छापा मारून ठोस कारवाई केली होती. त्यांच्या या धडक मोहिमेचा धसका अवैध व्यावसायीकांनी घेतला होता. मात्र लवकरच त्यांची येथुन बदली करून ठाणेदारपदाचा प्रभार सध्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांचेकडे देण्यात आला आहे. तेव्हापासुन अवैध व्यवसायीकांसाठी मोकळे रान झाले आहे. शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या कन्या शाळांच्या परिसराला लागुनच मटका व अवैध दारू चा व्यवसाय खुलेआम केल्या जातो. सर्वसामान्य नागरीक तसेच विद्यार्थ्यांनाही सहज नजरेस पडणारी ही गोष्ट पोलीसांना का दिसत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे अवैध व्यावसायीकांना संरक्षण देणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साभार:- देशोन्नती