Pages

Saturday 16 March 2013

घाटंजीत स्वामी विवेकानंद ‘सार्ध शती’ महोत्सवानिमित्य विवीध कार्यक्रम



स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त घाटंजीत विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयंतीदिनी स्थानिक विद्यार्थ्यांनी रॅली काढुन स्वामी विवेकानंदांना अभिवादन केले. तसेच नुकतेच सुर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शि.प्र.मं.मुलांच्या शाळेतील ३०० विद्यार्थी, शि.प्र.मं.मुलींच्या शाळेतील २५० विद्यार्थीनी, समर्थ विद्यालयाचे २९५ विद्यार्थी, नगर परिषद शाळेतील ४०० विद्यार्थी व श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालय घोटीच्या ३०० विद्यार्थ्यांनी पहाटे सुर्यनमस्कार घालुन या यज्ञात सहभाग घेतला. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती ता.घाटंजीचे सर्व कार्यकर्ते व शाळांमधील शिक्षक, कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.























No comments:

Post a Comment