Pages

Thursday 17 May 2012

कुर्ली येथे हिंदु स्मशानभुमी देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

तालुक्यातील कुर्ली येथे ब-याच कालावधीपासुन हिंदु स्मशानभुमीची गरज असताना प्रशासनाकडून त्यासाठी टाळाटाळ होत आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावासह या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र राजकीय दबावातून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना.नितीन राऊत, सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विभागीय आयुक्त, अमरावती, जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचेसह संबंधीतांकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र एक वर्षाचा कालावधी होऊनही स्मशानभुमीबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही असा सोलंकी यांचा आरोप आहे. मौजा कुर्ली येथे हिंदु समाजाकरीता अनेक वर्षांपासुन स्मशानभुमी नसल्याने ग्रामपंचायतीने रितसर ठराव घेतला. मात्र, कुर्ली येथे पुर्वीपासुनच हिंदु स्मशानभुमी असल्याचे महसुल विभागाच्या फेरफार, हक्क नोंदणीनुसार निष्पन्न झाले आहे. कुर्ली येथे गट क्र. ४/१ मध्ये माजी जि.प.सदस्य जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांच्या शेतजमीनीमध्ये ०.४० आर जागेवर हिंदुंची स्मशानभुमी असतांना तसेच तत्कालीन नायब तहसिलदार पंधरे यांना हिंदु स्मशानभुमीच्या प्रकरणात कोणताही आदेश देण्याचा अधिकार नसतांना त्यांनी ७/१२ उता-यावरील इतर अधिकारात नमुद असलेल्या ०.४० आर हिंदु स्मशानभुमीची जागा प्रकरणात प्रस्तुत ३/कली/क्रमांक/कावि/९५१/२००४, दि.१९/०६/२००४ रोजी आदेश काढुन गट क्र.४/१ जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांच्या ७/१२ उता-यातील इतर अधिकार मधील नोंदी काढुन आदेश पारित केला आहे. जो नियमबाह्य आहे. स्मशानभुमीच्या प्रकरणात कोणताही आदेश रद्द अथवा पारित करण्याचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिका-यांनाच आहे. त्यामुळे या प्रकरणात नायब तहसिलदार पंधरे यांच्यासह संबधीत तलाठीही दोषी असल्याने त्यांच्याविरूद्धही कार्यवाही करावी अशी सोलंकी यांची मागणी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंधरे यांनी काढलेला तो बेकायदेशीर आदेश तहसिल कार्यालयात उपलब्ध नसल्याचे जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार पारवा यांनी माहितीच्या अधिकारान्वये मागीतलेल्या माहितीमध्ये कळविले आहे. एकंदरीतच स्मशानभुमीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट असुन प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. कुर्ली येथे हिंदु स्मशानभुमीची अत्यंत आवश्यकता असतांना शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करून दोषींना पाठीशी घालत असल्याने आता याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोलंकी यांनी सांगीतले.
साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment