Pages

Tuesday 22 May 2012

शेतक-यांच्या बांधावर खत वाटप योजनेचा शुभारंभ


थेट शेतीच्या बांधावर खत वाटप करण्याच्या योजनेचा शुभारंभ राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांचे हस्ते करण्यात आला. येथिल पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातून खताच्या पहिल्या वाहनाला त्यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जि.प.सदस्य देवानंद पवार, योगेश देशमुख, पं.स.सभापती शैलेश इंगोले, उपसभापती सुवर्णा निकोडे, प्रभारी गटविकास अधिकारी अजय राठोड, तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार, कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे यांचेसह पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
थेट शेतक-यांच्या शेताच्या बांधापर्यंत खत पोहचविण्याची ही योजना शेतक-यांच्या फायद्याची असुन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ना.मोघे यांनी यावेळी केले.
गेल्या काही वर्षात खरीप हंगामात खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याने शेतक-यांना खत टंचाईला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे यावर्षीपासुन शासनाने थेट बांधावर खत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खत पुरवठा संनियंत्रण समिती मार्फत खताचा पुरवठा व नियोजन याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांच्या माध्यमातून खताचे वितरण होणार आहे.
या योजनेमुळे शेतक-यांना खताच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही असे पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांनी सांगीतले. 
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment