Pages

Tuesday 8 May 2012

धरणविरोधी संघर्ष समितीने बंद पाडले निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम












निम्न पैनगंगा प्रकल्पाचे (चिमटा धरण) काम  धरणविरोधी संघर्ष समितीने बंद पाडले.  आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वात समितीने हा पवित्रा घेतला. 
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीवर चिमटा धरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दि. ७ मे २०१२ रोजी दिग्रस मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी धरण विरोधी समितीसह निम्न पैनगंगा  प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करून उप अभियंता राजपाल वाणी यांचे कडून सदर प्रकल्पाचे काम बंद करण्याचे लेखी आश्वासन घेतले.
सातबारा खोडताड करणे, बंजर जमिन ओलीताची दाखविणे यासह खोटे कागदपत्रे दाखल करून करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या दै.देशोन्नती मध्ये प्रसिद्ध झाल्यावरून आमदार संजय राठोड आणी धरणविरोधी समितीने हा मुद्दा उचलुन धरला आणी दि. ७ मे रोजी प्रकल्पाच्या ठिकाणी शेकडो बुडीत क्षेत्रातील शेतक-यांसह भर उन्हात दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान दाखल झाले. यावेळी पोलीसांच्या गराड्याने प्रकल्पाच्या आवारात संबंधीतांना जाण्यास मज्जाव केला. त्यांचे म्हणणे ऐकुन घेण्याकरीता शिष्टमंडळास जाण्याची परवानगी दिली. तब्बल तासभर झालेल्या चर्चेदरम्यान उप अभियंता राजपाल वाणी हे पाऊण तास अबोल राहिले. शेवटी एक तासाच्या चर्चेनंतर सदर काम बंद करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले.
यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, श्रीकांत मुनगिनवार, जि.प.सभापती मनमोहनसिंग चव्हाण, माजी न.प.अध्यक्ष रविंद्र अरगडे, शहर प्रमुख दिनेश मेहेंद्रे, न.प.सदस्य बापु देशमुख यांचेसह धरण विरोधी समितीचे प्रल्हाद पाटील जगताप, मुबारक तंवर, गावंडे सर व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच किनवटचे तहसिलदार अविनाश कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोखंडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 


छायाचित्र :- कैलास कोरवते, निलेश जुनगरे


No comments:

Post a Comment