Pages

Tuesday 22 May 2012

नाभिक समाजाच्या समस्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार

घाटंजी येथे महामेळाव्यात ना.मोघेंचे प्रतिपादन

काळाच्या ओघात नाभिक समाज प्रगतीपासुन वंचित राहिला आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाला लढा देण्याची गरज आहे. सर्व मागण्या व समस्या सहज सुटणार नाहीच. त्यासाठी योग्य पाठपुरावा करावा लागेल. नाभिक समाजाच्या मागाण्यांसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असे आश्वासन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांनी दिले. येथिल संत मारोती महाराज सांस्कृतीक भवनात आयोजीत नाभिक समाजाच्या महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रांताध्यक्ष कल्याण तळे होते. प्रमुख अतिथी म्हणुन महामंडळाचे उपाध्यक्ष दामोधर बिडवे, कार्याध्यक्ष पुंडलीक केळझरकर, जि.प.सदस्य देवानंद पवार, योगेश देशमुख, पं.स.सभापती शैलेश इंगोले, उपसभापती सुवर्णा निकोडे, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, नगरसेवक किशोर दावडा, नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय धारकर, राजेश नागतुरे, जिल्हाध्यक्ष संजय मादेशवार, सचिव संतोष मोतेवार, जिल्हा संघटक शशीकांत नक्षणे, श्री.पिस्तुलकर, दिलीप मादेशवार, अरूण ठणेकर यांचेसह घाटंजी पंचायत समितीचे सदस्य, न.प. सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
नाभिक महामंडळाच्या पदाधिका-यांनी समाजाच्या विवीध समस्या व मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या. त्यावर यथोचीत उपाययोजना करण्याचे तसेच नाभिक महामंडळाच्या पदाधिका-यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन ना. मोघे यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पिस्तुलकर यांनी केले. तर संचालन व आभारप्रदर्शन प्रदिप गड्डमवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक महामंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाराव लिंगणवार, शहराध्यक्ष अमोल मोतेलवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या महामेळाव्याला मोठ्या प्रमाणात समाजबांधवांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment