Pages

Tuesday 29 January 2013

पांदण रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणा-यांवर कार्यवाही करा


कुर्ली ग्रामवासियांची मागणी

कुर्ली ते सायफळ पांदण रस्त्याच्या काम बंद करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणा-यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांचे नेतृत्वात कुर्ली ग्रामवासियांनी घाटंजी तहसिलदारांना दिले. तसेच हे काम तिन दिवसांच्या आत सुरू करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. कुर्ली ते सायफळ पांदण रस्ता तत्कालीन पालकमंत्री वसंतराव पुरके यांच्या निर्देशावरून २००३ साली मंजुर झाला होता. या रस्त्याचे काम जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत सुरू होते. मात्र अ.रब अ.सईद व ईतर काही लोकांनी रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण करून काम बंद पाडले. उल्लेखनिय म्हणजे गट क्र.११ मधुन तलाठी नकाशा, नझुल नकाशा नुसार कुर्ली ते सायफळ रस्ता असल्याचे स्पष्ट आहे. मात्र सदर व्यक्ती रस्त्याचे काम बंद पाडून शेतकरी व कंत्राटदारांना धमक्या देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. तिन दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा ईशारा देण्यात आला आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment