Pages

Showing posts with label पालकमंत्री. Show all posts
Showing posts with label पालकमंत्री. Show all posts

Tuesday, 29 January 2013

पांदण रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणा-यांवर कार्यवाही करा


कुर्ली ग्रामवासियांची मागणी

कुर्ली ते सायफळ पांदण रस्त्याच्या काम बंद करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणा-यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांचे नेतृत्वात कुर्ली ग्रामवासियांनी घाटंजी तहसिलदारांना दिले. तसेच हे काम तिन दिवसांच्या आत सुरू करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. कुर्ली ते सायफळ पांदण रस्ता तत्कालीन पालकमंत्री वसंतराव पुरके यांच्या निर्देशावरून २००३ साली मंजुर झाला होता. या रस्त्याचे काम जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत सुरू होते. मात्र अ.रब अ.सईद व ईतर काही लोकांनी रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण करून काम बंद पाडले. उल्लेखनिय म्हणजे गट क्र.११ मधुन तलाठी नकाशा, नझुल नकाशा नुसार कुर्ली ते सायफळ रस्ता असल्याचे स्पष्ट आहे. मात्र सदर व्यक्ती रस्त्याचे काम बंद पाडून शेतकरी व कंत्राटदारांना धमक्या देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. तिन दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा ईशारा देण्यात आला आहे.
साभार :- देशोन्नती 

Monday, 10 September 2012

सा.बां.विभागाच्या सदोष सर्वेक्षणामुळे पुरग्रस्त मदतीपासुन वंचीत



जुलै महिन्यात आलेल्या पुरानंतर पडझड झालेल्या घरांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदोष सर्वेक्षण केल्याने सुमारे ४१ कुटूंबे मदतीपासुन वंचीत राहणार असल्याची तक्रार कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी केली आहे. महापुरामुळे भयभित झालेल्या ग्रामस्थांनी अंगावरच्या कपड्यावरच बाहेर पडून जीव वाचवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्ह्यातील आमदार मंत्री, खासदार,  आमदार तात्काळ येऊन पाहणी करून गेले. शासनाची मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तलाठी चंदु भोयर यांनी पंचनामे केले. घरांच्या पडझडीचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. मात्र सदोष पद्धतीने मुल्यांकन करण्यात आल्याने सुमारे ४१ कुटूंब पडझड नुकसानापासुन वंचीत राहिले. ही माहिती मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापुर्वी तहसिलदारांना देण्यात आली होती. नुकसान झालेल्या सर्वांना मदत मिळेल असे महसुल विभागामार्पâत सांगण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत मदत मिळालेली नाही. कोळी (बु.) या गावात आपत्तीमुळे झालेली हानी मोठ्या प्रमाणात आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर कुणीही अधिकारी भेट देण्यास आला नाही. एकंदरीतच शासन प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे पुरग्रस्त वा-यावर आहेत. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना दिले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पुरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडणार असल्याचे खरतडे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती