Pages

Sunday 13 January 2013

माझ्या भावाचा अपघात नव्हे तर खुन झालाय

'त्या' घटनेतील मृतकाच्या भावाची एस.पी.कडे तक्रार

यवतमाळ घाटंजी रस्त्याने मुरली शिवाराजवळ अपघात सदृष स्थितीत अफरोजखाँ पठाण यांचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद असतांना पोलीसांनी कोणताही तपास न करता या घटनेला अपघात म्हणुन नोंद केली. त्यामुळे मृतकाचा भाऊ फिरोज शमिउल्लखॉं पठाण रा.पारवा यांनी हा अपघात नसुन पुर्वनियोजीत कट करून खुन करण्यात आल्याचा आरोप जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
इमरानखॉं ताजखाँ पठाण, सलमा अफरोजखॉं पठाण, जावेदखॉं ताजखाँ पठाण, ताजखॉं सरदारखॉं पठाण, जमीलाबी ताजखाँ पठाण तसेच मृतकाचा मामा या कटात समाविष्ट असल्याचेही तक्रारीत नमुद आहे.
दि. ६ जानेवारी रोजी घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना मृतदेह ग्रामिण रूग्णालयात नेल्यावर देण्यात आली. तक्रारकर्त्याने हा अपघात नसुन खुन असल्याबाबतची तक्रार घाटंजी पोलीस स्टेशनला देण्याचा प्रयत्न केला सर्व नातेवाईकांनी हा खुन असल्याचे ठासुन सांगितले. मात्र ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्यांचेवर दबाव टाकुन अपघाताची नोंद केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. 
उल्लेखनिय म्हणजे मृतकाची पत्नी ही सुमारे १० महिन्यांपासुन भांडण करून वेगळी राहात होती. तिने पतीसह ईतर कुटूंबियांविरोधात तक्रारही केली होती. त्यानुसार त्यांचेवर ४९८ अ, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल असुन प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. घटनेच्या सुमारे ३ महिन्यांपुर्वी ईमरानखॉं ताजखाँ पठाण याने फोनवरून मृतकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत मृतक पारवा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला असता तक्रार नोंदविण्यात आली नाही. असा तक्रारीत आरोप आहे. मृतक हा घटनेच्या दिवशी यवतमाळ येथे होता. मग दुसरे दिवशी त्याचे प्रेत मुरली गावाजवळ कसे सापडले? प्रेत रस्त्याच्या एका बाजुला पडलेले होते. दुचाकीची चाबी रस्त्यावर पडली होती. दुचाकीचे केवळ सायलेन्सर व मागील लाईट फुटले होते. मोबाईल घटनास्थळी आढळला नाही. घटनेच्या दिवशी त्यावर कॉल केला असता कोणी उचलत नव्हते. मृतकाच्या कपाळावर ठोसा मारल्याची खुण होती. तसेच अंगावर मारहाण केल्यासारख्या जखमा होत्या. एकंदरीतच सर्व परिस्थिती व कौटूंबीक वादाची पार्श्वभूमी यावरून हा खुन असल्याचा थेट आरोप मृतकाच्या भावाने केला आहे. संबंधीतांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. जर मृतकाच्या कुटूंबीयांचा या घटनेबाबत असा आरोप होता तर घाटंजी पोलीसांनी तेव्हाच यादृष्टीने किमान चौकशी का केली नाही? फिर्यादींना धाकदडप का करण्यात आली? घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये नेहमीच असे प्रकार घडत असतानांही वरिष्ठ का गप्प आहेत असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment