Pages

Wednesday 15 August 2012

कोठारी परिवारातर्फे पुरग्रस्तांना मदतीचा हात


तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. भांबोरा येथिल कोठारी परिवारानेही सामाजीक दायीत्व जपत गरजूंना ब्लँकेट व चादरींचे वाटप केले. भांबोरा ग्रा.पं.चे उपसरपंच निलेश कोठारी यांनी पुरग्रस्तांशी आस्थेने विचारपुस करून त्यांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनेक पुरग्रस्तांनी आपल्या व्यथा त्यांच्यापुढ़े व्यक्त केल्या. दोन वेळचे जेवण व कपड्यांची व्यवस्था दानशुरांच्या मदतीमुळे होत आहे. मात्र कायमस्वरूपी निवासाचा प्रश्न या पुरग्रस्तांपुढे असुन भविष्यात राहायचे कुठे अन शेती खरडून गेल्याने आता पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा असे एक ना अनेक प्रश्न पुरग्रस्तांनी त्यांच्यापुढे मांडले. या समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री यांनी प्रथम प्राधान्याने प्रयत्न करावे असे आवाहन निलेश कोठारी यांनी केले. कोळी, कापसी कोपरी, चिंचोली, कवठा, चांदापुर या गावांमध्ये कोठारी परिवारातर्फे अंथरूण साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी नितिन कोठारी, जितेंद्र कोठारी, रामधन नाईक, श्रावण राठोड, दत्ता पवार, रवि दत्ताणी, मनोज राठोड, अनिल चव्हाण, अविनाश भगत, दिलिप जाधव हे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती  

No comments:

Post a Comment