Pages

Tuesday 18 October 2011

किरकोळ वादातुन नणंद भावजयीची आत्महत्या


तालुक्यातील जरूर येथे घरगुती भांडणातुन नणंद भावजयीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. अर्चना धर्मा सातपुते (वय ३०) व तिची अविवाहीत नणंद सुशिला आनंदराव सातपुते (वय ४५) यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. हा वाद विकोपाला जाऊन दोघींनीही शेवटी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने घाटंजी ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले. मात्र अर्चना सातपुते हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुशिला सातपुते हिला यवतमाळला नेतांना कोळंबी जवळ तिची प्राणज्योत मालवली.

No comments:

Post a Comment