Pages

Sunday 28 August 2011

जनलोकपाल विजयाचा घाटंजीत जल्लोष









गेल्या काही दिवसांपासुन आंदोलनमय झालेल्या घाटंजी शहरात अण्णा हजारेंच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाल्याबद्दल प्रचंड जल्लोष करण्यात आला. येथिल हुतात्मा स्मारकाजवळ सकाळी ११ वाजेपासुन नागरीक एकत्र जमले होते. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास घाटंजी शाखेच्या वतीने हुतात्मा स्मारकाला वंदन करून फटाक्यांच्या आवाजात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौक, दुर्गा माता वार्ड, वसंत नगर येथिल युवकानी ढोल ताशांच्या गजरात शहरातुन विजयी मिरवणुक काढली.
गेल्या आठवडाभरात घाटंजी शहरात अभुतपुर्व आंदोलने झाली. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, कर्मचारी वर्ग यांचेसह सर्वस्तरातील नागरीक या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment