Pages

Thursday, 6 March 2014

घाटंजी तालुक्याच्या मातीतून उमलतोय भावस्पर्शी गझलांचा ‘अंकुर’

‘ओठी तुझ्या असु दे’ : हौशी युवकांनी साकारलाय 
‘गारवा स्टाईल’ गझल अल्बम


हळुवार पार्श्वसंगीत... अर्थपुर्ण शब्दांनी मनाचा ठाव घेणारे निवेदन... अन जणु काही अंत:करणातील भावनाच शब्दरूपाने कानावर पडत असल्याचा भास... तरूणाईला भुरळ पाडणा-या गारवा व सांज गारवा या सारख्या मराठी गित व गझलांच्या अल्बम्स मध्ये हा प्रकार अत्यंत लोकप्रिय झाला. या अल्बम्समधील गिते अनेकांचा काळजात घर करून गेली. असे दर्जेदार अल्बम्स केवळ पुण्या मुंबईकडे व केवळ व्यावसायीक स्तरावरच होऊ शकतात असा आपला समज आहे. मात्र घाटंजी तालुक्यातील काही हौशी युवकांनी हा समज सपशेल खोटा ठरवत ‘ओठी तुझ्या असु दे...’ हा एक अप्रतिम मराठी गझल अल्बम साकारला आहे. या अल्बमचा उद्देश व्यावसायीक नसला तरी त्याचा दर्जा मात्र व्यावसायीक स्तराचा आहे.
व्यवसायाने शिक्षक तसेच निवेदक, वादविवादपटू व कवि असलेले रूपेश कावलकर, नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेला युवा गझलकार पुष्कर राऊत, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून स्वरांची साधना करणारा युवा गायक संतोष मानकर व ट्रॅक्टर चालवुन तबल्यावरही थाप देणारे आकपुरी येथिल रवि एकुनकर या चार युवकांनी आदिवासीबहुल घाटंजी तालुक्याच्या मातीत मराठी गझलेचे ‘बिजारोपण’ केले आहे. मराठी गझलेची व्याप्ती वाढावी, आदिवासी भागातूनही नवे गझलकार पुढे यावे हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन तसेच ग्रामिण भागातूनही एक दर्जेदार कलाकृती निर्माण होऊ शकते याच धेय्याने या युवकांनी हा अल्बम साकारला आहे. या अल्बममध्ये रूपेश कावलकर व पुष्कर राऊत यांच्या एकुण सात गझल असुन प्रत्येक गझलेच्या पुर्वी रूपेश कावलकर यांच्या आवाजात त्यांच्याच कवितांचे निवेदन आहे. तर सर्व गझलांना संगित व स्वर संतोष मानकर यांनी दिला आहे. संगित संयोजन यवतमाळ येथिल संजय व संतोष र्इंगोले यांनी तर ध्वनीमुद्रण सुबोध वाळके यांनी केले आहे.
मराठीत गझल हा काव्यप्रकार हाताळणे वाटते तितके सोपे नाही. मात्र या अल्बममधील प्रत्येक गझल शास्त्रशुद्ध आहे. उल्लेखनिय म्हणजे या गझलकारांनी हा अल्बम व्यावसायीक उद्देशाने पुढे आणला नसुन केवळ उत्पादन खर्च निघेल एवढीच अत्यल्प किंमत ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नुकतेच घाटंजी येथे एका कार्यक्रमात या अल्बममधील काही गझल ध्वनिक्षेपकावरून ऐकविण्यात आल्या तेव्हा अनेक घाटंजीकरांनी या अल्बमचे कौतुक केले. हळव्या गझल अन मनाला स्पर्श करणारे निवेदन ओठी तुझ्या असु दे या मराठी गझल अल्बम मध्ये प्रेम, व्याकुळता, विरह, आनंद यासह विवीधांगी भावनांना स्पर्श करणा-या शब्दांची गुंफण आहे. या हळव्या शब्दांना रूपेश कावलकर यांच्या रेशमी आवाजाने चांगलाच रंग चढविला आहे.
‘‘काट्यां शिवाय गुलाबाचही प्रेम कधीच फुलत नाही,
अन त्यांना प्रेम काय कळणार ज्यांना काटा सलत नाही.’’
अल्बममधील पहिल्या गझलेच्या सुरूवातीला असलेल्या कवितेमधील या ओळींमध्ये प्रेमाचा असा मार्मिक अर्थ सांगितला आहे.
तर
‘‘भिजल्या तुझ्या रूपाला, तु सावरून घे ना !
पाण्यात आग मोठी, लागेल पावसाने !! ’’
गझलेतील हा शेर प्रेयसीचे सौंदर्यवर्णन करून जातो.
‘‘ओठी तुझ्या असु दे, बदनाम नाव माझे !
होता कधी सुगीचा हंगाम नाव माझे !! ’’
या गझलेतील शब्दांना संतोष मानकर यांनी अप्रतिम स्वरसाज दिला आहे.
‘‘शेवटी, लांडगा जरी साधू असला
तरी त्याचा भरवसा ठेऊ नये.
अन कसायाच्या हाती कधी
काळीज आपलं देऊ नये ! ’’
या कवितेचे शब्द खुप काही शिकवुन जातात. पुष्कर राऊतने लिहिलेली,
‘‘वेदनांचे गीत माझी आसवे गाणार आहे,
साथ मोलाची तुझे ते नयनही देणार आहे.
एकदा ये सांजवेळी राधीका होऊन माझी
मी पहाटे गोकुळाला सोडुनी जाणार आहे !!’’
हि गझल प्रेमातील व्याकुळता सांगते.
आणी
‘‘जन्माला येणारा प्रत्येक माणुस,
जगात कायमचा रहात नाही.
तरिही माणसं माणसाकडे
माणसासारखी पाहत नाही. ’’

हे रूपेश कावलकरचे शब्द समाजातील वास्तविकता पुढे आणतात
साभार : सकाळ 
By : अमोल राऊत

या अल्बम विषयी अधिक माहितीसाठी खालील Page Like करा 

Thursday, 20 February 2014

यशस्वी होण्यासाठी शिवरायांसारखी धेय्यनिष्ठा ठेवा - अमितकुमार राठोड

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कार्यप्रती समर्पण आणी आवड गरजेची असते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात चांगले आदर्श डोळ्यापुढे ठेऊन कार्य केले. जर प्रत्येकाने शिवरायांसारखी धेय्यनिष्ठा ठेऊन काम केले तर यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन आय.पी.एस.अमितकुमार राठोड यांनी केले. घाटंजी येथे शिवजयंती उत्सवात वीर राजे संभाजी पुरस्कार स्विकारल्या नंतर ते सत्काराला उत्तर देत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे होते. प्रसिद्ध वक्ते प्रा.श्याम मानव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, नगराध्यक्ष राम खांडरे, तहसिलदार एम.एम.जोरवर, ईकलाख खान, शैलेश र्इंगोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
युवकांना प्रेरणादायी असलेल्या भाषणात अमितकुमार राठोड पुढे म्हणाले की, शिवरायांनी भारतीय संस्कृतीला शिखरावर नेण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच आजच्या युवकांनीही स्वत:च्या ईच्छेचा पाठपुरावा करावा. पालकांनी मुलांना त्यांची आवड जपण्यासाठी प्रोत्साहित करावे. माणुस हा त्याच्या सहवासामुळे ओळखला जातो. त्यामुळे चांगल्या लोकांचा सहवास ठेवा असे आवाहन त्यांनी केले. अभ्यासाला दैनंदिनीचा भाग बनवुन त्याचा आनंद घेतल्यास यश मिळणे कठिण नाही असे ते म्हणाले. दरम्यान, ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ उपस्थितांच्या गर्दीमधुन वाजतगाजत व्यासपीठावर आणण्यात आला. हजारो घाटंजीकरांनी उभे राहुन हा सोहळा अनुभवला.
सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी अध्यक्षीय भाषणातून अंधश्रद्धा विरोधी कायदा देशभरात लागु करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी माणसांवर विश्वास ठेऊन कार्य केले. सर्वधर्मियांना संधी दिली. शिवराय लढले म्हणुन जिंकले. त्यामुळे लढायला शिका असे आवाहन त्यांनी केले. घाटंजी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी नगर परिषदेला संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाच्या पुर्वी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांचे छत्रपती शिवरायांचा वैज्ञानिक दृष्टीकोण या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे संचालक राजेश उदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक महाकुलकर, प्रपुâल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, अनिल मस्के, श्रीकांत पायताडे, राजु गिरी यांचेसह संभाजी ब्रिगेड व राजे छत्रपती सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
साभार : सकाळ 

Friday, 31 January 2014

स्नेहसंमेलनात फ्री स्टाईल बाईक रायडींगचा थरार

रस्ता सुरक्षेचा संदेश : युवकांनो फाजिल धैर्य दाखवू नका



येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलना दरम्यान फ्री स्टाईल बाईक रायडींगने युवकांच्या मनाचा ठाव घेतला. राष्ट्रीय रेसर राहुल राठोड व दिलशाद खान यांचे चित्तथरारक बाईक स्टंट्स यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. 
हिलचेयर व्हिली, सुसाईड बर्नाऊट, सिट स्टॅण्ड व्हिली, रोलींग बर्नाऊट यासह विवीध प्रकारचे स्टंट्स युवकांना भुरळ पाडीत होते. मात्र या बाईकर्सनी युवकांना बाईकवर फाजिल धैर्य न दाखविण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मर्यादीत वेगातच बाईक चालवावी. योग्य प्रशिक्षण असल्याशिवाय स्टंट्स करू नये. रस्ता हा सुरक्षीतपणे वाहने चालविण्यासाठी असतो स्टंट्स करण्यासाठी नाही असा संदेशही त्यांनी महाविद्यालयीन युवकांना दिला. या कार्यक्रमातून गोळा झालेला निधी यवतमाळ येथिल वृद्धाश्रमाला देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे विद्यार्थी अमित पडलवार, सुहास दिवुंâडवार, निलेश दुल्लरवार, अनुप तारक, पुष्कर कुरजेकर यांनी पुढाकार घेतला. दरम्यान या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विवीध खेळ व क्रिडा स्पर्धा, रांगोळी, थाळी सजावट, वादविवाद, वक्तृत्व, भावगित, कविता वाचन, आनंद मेळावा, पुष्परचना या स्पर्धांसह विवीध सांस्कुतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्याथ्र्यांनी उत्स्पुâर्त सहभाग घेतला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संचालक आर.यु.गिरी, आलिया शहेजाद यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे प्रभारी म्हणुन प्रा.टी.एम.कोटक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. 
साभार : सकाळ 

Sunday, 19 January 2014

महिला वाहक म्हणते, ‘बस मे चढोंगे तो जुते से मारूंगी’

सौजन्याचे धिंडवडे : बिघडलेल्या एस.टी.बसच्या 
प्रवाशांना बसविण्यास नकार
एस.टी.बसमधील वाहकाने प्रवाशांना विनम्र होऊन हात जोडून नमस्कार करावा, स्वत:चे नाव सांगुन त्यांचे स्वागत करावे आणि बस पेâरीबाबत माहिती द्यावी अशा सौजन्यपुर्ण वागणुकीच्या अभियानाला गेल्या एक जानेवारीपासुन सुरूवात झाली. मात्र काल (ता.१७) ला यवतमाळ घाटंजी मार्गावरील प्रवाशांना एका महिला वाहकाने दिलेल्या वागणुकीने हेच का ते एस.टी.चे ‘सौजन्य’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्या महिला वाहकाच्या अपमानास्पद वागणुकीची तक्रार काही प्रवाशांनी घाटंजी बसस्थानकात नोंदविली आहे.
याबाबत माहिती अशी की, काल (ता.१७) ला सकाळी १० वाजेदरम्यान यवतमाळ ते घाटंजी बस क्रं. एम.एच.०७ सी.७७७३ ‘यशवंती’ हि बस यवतमाळ शहरापासुन सुमारे ४ किमी अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. या बसमध्ये वाहक नसल्याने चालकाने प्रवाशांनाच यवतमाळ आगारात मोबाईलद्वारे सुचना देण्यास सांगितली. बस बिघडल्यास त्याच मार्गावरील दुस-या एखाद्या बसमध्ये बसण्याची प्रवाशांना मुभा असते. मात्र त्या दरम्यान तिन बस थांबल्या नाही. तब्बल दोन तास ताटकळत बसल्यावर दुपारी १२ च्या दरम्यान एम.एच.०७-९४३७ क्रमांकाची बस प्रवाशांनी प्रयत्न करून थांबविली. मात्र या बसची महिला वाहक प्रवाशांना बसु देण्यास तयार नव्हती. बसचा वाहक सांगत नाही तोवर बसु देणार नाही असे ती म्हणाली. मात्र या बसला वाहक नसतो, हि बस नॉन स्टॉप आहे, आमचेकडे तिकीट आहे ते तपासा व आम्हाला बसु द्या अशी विनंती प्रवाशांनी केली. मात्र त्या महिला वाहकाने प्रवाशांशी हुज्जत घातली. यावर तुमच्या वरिष्ठांना विचारा, आम्ही आगारात फोन केला होता असेही प्रवाशांनी सांगितले. मात्र मला कुणाशीच देणेघेणे नसल्याचे ती म्हणाली. प्रवाशांची बसजवळ गर्दी झाली असता, ‘कोई बस मे चढा तो जुते से मारूंगी’ असे म्हणत तिने दरवाजा लावुन घेतला व बस निघुन गेली. त्यानंतर ब-याच वेळाने प्रवाशी अन्य एका बसने घाटंजीला पोहचले. 
महिला वाहकाच्या या अपमानास्पद वागणुकीची लेखी तक्रार प्रवाशांनी घाटंजी बस स्थानकात केली. तसेच विभाग नियंत्रक व वरिष्ठांकडेही तक्रार करणार असल्याचे प्रविण दोंतुलवार, विवेक गोहाडे, राजु जाधव, तानाजी नैताम, ऊवंâडा मेश्राम, सुनिता जाधव, मिना दोंतुलवार, मिलिंद गजभिये या प्रवाशांनी ‘सकाळ’ ला सांगितले. सदर महिला वाहक नेहमीच प्रवाशांशी उद्धट बोलते व वरिष्ठांनाही जुमानत नाही असेही काही प्रवाशी म्हणाले. एकीकडे एस.टी.महामंडळ सौजन्यपुर्ण सेवेचा गाजावाजा करीत असतांना अशी घटना या अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अशा बेलगाम कर्मचा-यांना आधी शिस्तीत आणावे व नंतरच सौजन्याचा विचार करावा असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. त्या महिला वाहकावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.
साभार : सकाळ 

Tuesday, 14 January 2014

जातीधर्मापेक्षा देश महत्वाचा - रामदास आठवले

आवाहन : देशहितासाठी महायुतीला सत्ता द्या !
कोणत्याही जातीधर्मापेक्षा देश महत्वाचा असतो. कॉंग्रेसने गेल्या सहा दशकात देशाचे वाटोळे केले आहे. दीन दलित, शेतकरी व शोषीतांच्या नावावर सत्ता उपभोगुन त्यांचेसाठी काहीही केले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिपाई-भाजप-शिवसेना व स्वाभिमानी संघटनेच्या महायुतीला सत्ता द्या असे आवाहन रिपाईचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी केले. घाटंजी येथे आयोजीत महायुतीच्या मेळाव्यात ते उद्घाटक म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हंसराज अहिर होते. रिपाई (आ)चे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे, रिपाईचे सुधाकर तायडे, मोहन भोयर, बाबासाहेब गाडे, सेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर, विजय कोटेचा, उद्धव येरमे यांचेसह भाजप, रिपाई व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आठवले यांनी आपल्या खसखस पिकविणा-या भाषणातून कॉंग्रेसप्रणीत वेंâद्र व राज्य सरकारचा खरपुस समाचार घेतला. भगवा आणी निळा एकत्र आल्याने कॉंग्रेसच्या पोटात गोळा आल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाला केवळ विशिष्ट समाजापुरता मर्यादीत न ठेवता सर्वांपर्यंत नेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकत्र्यांना केले. काहीही झाले तरी हातातला निळा झेंडा व जयभिमचा विचार सोडणार नाही. कॉंग्रेसने दलितांना केवळ सत्तेसाठी वापरले. सन्मान दिला नाही. त्यामुळेच भाजप सेनेशी सन्मानाची महायुती केल्याचे त्यांनी सांगितले. सिंचनासाठी पाणी अडविण्यापेक्षा आघाडी सरकारने पैसा अडवा पैसा जिरवा हाच उपक्रम राबविल्याची टिका त्यांनी केली. 
खासदार हंसराज अहिर यांनी अध्यक्षीय भाषणातून कॉंग्रेसच्या धोरणांचा समाचार घेतला. आघाडी सरकारवर लोकांचा विश्वास नाही, कॉंग्रेसने लोकांना कधीच आपलं मानलं नाही. केवळ महात्मा गांधीच्या नावाने मतांची लुट केली. हि लुट थांबविण्यासाठीच महायुती अस्तित्वात आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. राज्याला विमानतळांपेक्षा धरणांची जास्त गरज आहे. विदर्भापेक्षा लहान असलेल्या पंजाब हरियाणामध्ये ९६ टक्के सिंचन होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यात सिंचन परिषदेत येऊन पर्यटनासाठी १० कोटींचा निधी जाहिर करतात. शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर सोयाबिन पेâकतो तरी या सरकारला शेतक-यांचे दु:ख कळत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आधी कोळसा घोटाळा झालाच नसल्याचा कांगावा करणा-या सरकारने अखेर सर्वोच्च न्यायालयात गैरव्यवहाराची कबुली दिल्याने पंतप्रधानांसह या विरोधात बोलणा-या मंत्र्यांचा खोटारडेपणा जनतेपुढे आल्याचे ते म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून आघाडी सरकारच्या धोरणांवर टिका करून महायुतीला सत्तेत आणण्याचे आवाहन केले. दरम्यान, रामदास आठवले यांची व्यासपीठावर लाडूतुला करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे यांनी केले. संचालन सुरेश जाधव तर आभार प्रदर्शन संतोष जिवने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे जेष्ठ नेते मधुसूदन चोपडे, तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर, शहराध्यक्ष विष्णु नामपेल्लीवार, सरचिटणीस देवानंद काळे, गिरीधर राठोड, तालुका कोषाध्यक्ष राजु सुचक, भाजयुमो तालुकाध्यक्ष गुड्डू शुक्ला, यांचेसह रिपाई (आ), भाजपा, शिवसेना व स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.
साभार : सकाळ