Pages

Showing posts with label वीर राजे संभाजी पुरस्कार. Show all posts
Showing posts with label वीर राजे संभाजी पुरस्कार. Show all posts

Thursday, 20 February 2014

यशस्वी होण्यासाठी शिवरायांसारखी धेय्यनिष्ठा ठेवा - अमितकुमार राठोड

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कार्यप्रती समर्पण आणी आवड गरजेची असते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात चांगले आदर्श डोळ्यापुढे ठेऊन कार्य केले. जर प्रत्येकाने शिवरायांसारखी धेय्यनिष्ठा ठेऊन काम केले तर यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन आय.पी.एस.अमितकुमार राठोड यांनी केले. घाटंजी येथे शिवजयंती उत्सवात वीर राजे संभाजी पुरस्कार स्विकारल्या नंतर ते सत्काराला उत्तर देत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे होते. प्रसिद्ध वक्ते प्रा.श्याम मानव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, नगराध्यक्ष राम खांडरे, तहसिलदार एम.एम.जोरवर, ईकलाख खान, शैलेश र्इंगोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
युवकांना प्रेरणादायी असलेल्या भाषणात अमितकुमार राठोड पुढे म्हणाले की, शिवरायांनी भारतीय संस्कृतीला शिखरावर नेण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच आजच्या युवकांनीही स्वत:च्या ईच्छेचा पाठपुरावा करावा. पालकांनी मुलांना त्यांची आवड जपण्यासाठी प्रोत्साहित करावे. माणुस हा त्याच्या सहवासामुळे ओळखला जातो. त्यामुळे चांगल्या लोकांचा सहवास ठेवा असे आवाहन त्यांनी केले. अभ्यासाला दैनंदिनीचा भाग बनवुन त्याचा आनंद घेतल्यास यश मिळणे कठिण नाही असे ते म्हणाले. दरम्यान, ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ उपस्थितांच्या गर्दीमधुन वाजतगाजत व्यासपीठावर आणण्यात आला. हजारो घाटंजीकरांनी उभे राहुन हा सोहळा अनुभवला.
सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी अध्यक्षीय भाषणातून अंधश्रद्धा विरोधी कायदा देशभरात लागु करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी माणसांवर विश्वास ठेऊन कार्य केले. सर्वधर्मियांना संधी दिली. शिवराय लढले म्हणुन जिंकले. त्यामुळे लढायला शिका असे आवाहन त्यांनी केले. घाटंजी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी नगर परिषदेला संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाच्या पुर्वी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांचे छत्रपती शिवरायांचा वैज्ञानिक दृष्टीकोण या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे संचालक राजेश उदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक महाकुलकर, प्रपुâल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, अनिल मस्के, श्रीकांत पायताडे, राजु गिरी यांचेसह संभाजी ब्रिगेड व राजे छत्रपती सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
साभार : सकाळ 

Friday, 22 February 2013

३३ वर्षांच्या न्यायदानाचा घाटंजीकरांच्या साक्षीने सन्मान

माजी न्यायमुर्ती गिलानी यांना ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’


 मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती तथा घाटंजी तालुक्याचे भुमीपूत्र एम.एन.गिलानी यांना शिवजयंती उत्सवात यंदाच्या वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली ३३ वर्ष न्यायदानाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, घाटंजीचे नगराध्यक्ष किशोर दावडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिका-यांच्या हस्ते गौरवचिन्ह, मानपत्र व शाल श्रिफळ देऊन माजी न्यायमुर्ती गिलानी यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी हजारो घाटंजीकरांनी उभे राहुन त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
सत्काराला उत्तर देताना माजी न्यायमुर्ती गिलानी म्हणाले की, ज्या मातीत राहुन मी लहानाचा मोठा झालो त्या मातीत होत असलेल्या सत्काराने मन उचंबळून येत आहे. अशा पुरस्काराने कधी गौरव होईल असे कधीच वाटले नव्हते. यावेळी गिलानी यांनी आपल्या लहाणपणाच्या आठवणींना उजाळा दिला. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त करून समाजाची संवेदनशीलता कमी होत असल्याबाबत खेद व्यक्त केला. दिल्लीच्या घटनेवर अवघा देश पेटून उठतो. मग त्यापेक्षाही भयंकर असलेल्या कृत्याचा अपेक्षीत त्या प्रमाणात निषेध होत नाही. समाजाचे मन बोथट झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रसार माध्यमे सुद्धा अशा घटनांना पाहिजे त्या प्रमाणात गांभिर्याने घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात घडलेल्या या घटनेनंतर किती राजकारण्यांनी त्या ठिकाणी भेट देण्याचे सौजन्य दाखविले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. स्वत:वर होत असलेला अन्याय सहन करण्याची समाजाची मानसिकता होत आहे. अन्याय सहन करू नका, त्याचा प्रतिकार करा. महिलांनी देखिल अन्यायाविरोधात पुढे यावे. प्रसंगी शिवाजीराजांची तलवार उपसावी. मात्र मुकाटपणे राहु नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगुन या विचारांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले.
याप्रसंगी धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या शिरोली येथिल धावपटू महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राजेश उदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक महाकुलकर, प्रपुâल्ल अक्कलवार, राहुल खर्चे, अनिल मस्के, राजु गिरी, प्रमोद टापरे, नाना राठोड यांनी परिश्रम घेतले. 

.....अन न्यायमुर्ती भावूक झाले !

वीर राजे संभाजी पुरस्कार स्विकारल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना माजी न्यायमुर्ती गिलानी यांना गहिवरून आले. बराच वेळ त्यांना बोलणेही सुचत नव्हते. बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावले. त्यावेळी सर्वत्र शांतता पसरली होती. बालपणाच्या व शैक्षणीक जिवनातील आठवणी सांगतांना ते भावूक झाले होते. भावना बाजुला सारून आजवर नि:पक्षपणे न्यायदान करणा-या न्यायमुर्तींना भावनिक झालेले पाहुन वातावरण गहिवरून गेले होते.
साभार :- देशोन्नती 

Monday, 18 February 2013

न्यायदानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणा-या ‘भुमिपूत्राचा’ आज सन्मान

माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांना ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व घाटंजी तालुक्याचे भुमिपूत्र न्या.एम.एन.गिलानी यांना उद्या दि.१९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवात शिवतिर्थ, जेसिस कॉलनी येथे शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल राहतील. मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, नगराध्यक्ष किशोर दावडा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
राजे छत्रपती सामाजिक संस्था, घाटंजीच्या वतीने दरवर्षी शिक्षण, साहित्य, कला तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या विभुतीला वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात येते. यापुर्वी उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, व-हाडी कवी शंकर बडे, मुंबई येथिल शिवस्मारकाचे निर्माते भरत यमसनवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वीर शहिद संजय शिंदे, एच.एम.टी.तांदूळाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी हे घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा गावचे मुळ रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षणही घाटंजी तालुक्यातच झाले आहे. नागपुर येथिल विधी महाविद्यालयातून त्यांनी विधी स्नातक ही पदवी प्राप्त केली. सन १९८० साली प्रथम न्याय जिल्हाधिकारी व त्यानंतर जिल्हा न्यायाधिश म्हणुन त्यांनी नागपुर, पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी कार्य केले. टाडा या महत्वाच्या कायद्याचे विशेष न्यायाधिश म्हणुन त्यांची नियुक्ती झाली होती हे विशेष. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव य महत्वाच्या पदावर त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. दि.१७ मार्च १९११ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात नियुक्ती झाली. दोन वर्ष त्यांनी या पदावर कार्य केले. नुकतेच ते या पदावरून निवृत्त झाले आहेत. न्यायदानाच्या क्षेत्रात तब्बल ३३ वर्षे निर्भीड, नि:स्पृह व निस्वार्थपणे केलेल्या सेवेचा सन्मान म्हणुन त्यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. तत्पुर्वी शिवजयंती महोत्सवात सायंकाळी ५ वाजता शिवपुजन होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ता तथा विचारवंत राजर्षी पाटील (नांदेड) यांचे ‘जिजाऊ शिवबांच्या विचारातूनच महिला अत्याचाराला प्रतिबंध शक्य’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होईल. या सर्व कार्यक्रमांना घाटंजीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजे छत्रपती सामाजिक संस्था तथा संभाजी ब्रिगेड, तालुका घाटंजीचे राजेश उदार, दिपक महाकुलकर, प्रफुल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, श्रीकांत पायताडे, राजु गिरी, अनिल मस्के यांनी केले आहे. 

गुलाबी थंडीत हास्याची मेजवानी

अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा पसरलाय. या गोड गुलाबी थंडीत यंदा घाटंजीकरांना मेजवानी मिळणार आहे ती खदखदून हसण्याची. शिवजयंती उत्सवात सायंकाळी ७ वाजता हिंदी हास्य कवी संमेलनाचे आयोजन शिवतिर्थावर करण्यात आले आहे. आपल्या विनोदी व बहारदार संचालनाने देशभरात नावाजलेले हास्य कवी किरण जोशी (अमरावती), मनोज मद्रासी (निजामाबाद), हिंदी वाहिन्यांवरील हास्य कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटविणारे यवतमाळचे कपील जैन (बोरूंदीया) व हास्यकवी राजा धर्माधीकारी (परतवाडा) हे या कवी संमेलनात श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत. अनेकांच्या खास आग्रहास्तव घाटंजीकरांसाठी या नि:शुल्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Monday, 11 February 2013

घाटंजीत शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

हिंदी हास्य कवी संमेलन मुख्य आकर्षण

स्थानिक राजे छत्रपती सामाजीक संस्था व संभाजी ब्रिगेड तालुका शाखा घाटंजीच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवतिर्थ’ जेसिस कॉलनी येथे छत्रपती शिवरायांच्या ३८३ व्या जयंती निमित्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१९ फ़ेब्रुवारी ला सायंकाळी ५ वाजता शिवपुजनाने कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यानंतर नांदेड येथिल ख्यातनाम विचारवंत व वक्ता प्रा.सौ.राजर्षी पाटील यांचे ‘‘जिजाऊ शिवबांच्या विचारातूनच महिला अत्याचाराला प्रतिबंध शक्य’’ या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प.सभापती संगिता भुरे राहतील, तसेच यावेळी न.प.सभापती परेश कारीया, चंद्ररेखा रामटेके, सिमा डंभारे यांची उपस्थिती राहिल. 
त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ वितरण सोहळा होईल. या कार्यक्रमाला सत्कारमुर्ती व पुरस्काराचे मानकरी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती मा.एम.एन.गिलानी यांची प्रमुख उपस्थिती राहिल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल राहतील. मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, घाटंजीचे नगराध्यक्ष किशोर दावडा हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहतील. 
सायंकाळी ७ वाजता हिंदी हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या हास्यकवी संमेलनात प्रख्यात हिंदी हास्यकवी किरण जोशी अमरावती, मनोज मद्रासी निजामाबाद, कपील जैन (बोरूंदीया) यवतमाळ व राजा धर्माधीकारी परतवाडा हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला श्रोत्यांना नि:शुल्क प्रवेश मिळणार आहे. 
या सर्व कार्यक्रमांना घाटंजीकरांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन राजे छत्रपती सामाजीक संस्था, संभाजी ब्रिगेडचे राजेश उदार, दिपक महाकुलकर, संजय राऊत, प्रफ़ुल्ल अक्कलवार, राहुल खर्चे, अनिल मस्के, संतोष राऊत, मनोज ढगले, राजु गिरी, रूपेश कावलकर, श्रिकांत पायताडे, संजय पडलवार, प्रमोद टापरे, हर्षद दावडा, गजानन कटकमवार, प्रविण मडावी, रवि बेलोरकर, निरज विरदंडे, आकाश निमसरकर, सतिश भोयर, संतोष गावंडे, दिनेश बावनकुळे, प्रदिप ढगले, संतोष भोयर, सुमित कैटीकवार, प्रशांत चौधरी, अजय दिघडे, पंकज वल्लभकर, मंगेश वांढरे, अमित वैश्य, पंकज घाडगे, सुरेश यन्नरवार, समिर चौधरी, अंकुश ठाकरे, संदिप धांदे, अरविंद मानकर, संतोष काळे, दिलीप गुघाणे, मंगेश रामटेके, मानव लढे, आकाश कवासे, शरद सोयाम, अभय ठाकरे, सचिन गवळी, नरेश ताजणे, अमोल कर्णेवार, सुशिल कोवे, अनिल डहाके, शक्तिसिंग ठाकुर, शितल कोवे, नंदू बुरबुरे, नरेश भडांगे, विजय जयवळ, अरूण गावंडे, सुमित ढगले, एस.आर.जाधव, एन.डी.कोळी, बाल्या चावरे, प्रेम चावरे, ज्ञानेश्वर राठोड, सचिन यन्नरवार, अवि जळके, प्रफ़ुल्ल खंडाळकर यांनी केले आहे.

माजी न्यायमुर्ती गिलानी यांना विर राजे संभाजी पुरस्कार 

आपल्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करणारे व्यक्तीमत्व तसेच घाटंजी तालुक्यातील भुमीपूत्रांना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांना जाहिर करण्यात आला आहे. न्यायमुर्ती गिलानी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. ते मुळचे घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण घाटंजी येथे झाले आहे. न्यायमुर्ती गिलानी यांनी आजवर मोठमोठी पदे भुषविली आहेत. विवीध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
साभार :- देशोन्नती 

Sunday, 4 March 2012

हजारो घाटंजीकरांच्या साक्षीने ‘एच.एम.टी.’ च्या जनकाचा सन्मान








एच.एम.टी.तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांना यावर्षीचा वीर राजे संभाजी पुरस्कार देऊन शिवजयंती उत्सवात गौरविण्यात आले. यावेळी सुमारे १५ हजार घाटंजीकरांनी उभे राहुन दादाजींच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा केला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के होते. याप्रसंगी संपुर्ण खोब्रागडे कुटूंबीयांचाही सत्कार करण्यात आला. मराठमोळा वेश परिधान केलेल्या युवक युवतींनी गौरवचिन्ह सभामंडपात आणले तेव्हा सर्वांच्याच नजरा त्याकडे खिळल्या होत्या. राजेश उदार यांनी मानपत्राचे वाचन केले. पुरस्काराला उत्तर देताना दादाजी खोब्रागडे यांनी संशोधनाची प्रामाणीक भुमिका विशद केली. शासन शेतक-यांच्या समस्यांकडे कधीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के म्हणाले की, आजची पिढी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. या पिढीचा बुध्यांक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता मात्र भावनांक वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पुर्वीच्या काळी किती लढाया जिंकल्या यावर एखाद्या परिवाराला महत्व दिले जात असे. आज किती सॉफ्टवेअर इंजीनियर कुटूंबात आहेत याला महत्व आले आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना फाजील गोष्टींऐवजी लॅपटॉप घेऊन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. वीर राजे संभाजी पुरस्कारासाठी एका संशोधकाची निवड करून शिवजयंती उत्सवात विज्ञाननिष्ठतेला सुरूवात केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांचा पी.एच.डी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राजेश उदार  व आभार प्रदर्शन दिपक महाकुलकर यांनी केले.
साभार :- देशोन्नती  

Saturday, 18 February 2012

घाटंजीत आजपासुन शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

सामाजीक व सांस्कृतीक कार्यक्रमांची अनोखी मेजवानी

येथिल राजे छत्रपती सामाजीक संस्था व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवतिर्थ जेसिस कॉलनी येथे दि.१८ व १९ फेब्रुवारी ला शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ ला दुपारी ३ वाजता तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. दोन गटात होणा-या या स्पर्धेसाठी प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी प्रथम बक्षिस १ हजार व १०१ रुपयांची १० बक्षिसे हर्षद दावडा यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होणार असुन या कार्यक्रमात नगर परिषदेच्या नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे राहतील. यावेळी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, बांधकाम सभापती परेश कारीया, राम खांडरे, संगिता भुरे, शोभा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर खुली समुहनृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षिस २ हजार स्व.मारोतराव अक्कलवार यांचे स्मृतीप्रित्यर्थ सुधाकर अक्कलवार यांचेकडून , द्वितीय १ हजार अरविंद मानकर यांचेकडून देण्यात येईल. दि.१९ ला सकाळी ८ वाजता मॅराथॉन स्पर्धा होणार आहे. खुल्या गटासाठी प्रथम बक्षिस १ हजार रूपये अनुप देव यांचेकडून, द्वितीय ५०१ रू मनोज ढगले यांचेकडून, तर ब गटासाठी प्रथम बक्षिस ७०१ रू.निमकर बंधु यांचेकडून, द्वितीय ५०१ रू.विशाल यल्लरवार यांचेकडून देण्यात येईल.
सकाळी ११ वाजता विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रसार माध्यमांची वाढती व्यावसायीकता लोकशाहीस मारक’ या विषयावर होणा-या या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षिस ३ हजार रूपये स्व.डॉ.ज्ञानेश्वर राऊत स्मृतीप्रित्यर्थ अमोल राऊत यांचेकडून, द्वितीय २ हजार रूपये भरत खाटीक यांचेकडून, तृतिय १ हजार रूपये पंकज तन्ना यांचेकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी गिरीराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय मारावार राहतील. जितेंद्र ठाकरे, संजय पिसाळकर, रावसाहेब जुमनाके, हेमंत कांबळे, डॉ.मधुकर मडावी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. सायंकाळी ५ वाजता फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम बक्षिस ७०१ रू. अनिता वर्हाडे यांचेकडून, द्वितीय ५०१  प्रमोद टापरे यांचेकडून  देण्यात येणार आहे.  सायंकाळी ६ वाजता शिवपुजन होईल. त्यानंतर ईतिहास संशोधक डॉ. साहेबराव खंदारे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. अरविंद भुरे, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, तहसिलदार संतोष शिंदे, सि.यु. मेहेत्रे, के.झेड. राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता वीर राजे संभाजी पुरस्कार वितरण होईल. यावर्षी या पुरस्काराने चंद्रपुर येथिल एच.एम.टी. तांदळाच्या वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके राहतील. विशेष अतिथी म्हणुन उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के, पणन महासंघाचे संचालक सुरेश लोणकर, अण्णासाहेब पारवेकर यांची उपस्थिती राहील. या सर्व कार्यक्रमांना नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.