Pages

Friday, 16 November 2012

घाटंजी बाजार समितीच्या कापुस खरेदीचा शुभारंभ






येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापुस यार्डावर आज कापुस खरेदी तसेच शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचे हस्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. 
या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, शंकर ठाकरे, संजय इंगळे, शाम बेलोरकर, नामदेव आडे, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, न.प.शिक्षण सभापती राम खांडरे, किशोर चवरडोल, विवेक भोयर, चंपत आत्राम, संजय निकडे, रफिक बाबु, वंदना जिभकाटे, लक्ष्मण पोतराजे, श्री.गवळी, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे म्हणाले की, शेतक-यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. मार्केट यार्डावर ईलेक्ट्रॉनिक काट्यांद्वारे मोजमाप पद्धतीचा अवलंब करून शेतक-यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धान्यासाठी नाफेडची खरेदी सुरू करण्यात बाजार समितीने पुढाकार घेतला असुन सि.सि.आय.च्या खरेदीसाठीही बाजार समिती प्रयत्नरत आहे. उल्लेखनिय म्हणजे कापुस व्यापा-यांना ५ लाख रूपये तर अडत्यांसाठी २ लाख रूपये बँक गरंटी करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शेतक-यांच्या सुरक्षिततेकरीता मापा-यांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे. सेसबद्दल सुद्धा व्यापा-यांकडून आलेल्या अर्जावर धोरणात्मक निर्णय घेऊन शेतक-यांना जास्तीत जास्त भाव मिळवुन देण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांनी केले. यावेळी व्यापारी, अडते व शेतक-यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

साभार :- देशोन्नती 


लखमाई ईण्डेन कडून गॅस ग्राहकांची पिळवणूक

संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा ईशारा

येथिल लखमाई ईण्डेन गॅस एजन्सी कडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पिळवणुक होत असुन गॅस वितरणात गैरप्रकार होत आहे. प्रशासनाने यावर त्वरीत कार्यवाही न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
लखमाई ईण्डेनच्या वितरण प्रणालीमध्ये प्रचंड गलथानपणा होत असुन नोंदणी केल्यावरही गॅस सिलेंडर मिळत नाही. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये एजन्सी मार्पâत घरपोच गॅस पुरविण्याची सेवा बंद करण्यात आली आहे. या एजन्सीच्या अंजी मार्गावर असलेल्या गोदामावर पहाटे पाच वाजता पासुनच सुमारे एक किलोमिटर लांबपर्यंत सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची रांग लागलेली असते. या रांगेमुळे बहुतांश वेळा राज्य महामार्गावरील वाहतुकही विस्कळीत होत असुन ग्राहकांना जीव मुठीत घेऊनच येथे उभे राहावे लागते. मागणी व पुरवठ्याच्या बाबतीत एजन्सी मार्पâत योग्य सुसूत्रता पाळली जात नसल्यामुळे ग्राहकांना योग्य वेळी गॅस उपलब्ध होत नाही. ऐन सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू असल्याने वरिष्ठांनी याबाबत तातडीने लक्ष देऊन लखमाई ईण्डेनच्या कारभाराची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी. असे न झाल्यास संभाजी ब्रिगेड आंदोलनाचा मार्ग स्विकारेल असा ईशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजेश उदार, राहुल खर्चे, प्रपुâल्ल अक्कलवार, नाना राठोड, दिपक महाकुलकर, प्रमोद टापरे, शितल कोवे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती 



जिल्हास्तरीय मैदानी खेळात विकासगंगा संस्थेच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगीरी


नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धांमध्ये विकासगंगा सामाजीक संस्था, पांढुर्णा खुर्द ता.घाटंजी या संस्थेच्या चार खेळाडूनी उत्कृष्ट कामगीरी केली असुन त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. धावण्याच्या स्पर्धेत महिलांच्या खुल्या गटामध्ये माया भुरे हिने ४०० मिटर हर्डल्स मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तर अश्विनी देठे ही १०० मिटर हर्डल्स मध्ये अव्वल आली. सपना वाढई, लक्ष्मी लेनगुरे यानी सुद्धा याच क्रिडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व खेळाडूंना तालुक्यातील राष्ट्रीय धावपटू राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले. विकासगंगा संस्थेने ग्रामिण भागातील विद्यार्थी व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी केलेला हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य असुन क्रिडा क्षेत्राच्या वाढीला पोषक ठरणारा आहे असे मत धावपटू राजन भुरे यांनी व्यक्त केले. तसेच खेळाडूंना दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांनी विकासगंगा संस्थेचे अध्यक्ष रणजीत बोबडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

साभार :- देशोन्नती 


रा.कॉ.च्या घाटंजी महिला तालुकाध्यक्षपदी चंद्ररेखा रामटेके


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घाटंजी महिला तालुकाध्यक्षपदी नगरसेविका चंद्ररेखा सुखदेव रामटेके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना.मनोहर नाईक, आमदार संदिप बाजोरीया, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे (राऊत) यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक तथा देशाचे कृषीमंत्री ना.शरद पवार यांचे विचार तळागाळातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी रामटेके यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारीणीत नेमणुक करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, शिक्षण सभापती राम खांडरे, आरोग्य सभापती संगिता भुरे, नगरसेविका इंदू परतेकी, नगरसेवक संजय राऊत यांनी केले आहे.

साभार :- देशोन्नती 


Sunday, 11 November 2012

लाखोंचे आमिष अन मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल फसवेगिरी सुरू

फसवणुकीच्या तक्रारींना पोलीस दरबारी किंमत नाही

लाघवी भाषा, अधिकृतपणाचा आव आणी प्रामुख्याने ग्रामिण भागातील नागरीकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल च्या माध्यमातून फसवणुक करण्याचा ऑनलाईन गोरखधंदा सध्या तेजीत आहे. बनावट नावाने बँक खाते उघडून आधुनिक प्रणालींचा उपयोग करून चालणारा बिनभांडवली व कोणतीही जोखीम नसलेला हा अवैध व्यवसाय चांगलाच पसरत चाललाय. एकट्या घाटंजी तालुक्यातूनच गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत आमिषाला बळी पडलेल्या लोकांची लाखो रूपयांनी फसवणुक झाली आहे. आपली फसगत झाल्याने लोकलाजेखातर अनेकजण तक्रारीसाठी पुढेच येत नाहीत. अन जे कोणी हिंमत दाखवून पुढे येतात व पोलीसांकडे फिर्याद नोंदविण्यासाठी जातात त्यांना पोलीसांकडून अक्षरश: धुडकावून लावण्यात येते. स्थानिक पोलीसांना अशा प्रकरणांचा तपास करणे खरंच कठिण आहे. मात्र तरी स्थानीक पोलीसांनी किमान फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सायबर गुन्हे शाखांकडे देणे श्रेयस्कर ठरेल.  मात्र पोलीसांनी या गंभिर प्रकाराकडे असेच दुर्लक्ष केले तर फसवणुक करणारे हे रॅकेट आणखी बळकट होत जातील. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथिल एका युवकाला नुकताच या रॅकेटने दहा हजारांनी गंडा घातला आहे. सदर युवकाला त्याच्या मोबाईल नंबरवर ९२३०४५२८३०४ या क्रमांकावरून कॉल आला. आयडीया कंपनीकडून काढ़ण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाला २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यासाठी प्रोसेसिंग फिच्या स्वरूपात १६ हजार रूपयांची रक्कम स्टेट बँकेच्या ३२१०६७८१६०१ या खात्यात जमा करावे लागतील अशी अट ठेवण्यात आली. मात्र सदर युवकाने त्यांना आपल्याकडे सध्या केवळ १० हजार रूपयेच असल्याचे सांगितल्यावर निदान तेवढी रक्कम तरी भरा असे त्याला सांगण्यात आले. रक्कम खात्यात जमा करताच ती त्वरीत काढण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी परत त्याला दुस-या एका क्रमांकावरून कॉल आला. व पुन्हा त्या खात्यात १० हजार रूपये भरा व या ईमेल वर तुमची कागदपत्रे पाठवा एका तासात हे न केल्यास ही २५ लाखांची लॉटरी दुस-या क्रमांकाला देण्यात येईल अशी भिती त्या युवकाला दाखविण्यात आली. 
यावेळी मात्र सदर युवकाने काही मित्रांकडे याविषयी  विचारणा केली असता हा संपुर्ण फसवणुकीचा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने या प्रकाराची लेखी तक्रार करण्यास घाटंजी पोलीस स्टेशन गाठले. मात्र येथिल ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्या युवकाची तक्रार समजुन घेण्या ऐवजी, ‘तुम्ही अशी फाल्तुची कामे करताच कशाला? आम्ही यामध्ये काय करणार? निघा येथुन लवकर.’ अशी मुक्ताफळे उधळून तक्रारकर्त्यास तक्रारीची पोच पावती न देताच पिटाळून लावले. अनेक गंभिर घटनांची तक्रार करण्यास गेलेल्यांना त्यांच्या कायद्याविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हाकलून देतात असा आजवरचा अनुभव आहे हे विषेश.
सायबर व तांत्रिक स्वरूपातील गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीसांची जिल्हास्तरावर विषेश शाखा आहे. तरी देखिल तक्रारकर्त्याना धाकदपट करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभिर आहे. तक्रार न नोंदविल्याने गुन्हेच घडत नाहीत हे दर्शविण्याचा हा केविलवाना प्रकार कुठवर चालणार याचा विचार करणे गरजेचे आहे.
साभार :- देशोन्नती