Pages

Showing posts with label आंदोलन. Show all posts
Showing posts with label आंदोलन. Show all posts

Friday, 16 November 2012

लखमाई ईण्डेन कडून गॅस ग्राहकांची पिळवणूक

संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा ईशारा

येथिल लखमाई ईण्डेन गॅस एजन्सी कडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पिळवणुक होत असुन गॅस वितरणात गैरप्रकार होत आहे. प्रशासनाने यावर त्वरीत कार्यवाही न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
लखमाई ईण्डेनच्या वितरण प्रणालीमध्ये प्रचंड गलथानपणा होत असुन नोंदणी केल्यावरही गॅस सिलेंडर मिळत नाही. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये एजन्सी मार्पâत घरपोच गॅस पुरविण्याची सेवा बंद करण्यात आली आहे. या एजन्सीच्या अंजी मार्गावर असलेल्या गोदामावर पहाटे पाच वाजता पासुनच सुमारे एक किलोमिटर लांबपर्यंत सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची रांग लागलेली असते. या रांगेमुळे बहुतांश वेळा राज्य महामार्गावरील वाहतुकही विस्कळीत होत असुन ग्राहकांना जीव मुठीत घेऊनच येथे उभे राहावे लागते. मागणी व पुरवठ्याच्या बाबतीत एजन्सी मार्पâत योग्य सुसूत्रता पाळली जात नसल्यामुळे ग्राहकांना योग्य वेळी गॅस उपलब्ध होत नाही. ऐन सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू असल्याने वरिष्ठांनी याबाबत तातडीने लक्ष देऊन लखमाई ईण्डेनच्या कारभाराची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी. असे न झाल्यास संभाजी ब्रिगेड आंदोलनाचा मार्ग स्विकारेल असा ईशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजेश उदार, राहुल खर्चे, प्रपुâल्ल अक्कलवार, नाना राठोड, दिपक महाकुलकर, प्रमोद टापरे, शितल कोवे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती 



Tuesday, 11 September 2012

नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात विद्यार्थी व पालकांचा एल्गार

पालक सभेत प्रचंड गोंधळ



तालुक्यातील बेलोरा येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात आज झालेल्या पालक सभेत विद्यार्थी व पालकांनी विद्यालयाच्या प्राचार्या सुमन बैलमारे यांच्या मनमानी कारभाराविषयी एल्गार पुकारला. अनेक विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या विचित्र वागणुकीचे पुरावेही यावेळी मांडले. केंद्र शासनाच्या अख्त्यारीत असलेल्या या जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थी अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. पालकसभेत विद्यार्थ्यांनी या समस्या सर्वांसमोर मांडल्या. ही परिस्थिती ऐकुन पालकही संतप्त झाले. काही पालकांनी प्राचार्यांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, तुम्ही माझी बदली करून टाका मी जाण्यास तयार आहे असे उद्धट उत्तर दिले. येथे वर्ग ६ ते १२ पर्यंतचे शिक्षण घेण्याची सुविधा आहे. मात्र शिक्षकां अभावी १२ वी ची तुकडीच चंद्रपुरला हलविण्यात आल्याची धक्कादायक माहीती विद्यार्थ्यांनी दिली. सध्या या विद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषय शिकवायला शिक्षक नाहीत. यासाठी प्राचार्यानी अद्याप कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. यावेळी तर चक्क निधी कमी आल्याने तुम्हाला वरण भातच खावा लागेल असे वक्तव्य प्राचार्यानी केल्याचे विद्यार्थी यावेळी म्हणाले. 
वसतीगृहातील काही भागात दोन वर्षांपासुन पंख्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थी बिछाने सरकवुन झोपतात. अशावेळी क्वचीत प्रसंगी त्यांच्यात वाद होतात. मात्र प्राचार्यानी त्याना समज देण्या ऐवजी १० वीच्या ५ विद्यार्थ्यांना १ महिन्यासाठी निलंबीत केले. विद्यार्थी एखादी समस्या घेऊन प्राचार्यांकडे गेले तर त्या थेट विद्यार्थ्यांना धमकावतात की, पालकांना अथवा बाहेर कुणाला सांगितले तर गाठ माझ्याशी आहे.
अशा अनेक समस्यांचा पाढाच विद्याथ्र्यानी पोटतिडकीने मांडला. यामुळे पालकसभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला. प्रचार्या सुमन बैलमारे यांना हटवा असे नारे विद्यार्थ्यांनी लगावले.

नवोदयच्या विद्यार्थ्यांचा लढा यशस्वी
प्राचार्या बैलमारे यांची हकालपट्टी
जवाहर  नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या सुमन बैलमारे यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन यशस्वी झाले. वरिष्ठांनी विद्यार्थ्यांच्या संतापाची तातडीने दखल घेत प्राचार्यांना तातडीने कार्यमुक्त करून उपप्राचार्य मोहम्मद शाकीब यांचेकडे तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. प्राचार्यांना हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काल पालकसभेत संताप व्यक्त केला. मात्र प्राचार्या सुमन बैलमारे यांनी आपला तोरा सोडला नसल्याने विद्यार्थ्यांनी आज सकाळपासुन अन्नत्याग आंदोलन सुरू केले. जोवर प्राचार्यांना हटविण्यात येत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. नवोदयचे सहाय्यक आयुक्त पी.के.शर्मा हे विद्यालयात आले. मात्र त्यांनाही  विद्यार्थ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. पी.के.शर्मा गो बॅक अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी त्यांना येण्यास मज्जाव केला. त्यानंतर उपायुक्त के.एस.भट्ट यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केल्यावर त्यांनी एका तासात प्राचार्यांच्या कार्यमुक्तीचा आदेश देण्याचे आश्वासन दिल्यावरच विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन थांबविले. विद्यार्थ्यांनी भर पावसात जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाचा निषेध नोदविला. 

साभार :- देशोन्नती  


Friday, 20 April 2012

भुरटे समाजसेवक व अर्थहिन आंदोलने


हल्ली समाजाची ‘सेवा' करणा-यांची संख्या खुप वाढली आहे. शासकीय कार्यालयाच्या परिसरात व वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये हे समाजसेवक नेहमीच चमकत असतात. ‘सामाजिक कार्यकर्ता' हे गोंडस बिरूद लावुन मिरवणारे महाभाग दगड उचलला तरी नजरेस पडतील. समाजाच्या सेवेचा वसा घेऊन कुणी पुढे येत असेल तर त्याला जनाधारही मिळतो. परंतु समाजसेवेच्या बेगडाखाली व्यक्तीगत स्वार्थ साधणा-या ‘भुरट्यांचे' काय? आजुबाजुचे चार दोन लोक गोळा केले, शंभर रूपयांचे बॅनर लावले, वर्तमानपत्राला बातमी द्यायला फोटो काढला की झाले आंदोलन. अशा आंदोलनाच्या माध्यमातुन शासकीय अधिका-यांना वेठीस धरून पैसा उकळणा-या आंदोलकांचे पिक सध्या जोमाने वाढत आहे. तहसिल कार्यालय परिसरात असे समाजसेवक पडलेलेच असतात. निराधार लाभार्थी, दारिद्र्य रेषेचे कार्डधारक व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन ते गरिबांची लुबाडणूक करतात. अधिकारी व कर्मचा-यांना धाक दाखवुन त्यांच्या कडुन अनेकदा बेकायदेशीर कामेही करवून घेतल्या जातात. कधी अधिकारी अथवा कर्मचा-याने काम करण्यास नकार दिला तर थेट ‘मोर्चा' काढल्या जातो. माहितीच्या अधिकाराचा खरा वापर या भुरट्यानीच केला आहे. योजनांच्या ‘निधी' ची माहिती मागवायची व नंतर खिशात ‘निधी' आला की, प्रकरण तिथेच दाबायचे असे प्रकार सर्रास होताना दिसतात. प्रसिद्धी पत्रक काढुन आंदोलनाचे देण्यात येणारे ईशारे, प्रत्यक्षात होणारे आंदोलन व त्या आंदोलनाची फलनिष्पत्ती तपासुन पाहिल्यास या कथित आंदोलकांचा खरा चेहरा समाजासमोर येईल.
घाटंजी तालुक्यात तर एकेकाळी रोजमजुरी करणा-यानीही  समाजसेवेचे सोंग घेतले आहे. तुम्हाला योजनांचा लाभ मिळवुन देतो असा कांगावा करून आंदोलनात गर्दी जमवायची व आपला हेतु साध्य करून घ्यायचा असा हा समाजसेवेचा उद्योग सध्या परिसरात भरभराटीला आला आहे. अशाच एका पोटभरू समाजसेवकाने अनेक गरिबांना जमिनीचे पट्टे मिळवुन देतो अशी बतावणी करून लाभार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रूपये गोळा केले व स्वत:चा गल्ला भरला. निवडणुक जवळ आली की या सामाजिक कार्यकर्त्यांच्या ‘उठाठेवी' या ना त्या माध्यमातुन वाढतात. जनतेच्या समस्यांची आपल्यालाच चाड आहे असा बनाव निर्माण केल्या जातो. कोणत्याही आंदोलनाचा हेतू स्वच्छ दिसला तर जनता त्यांच्या पाठीशी उभी राहतेच (अण्णा हजारेंच्या मौन सत्याग्रहानेही सरकार हादरून जाते). मग या समाजसेवकांच्या आंदोलनाला जनता व प्रशासन कवडीचेही महत्व का देत नाही याचे आत्मचिंतन या सामाजिक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे.
सद्यस्थितीत पैशाला पासरी भावाने मिळणा-या संघटना व त्याचे पदाधिकारी ज्याच्या त्याच्या तक्रारी करतांना आढळतात. भ्रष्टाचारावर त्यांचे विशेष लक्ष असते. वनविभाग, तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन व कृषी विभाग हे कार्यालय तर या भुरट्यांसाठी चरण्याचे कुरण बनले आहे. आधी तक्रारी करायच्या व ‘डिमांड' पुर्ण झाल्यावर ‘समाधान' झाल्याचे लिहुन द्यायचे असा बिनभांडवली व्यवसाय सध्या चांगलाच फोफावतोय. त्यामुळे वरिष्ठांनी आता तक्रारीच्या खरेखोटेपणा सोबतच तक्रारकर्त्याचीही उलट तपासणी घेण्याची गरज आहे. जनतेनेही अशी आंदोलने केवळ मनोरंजनासाठी 'एन्जॉय' करावीत.

Thursday, 29 March 2012

तोडफोड करण्याची वेळच कशाला येऊ देता ?

मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांचा सवाल

स्वत:चा खिसा भरण्यासाठी शासन व प्रशासनातील दलाल विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पद्धतीनेच त्याचा निषेध करणार अशी संतप्त प्रतिक्रीया मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी दिली. आमच्या  आक्रमक पावित्र्यामुळे कर्मचा-यांची सुरक्षा धोक्यात आली आहे असे प्रशासनाला वाटते. त्याबद्दल त्यांनी आमच्या कृतीचा निषेधही नोंदवला आहे. मात्र गरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरच हल्ला करण्याच्या प्रकारावर सगळेच आपली जबाबदारी का झटकत आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शासकीय कार्यालयात निवेदने, तक्रारी कचराकुंडीतच जातात. त्यामुळेच आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ येते असेही धांदे म्हणाले. आम्हाला तोडफोड करण्याची संधीच मिळु न दिल्यास आम्ही प्रशासनाचे आभारी राहु. प्रशासनच नियम कायदे बासनात गुंडाळून आपला खिसा गरम करण्यात व्यस्त असेल तर आमच्याकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
गरीब विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणा-या या प्रकाराचे वृत्त ‘देशोन्नती’ मध्ये वाचताच तातडीने वसतिगृहात जाऊन अंथरूणाच्या साहित्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तिथले भयावह चित्र पाहताच राहवले नाही आणी त्या गाद्या दाखविण्यासाठी यवतमाळ येथे आणल्या. राज्य आणी जि.प. समाजकल्याण विभागाचे अधिकारी या गंभिर प्रश्नाबाबत टोलवाटोलवीचे उत्तरे देत असल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणी त्यामुळेच कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा आक्रमक पद्धतीने निषेध नोंदविला. जनतेच्या प्रश्नांसाठी लढतांना आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. शासन व प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर राहील असे ते म्हणाले. या गैरप्रकारात दोषी असलेल्यांवर कार्यवाही न झाल्यास मनसे जिल्ह्यात सर्वत्र आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगीतले.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 25 January 2012

संतप्त मजुरांचा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला घेराव

आश्वासन देऊन बोनस न दिल्याचा संताप
तेंदुपत्ता बोनस वाटपात प्रचंड घोळ


तेंदुपत्ता बोनस वाटपाच्या यादीत ख-या मजुरांऐवजी वनविभागातील कर्मचा-यांच्या नातलगांच्या नावाने धनादेश काढण्यात आल्याच्या निषेधार्थ मजुरांनी आज वनपरिक्षेत्र कार्यालयाला घेराव घातला. 
काही दिवसांपुर्वी बोनस वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्राऊटिस्टचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात अभिनव भिक मांगो आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बोनस पासुन वंचीत राहिलेल्या मजुरांना १५ दिवसांच्या आत बोनस दिल्या जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच या प्रकरणात गैरप्रकार करणा-यांची चौकशी करण्यात येईल असेही तेव्हा सांगण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही वनविभागाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. यामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी आज दुपारी संपुर्ण कार्यालयाला घेराव घातला. यावेळी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, स.पो.नि.अरूण गुरूनूले, पी.एस.आय. राऊत, पी.एस.आय.कोंडे यांचेसह पोलीस ताफा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पोहचला.  बोनस घेतल्याशिवाय येथुन हलणार नाही असा आक्रमक पवित्रा मजुरांनी घेतल्याने पोलीसांचाही नाईलाज झाला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड.राठोड यांची या प्रकरणी प्रतिक्रीया घेतली असता ते कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. यादीत घोळ झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र त्यावर नेमकी काय कार्यवाही झाली? या गैरप्रकाराला कोण जबाबदार आहेत? या प्रकरणात वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला आहे का? याबाबत त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
साभार :- देशोन्नती