Pages

Showing posts with label महाराष्ट्र नवनिर्माण सेना. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र नवनिर्माण सेना. Show all posts

Sunday, 3 March 2013

पांढरकवडा नांदेड महामार्गावर मनसेचा रास्तारोको

अहमदनगर येथिल ‘त्या’ दगडफेकीचा निषेध
मनसे तालुकाध्यक्ष स्थानबद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगर येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ पारवा येथिल मनसे कार्यकर्त्यांनी पांढरकवडा नांदेड महामार्ग रोखुन धरला. सुमारे दोन तास या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. उल्लेखनिय म्हणजे मनसेचे घाटंजी तालुका प्रमुख राजु बल्लुरवार यांना पारवा पोलीसांनी सकाळीच स्थानबद्ध केले होते. तरी देखिल पारवा परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पारवा येथुन निषेध मोर्चा काढत महामार्गावर ठिय्या दिला. यावेळी मनसे कार्यकर्ते रमेश इंगोले, संजय कुडमते, गजानन चौधरी, रविंद्र शेंडे, हर्षल राऊत, संतोष चिल्लावार, विजय नेरूद्रवार, ज्योतीराम कुसरे, पुंजाराम धानोरकर, गणपत म्हरस्कोल्हे, देवीदास मंगाम, उमेश कुडमते, गोवर्धन मडावी, संजय जाधव, प्रकाश बावणे, बळवंत कुमरे या कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 12 September 2012

घाटंजी नगर परिषदेत मनसेचा राडा

मुख्याधिका-याला धक्काबुक्की








विनापरवाना बांधकामे, शहरातील समस्या तसेच मुख्याधिका-याची मनमानी याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  कार्यकर्त्यांनी  घाटंजी नगर परिषद कार्यालयात गोंधळ घातला. मुख्याधिका-याच्या कक्षातील साहित्याची तोडफोड करून मुख्याधिका-याला धक्काबुक्की केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, समर्थ कर्णबधीर विद्यालयाचे अवैध बांधकाम याविषयी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यानी गेल्या काही  महिन्यांपासुन तक्रारी केल्या होत्या. मात्र मुख्याधिका-यानी त्यावर कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकत्र्यानी ..कार्यालयात धुडगूस घातला. मुख्याधिकारी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देतात हा त्यांचा आरोप होता. कार्यालयातील संगणके, टेबल खुच्र्या आदींची तोडफोड करून  कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तोडफोड केल्यावर मुख्याधिका-यांच्या कक्षाला चपलांचा हार घालण्यात आला अचानक झालेल्या प्रकाराने कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती. या गोंधळात नगर परिषदेचे सुमारे लाखांचे नुकसान झाल्याचे मुख्याधिका-यानी सांगितले.


मुख्याधिका-यांचा हेकेखोरपणाच कारणीभुत - नगराध्यक्ष
 आज झालेली घटना घाटंजी नगर परिषदेच्या ईतिहासात प्रथमच घडली असुन ती अत्यंत दुदैवी आहे. मात्र या संतापाला मुख्याधिका-यांचा हेकेखोरपणा असहकार्याची कार्यपद्धतच जबाबदार असल्याची प्रतिक्रीया नगराध्यक्ष जगदीश पंजाबी यांनी व्यक्त केली.

कार्यकर्ते काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते - मुख्याधिकारी
मनसेच्या कार्यकत्र्यांनी दिलेल्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. त्यांना हीच गोष्ट समजावुन सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र कार्यकर्ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तोडफोड करण्याचाच त्यांचा हेतु होता अशी प्रतिक्रीया मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी दिली. पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने समस्या सोडविण्यास कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ताधारी मुख्याधिका-यात समन्वय नाही - गटनेता
सत्ताधारी मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने विकास खुंटला असुन त्यामुळेच नगर परिषदेत धिंगाणा झाल्याची प्रतिक्रीया विरोधी पक्षाचे गटनेते संतोष शेंद्रे यांनी दिली. कोणालाच जनतेच्या समस्यांशी घेणेदेणे नसुन सर्व आपल्याच कामात मग्न असल्याचे ते म्हणाले

साभार :- देशोन्नती  

मनसेने घाटंजी नगर परिषदेत केलेल्या तोडफोडीचा Video

Thursday, 29 March 2012

तोडफोड करण्याची वेळच कशाला येऊ देता ?

मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांचा सवाल

स्वत:चा खिसा भरण्यासाठी शासन व प्रशासनातील दलाल विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पद्धतीनेच त्याचा निषेध करणार अशी संतप्त प्रतिक्रीया मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी दिली. आमच्या  आक्रमक पावित्र्यामुळे कर्मचा-यांची सुरक्षा धोक्यात आली आहे असे प्रशासनाला वाटते. त्याबद्दल त्यांनी आमच्या कृतीचा निषेधही नोंदवला आहे. मात्र गरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरच हल्ला करण्याच्या प्रकारावर सगळेच आपली जबाबदारी का झटकत आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शासकीय कार्यालयात निवेदने, तक्रारी कचराकुंडीतच जातात. त्यामुळेच आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ येते असेही धांदे म्हणाले. आम्हाला तोडफोड करण्याची संधीच मिळु न दिल्यास आम्ही प्रशासनाचे आभारी राहु. प्रशासनच नियम कायदे बासनात गुंडाळून आपला खिसा गरम करण्यात व्यस्त असेल तर आमच्याकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
गरीब विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणा-या या प्रकाराचे वृत्त ‘देशोन्नती’ मध्ये वाचताच तातडीने वसतिगृहात जाऊन अंथरूणाच्या साहित्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तिथले भयावह चित्र पाहताच राहवले नाही आणी त्या गाद्या दाखविण्यासाठी यवतमाळ येथे आणल्या. राज्य आणी जि.प. समाजकल्याण विभागाचे अधिकारी या गंभिर प्रश्नाबाबत टोलवाटोलवीचे उत्तरे देत असल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणी त्यामुळेच कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा आक्रमक पद्धतीने निषेध नोंदविला. जनतेच्या प्रश्नांसाठी लढतांना आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. शासन व प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर राहील असे ते म्हणाले. या गैरप्रकारात दोषी असलेल्यांवर कार्यवाही न झाल्यास मनसे जिल्ह्यात सर्वत्र आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगीतले.
साभार :- देशोन्नती