Pages

Showing posts with label रोजगार हमी. Show all posts
Showing posts with label रोजगार हमी. Show all posts

Friday, 18 January 2013

आता संयुक्त वनव्यवस्थापन समितीही करणार रोहयोची कामे



महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गतची कामे आता ग्रामपंचायत स्तरावरील वनव्यवस्थापन समिती करू शकणार आहे. त्यासाठी समितीला यंत्रणा म्हणुन मान्यता देण्याबाबतचा आदेश नुकताच निर्गमीत करण्यात आला आहे. मात्र समिती केवळ वनक्षेत्रातीलच कामे करू शकणार आहे. नरेगा अंतर्गतच्या कामांमध्ये अभिसरणावर भर देण्यात यावा असे केंद्रीय ग्रामिण विकास मंत्रालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीसोबतच संयुक्त वनव्यवस्थापन समितीला गावपातळीवर यंत्रणा म्हणुन दर्जा देण्यात आला आहे. महसुल व वनविभागाच्या ५ ऑक्टोबर २०११ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यात गावपातळीवर संयुक्त वनव्यवस्थापन समित्या बॉम्बे व्हिलेज पंचायत अक्ट १९५८ मधील कलम ४९ प्रमाणे गठित झालेल्या आहेत. त्यातील उपकलम ४९ (७) प्रमाणे संयुक्त वनव्यवस्थापन समित्याना ग्रामपंचायतीप्रमाणे शक्ती, कर्तव्य व जबाबदारी देता येते. या निर्णयामुळे आता यापुढे गावपातळीवरील संयुक्त वनव्यवस्थापन समिती वनक्षेत्रात रोहयोची कामे करू शकणार आहे. समितीची निर्मीती ग्रामसभा करीत असल्याने समितीला ग्रामपंचायतीशी समन्वय साधुन काम करावे लागणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याला कामासंबंधीचा हिशोब ग्रामपंचायतीला सादर करावा लागेल. ही कामे करताना यंत्रणांसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार आहे. या कामांवर संबंधीत वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष ठेवतील व वनव्यवस्थापन समित्याच ही कामे करीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी वनविभागाची राहणार आहे. कामाच्या सामाजीक अंकेक्षण अनिवार्य असल्याने अकुशल व अर्धकुशल कामाकरीता सर्व खर्चाचा हिशोब सामाजीक अंकेक्षणासाठी द्यावा लागेल. 
तसेच कामे सुरू करण्यापुर्वी, काम सुरू असताना व काम पुर्ण झाल्यावर कामाच्या विवीध पातळीवरील छायाचित्रे काढुन योजनेच्या संकेतस्थळावर टाकावी लागणार आहेत. रोजगार हमी योजनेची कामे यंत्रणेमार्फतच केली जावी असा निकष असला तरी घाटंजी तालुक्यासह सर्वत्र कंत्राटदारच करीत असल्याचे चित्र आहे. घाटंजी तालुक्यात तर कामे न करताच देयके काढल्याचा आरोप वेळोवेळी झाला आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची चौकषी झाली नाही. आता संयुक्त वनव्यवस्थापन समित्याना देण्यात आलेल्या अधिकारानंतर तरी या योजनेतील कंत्राटदारांचा हैदोस कमी होणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 16 January 2013

रोहयो अपहार प्रकरणी दोषींवर फौजदारी कार्यवाही करा

अयनुद्दीन सोलंकी यांची मागणी

पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत घाटंजी तालुक्यातील पारवा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत माणुसधरी येथे रोजगार हमी योजनेची कामे न करता मोहदा पोष्टातून रक्कम काढुन अपहार केल्या प्रकरणी संबधीतांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केली आहे. 
रोहयो अंतर्गत माणुसधरी येथे कामे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात माणुसधरी येथे कुर्ली येथिल मजुरांनी कोणतीही कामे केली नसल्याचे बयाणात मजुरांनी कबुल केले आहे. जिल्हा परिषद रोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी पठारे यांनी केलेल्या चौकशीत मिरा मोहुर्ले, नामदेव मोहुर्ले, पार्वता पुसनाके, अनुसया गुरनुले, कर्णु तोडसाम, अनिता मोहुर्ले, दिनेश गुरनुले यांनी रोहयोच्या कोणत्याही कामावर मजुरीचे काम केले नाही व आमचे पैसे मोहदा पोस्ट ऑफिसमध्ये कसे काय आहे? असे चौकशी दरम्यान नमुद केल्याचे सोलंकी यांनी तक्रारीत म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे पोस्टाच्या विड्रॉल स्लिपवर साक्षीदार म्हणुन सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांची खोटी स्वाक्षरी संबंधीत ठेकेदार अथवा त्यांच्या सहका-यांनी केली असल्याचा आरोप करून त्याची हस्ताक्षर तज्ञामार्पâत तपासणी करण्याची मागणी सोलंकी यांनी केली आहे.
पांढरकवडा वनविभागामार्फत माणुसधरी येथे रोहयोचे काम झाले नाही. परंतु उपवनसंरक्षक, पांढरकवडा, नितीन कांबळे, किसन जाधव, मंगेश ताटकंडवार, पोस्ट मास्तर मोहदा, वनपरिक्षेत्र अधिकारी पारवा, तहसिलदार घाटंजी, गटविकास अधिकारी पं.स.घाटंजी, यांनी संगनमत करून मजुरीच्या पैशाची उचल करून रकमेचा अपहार केल्याने त्यांचेविरूद्ध फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अन्यथा याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोलंकी यांनी म्हटले आहे.
साभार :- देशोन्नती 

Friday, 13 April 2012

रोहयोच्या कामातील ४० टक्के रक्कम अधिका-यांच्या खिशात

प्रत्येक कामाचा ‘दर’ ठरलेला
कार्यालयातूनच कामाची पाहणी

ग्रामिण भागातील विकासकामे, निसर्ग संवर्धनाची कामे करण्यासाठी रोहयोंतर्गत आलेल्या निधीतील सुमारे ४० टक्के रक्कम ‘कमीशन’च्या स्वरूपात अधिका-यांच्या खिशात जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत घाटंजी तालुक्यात सुरू असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या कामांचे घसघशीत कमीशन अधिका-यांना मिळत असल्याने रोहयोचे प्रत्येक काम कंत्राटदारांमार्फतच  करण्याचा सपाटा अधिका-यांनी लावला आहे. प्रत्येक स्तरावर अधिकारी व कर्मचा-यांच्या स्वाक्षरीचे ‘दर’ ठरलेले असल्याने कंत्राटदारही कामाच्या दर्जाबाबत निश्चिंत राहतात. ठरलेले कमीशन मिळाले की, अधिकारी कोणत्याही गोष्टींची पडताळणी न करता हिरवी झेंडी दाखवितात. प्रसंगी नियमांना फाटा देऊन कंत्राटदारांच्या फायद्यासाठी गरज नसलेल्या ठिकाणी कामांना मान्यता दिल्या जात असल्याची माहिती आहे. प्रत्येक कामाच्या एकुण रकमेतील सुमारे ४० टक्के रक्कम अधिकारी व कर्मचा-यांमध्ये विभागल्या जात असल्याने कामे निकृष्ट होणार नाहीतर काय? असे एका वंâत्राटदाराने खासगीत सांगीतले. 
कामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तहसिल कार्यालयात अधिका-याला ३ हजार रूपये मिळतात. तर घाटंजी तहसिल कार्यालयातील एक महिला लिपीक फाईल पुढे रेटण्यासाठी ५०० रूपये ‘परिश्रम शुल्क’ घेते. तांत्रीक मान्यतेसाठी वनपरिक्षेत्र अधिका-याला २ हजार तर त्या संबंधीत लिपीकाला ५०० रूपये मिळतात. जलसिंचनाची कामे जसे, पाझर तलाव, वनतलाव, वन्यजीव पाणी पुरवठा तलाव, मातीचे बांध, दगडी बांध, वनराई बंधारे, मातीचे धरण, भुमिगत बंधारे यासह विवीध कामांना या प्रकाराचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसतांना वनविभागाचे अधिकारी तांत्रिक मान्यता कशी काय देऊ शकतात हा मुख्य प्रश्न आहे. काम पुर्ण झाल्यावर मागणी पाठवितांना कामाच्या रकमेतील १५ टक्के रक्कम वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी २० टक्के, क्षेत्र सहाय्यक ३ टक्के, वनरक्षक २ टक्के व ५ टक्के रक्कम तहसिलदाराच्या वाटणीला येते अशी माहिती आहे. 
महसुल प्रशासनाच्या अधिका-यांनी रोहयोच्या कामांवर प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा दर्जा, मजुरांची उपस्थिती यासह विवीध बाबींची पाहणी करणे अपेक्षीत असतांना अधिकारी मात्र कार्यालयातुनच कामाच्या स्थळी भेट दिल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकतात. त्यामुळे एकंदरीतच सर्वानुमते शासनाच्या निधीची सोयीस्करपणे विल्हेवाट लावण्याचा प्रकार खुले आमपणे सुरू असल्याने रोजगार हमी योजनेच्या मुळ उद्देशाला हरताळच फासल्या गेला आहे.
साभार :- देशोन्नती


Tuesday, 10 April 2012

लाकडाच्या काळाबाजारातील व्यापारी उतरले रोहयोच्या कामात

पारवा वनपरिक्षेत्रात प्रचंड गैरप्रकार
बंधारे खोदताना झाडांची कत्तल

महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणा-या कामांमध्ये लाकडाचा काळाबाजार करणा-या व्यापा-यांचा शिरकाव झाला आहे. रोहयोची कामे संबंधीत विभागाने मजुर लावून करावी असा नियम आहे. मात्र अधिकारी या नियमाला धाब्यावर बसवुन कंत्राटदारांना ही कामे देत असल्याचा धक्कादायक प्रकार घाटंजी तालुक्यासह ईतरही भागात बिनबोभाटपणे सुरू आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी अनेक कामे प्रामुख्याने निसर्ग संवर्धन व पर्यावरणाशी संबंधीत आहेत. मात्र ही कामे करतांना झाडांची बेसुमार कत्तल केल्या जात आहे. बंधारे, वनतळे यासह विवीध कामांमध्ये येणा-या आजुबाजूच्या वनराईला तोडण्यात येत असल्याने या कामातून नेमके कोणते निसर्ग संवर्धन साधल्या जात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पारवा वनपरिक्षेत्रात हा प्रकार सर्रास सुरू आहे. रोहयोच्या कामातील मलिद्यासह आजुबाजूची मौल्यवान झाडे तोडण्याचा अलिखीत परवानाच मिळत असल्याने लाकडाच्या काळाबाजारातील तगडे व्यापारी आता रोहयोच्या कामातही उतरले आहेत. जिल्ह्यातील लाकडाच्या ठेकेदारीत चर्चेत असलेले लच्छु पाटील, अमीन शेख, राम बाबु, मुन्ना सेठ यांचा या कामांमध्ये सध्या चांगलाच बोलबाला आहे. प्रादेशिक पक्षांच्या स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन हे व्यापारी धडाक्यात ही कामे करीत आहेत. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा केळापूर तालुक्याचा एक पदाधिकारी या कामांमध्ये आघाडीवर आहे. स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अधिका-यांशी संगनमत करून रोहयोची कामे बळकावीत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. नियमानुसार एका गावामध्ये रोहयोंतर्गत जास्तीत जास्त ६० लाखांची कामे करता येतात. मात्र राजकीय दबावतंत्र तसेच मिळणा-या कमीशनसाठी अधिकारी काही गावांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त निधीच्या कामाना मंजुरात देत आहेत. रोहयोची बरीच कामे जंगलात करण्यात येत असल्याने सागवानासारखी मौल्यवान झाडे कंत्राटदारांच्या घशात जात आहे.
साभार :- देशोन्नती 

घाटंजीत रोहयोच्या कामांमध्ये जेसीबीचा धुमाकूळ



गेल्या काही महिन्यांपासुन घाटंजी तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये जेसीबीचा खुले आम वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वनविभाग त्यामध्ये आघाडीवर आहे.  तालुक्यातील अनेक भागांमध्ये सध्या वनविभागातर्फे बंधा-यांचे काम सुरू असुन त्यासाठी जेसीबीचाच प्रामुख्याने वापर होत आहे. रोजगार हमी, ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ या एकाच वाक्याने शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत नेमका काय प्रकार सुरू आहे हे लक्षात येते. घाटंजी व पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत बंधारे, वन्यजीवांसाठी पाणी साठवण तलाव, यासह विवीध कामे सध्या सुरू आहेत. ही सर्व कामे रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या मजुरांच्या माध्यमातून करण्यात यावीत असा नियम आहे. मात्र महसुल व वनविभागाच्या अधिका-यांनी या नियमाला सपशेल हरताळ फासुन बिनदिक्कतपणे जेसीबी व तत्सम यंत्रांचा वापर करून ही कामे करण्याचा सपाटा लावला आहे.
बहुतांश ठिकाणी रात्रीच्या वेळी ही कामे केल्या जात आहेत. संबंधीत कामांवर एकही मजुर उपस्थित नसतांना मस्टरवर मात्र मजुरांची उपस्थिती असल्याचे दाखविण्यात येत असल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत होणारी अनेक कामे अनावश्यक ठिकाणी करण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही तिथे बंधारे बांधण्याची किमया वनविभाग करीत आहे.
साभार :- देशोन्नती