Pages

Showing posts with label वनविभाग. Show all posts
Showing posts with label वनविभाग. Show all posts

Monday, 25 June 2012

वनविभागाच्या इमारतीचे ना.मोघेंच्या हस्ते लोकार्पण

तालुक्यातील वाढोणा(खु) येथे 'कॅम्पा' अंतर्गत वनविभागाची इमारत आणि सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा इमारतीचे  उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते नुकतेच झाले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशीक) डॉ. दिनेशकुमार त्यागी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पांढरकवडाचे उपवनसंरक्षक अ.पा. गि-हेपुंजे, जि. प. सदस्य योगेश पारवेकर, देवानंद पवार, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष इकलाख खान पटेल, पं.स. सभापती शैलेश इंगोले, रफिक पटेल,  स्वामी काटपेल्लीवार,  संजय आरेवार, रूपेश कल्यमवार, किशोर दावडा, प्रजय कडू पाटील, रमेश आंबेपवार, शालिक चवरडोल आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि वनविभागाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
रामू पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, राजू निकोडे, श्रीकांत देशमुख, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, नायब तहसीलदार जयस्वाल, बाबाराव उदार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन दीपक महाकुलकर, प्रास्ताविक पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मणराव गाडे तर आभार प्रदर्शन चिखलवर्धाचे वनरक्षक शांतीदूत मुळे यांनी केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळीराम उईके, भाऊराव कोवे, सूर्यभान मेश्राम, सज्जनराव कुडमेथे, हॉफिज पठाण, गजानन भोयर, पारवाचे क्षेत्र सहायक शकील खान, विजय कडू (पहापळ), वाढोणा बीट गार्ड वसंतराव लामतुरे, वैजनाथ बांगर, संजय जिरकर, नरेंद्र मस्के, राजू गोटे, पवन बाजपेयी, विलास पतंगे, गजानन गहुकार, श्रीकृष्ण येसनसुरे, विजय शुक्ला, पाटापांगराचे क्षेत्र सहायक जगदीश पेंदोर यांनी परिश्रम घेतले.
     

साभार :- देशोन्नती 

Thursday, 14 June 2012

वन्यजीव संरक्षण कायदा धाब्यावर बसवुन होतात सापांचे खेळ

वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष





वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये साप व तत्सम जीवांना पकडणे, त्यांचे प्रदर्शन करणे, खेळ करणे हा गंभिर गुन्हा आहे. मात्र असे असले तरी घाटंजी तालुक्यातील विवीध भागांमध्ये दुर्मीळ जातीच्या सापांचे खेळ करण्याचा प्रकार हल्ली चांगलाच फोफावला आहे. वनविभाग, पोलीस यंत्रणा यासह वन्यजीवप्रेमींचेही  याकडे दुर्लक्ष होत आहे. घाटंजी शहरातील प्रमुख चौकांमध्ये सध्या सापांचा खेळ करण्याचा प्रकार नित्यनेमाने सुरू आहे. विशेष म्हणजे असे खेळ करतांना चिमुकल्या बालकांचाही वापर होत असुन या लहान मुलांच्या हातात साप देऊन लोकांना खेळाकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.
नाग, धामण, पाणदिवड यासह विवीध जातीच्या सापांचा खेळात उपयोग केल्या जातो. हा खेळ करणा-यांना सापांविषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ते हाताळतांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतल्या जात नाही. कापडी पिशव्यांमध्ये सापांना कोंबुन ठेवल्या जाते. त्यामुळे अनेकदा साप चार दोन दिवसातच दगावतात. सापांच्या खेळामध्ये चिमुकल्या मुलांचा वापर करण्याचा प्रकारही वाढ़ल्याने साप हाताळताना या मुलांच्या जीवाला धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या बालमजुरी विरोधातील अभियान सुरू आहे. मात्र भर चौकामध्ये लहान बालकांचा जीवघेण्या प्रयोगामध्ये उपयोग होत असतांना यंत्रणा मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे अभियान केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसुन येत आहे. 
वन्यजीवांचे संरक्षण व्हावे व त्यांचे कुठेही खेळ अथवा प्रदर्शन होऊ नये यासाठी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यान्वये साप व अन्य वन्यजीवांना पकडून त्यांचे प्रदर्शन करणा-यांवर गुन्हा दाखल करता येतो. या कायद्याचे पालन व्हावे याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन, वनविभाग व पोलीस यंत्रणेवर असते. मात्र याबाबत कोणीही गंभिर असल्याचे आढळत नाही. अनेकदा काही जागरूक नागरीक असे खेळ सुरू असतांना वनविभागाला कळवितात मात्र वनविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनाच या कायद्याबाबत पुरेशी माहीती व गांभिर्य नसल्याने या कायद्याचे खुलेआम उल्लंघन होते. गेल्या काही वर्षात या कायद्यान्वये वनविभागाने तालुक्यात अपवादात्मक स्थितीतही कुणावर गुन्हा दाखल केल्याचे ऐकीवात नाही. नागरीकांनीच याबाबतीत सतर्क राहुन वन्यजीवांचे खेळ सुरू असल्यास वनविभाग अथवा पोलीसांना कळवुन कार्यवाही करण्यास भाग पाडण्याची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 10 April 2012

घाटंजीत रोहयोच्या कामांमध्ये जेसीबीचा धुमाकूळ



गेल्या काही महिन्यांपासुन घाटंजी तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये जेसीबीचा खुले आम वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वनविभाग त्यामध्ये आघाडीवर आहे.  तालुक्यातील अनेक भागांमध्ये सध्या वनविभागातर्फे बंधा-यांचे काम सुरू असुन त्यासाठी जेसीबीचाच प्रामुख्याने वापर होत आहे. रोजगार हमी, ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ या एकाच वाक्याने शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत नेमका काय प्रकार सुरू आहे हे लक्षात येते. घाटंजी व पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत बंधारे, वन्यजीवांसाठी पाणी साठवण तलाव, यासह विवीध कामे सध्या सुरू आहेत. ही सर्व कामे रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या मजुरांच्या माध्यमातून करण्यात यावीत असा नियम आहे. मात्र महसुल व वनविभागाच्या अधिका-यांनी या नियमाला सपशेल हरताळ फासुन बिनदिक्कतपणे जेसीबी व तत्सम यंत्रांचा वापर करून ही कामे करण्याचा सपाटा लावला आहे.
बहुतांश ठिकाणी रात्रीच्या वेळी ही कामे केल्या जात आहेत. संबंधीत कामांवर एकही मजुर उपस्थित नसतांना मस्टरवर मात्र मजुरांची उपस्थिती असल्याचे दाखविण्यात येत असल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत होणारी अनेक कामे अनावश्यक ठिकाणी करण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही तिथे बंधारे बांधण्याची किमया वनविभाग करीत आहे.
साभार :- देशोन्नती