Pages

Tuesday 11 September 2012

अपघातातील आरोपीच्या अटकेसाठी टिटवी येथे रास्तारोको





तालुक्यातील टिटवी बसथांब्यावर काही दिवसांपुर्वी झालेल्या अपघातातील आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी टिटवी येथे शिवसेना व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत दलाल यांचे नेतृत्वात सुमारे चार तास चक्काजाम करण्यात आला. भाजपाचा पदाधिकारी व खासदार हंसराज अहिर यांचा निकटस्थ असलेल्या राजु तोडसाम यांच्या स्विफ्ट कारने टिटवी बसथांब्याजवळ गणेश किशोर पोटवडे (वय ९) या विद्यार्थ्यास धडक दिली. यात तो विद्यार्थी गंभिर जखमी झाला. मात्र वाहन चालवित असलेल्या राजु तोडसाम यांनी कोणत्याही प्रकारचे सौजन्य न दाखवता घटनास्थळावरून पळ काढला. अपघातग्रस्त मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे अपघातास जबाबदार असलेल्या तोडसाम यांनी किमान उपचाराचा खर्च उचलावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. शिवाय पोलीसांनी सदर आरोपीस अटक करावी अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आरोपीस अटक करण्यात आली नाही. त्यामुळे आज टिटवी येथिल सुमारे २०० ते ३०० नागरिकांनी घाटंजी पांढरकवडा मार्ग जाम केला. त्यामुळे सुमारे ४ तास वाहतुक ठप्प झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन यांनी आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिल्यावरच गावक-यांनी मार्ग मोकळा करून दिला. यावेळी नायब तहसिलदार एस.व्ही भरडे, जयस्वाल हे उपस्थित होते. एका राजकीय पक्षाच्या कार्यकत्र्याची ही भुमिका अत्यंत निषेधार्ह असुन यापुढे त्यांना या मतदारसंघात फिरू देणार नाही अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत दलाल यांनी दिली.

साभार :- देशोन्नती  

No comments:

Post a Comment