Pages

Tuesday 18 September 2012

टाईमपास करणा-या अधिका-यांना धडा शिकविणार

मनसेचा ईशारा

आपले कर्तव्य विसरून तिन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करण्यासाठी टाईमपास म्हणुन टोलवाटोलवी करण्या-या अधिका-यांना मनसे स्टाईलनेच धडा शिकविल्या जाईल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आला. घाटंजी नगर परिषदेत मनसे कार्यकत्र्यांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर येथिल विश्रामगृहात पत्रपरिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बोक्से, प्रशांत धांदे, एस.टी. कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्याम चंदेल, जिल्हाध्यक्ष गाडगे पाटील, मनसेचे यवतमाळ तालुकाध्यक्ष संजय देठे, घाटंजी तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यांचेकडे केलेल्या तक्रारी, त्यावर दिलेली स्मरणपत्रे यावर मुख्याधिका-यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. दरवेळी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे त्यांनी दिली. सर्वसामान्यांनी विनापरवानगी बांधकाम केले तर न.प.त्यांचेवर दंड ठोठावुन कार्यवाही करते. मग विनापरवाना बांधकाम सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ईमारती व समर्थ मुकबधीर विद्यालयाला वेगळा न्याय का? त्यांचेवर कार्यवाही का करण्यात आली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तुंबलेल्या नाल्या, जीवघेणे रस्ते, बंद पडलेले पथदिवे, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा एक ना अनेक समस्या घाटंजी शहरात असतांना सत्ताधारी, विरोधक व मुख्याधीकारी आपापसात संगनमत करून मलिदा लाटण्यात व्यस्त आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. अवैध बांधकामांवर कार्यवाही करण्यात आली नाही तर यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेच ही अवैध बांधकामे पाडतील असा ईशारा प्रशांत धांदे यांनी यावेळी दिला.  केंद्र , राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता, स्थानिक आमदार मंत्री सत्ताधारी पक्षाचे असे असतांना घाटंजी शहराची भयाण अवस्था संतापजनक असुन राज्याचे अनुभवी मंत्री असलेले ना. मोघे यांच्या राजकीय प्रतिष्ठेला न शोभणारी आहे. त्यांनी आपले आर्णी प्रेम बाजुला ठेवुन घाटंजी शहराच्या विदारक परिस्थितीकडे लक्ष द्यावे असे आवाहन संजय बोक्से यांनी यावेळी केले. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढेही लढा देत राहिल. मात्र त्यासाठी जनतेनेही आम्हाला पाठींबा द्यावा असे बोक्से म्हणाले. यानंतर जनतेला सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी नगर परिषदेत लोकांच्या समस्या सोडविण्यास सपशेल अपयशी ठरली असुन ना.शिवाजीराव मोघे यांना घाटंजीच्या विकासाशी देणेघेणे नसल्याचा आरोप मनसेने यावेळी केला. उल्लेखनिय म्हणजे पत्रपरिषदेला उपस्थित असलेल्या एका कॉंग्रेस पदाधिका-यानेही मनसेच्या या आरोपाला दुजोरा दिला.

साभार :- देशोन्नती  


No comments:

Post a Comment