Pages

Monday, 29 September 2014

अमरावती विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश निमकर

स्थानिक शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील मुख्य लिपिक उमेश कृष्णराव निमकर यांची श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत बहुमताने त्यांची निवड झाली. संघटनेचे राष्ट्रीय सचिव व राज्याध्यक्ष राजाभाऊ बडे यांचे हस्ते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासुन ते येथिल गिलानी महाविद्यालयात कार्यरत आहेत. 

त्यांच्या या निवडीचे संस्थेतील कर्मचारी शुक्रचार्य ढोके, पुरूषोत्तम मेश्राम, संजय जाधव, अभय कराळे, प्रकाश भोरे, स्वरूप नव्हाते, अनिल श्रिवास्तव, मोहन गहणेवार, अनिल कापसे, बाबाराव पुâटाणे, विलास करपे, अचल गिरी, दिनेश बोरेकर, सुनिल डहाके, अशोक गिनगुले, दिनेश खांडरे, सुभाष कनाके, अरूण हेडाऊ, अशोक ढवळे, भिमशंकर मुरार, किरण सोनडवले, विलास गुडधे, लक्ष्मण बोरकर, गजानन मडावी, मंदार भुसारी महाविद्यालयातील विद्यार्थी अमित पडलवार, प्रणित ठाकरे, सुहास दिकुंडवार, सुरज टाले, विशाल वाकोडे, गणेश तारक यांचेसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे.

घाटंजी बाजार समितीचे संचालक मंडळ पुन्हा सत्तारूढ

उच्च न्यायालयाने घाटंजी बाजार समिती बरखास्तीचा निर्णय रद्दबातल ठरविल्याने सभापतींसह संचालक मंडळाने आज प्रभार स्विकारला. बाजार समिती संचालक मंडळाच्या कथित गैरव्यवहाराची तक्रार मनसेने केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीवर बरखास्तीची कार्यवाही केली. हि कार्यवाही राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचा आरोप पुर्वी पासुनच होत होता. 
शिवाय न्यायालयात दाद मागण्याची संधी मिळु नये म्हणुन सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रभार काढुन घेण्याची घाई, बाजार समितीची बाजु ऐकुन न घेता घेतलेला बरखास्तीचा निर्णय यामुळे या संपुर्ण कार्यवाहीवरच संशय व्यक्त केल्या जात होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे तक्रारकर्ते तोंडघशी पडले आहेत. 
बरखास्तीची कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय ७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिला होता. तक्रारकत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र मनसेने सर्वोच्च न्यायालयात जाणे टाळले. त्यामुळे अखेर आज संचालक मंडळाने प्रभार स्विकारला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, सभापती अभिषेक ठाकरे यांचेसह बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, 14 September 2014

घाटंजी पंचायत समितीत अभद्र युती

ना.मोघे गटाला जबर धक्का
सभापती कॉंग्रेसचे शैलेश इंगोले, उपसभापती भाजपाचे रमेश धुर्वे







कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीमुळे ना.शिवाजीराव मोघेंच्या विरोधी गटाने थेट भाजपाशी हात मिळवणी करीत सभापतीपद मिळविले. तर उपसभापतीपद आयतेच भाजपाच्या पदरात टाकले. ऐन विधानसभेच्या तोंडावर घाटंजी पंचायत समितीमध्ये झालेल्या या अभद्र युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश इंगोले विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसच्याच सुवर्णा निकोडे यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. तर उपसभापतीपदी भाजपाचे रमेश धुर्वे यांनी बाजी मारली. त्यांनी कॉंग्रेसच्या रूपेश कल्यमवार यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. 
गेल्या २-३ दिवसांमध्ये घाटंजी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वर्तमानपत्रातून व्हिप बजावला होता. मात्र ना.मोघेंच्या विरोधी गटाने यावर कुरघोडी करत जिल्हाध्यक्षांचा व्हिप तर धुडकावलाच शिवाय गटनेते म्हणुन शैलेश र्इंगोले यांनी देखिल व्हिप काढला. अखेर आज निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचा एक गट व भाजपाचे सदस्य एकत्र आल्याने चित्र स्पष्ट झाले. एकीकडे राज्याच्या राजकारणात कॉंग्रेस भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष व दुसरीकडे घाटंजी मध्ये कॉंग्रेस व भाजपाचे एकत्र आलेले झेंडे पाहुन सर्वसामान्य मतदार मात्र बुचकळ्यात पडला आहे. 
राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जि.प.सदस्य देवानंद पवार यांच्यात निर्माण झालेल्या दुफळीमुळे घाटंजी तालुका कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अवघा जिल्हा अनुभवत असतांना एकेकाळी ना.मोघेंचे मानसपुत्र अशी ओळख असलेल्या देवानंद पवारांनी विधानसभेच्या तोंडावर या निवडणुकीच्या निकालामुळे जबर धक्का दिला आहे. मात्र विधानसभेतही हि अभद्र युती कायम राहणार का? आज कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन असलेले नेते कार्यकर्ते कुणाच्या बाजुने उभे राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस जिंकली...कॉंग्रेस हरली !
अवघे बोटावर मोजण्याईतके सदस्य असलेल्या घाटंजी पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसच कॉंग्रेसच्या विरोधात असल्याने विजय व पराभवाचा एकत्रीत अनुभव घेण्याचा दुर्मिळ योग पक्षाला मिळाला. तर कॉंग्रेस व भाजपाचे नवनियुक्त पदाधिकारी विजयी मुद्रेत बाहेर पडत असतांना माळी महासंघ व काही संतप्त कार्यकत्र्यांकडून मुर्दाबादचे नारे लागल्याने आनंदावर थोडे विरजणही पडले. शेकडो कार्यकत्र्यानी गद्दारांना हाकला, देवानंद पवार मुर्दाबाद, शैलेश इंगोले मुर्दाबाद असे नारे लावले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते. भाजपाने कॉंग्रेसला निवडणुक कक्षात दिलेली साथ रस्त्यावरही दिसुन आली. भाजप व कॉंग्रेस कार्यकत्र्यांची आपापल्या झेंड्यांसह निघालेली विजयी मिरवणुक अभुतपुर्व ठरली. या निवडणुकीत भाजपाने सत्तेसाठी चक्क कॉंग्रेसचा हात धरल्याने पद मिळवुनही नैतिक पराभव करून घेतला आहे. भाजप सदस्य तटस्थ राहिले असते तर एक चांगला संदेश मतदारांमध्ये गेला असता. तालुक्यात पहिल्यांदाच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाचे सदस्य निवडुन आले. मात्र एक जबाबदार विरोधक म्हणुन भाजपाचे सदस्य कधीच दिसले नाही.

Sunday, 4 May 2014

प्रा.अभय पत्की यांना पी.एच.डी.प्रदान

येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अभय केशवराव पत्की यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आचार्य पदवीने गौरविण्यात आले आहे. त्यांना ’’स्टडी ऑफ सम केस्टोड पॅरासाईट्स फ्रॉम फिशेस ऑफ वेस्ट कॉस्ट ऑफ र्इंडीया’’ या विषयावरील शोध प्रबंधासाठी पी.एच.डी.प्रदान करण्यात आली आहे. यासाठी त्यांना श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालय चिखली येथे कार्यरत डॉ.एम.बी.सोनुने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ.के.एम.कुळकर्णी यांनीही त्यांना सहकार्य केले. 
प्रा.अभय पत्की यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी, संचालक र.ऊ.गिरी, अ‍ॅड अनिरूद्ध लोणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए.शहेजाद, डॉ.ए.पी चार्जन, प्रम.बी.बी.चोपडे, प्रा.सि.पी.वानखडे, प्रा.आर.जी.डंभारे, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.आर.व्ही.राठोड, प्रा.जी.सी.भगत यांचेसह सर्व प्राधापक व कर्मचारी वुंदाने कौतुक केले आहे.
  

Saturday, 12 April 2014

घाटंजीत आज ऑल इंडीया मुशायरा व कवी संमेलन

देशातील नामांकीत कवींची उपस्थिती
येथिल हजरत बाबा जानेमन जन्नती रहेमत उल्लाह अलैह दर्गा कमेटीच्या वतीने ता.१३ ला सायंकाळी सहा वाजता आझाद मैदानात ऑल इंडीया मुशायरा व कवी संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 
या कवी संमेलनात उर्दू आणी हिंदीतील प्रख्यात शायर व चित्रपट सुष्टीतील गीतकार राहत र्इंदोरी, शमीम फरहत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे देशातील नामवंत शायर उम्मी अहेमदाबादी, कपील जैन, अलताफ जिया,नईम फराज, तंवीर गाजी, मनोज मद्रासी, अ.हक वफा, नसिम  नवाज, आजीम रायपुरी, फिरोज कादरी, इब्राहिम सागर यांचाही या मुशाय-यामध्ये सहभाग राहणार आहे. 
हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी नि:शुल्क असुन घाटंजी शहरात दुस-यांदा अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन होत आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सैय्यद जावेद, सैय्यद अनवर मुशायरा कमेटीचे शेख आबीद, शेख फारूख, सैय्यद सरफराज, विक्रम लामसोंगे, हितेश सुचक, विठ्ठल भोंग, शेख तौफिक, रितेश सहारे, आशिष रामटेके, योगेश निमकर, राहुल ठाकरे, सैय्यद सद्दाम, बंटी मराठे, सैय्यद नादीर, शेख अनवर, साहेबराव मुन यांनी केले आहे.
साभार : सकाळ