Pages

Sunday 15 April 2012

स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठ्याच्या आश्वासनाची पुर्तता-अभिषेक ठाकरे



आमडी येथिल ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासुन मुबलक पाण्यापासुन वंचित होते. उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलावर्गाची प्रचंड वणवण होत होती. गावक-यांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरविण्याचे धेय्य पुढे ठेवुन वाटचाल केल्याने आज हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या आश्वासनाची पुर्तता झाल्याचा आनंद होत असल्याचे मत घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमडी ग्रा.पं.सरपंच अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केले.
आमडी ग्रामपंचायतींतर्गत राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजुर झालेल्या सुमारे ५० लाखांच्या पाणी पुरवठा योजनेच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. आमडी येथे नुकताच या पाणी पुरवठा योजनेचा भुमिपूजन कार्यक्रम सरपंच अभिषेक ठाकरे यांचे हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सुरेश राठोड (नाईक) होते. यावेळी ग्रा.पं.सदस्य थावरसिंग चव्हाण, विठुजी वाढ़गुरे, किशोर वानखेडे, मंदा गिनगुले, नर्मदा लढे, पुष्पा कनाके, आमडी येथिल जेष्ठ नागरीक शंकर ठाकरे, बाबाराव महल्ले, विठ्ठल गावंडे, नामदेव पांगुळ, उत्तम चव्हाण, उमाकांत ठाकरे, सिताराम ठाकरे, डोमाजी जाधव, हिरालाल जयस्वाल, रमेश डंभारे, अंबादास निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या योजनेतून आमडी येथे उद्भव विहिर, नलिका वितरण व्यवस्था व पाण्याची उंच टाकी ही कामे करण्यात येणार आहे. सरपंच अभिषेक ठाकरे यांच्या विषेश प्रयत्नातून आमडी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पेयजल योजनेतून सन २०१२-१३ या वर्षासाठी ४९,२२,३२२ रू निधी मंजुर झाला आहे. त्यापैकी ४,९२,२३२ रू रक्कम लोकवर्गणीतून भरण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता यावले, सह अभियंता गभणे यांनी या कामाचा आराखडा तयार केला आहे. 
ही योजना पुर्णत्वास येताच आमडी येथिल गावक-यांना पाण्याची चणचण भासणार नाही याबद्दल अनेकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजु जाधव, अरूण नाईक, मारोती कुकडे, तानबा कुकडे, किसन गिनगुले, निलेश ठाकरे, देवराव वाढगुरे, हरसिंग राठोड, मोहन चव्हाण, पुरूषोत्तम नाईक यांनी अथक परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 



No comments:

Post a Comment