Pages

Saturday 13 October 2012

घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्तांपुढे आता मोठ्या समस्या नाहीत - ना.शिवाजीराव मोघे


तालुक्यातील पुरग्रस्त आता आता ब-याच अंशी सावरले असुन त्यांच्यापुढे कोणतेही ‘मेजर प्रॉब्लेम्स’ नाहीत अशी माहिती राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी पत्रपरिषदेत दिली. घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्त गावांचा दौरा केल्यावर येथिल शासकीय विश्रामभवनात ते पत्रपरिषदेला संबोधीत करीत होते.
यावेळी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान पटेल, घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, तहसिलदार प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती. सध्याच्या परिस्थितीत पुरामुळे वाहुन गेलेल्या विजेच्या खांबांना उभारणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी आधी विज वितरण वंâपनीच्या नियमानुसार विज बिल भरावे लागेल असे ते म्हणाले. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन मदतीबाबत कॅबिनेट मध्येच निर्णय होईल त्यावर आता काहीही बोलता येणार नाही असे एका प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले. तालुक्यात जाहिर झालेला दुष्काळ हा ओला होता की कोरडा यावर ते म्हणाले की याबाबत आपल्याला वर्तमानपत्राच्या बातमीवरूनच माहिती मिळाली. नेमक्या कोणत्या माहितीच्या आधारे हा दुष्काळ जाहिर करण्यात आला याबद्दल अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. 
उपविभागीय कार्यालय आर्णीला होणार असल्याच्या निर्णयावर ते म्हणाले की तो निर्णय शासनाच्या नियमाला अनुसरूनच होत असुन त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही. घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेसच्या नेतृत्वातील सत्ता असुनही आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही यावर ते म्हणाले की नगर परिषदेने मागणी केल्यास निधीची कमतरता पडू दिल्या जाणार नाही. मात्र याबाबत नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना छेडले असता निधीची मागणी सुरूच आहे. तडकाफडकी सर्व कामे शक्य नाहीत. साहेबांकडून गेल्या तिस वर्षात काही घडले नाही ते आता काय घडणार ? असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी ना.मोघेंनी तालुक्यात प्रस्तावीत असलेल्या विवीध विकासकामांची माहिती दिली. त्यामध्ये निवासी शाळा, मोवाडा आश्रमशाळेचे जांब येथे स्थानांतरण, अनुसूचीत जमातीच्या मुलामुलींसाठी वस्तीगृह, घाटंजी येथे क्रिडा संकुल तसेच विवीध सहा ठिकाणी पुल बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
साभार :- देशोन्नती  

No comments:

Post a Comment