Pages

Showing posts with label ठाणेदार. Show all posts
Showing posts with label ठाणेदार. Show all posts

Sunday, 17 March 2013

पोलीसच बनले अवैध व्यवसायाचे ‘पालनहार’


गेल्या काही वर्षांपासुन घाटंजी तालुका अवैध व्यावसायीकांसाठी अत्यंत सुरक्षीत परिसर झाला आहे. कारण ज्यांच्या खांद्यावर या व्यवसायांना पायबंद घालण्याची जबाबदारी आहे ती पोलीस यंत्रणाच जाणिवपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. जणु काही पोलीसच या अवैध व्यवसायांचे पालनहार आहेत की काय असे वाटण्या एवढी गंभिर परिस्थिती आहे. पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर चालणारे मटका अड्डे या गोष्टीची साक्ष देतात. तर क्लबच्या गोंडस नावाखाली चालणा-या जुगार अड्ड्यांवर महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. पारवा पोलीस स्टेशन परिसरात अवैध दारू व मटका व्यवसायाची भरभराट आहे. गेल्या वर्षभरात घाटंजी व पारवा पोलीस स्टेशन परिसरात विषेश शाखेच्या पथकाने अनेकदा छापे मारले. मात्र स्थानिक पोलीसांनी आजवर कोणताही मोठा छापा मारल्याचे ऐकीवात नाही. केवळ विशेष शाखेच्या छाप्यानंतर औपचारीकता म्हणुन तुरळक कार्यवाही दाखविण्यात येते. घाटंजी शहरात उघडपणे मटका अड्डे चालतात. कन्या शाळा, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, घाटी यासह विवीध परिसरात अगदी सर्वसामान्यांना दिसेल अशा ठिकाणी हे अड्डे चालतात. मात्र पोलीसांना त्यावर कार्यवाही करण्याची गरज वाटत नाही. तालुक्यातील पारवा, चिखलवर्धा, घोटी, शिवणी, जरूर यासह ग्रामिण भागात कुठे अवैध दारू तर कुठे मटक्याचे प्रस्थ निर्माण झाले आहे. तालुक्यात दोन पोलीस स्टेशन, पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध असुनही अवैध व्यवसायांवर पोलीसांचे नियंत्रण नसेल तर ते जाणिवपुर्वकच त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सिद्ध होते. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असतील तिथल्या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याचे सुतोवाच पोलीस अधिक्षकांनी केले होते. मात्र घाटंजी तालुक्यातील परिस्थितीकडे पाहता तालुक्याला यामध्ये ‘सुट’ तर देण्यात आली नाही ना असा संभ्रम निर्माण होईल एवढी गंभिर परिस्थिती आहे. ठाणेदार जगमोहन जोहरे यांच्या काळात अवैध व्यावसायीकांवर निर्माण झालेली जरब पुन्हा कधी होईल याची नागरीक वाट पाहात आहेत. 
साभार :- देशोन्नती 

Monday, 18 June 2012

अवैध वाहतुकीने घेतला नवयुवकाचा बळी

पारवा पोलीसांच्या नाकर्तेपणाचा परिणाम

पारवा पोलीस स्टेशन हद्दीसह संपुर्ण घाटंजी तालुक्यात बिनबोभाटपणे सुरू असलेल्या अवैध वाहतुकीमुळे 
१५ वर्षीय नवयुवकाचा बळी घेतला. आयता येथुन घाटंजीकडे येताना अज्ञात काळी पिवळीने दुचाकीला धडक दिल्याने अभिजीत अशोक खडसे (१५) याचा उपचाराकरीता यवतमाळला नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला. सदर युवक आपल्या मित्राच्या दुचाकीवर दुपारी १२ वाजताच्या सुमारास घाटंजीकडे येत होता. यादरम्यान पाटापांगरा गावाजवळ काळी पिवळीने दुचाकीला धडक दिली. या भिषण धडकेत जखमी झालेल्या दोन्ही युवकांना उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले. मात्र अभिजीत याचा रूग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे. उल्लेखनिय म्हणजे अपघाताला ६ तास लोटुनही पारवा पोलीसांकडे घटनेची नोंद झाली नव्हती. यावरूनच पोलीस याबाबत किती गंभिर आहेत याची प्रचिती येते. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी अवैध वाहतुकीला खुली सुट दिल्याने प्रवाशी वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी नेण्यात येतात. गाडीच्या टपावर व अवतीभवती बिलगुन असलेले प्रवाशी वाहने घाटंजी तालुक्याच्या प्रत्येक रस्त्यावर आढळतात. पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक त्यांचेवर असल्याचे दिसत नाही. घाटंजी व पारव्याच्या बसस्थानकासमोर नेहमीच अवैध वाहतुकदारांचा गराडा असतो. अनेकदा वाहतुक पोलीसांच्या नजरेसमोर बसस्थानक परिसरातून प्रवाशी घेतल्या जातात. मात्र त्याकडे पोलीसांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याची माहीती आहे. ठाणेदारांकडून जसा आदेश मिळतो त्याचेच पालन करावे लागत असल्याचे एका वाहतुक पोलीसाने खासगीत सांगीतले. अवैध वाहतुकदारांकडून पोलीसांना महिन्याकाठी मिळणा-या मलिद्यामुळेच बेशिस्त वाहतुकीला मोकळीक दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 
मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला असुन यावर वेळीच नियंत्रण न आणल्या गेल्यास यापेक्षाही गंभिर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अवैध वाहतुकीला चालना देणा-या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Friday, 8 June 2012

पारवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची तिव्रता दडपण्याचा प्रयत्न

सव्वा लाखांची चोरी ७२ हजारात दडपली
ठाणेदार वंजारेंचा मनमानीपणा
पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

घरात झालेल्या १ लाख ३१ हजार रूपयांच्या चोरीची तक्रार घेताना केवळ ७२ हजार रूपयांचीच चोरी झाल्याची नोंद घेणा-या ठाणेदार पंजाब वंजारेंची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याची तिव्रता कमी करून  बर्किंगचे प्रकार वाढल्याचे या घटनेतून प्रकर्षाने दिसुन येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वघारा येथिल रहिवासी शेख मोईन शेख हुसेन हे एका कौटूंबीक कार्यक्रमानिमित्य ३ दिवस बाहेरगावी गेले होते. दि.२८ मे रोजी घरी परत आल्यावर घराचे कुलूप तुटून होते, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाट फोडून लॉकरमधील ३५ हजार रूपये रोख, मोबाईल तसेच आणखी दुस-या कपाटातील ९३ हजार रूपये असा एकुण १ लाख ३१ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. वघारा हे गाव पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने तक्रारकर्ते चोरीची फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. तोंडी तक्रारीवरून फिर्याद दाखल करतांना ठाणेदार पंजाब वंजारे यांच्या सांगण्यानुसार संबंधीत कर्मचा-याने तक्रारीत केवळ ७२ हजार रूपयेच चोरीस गेल्याचा उल्लेख केला. तक्रारकत्र्यांनी वारंवार सांगीतले की, आमच्या घरी १ लाख ३१ हजार रूपयांची चोरी झाली आहे. त्यामुळे तेवढीच रक्कम तक्रारीत नोंद करा. मात्र आपल्याच गुर्मीत वावरणारे ठाणेदार वंजारे यांनी तक्रारकर्त्यांना ‘तुम्हाला काही समजत नाही, आम्ही बरोबर करतो, तुम्ही चुप बसा’ असे बजावले. त्यानंतर एकदा घरी येऊन थातुरमातुर चौकशी केली. मात्र अद्याप चोरट्यांना पकडण्यात पोलीसांना यश आलेले नाही. गेल्या काही कालावधीत पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या अनेक घटना झाल्या असुन बहुतांश घटनांमधील आरोपी पोलीसांच्या हाती लागलेले नाही. जवळजवळ प्रत्येक घटनेमध्ये गुन्ह्याची तिव्रता कमी करण्याचा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये वाढला आहे.
चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी बोलाविण्यात येणा-या श्वानपथकासाठी खर्च लागतो असे कारण देऊन फिर्यादींकडून पैसे उकळल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे.
ठाणेदार पंजाब वंजारे यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आश्रय देण्याच्या कार्यपद्धतीमुळे पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय बळावले आहेत. त्यामुळे ठाणेदार वंजारेंची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 21 January 2012

सावंगी संगमच्या ग्रामसेवकाला अर्धनग्न करून मारहाण

तालुक्यातील सावंगी संगम येथिल ग्रामसेवकाला विषेश ग्रामसभेदरम्यान तिन लोकांनी कपडे काढायला लावून मारहाण केल्याची घटना घडल्याने त्याचा सर्वत्र निषेध होत आहे.
या घटनेतील आरोपी अशोक नालमवार, व्यंकटी अंगावार, आशन्ना जाधव यांच्या विरोधात कलम ३५३, ३४१, २९४, ५०६, ४२७, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जि.प.व पं.स.निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांकडे शौचालय आहे किंवा नाही या विषयासाठी विषेश ग्रामसभा बोलविण्यात आली होती. यादरम्यान आरोपींनी घरकुल व बि.पी.एल.यादी संदर्भात ठराव घेण्याची मागणी केली. मात्र विषेश ग्रामसभा असल्याने तसा ठराव घेता येणार नाही असे ग्रामसेवकाने सांगताच आरोपींनी सर्वांसमक्ष ग्रामसेवक हरिदास मडावी यांना कपडे काढण्यासाठी जबरदस्ती केली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करून बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी गदारोळ घालुन तेथिल खुच्र्या व ईतर सामानाची तोडफोड केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या घटनेमुळे कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची फिर्याद गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांनी पारवा पोलीस स्टेशनला दाखल केली असुन पुढील तपास सुरू आहे.


घाटंजीत ३६ उमेदवारांचे नामांकन दाखल
नामांकन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी घाटंजीत जि.प.गटात १४ तर पंचायत समितीसाठी २२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यामध्ये पार्डी नस्करी गटात ५, पार्डी(न) गणात २ तर शिरोली गणात १, शिवणी गटात ५ शिवणी गणात ६, मानोली गणात ३, पारवा गटात ४, पारवा गणात ६ व कुर्ली गणात ४ उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करणा-यांमध्ये पार्डी (न) जि.प.गटात वैशाली भोयर, शांता आसुटकर, उषा राठोड, ज्योती निकडे, शिवणी गटातून विशाल कदम, जितेंद्र ठाकरे, सतिश भोयर, प्रशांत धांदे, मोहन जाधव, पारवा गटात अविनाश ठाकरे, रमेश यमसनवार, योगेश पारवेकर, पांडूरंग निकोडे, पार्डी गणातून रत्नमाला कोंडेकर, अर्चना राठोड, शिरोली गणात अनिल गेडाम, शिवणी गणात गिरीधर राठोड, नरेंद्र चव्हाण, गजानन भोयर, संजय आडे, रविंद्र चव्हाण, शैलेष इंगोले, मानोली गणात सुशिला मंगाम, सुमित्रा पेन्दोर, रूख्मा कनाके, पारवा गणात अरूणा महल्ले, विद्या गावंडे, पुष्पा खडसे, माधुरी भोयर, शिल्पा ठाकरे, सुनिता शेंडे, सुवर्णा निकोडे, कुर्ली गणात गजानन गाऊत्रे, रमेश आंबेपवार, रूपेश कल्यमवार, रमेश वाटगुरे यानी नामांकन दाखल केले.


वादग्रस्त ठाणेदार अंबाडकर घाटंजीत रूजू
दिग्रस येथे वादग्रस्त ठरलेले ठाणेदार ओ.पी. अंबाडकर यांची घाटंजी पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. आज त्यांनी घाटंजीच्या ठाणेदारपदाचा प्रभार घेतला. घाटंजीचे यापुर्वीचे वादग्रस्त ठाणेदार बाबुराव खंदारे निलंबीत झाल्यापासुन या पदाचा प्रभार सुरूवातीला सुधाकर अंभोरे व त्यानंतर स.पो.नि.अरूण गुरूनूले यांचेकडे होता. दिग्रस येथे अंबाडकर यांच्या विरोधात वकीलांच्या संघटनांनी आंदोलन केल्याने त्यांची बदली करण्यात आली.
साभार :- देशोन्नती