Pages

Friday, 2 August 2013

शि.प्र.म. विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती




राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ईयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.) परिक्षेत येथिल शि.प्र.मं.विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 
समिक्षा संजय कांबळे, शौरी विकास डंभारे, शिवाणी गणेश वल्लपवार, शरयु प्रविण चौधरी, सुबोध राजेश मुनेश्वर,  अनिकेत सुभाष निकम, अजिंक्य दत्ताजी पांढरमिसे, प्रतिक श्रिराम कनाके या आठ विद्याथ्र्यांना ईयत्ता बारावी पर्यंत दरमहा पाचशे रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्याथ्र्यांना संस्थेचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव अ‍ॅड. अनिरूद्ध लोणकर, मुख्याध्यापक बाबा भोंग, उपमुख्याध्यापक पुरूषोत्तम बोभाटे, पर्यवेक्षीका कुसूम महाकाळकर, देविदास टोंगे, जी.आर.सिंहे, एस.जी.राठोड, दिपक सपकाळ, महेश वाघाडे, डी.के.मस्के, मनोज बुरांडे, संदीप नखाते, अनुप मानकर, फिरोज पठाण, प्रशांत उगले, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

अंशकालीन निदेशकांचे सामाजीक न्यायमंत्र्यांना साकडे

राज्यातील १८६४५ निदेशक बेरोजगार : पुनर्नियुक्तीची मागणी
राज्यातील न.प., मनपा, तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अंशकालीन निदेशकांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक अंशकालीन निदेशकांनी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांची भेट घेतली. 
या वर्षी राज्यातील सुमारे १८ हजार ६४५ अंशकालीन निदेशकांना पुनर्नियुक्ती देण्यात न आल्याने त्यांचेवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याच्या अधिनियमान्वये वेंâद्र सरकारने ईयत्ता ५ ते ७ वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी क्रिडा, कार्यानुभव व कला या तिन अंशकालीन निदेशकांची नियुक्ती केली. त्यानुसार २०१२ या वर्षात निदेशकांनी काम सुद्धा केले. 
मात्र १८ फ़ेब्रुवारी २०१३ ला केंद्र शासनाच्या मान्यता मंडळाच्या बैठकीत सर्व शिक्षा अभियानांतर्गत चालणा-या २३ उपक्रमांमधुन १६ उपक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद सर्व शिक्षा कार्यक्रमांतर्गत करण्यात आली नाही असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या १९ मार्च २०१३ च्या परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहे. मात्र १३ मे २०१३ ला केंद्रशासनाने काढलेल्या शुद्धीपत्रकात कला, क्रिडा व कार्यानुभव निदेशकांच्या पदांसाठी २०१३-१४ वर्षाकरीता अनुदानाची तरतूद केली आहे. 
शासनाने शैक्षणीक सत्र २०१३-१४ मध्ये सर्व शिक्षा अभियानाला ७११.५० कोटी अनुदानास मंजुरी सुद्धा दिली आहे. मात्र तरी देखिल राज्यातील १८ हजार ६४५ निदेशकांना शासनाने पुनर्नियुक्ती दिलेली नाही अशी तक्रार आहे. सामाजीक न्यायमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करून बेरोजगारांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक निदेशकांनी यावेळी केली असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जितेंद्र जुनगरे यांनी कळविले आहे.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

घाटंजी पालिकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे अनुकंपा उमेदवाराची फरफट

जिल्हाधिका-यांचा आदेशही मुख्याधिका-यांसाठी ‘कवडीमोल’
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी शासन निर्णयानुसार पात्र असतांनाही केवळ घाटंजी पालिका मुख्याधिका-यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे विक्की माधव शेंद्रे हा उमेदवार नोकरीपासुन वंचित आहे.
सदर उमेदवाराने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि.१४ जुन २०१३ ला जिल्हाधिकारी कार्यालयाने घाटंजी नगर परिषदेला पत्र पाठवुन शासकीय निकषानुसार अनुकंपा तत्वावरील पद भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी असे सुचित केले होते. तसेच या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात यावा असेही या पत्रात नमुद करण्यात आले होते. मात्र जिल्ह्याधिका-यांनी आदेश देऊनही घाटंजी नगर परिषद प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.
त्यामुळे घाटंजी पालिका आता जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही महत्व देत नसल्याचेच सिद्ध झाले आहे. सुधारीत आकृतीबंधानुसार नगर परिषदेने पदभरती करतांना प्रथम पदोन्नतीची पदे, त्यानंतर अनुकंपा त्वावरील पदे, लाडकमिटीची पदे व शेवटी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सरळ सेवा भरती द्वारे पदे भरण्याचे निकष ठरवुन देण्यात आले आहेत. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदांनी आपल्या आस्थापनेवर कोणतेही पद कंत्राटी, हंगामी, मानधन तत्वावर अथवा प्रतिनियुक्ती द्वारे भरण्यात येऊ नये असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवुन नगर परिषदेचे पदाधिकारी व प्रशासन कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याच्या प्रयत्नात होते. 
नगर परिषदेच्या ग्रंथालयातील पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यास पात्र असलेला उमेदवार विक्की माधव शेंद्रे याने ग्रंथालय शास्त्रातही पदवी संपादन केली आहे. तसेच तो कला शाखेत पदव्युत्तर पदवीधारक आहे. सदर उमेदवाराचे वडील माधव शेंद्रे यांचा २५ जुन २००६ मध्ये कार्यालयीन कामकाजा दरम्यान मृत्यू झाला. ते लिपिक पदावर कार्यरत होते. त्यामुळे समकक्ष पदावर कार्य करण्यास सदर उमेदवार पात्र आहे. शिवाय अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये तो एकमेव उमेदवार आहे. तरी देखिल न.प.प्रशासनाकडून त्याला नियुक्ती देण्यास जाणिवपुर्वक दिरंगाई केल्या जात असल्याची तक्रार त्याने जिल्हाधिका-यांकडे केली होती. मात्र मुख्याधिकारी विपीन बन्नोरे हे जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही जुमानत नसल्याने कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडीलांच्या निधनामुळे कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी सदर उमेदवारावर आहे. अर्धांगवायुने ग्रस्त आई व तिन बहिणींसह कुटूंबाची उपजिवीका तो कशीबशी सांभाळत आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नगर परिषदेला नाही. जिल्हाधिका-यांचा आदेश झुगारणा-या मुख्याधिका-यांवर वरिष्ठांचा अंकुश नाही हे यातुन सिद्ध होत आहे. या प्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सदर उमेदवाराने ‘सकाळ’ शी बोलतांना सांगितले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडीयाच्या शहर शाखेचे गठण

दि.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इडीया च्या घाटंजी शहर शाखेचे नुकतेच गठण करण्यात आले. शहराध्यक्षपदी गजानन भावराव मनवर, सरचिटणीसपदी आशिष विठ्ठलराव कांबळे व कोषाध्यक्षपदी विरेंद्र पिलावन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरीत कार्यकारीणीमध्ये संरक्षण विभाग उपाध्यक्ष स्वप्निल खोब्रागडे, प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष स्वप्निल कांबळे, संस्कार विभाग उपाध्यक्ष सचिन खोब्ब्रागडे, कार्यालय सचिव मयुर भवरे, हिशेब तपासणीस सचिन भगत, संरक्षण विभाग सचिव अमोल मानकर, प्रचार व पर्यटन विभाग सचिव प्रतिक खरतडे, संस्कार विभाग सचिव प्रविण बागेश्वर, संघटक संरक्षण विभाग चंदू खरतडे, रवि कांबळे, वैभव निखाडे, शुभम मनवर यांचा समावेश आहे. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इडीयाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष रवि भगत यांचे प्रमुख उपस्थितीत या कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस नरेंद्र भगत व आभार प्रदर्शन तालुका संस्कार विभाग उपाध्यक्ष संतोष जिवने यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल नगराळे व अविनाश खरतडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   

Sunday, 30 June 2013

पिवळ्या हळदीने आणली लक्ष्मी घरात

घाटंजी तालुक्यातील रमेश आंबेपवार यांनी घेतले दिड एकरात ४६ क्विंटल हळदीचे उत्पन्न



केवळ शासकीय योजनांच्या भरवशावर न राहता शेतक-याने घाम गाळुन शेती कसली तर धरणीमाय सोनेच पिकवते. शेतीवर असा निढळ विश्वास असलेल्या घाटंजी तालुक्यातील राजापेठ येथिल उपक्रमशील शेतकरी रमेश गंगण्णा आंबेपवार यांनी अवघ्या दिड एकर शेतीमध्ये तब्बल ४६ क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. 
कापुस, सोयाबीन अशा पारंपारीक पिकांव्यतिरिक्त अन्य कोणते पिक घेण्याची रिस्क अनेक शेतकरी घेत नाहीत. पण तरी देखिल अवघी २ हेक्टर ६० आर शेती असलेल्या रमेश आंबेपवार या शेतक-याने धाडस केले. दिड एकर शेतीत हळद, एका एकरात कापुस व ४ एकरात सोयाबीन पिकाचे उत्पादन घेऊन त्यांनी पारंपारिक शेतीसोबतच नाविन्यपुर्ण पिकही घेतले. ४६ क्विंटल हळदीसह १७ क्विंटल कापुस व १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न त्यांना झाले आहे. कृषी विभागामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या पिक पाहणी कार्यक्रमात परभणी व हिंगोली येथे शेतक-यांनी हळदीच्या पिकांमधुन साधलेली प्रगती पाहुन प्रेरणा मिळाली व त्यानंतर हा प्रयत्न केला. अनेकांनी सुरूवातीला शंका कुशंका व्यक्त केल्या मात्र स्वत:च्या मेहनतीवर विश्वास असल्याने केवळ दिड एकरात एवढे उत्पन्न घेतल्याचे आंबेपवार ठामपणे सांगतात. 
त्यांच्या शेतात विहिरीच्या पाण्याने ओलीताची व्यवस्था आहे. शेती कमी असली तरी स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर, मळणीयंत्र व पेरणीयंत्र अशी आधुनिक शेतीसाधने त्यांच्याकडे आहेत. शिवाय शेतीला जोडधंदा म्हणुन दुधाचा व्यवसायही ते करतात. त्यांच्याकडे ६ म्हशी आहेत. त्या दिवसाला सुमारे २५ लिटर दुध देतात. राजापेठ या छोट्याशा गावात नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. काही शेतक-यांचा एका गट मिळुन सुमारे ५० एकरात गट शेती करण्यात येते. या मंडळाच्या माध्यमातून गावातील शेतक-यांसाठी नाविण्यपुर्ण उपक्रम, चर्चासत्र अशा कार्यक्रमांच्या आयोजनात आंबेपवार यांचा मोलाचा वाटा असतो. ते घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालकही आहेत. 
पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार व कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे ते आवर्जुन सांगतात. शेतक-यांनी केवळ शासकीय योजनांच्या मागे लागुन वेळ न गमावता परिश्रमाने शेती कसल्यास कुण्याही शेतक-यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. मात्र त्यासाठी शेतीला आधुनिकतेची जोड देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत रमेश आंबेपवार यांनी ‘सकाळ’ शी बोलतांना व्यक्त केले.
‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराने होणार गौरव
अत्यंत अल्प शेतीत हळदीचे चांगले उत्पादन घेणा-या रमेश आंबेपवार यांचा कृषी दिनानिमित्य शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्या शेतीप्रती असलेल्या एकनिष्ठतेचा सन्मान केल्या जाणार आहे.
रमेश आंबेपवार :- मोबाईल नं. ९४२०११८५५४
अमोल राऊत, घाटंजी
साभार : सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा